Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

दारूच्या नशेत कार चालवून २५ लोकांना कट मारला!

AKAMAR KANE
Aug 04, 2025 03:47:59
kolhapur, Maharashtra
2c ला फोटो आणि व्हिडिओ जोडले आहे ------ नागपूर - *रामटेक तालुक्यातील नगरधन येथे कारवरील नियंत्रण सुटून कारचालकाने २५ ते ३० लोकांना कट मारला.* - संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यामुळे त्याने २५ ते ३० लोकांना कट मारली. संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग करत त्याला चांगलाच चोप दिला. - ही घटना रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत नगरधन येथे रविवारी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. - *हर्षपाल महादेव वाघमारे असे नाव असून, तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.* - तो चार दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचं सांगितलं जातं. - नगरधनचा साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जात असताना कारवरील ताबा सुटला आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता. कार नाल्यात जाऊन पलटी झाली. - रामटेक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 04, 2025 09:31:07
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_CHILLY_RATE(7 FILES) जालना : पीकपाणी | हिरव्या मिरचीचे भाव 15 दिवसात 7 हजारांनी कोसळले,शेतकरी हतबल अँकर : जालना जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे भाव 15 दिवसांत तब्बल सात हजार रुपयांनी कोसळले आहेत.15 दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपये बाजारभाव मिळत होता.पण गेल्या 15 दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या दरात प्रचंड घसरण पाहायला मिळत असून अलीकडच्या 15 दिवसांपासून मिरचीला केवळ अडीच हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.मिरच्या दरात तब्बल 7 हजारांची घसरण झाल्यानं मिरची उत्पादक शेतकरी चांगलाच हतबल झालाय.गेल्या 15 दिवसांपासून अडीच हजार रुपयांवरच भाव स्थिरावल्यानं मिरची पिकावर केलेला खर्च वसूल करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 04, 2025 09:21:59
Beed, Maharashtra:
**मुंडे भावंडं प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक...!** **पंधरा वर्षांनंतर पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले देवदर्शनासाठी** Anc- राजकारणात अनेकवेळा परस्परविरोधी भूमिका घेणारे राज्यातील चर्चित मुंडे भावंडं आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी एकत्र नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत भाऊ परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी अभिषेक देखील घातला. तब्बल १५ वर्षांत हे दोघं एकत्र देवदर्शनासाठी प्रथमच दिसले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे स्थान असलेले प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला दुसऱ्या सोमवारी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
1
Report
VKVISHAL KAROLE
Aug 04, 2025 09:21:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn boy suicide pkg सकाळी फीड दिले आहे आता बाईट्स जोडले आहेत Anchor : छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मोबाईल न देण्याच्या रागात 16 वर्षीय मुलांना डोंगरावरनं उडी मारून आत्महत्या केली आहे उडी मारताच हा मुलगा मृत्यूमुखी पडला मात्र मोबाईल मिळाला नाही म्हणून एका मुलांना आत्महत्या करणे यामुळे चांगलीच खळबळ झालीय... Vo 1... मोबाईल न दिल्याच्या रागात 16 वर्षीय मुलाची डोंगरावरून उडी आत्महत्या खवडया डोंगरावरून घेतली उडी,जागीच मृत्यू मुलगा पोलीस भरती ची करत होता तयारी फक्त मोबाईल दिला नाही म्हणून रागावलेल्या 16 वर्षीय अथर्व तायडे या  तरुणांन संभाजीनगर मध्ये डोंगरावरनं उडी मारून आत्महत्या केली आहे मूळचा बुलढाण्याचा असलेला हा मुलगा आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता पोलीस भरतीचा प्रशिक्षण तो घेत होता,  त्यांन आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली मात्र आईना सध्या मोबाईल घेण्यास नकार दिला. त्याचाच राग मनात ठेवून मुलगा घरून निघाला थेट खवड्या डोंगरावर पोहोचला आणि उंचावरन उडी मारून त्यानं आत्महत्या केली यात मुलाचा जागीच मृत्यू झालाय... Byte प्रशांत स्वामी, डीसीपी Vo 2... या वयात मुलांना समजून घेऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याशी बोलण्याची त्यांची मानसिकता समजून घेण्याची गरज असल्याचं मानसोपचार तज्ञ सांगतात ..मुलांना या वयात राग अनावर होतो, आजूबाजूला सगळ्यांकडे मोबाईल आहे मग माझ्याकडे का नाही माझे पालक मला का देत नाही असा विचार त्याच्या मनात येतो,  आणि त्यातून ते असले धोकादायक निर्णय घेऊ शकतात , त्यामुळं बालपणापासून मुलांना प्रतिकार शिकू द्यावा, त्याच्या सर्व गरज पूर्ण करताना काळजी घ्यावी असे  मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केलंय.. Byte डॉ संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ञ Vo 3... फक्त मोबाईलच्या हट्टा पायी एका सोळा वर्षे मुलांना अशा पद्धतीने आपलं आयुष्य संपवून घेतलं हे दुर्दैवी म्हणावं लागेल मुलाच्या मृत्यूनंतर आईनं फोडलेला हंबरडा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणण्यास पुरेसा होता, मोबाईल मुळे अनेकांच्या घरात अडचणी निर्माण होताय 10 पैकी 7 केसेस या मोबाईल निगडित असल्याचं तज्ञा सांगतात त्यामुळं जितकं पालकांनीही समजून घ्यायचा आहे तितकच मुलांनीही आताताई निर्णय घेताना काळजी घेण्याची गरज आहे.. विशाल करोळे,छत्रपती संभाजी नगर....
