Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

धनंजय मुंडे बाइटPointers: विपक्ष के वार क्या सच में धमाकेदार हैं?

MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 07:50:43
Beed, Maharashtra
बीड: धनंजय मुंडे बाईट pointers - कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये.. - बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे. बाकी sa सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. - मात्र स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र असताना बोलताना स्वर्गीय मुंडे साहेबांवर याच समाजाने प्रचंड प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. - अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे हे कोण आहेत, ते सोशल मीडियावर सगळ्यांना समजले आहे. - कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम आहे. - माध्यमांना चांगले कार्यक्रम दाखवता येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी होतात. इथे काही तरी झाले पाहिजे तेंव्हाच माध्यमांचा trp वाढतो... - काही विघ्नसंतोषी लोकांनी करवून आणलेला हा प्रकार आहे. - बंजारा वंजारा आम्ही एक म्हणतो कारण आम्ही भटके आहोत...
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 10:04:45
Washim, Maharashtra:वाशीम: File2:1609ZT_WSM_MAHANT_KABIDAS121 WSM_MAHANT_KABIDAS_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:मनोज जरांगे पाटील यांच्या मुबंईतील आंदोलनानंतर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला.ओबीसी आरक्षणाची दारे खुली झाल्यानंतर आता याच गॅझेटला आधार मानून राज्यातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्यात येतं आहेत.मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि न्यायालयात जाण्याचाही इशारा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.आरक्षणाच्या या चळवळीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत कबीरदास महाराज आरक्षणा संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी... *महंत कबिरदास महाराज पोहरादेवी121 पॉईंटर* St मधून आरक्षण मागण्याच कारण म्हणजे आतापर्यंत देशावर सर्वप्रथम बंजारा समाजाचा अधिकार आज sc आदिवासींमध्ये ..तेलंगणा आंध्रप्रदेश निजामशाही आहे रेनकी आयोग, रोहिणी आयोग ,बापट ह्या सर्व समित्या बंजारा समाजासाठी पॉझिटिव्ह आहेत.. धनंजय मुंडे on बंजारा आणि वंजारी हे एकच कारण बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे. ऐसा पेहराव वेगळा आहे खानपान वेगळा आहे पूर्वीपासून सर्व वेगवेगळ आहे न त्यामुळे हे एक कसे शक्य म्हणता येईल बंजारा व वजारा एक आहे... आरक्षण मार्ग on आरक्षण मार्ग निघणार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या वर आमचा विश्वास आहे.कारण आमचं साडेतीन आरक्षण आमचं हक्काचं आम्हला मिळणार आहे त्यांनी पोहरादेवी ला येऊन घोषणा ही केली होती 3 डिसेंबर 2018 ला त्याचा आज ही व्हिडीओ आपण पहिला तर त्यावेळी बंजारा समाज आदिवासी हाय त्यांना आरक्षण द्यावंच लागेल आता फक्त आम्हला आता धक्का द्यावा लागेल त्यामुळे तो विषय संपला .. अधिवाशी समाज मोर्चे on हे सध्या आता दिशाभूल करते त्यासाठी आमचे नेते यांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करतील अधिवाशी आरक्षण आहे त्यातून आम्ही आरक्षण मागत आमचं आम्ही मागत आहे..
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 16, 2025 09:52:59
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- आमदार भास्कर जाधव byte on कर्जाचा बोजा --- महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. असे आम्ही यापूर्वीच अधोरेखित केले होते. आर्थिक स्थिती बेशिस्त झालेली आहे. निवडणुकी पूर्वी लोकांना दाखवलेली गाजर आणि सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मत त्यामुळे हया सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. On देवा भाऊ ब्रॅण्डिंग --- निवडणुकी पूर्वी तिघे भाऊ लाडका भाऊ म्हणून मिरवत होते. पण आतां केवळ देवेंद्र फडणवीस यांची एकट्याची जाहिरात का झालीय ?? *कर्जाची जबाबदारी मंत्री मंडळाची आणि श्रेय फक्त माझं हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. चांगल्याच श्रेय घ्यायचं आणि वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत आहे.* on ठाकरे सेना बळ ( सिंधुदुर्ग ) --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करणारे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत. आमचे लोक सैरावैरा झालेले नाहीत आमचे लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. On रणनीती -- भ्रष्टाचारी गुंडगिरी बेशिस्त, महिलांचा अवमान करणारे राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारे भ्रष्टाचार करुन स्वतःची चोमडी भरणारे अशा लोकांच्या विरोधात आवाज उठविणे आणि जनतेला जागरुक करणे हीच आमची रणनीती असेल. On जातीय वाद --- जातीला पोट असत पोटाला जातं नसते जात बघून कोणाला देऊ नका तर ज्याला भूक आहे त्याला द्या असं तेव्हा बाळासाहेब ठाकरे सांगायचे.. तेव्हा काही लोकांना हे शब्द कठोर वाटले पण आज त्यांच्या शब्दांची जनतेला आठवण होत असेल जातं बघून सरकारने निर्णय करू नये हा शिवसेनाप्रमुखांचा दृष्टेपणा on स्मार्ट मीटर -- आमच्या भागात मुंबईला असणाऱ्या लोकांची घरे उघडून त्यांच्या घरात स्मार्ट मिटर लावण्याच काम वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. हा एक प्रकारचा दरोडा आहे. आम्ही चोरीच्या केसेस घालू असं सांगितल्यावर ते मिटर काढण्यात आले. सरकारचे दलाल किती सांगत असले तरी जनतेने हे मिटर लावून घेऊ नये. मी वीज बिल जमा करुन ठेवलीय ती विधानसभेत सरकारच्या तोंडावर मारणार आहे. सरकारचे दलाल कितीही घुरघुरले तरी त्यांचं ऐकू नका आणि स्मार्ट मिटर लावू नका भास्कर जाधव, आमदार
