431122
धनंजय मुंडे बाइटPointers: विपक्ष के वार क्या सच में धमाकेदार हैं?
Beed, Maharashtra:बीड: धनंजय मुंडे बाईट pointers - कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये.. - बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे. बाकी sa सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. - मात्र स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र असताना बोलताना स्वर्गीय मुंडे साहेबांवर याच समाजाने प्रचंड प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. - अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे हे कोण आहेत, ते सोशल मीडियावर सगळ्यांना समजले आहे. - कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम आहे. - माध्यमांना चांगले कार्यक्रम दाखवता येत नाही, त्यामुळे अशा गोष्टी होतात. इथे काही तरी झाले पाहिजे तेंव्हाच माध्यमांचा trp वाढतो... - काही विघ्नसंतोषी लोकांनी करवून आणलेला हा प्रकार आहे. - बंजारा वंजारा आम्ही एक म्हणतो कारण आम्ही भटके आहोत...0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मातोश्री पर चर्चा तेज: वरुण सरदेसाई ने आदित्य ठाकरे को पुरावा दिखाने चुनौती दी
Kalyan, Maharashtra:मातोश्री नाव इतकं मोठं की मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते सगळ्यांना खुलं चॅलेंज आदित्य ठाकररेंबद्दल एक तरी पुरावा द्या वरुण सरदेसाई यांची दिशा सलीयन प्रकरणी प्रतिक्रिया यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. मातोश्री हे मोठं नाव आहे, मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते. मी सगळ्यांना खुलं चॅलेंज करतो की आदित्य ठाकरें बद्दल बोलताना एक तरी पुरावा द्या, त्यामुळे अशांवर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करूनच पण यापुढे शांत बसणार नाही असा इशारा सरदेसाई यांनी दिलाय. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी सरदेसाई हे सध्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत.0
0
Report
पार्थ पवार का फोटो सोमेश्वर कारखाने के रिपोर्ट से गायब, सतीश काकडे की तीखी आलोचना
Rui, Maharashtra:सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो वगळल्याची चर्चा.... सतीश काकडेंची टीका बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अहवालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो वगळल्याचे समोर आले आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली आहे. “कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला सतीश काकडे यांनी लगावला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. याआधी काढलेल्या अहवालावरून वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेले पॅनल सध्या कारखान्यावरती संचालक म्हणून असून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागली असताना पार्थ पवारांचाच फोटो अहवालातून गायब करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी कारखान्याच्या चेअरमन वरती टीकास्त्र डागले आहे.0
0
Report
कृष्णा नदी में पानी उपास रोक, जिलों की खेती संकट में
Sangli, Maharashtra:स्लग - संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णानदीसह तलावातून शेतीच्या पाणी उपासावर बंदी.. अँकर - सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद होऊ लागला आहे,कृष्णा नदी आणि जिल्ह्यातल्या पाण्याचा साठा लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.शेतीसाठी पाणी उपसावर बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा हो नाही यासाठी खाजगी उपसा सिंचन योजनांच्या वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. कृष्णा नदीसह जत,मिरज,वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी घालण्यात आली आहे,त्यामुळे कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके धोक्यात येणार आहेत.तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याचं सांगत कोयना धरणातून कृष्णा नदीत अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में बारिश नहीं, मुख्यमंत्री का कड़ा पानी-बचत निर्देश जारी