1
Report
PNPratap Naik1
Aug 04, 2025 09:17:07
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop KMC Gherav Feed :- Live U Anc :- कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल आणि रिक्षा आणि महापालिकेला घेराव घातलाय. 85 लाखांच्या बोगस बिले उचल प्रकरणात अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा... स्ट्रीट लाईट खांबात कोट्यावधीचा भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करा,जयप्रभा स्टुडिओ परत द्या आणि प्रभाग फेरफार आणि मतदार यादीत फेरफार झाल्या प्रकरणी शिवसैनिकांनी महापालिकेला घेराव घातलाय. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आला आहे. यावेळी महापालिकेच्या एकूणच कारभारावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी टीका केली. Byte - रविकिरण इंगवले, शिवसेना जिल्हाप्रमुख
3
Report
SMSarfaraj Musa
Aug 04, 2025 09:03:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भटक्या कुत्र्यांच्या टोळीने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला करत केले जखमी.. अँकर - सांगलीच्या संजयनगर मध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने थेट खरात घुसून एका महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.चार ते पाच जणांच्या भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला करून लचके तोडून सविता कोळेकर यांना गंभीर जखमी केले आहे.संजयनगर मधील स्फूर्ती सोसायटी मध्ये एका घरामध्ये महिला एकटी असताना परिसरातील चार ते पाच मोकाट कुत्रे थेट घरात घुसले,त्यानंतर कुत्र्यांनी सविता कोळेकर यांच्यावर हल्ला चढवला,यामध्ये पायाला,हाताला,मानेला चावा घेत जखमी केला आहे,यावेळी सविता कोळेकर यांनी आरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन घरातील कुत्र्यांना हुसकावून लावले आहे.मात्र या घटनेमुळे संजयनगर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरला असून पालिका प्रशासनाकडून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनात भटकी कुत्री सोडू,असा इशारा नागरिकांनी दिला आहे. बाईट - संजय कांबळे - सामाजिक कार्यकर्ते - सांगली.
3
Report
JJJAYESH JAGAD
Aug 04, 2025 08:18:51
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराज राजेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, श्रीराज राजेश्वराच्या जलाभिषेकाची परंपरा भक्तिभावाने पार पाडली जात आहेय. मंदिर परिसरात 'हर हर महादेव' च्या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले होते..पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन अनेक भाविकांनी जलाभिषेक केलाय..मंदिर समिती व पोलिस प्रशासनाकडून गर्दीचे योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहेय. श्रावणात येथे अशीच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते तर दर सोमवारी विशेष गर्दी पाहायला मिळते , हे अकोल्याच्या धार्मिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहेय..