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 16, 2025 09:51:26
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_SAWNT_HELP धाराशिव येथील आत्महत्याग्रस्त मराठा आंदोलकाच्या कुटुंबाला माजी मंत्री तानाजी सावंतांकडून तीन लाखांची मदत तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाकडून मदतीचा धनादेश धाराशिवच्या कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ या तरुणाने मराठा आरक्षणासाठी संपवलं होत जीवन तानाजी सावंत यांच्याकडून राज्यभरातील 90 आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या कुटुंबांना थेट मदत तानाजी सावंत यांच्याकडून मदत मिळाली, सरकारनेही मदत करावी मयत परमेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबाची भावना Anc: धाराशिवच्या कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी या तरुणाच्या कुटुंबाला भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून तीन लाखांची थेट मदत केली आहे. मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी आज हा मदतीचा धनादेश मिसाळ कुटुंबीयांना सुपूर्द केला. तानाजी सावंत यांनी आतापर्यंत राज्यभरातील 90 आंदोलकांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत तानाजी सावंत यांच्या माध्यमातूनच कुटुंबाला मदत झाली असून सरकारनेही मदत द्यावी अशी भावना मयत मराठा आंदोलक परमेश्वर मिसाळच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. Byt: महेश डोंगरे Byte नातेवाईक
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 09:33:55
Buldhana, Maharashtra:मलकापूरात बांधकाम विभाग 'पाण्यात'; गुणवत्ता तपासण्यापूर्वी स्वतःचं कार्यालय बुडालं..! Anchor: गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्याला 'जलमय' केलं आहे, पण मलकापूरात तर चक्क जिल्हा परिषदेच्या उपविभागीय बांधकाम कार्यालयानेच 'पाणी पाणी'चा अनुभव घेतला! ज्या विभागावर बांधकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे, तोच विभाग गुडघाभर पाण्यात बुडाला. आता प्रश्न असा आहे, की ज्यांना स्वतःचं कार्यालय वाचवता येत नाही, ते बांधकामांची गुणवत्ता काय तपासणार? मलकापूर शहरातील या शासकीय कार्यालयात पाणी शिरल्याने महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रं आणि फर्निचर पाण्याच्या लाटेत वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रशासनाने नागरिकांना 'सुरक्षित राहा' असं आवाहन केलं, त्यांचंच कार्यालय पाण्याखाली गेल्याने आता प्रशासनाचीच सुरक्षा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळेवर काम करणं तर सोडाच, आता पाण्याच्या या लाटेमुळे फाईल्स भिजून कामाचा 'खेळ' आणखी लांबणार हे नक्की...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 16, 2025 09:33:25
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_BANJARA_BYTE तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 एसटी संवर्गाच्या आरक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज धडकला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अँकर :- अमरावतीत आज सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकच मिशन – एसटी आरक्षण अशा जोशपूर्ण घोषणा देत समाजबांधवांनी आपली ताकद दाखवली. मोर्चात महिलांचा व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हैदराबाद गॅझेट इतर जातींना जसं जाहीर केलं तसं बंजारा समाजाला सुद्धा जाहीर करावा व आदिवासींचे आरक्षण आम्हाला मिळावे अशी मागणी बंजारा समाजाने केली. यावेळी समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एसटी आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. बाईट :– आंदोलन
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 09:26:02
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1609ZT_JALNA_WOMEN_CARRY(7 FILES) जालना | 60 वर्षीय वृद्ध महिला नाल्याच्या पाण्यात गेली वाहून… जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील घटना... अँकर: जालन्यात 60 वर्षीय वृद्ध महिला नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे ही घटना घडली असून, शारदाबाई काशिनाथ शिरीसुंदर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथून जाणाऱ्या नाल्याला पूर आला होता. शारदाबाई आज सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर आल्या असता त्यांच्या घराजवळून नाल्याचे पाणी वाहत होता. यावेळी पाय घसरल्याने त्या नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्या. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी वृद्ध महिलेचा शोध सुरू केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 09:05:32