14
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 04, 2025 08:18:33
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- विद्यार्थिनी मनपा कर्मचारी रक्षाबंधन फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरातील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छता करण्याचे काम करत असतात. या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आज अहिल्यानगर शहरातील सविता रमेश प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्त्व सांगत ओला कचरा, सुका कचरा यांचे वर्गीकरण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीने रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे देखील उर भरून आले. यावेळी विद्यार्थिनींनी देखील सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सफाई कर्मचारी बांधव आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यामुळे जसा एक भाऊ आपल्या बहिणीची आईप्रमाणे काळजी घेतो तसेच सफाई कर्मचारी हे आपल्या शहराची काळजी घेत असतात त्यामुळे आज आम्ही सर्व भगिनींनी शहरातील सफाई कर्मचारी बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बाईट:- विद्यार्थी व मनपा कर्मचारी
11
Report
KJKunal Jamdade
Aug 04, 2025 08:18:14
Shirdi, Maharashtra:
Anc - आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा असे घोटाळ्याचे एक ना अनेक प्रकार आपण ऐकले असेल.. मात्र आता चक्क पक्ष प्रवेशामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय.. शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय.. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्ह्या दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.. काय आहे सगळं प्रकरण..? आणि कोण आहे तो नेता..? बघूया.. V/O - अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात.. मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.. आपल्या सोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा दावा मारुती मेंगाळ यांनी केला होता.. _SOUND BYTE_ मारुती मेंगाळ ( संग्रहित बाईट ) V/O - मेंगाळ यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आली असून यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप केला जातोय.. यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत, आपण असा पक्षप्रवेश केलाच नसल्याचा दावा केलाय.. Byte - पक्षप्रवेश यादीतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य V/O - या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही.. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत.. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आलंय.. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे आम्ही नेत्यांना कळवलय.. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे दराडे म्हणालेत... Byte - बाजीराव दराडे, संपर्क प्रमुख, शिर्डी लोकसभा, शिवसेना शिंदे गट V/O - दरम्यान 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.. मात्र शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय.. या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी २४ तास अहिल्यानगर
13
Report
KJKunal Jamdade
Aug 04, 2025 08:00:29
Shirdi, Maharashtra:
Anc - देशाच्या सीमांचे रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीतून “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त शिर्डी ते श्रीनगर रक्षायात्रेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी सैनिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेला आज साईबाबा मंदिराजवळून शुभारंभ झाला. V/O - या रक्षारथाच्या माध्यमातून देशभरातून जमा झालेल्या हजारो राख्या थेट श्रीनगरमधील जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. जवळपास २२५० किलोमीटरचा प्रवास करत हा रथ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाबमार्गे जम्मू कश्मीरपर्यंत पोहोचणार आहे.उद्घाटनप्रसंगी संजीवनी सैनिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वाद्य सादरीकरण करीत वातावरणात उत्साह आणि देशप्रेम जागवलं.या उपक्रमाचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाने सामाजिक भान आणि देशप्रेमाचे अनोखे दर्शन घडवले आहे.या उपक्रमाबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अधिक माहिती दिलीये... Bite - विवेक कोल्हे , अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान Bite - साईभक्त महिला
12
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 04, 2025 07:45:45
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Kharmale Presidential File:05 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc:जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे. भारतीय टपाल विभागामार्फत आलेले हे आमंत्रण पोस्टमनने त्यांच्यापर्यंत पोहोचवले. रमेश खरमाळे यांच्या ऑक्सिजन पार्कसारख्या उल्लेखनीय उपक्रमामुळे त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान देशपातळीवर पोहोचले आहे.  गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" या कार्यक्रमात रमेश खरमाळे यांच्या वृक्षारोपण व जलसंधारण उपक्रमांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी जनतेला या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले होते. खरमाळे कुटुंबीयांनी हजारो झाडे लावली असून, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे. “राष्ट्रपती भवनातून आलेले आमंत्रण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे,” अशी भावना रमेश खरमाळे यांनी यावेळी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. Byte:- रमेश खारमळे (माजी सैनिक आणि वनविभात जुन्नर चे कर्मचारी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 07:35:45
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधु अमृतधारा मंदिर अशी ही कावडयात्रा काढली जाते. चिंचाळेश्वर मंदिरात महादेवाची आरती करून या यात्रेला सुरुवात झालीय, वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू नावघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रेत तरुणाचा मोठा उत्साह बघायला मिळतो,18 किलोमीटर ची पाई यात्रा करीत ही यात्रा हिंगोलीत पोहोचत असते. मागील तीन वर्षांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावड यात्रेला येत असतात याही वेळी एकनाथ शिंदे कावड यात्रेला येणार असून उपमुख्यमंत्री शिंदे यांची सायंकाळी 5 वाजता हिंगोली शहरातील गांधी चौकात जाहीर सभा पार पडणार आहे.
13
Report
UPUmesh Parab
Aug 04, 2025 07:35:38
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग- आमदार दीपक केसरकर बाईट पॉईंटर- *ऑन : परिणय फुके वक्तव्य* एखाद्या कोणी केलेल्या विधानाला पक्षाचे विधान म्हणून बघता नये. अशी वक्तव्य करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे. हे युतीचे शासन आहे. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असून लोकांनी आपल्याला मोठ्या अपेक्षांनी निवडून दिले आहे. त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा आपल्या माध्यमातून कशी होईल, यावर भर दिला पाहिजे. *ऑन: माधुरी हत्ती* हा शासनाचा निर्णय आहे. पूर्वी लोक हत्तींचे पालनही करीत. मात्र, आता शासन मान्यता असलेल्या ठिकाणी त्यांना न्यावे लागते. पण हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असून त्याचा विचार व्हावा. मी त्या ठिकाणचा पालकमंत्री होतो, त्यामुळे मी लोकांच्या भावना वनमंत्र्यांना कळवेन. *ऑन : दोडामार्ग हत्ती विषय* याबाबत दोन पर्याय आहेत. तिलारी धरणाच्या मागच्या बाजूला कंपाउंड करून हत्तीचे त्या ठिकाणी संवर्धन करावे. तसेच पालकमंत्री येथील हत्तींबाबत “वनतारा”शी बोलले असतील तर तो एक पर्याय आहे. *ऑन: राज ठाकरे सभा* राज ठाकरेंनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्यांना यापूर्वी कशी वागणूक मिळाली हे त्यांनी बघितलंय. राज हे चांगले नेतृत्व असून त्यांना आमच्या कायम शुभेच्छा असतील. *ऑन : अमित ठाकरे* महिलांवर अन्याय होता नये या मताशी सहमत आहे. मात्र, कुणीही कायदा हातात घेऊ नये. राज्य सरकारने महिलांबाबत कडक कायदे केलेत. *ऑन: महायुती तणाव* महायुतीमधील पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये. असे प्रवेश दिल्यास महायुतीमधील वातावरण खराब होते. त्यामुळे असे प्रवेश मी थांबविले आहेत. एकमेकांच्या विरोधात विधाने येऊ नयेत. सर्वांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. युती म्हणून सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा. *ऑन: जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे तक्रार* मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती कानावर घालेन. भाजपमधील कोणाचेच प्रवेश आमच्या पक्षात झालेले नाही. आमची कायम भूमिका अशी आहे की, युतीने एकत्रच निवडणुका लढल्या पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. *ऑन: महायुती स्वबळाचा नारा* असे निर्णय वरिष्ठांकडून होत असतात. युती म्हणून सर्व निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत. त्यामुळे युतीतील वातावरण चांगले राहिले पाहिजे असा मी सर्वांना सल्ला देईन. *ऑन: शिवसेना नेत्यांवर जबाबदारी* ते सर्व जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. byte - आमदार दिपक केसरकर
14
Report
SNSWATI NAIK
Aug 04, 2025 07:18:15
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल तालुका पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात बार तोडफोड के मामले मे योगेश चिले अरेस्ट FTP slug - nm mns yogesh chile shots- reporter - swati naik navi mumbai anchor- राज ठाकरेंच्या इशारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल येथील नाईट रायटर ऑर्केस्ट्रा आणि बारवर तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर मनसे कार्यकर्ते पळून गेले होते मात्र पनवेल तालुका पोलिसांनी मनसे नेते योगेश चिले सह आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दंगल घडून आणणे खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे जीव मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नोंद करण्यात आलेत पोलिसांकडून आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 04, 2025 07:17:23
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0408ZT_CHP_CM_LETTER ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदाराच्या मनमानीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे, आमदारांनी स्वतःच्या दिवंगत आईच्या नावाने चौक नामकरणाची चालविली आहे तयारी, दुसरीकडे गोवा मुक्ती संग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांचा मात्र विसर, शहीद बाबुराव थोरात यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली कैफियत      अँकर:--चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदाराच्या मनमानीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. आमदारांनी स्वतःच्या दिवंगत आईच्या नावाने चौक नामकरणाची जोरदार तयारी चालविली आहे.  मात्र दुसरीकडे गोवा मुक्ती संग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांचा मात्र त्यांना विसर पडलाय. गोवा मुक्ती संग्रामात प्रथम शहीद झालेल्या शहीद बाबुराव थोरात यांच्या आणि असंख्य शहिदांच्या नावाने एक रस्ता देखील नामीत झाला नाही, मात्र कुठलाही स्वातंत्र्य संग्राम अथवा सामाजिक कार्य नसलेल्या आमदारांच्या दिवंगत आईच्या नावाने शहरातील महत्वाच्या चौकात गुपचूप सौंदर्यीकरण केले जात आहे. यावर व्यथित झालेल्या शहीद कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे कैफियत मांडली आहे. बाईट १) विजय थोरात, शहीद बी. के. थोरात यांचे पुत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
SKSudarshan Khillare
Aug 04, 2025 07:03:02
Yeola, Maharashtra:
अँकर :-आज श्रावण महिन्याचा दुसरं सोमवार असून या निमित्त चांदवडच्या चंद्रेश्वरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी असून सकाळ पासून भाविकांची रांग लागली आहे विशेष म्हणजे दर्शनासाठी शालेय विद्यार्थी देखील मोठया संख्येने आले आहे मंदिर मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून डोंगरावर असल्यामुळे सर्वत्र पसरलेली हिरवळ, दाट धुके या निसर्गरम्या वातावरणामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित होत आहे
14
Report
Advertisement
Back to top