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 09:05:04
Jalna, Maharashtra: FEED NAME |1609ZT_JALNA_MLA_MARHAN(2 FILES) जालना : आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर दोन गटात तुंबळ हाणामारी,एक गट ऐकत नसल्याने खोतकरांनी एकाच्या लगावली कानशिलात दोन्ही लोकं ऐकण्यातले,दोघांना हटवण्यासाठी कानशिलात लगावली-खोतकर अँकर | जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच ही घटना घडली आहे. काल रात्री जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.यामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली.या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर बस स्थानक परीसरात पोहचले आणि त्यांनी वाहून गेलेल्या दुकानांची पाहणी सुरू केली.यावेळी दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटात खोतकर यांच्या समोरच हाणामारी झाली.दरम्यान खोतकर यांनीच दोन्ही गटातील लोकांची समजुत काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.यातील एक गट खोतकर यांनी समज देऊनही ऐकत नव्हता त्यामुळे खोतकर यांनी एकाच्या कानशिलात लगावली आहे.दरम्यान दोघांनाही हटवण्यासाठी कानशिलात मारावी लागली असं खोतकर यांनी म्हटलं आहे बाईट: अर्जुन खोतकर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 09:04:34
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Us Humani Story Feed:- Live U Anc:- सलग पडणाऱ्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात पावसाचा जोर मोठा असल्याने हा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना शिवारात आवश्यक असणारा वाफसा मिळालेला नाही. त्यामुळे उसावर तांबेरा, पोका बोंग, मावा करपा या किडीने ऊसाला पोखराला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन घटन्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकूण 3 लाख 91 हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे, त्यापैकी तब्बल 50% म्हणजेच सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचं पीक उभ आहे. यातील 20% हून अधिक ऊस पिकावर तांबेरा, पोका बोंग, मावा किडीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. Play Byte:- जालिंदर पांगारे, जिल्हा कृषी अधीक्षक कोल्हापूर
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 16, 2025 09:01:10
Parbhani, Maharashtra:अँकर - बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून काल आदिवासी बांधवाणी हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता,या मोर्चा पाठोपाठ आज बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंटवर बंजारा समाजाने भव्य रास्ता रोको सुरू केलाय. यामुळे छत्रपती संभाजीनगर,हिंगोली आणि नांदेड कडून येणारी वाहतूक ठप्प झालीय,या रास्तारोकोमध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव भगिनी एकवटल्या असून बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशात रास्तारोको मध्ये सहभागी झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेट मध्ये आमची एसटी प्रवर्गात नोंद हसून आम्हालाही हैदराबाद गॅजेट लागू करावे आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा पद्धतीची मागणी बंजारा समाजाकडून केली जात आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 16, 2025 08:36:54
Nashik, Maharashtra:Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_nimse_cort नांदूर नाका परिसरातून राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील आरोपी उद्धव निमसे काल पोलिसात हजर उद्धव निमसेवर खुनाचा गुन्हा केला होता दाखल २० दिवसांपासून निमसे होता फरार आज निमसेला नाशिकच्या जिल्हा न्यायालय केले हजर न्यायालयात हजर केल्यानंतर निमसेला २० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली पोलिस पुढील तपास करत असून राहुल धोत्रे खून प्रकरणाला आता वेग येणार... अँकर:     नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पोळ्याच्या दिवशी धोत्रे आणि निमसे गटात तुफान हाणामारी झाली होती यानंतर यात राहुल धोत्रे या युवकाचा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता... मात्र ते वीस दिवसांपासून फरार होते... पोलिसांना गुंगरा देऊन अखेर काल ते पोलिसांना शरण आलाय.. आज त्यांना कोर्टात हजर केले असता 20 सप्टेंबरपर्यंत उद्धव निमसे यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे....या संदर्भात आता पोलीस पुढील तपास करत असून राहुल धोत्रे खून प्रकरणातील तपासाला आता वेग येणार आहे. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे कोणाचे मुख्य आरोपी असून हे स्वतः पोलिसात शरण आले आहे.... बाईट: शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त.
1
comment0
Report
Advertisement
Back to top