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस झाला नाही मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत आशा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे मात्र सध्या तरी कृत्रिम पावसाचा कोणताही विचार नाही अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे उजनी धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करूनच त्याचा शेतीसाठी वापर करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे लागेल पाण्याची बचत करावी लागेल. एक वर्ष समोर आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे。 दिशा सालियन प्रकरणावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले एखाद्या भगिनीवर अन्याय झाला आहे ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच सीबीआयने पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय तपासात जे जे समोर येईल त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळे कोणी चिंतित होण्याची गरज नाही. जे सहभागी होतील ते चिंतित होतील असा टोला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे。 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक चिन्हावर लढाईची का नाही याचा निर्णय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष घेतील. महायुती म्हणून निवडणूक लढू मात्र वेळ आली तर भाजप म्हणून सुद्धा सक्षमपणे निवडण्याची आमची तयारी आहे असे म्हणत एक प्रकारे मित्र पक्षांना गोरे यांनी इशारा दिलेला आहे。 सोलापूर जिल्हा बँकेच्या संभाव्य निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील जुन्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात यावर टोला लगावत पावसाळा आला की छत्र्या उगवत असतात मात्र सोलापूर जिल्हा बँक निवडणूक कशी लढवायची याच निर्णय सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते घेतील ते त्यासाठी सक्षम आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहे मात्र समविचारी लोक सोबत आले तर त्यांनाही सोबत घेतलं जाईल. पंढरपूर शहराचा विकास होऊन आणि त्या पायाभूत सुविधा मजबूत होणं हे काम भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. पंढरपूर नगरपालिकेमध्ये कॉरिडॉर संदर्भात कोणताही ठराव झाला तरी कॉरिडॉर काम थांबणार नाही असा थेट इशारा नगरपालिकेच्या सभेत कॉरिडॉर विषय तर खूप करणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे。0
0
Report
चंद्रकांत पाटल ने शरद पवार को कहा संवेदनशील मुख्यमंत्री, सूखा पर तंज
Sangli, Maharashtra:पत्र देऊन जागे होणारे असंवेदनशील नव्हे तर संवेदनशील मुख्यमंत्री आहेत - मंत्री चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना खोचकटोला अँकर - पत्र देऊन जागे होणारे,असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत,संवेदनशील मुख्यमंत्री आहेत,असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रावरून लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.0
0
Report
रायगढ़ ब्रेकिंग: मुंबई-गोवा राजमार्ग पर यातायात जाम, भीड़भाड़ बढ़ी
Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहतूक अतिशय संथगतीने सुरू गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न पावसाच्या हजेरीमुळे वाहनकोंडीत भर0
0
Report
Advertisement
अंबरनाथ में बालाजीनगर प्रवेशद्वार गिरा, निर्माण गुणवत्ता पर सवाल
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पश्चिम की खुंटवली बालाजीनगर मंदिर के पास प्रवेशद्वार अचानक गिर गया. खराब निर्माण के आरोप; सौभाग्य से किसी के जीवन की हानि नहीं हुई. नगरपालिका प्रशासन की तरफ से जांच का आश्वासन. घटना के समय प्रवेशद्वार के दो टुकड़े हो गए और उनका एक भाग सड़क पर गिरा. भीड़ जुटी और ट्रैफिक जाम थोड़ा हुआ. लगभग छह साल पहले यह प्रवेशद्वार लोकार्पण हुआ था. नगर परिषद द्वारा स्थापित यह प्रवेशद्वार जल्द ही गिरने से निर्माण गुणवत्ता पर प्रश्न उठे हैं. प्रवेशद्वार में उपयोग किए गए सामग्री, निर्माण गुणवत्ता और उसकी देखभाल को लेकर नागरिकों के सवाल हैं. घटनाक्रम जानकारी मिलते ही अम्बरनाथ पुलिस, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी और भाजपा नगरसेवकों ने घटना स्थल का दौरा किया. भाजप के गुट नेता अभिजीत करंजुले पाटील ने मौके पर निरीक्षण किया. पूरे मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई का आश्वासन दिया गया।0
0
Report
गोवळकोट में गणेश विसर्जन की सदियों पुरानी परंपरा, नाव से जल विसर्जन भी आकर्षण
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : गोवळकोटमध्ये अनोखी परंपरा; नदीत रिंगण घालून आणि बोटीतून बाप्पाला निरोप!.. रत्नागिरीच्या चिपळूणमधील गोवळकोट येथे गणेश विसर्जनाची शेकडो वर्षांची अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जातेय.. येथे गावातील सर्व गणेशमूर्ती डोक्यावरून नदीपात्रात आणून त्यांचे भव्य रिंगण केले जाते आणि पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.. तर दुसरीकडे, स्थानिक भोई समाजाकडून गणरायाला बोटीतून नदीच्या खोल पाण्यात नेऊन वाजतगाजत विसर्जन करण्याची आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळते.. गोवळकोटमधील या दोन्ही विसर्जन परंपरा सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत..0
0
Report
बंजारा आरक्षण के लिए सात युवकों का उपोषण समाप्त; सरकार से बैठक की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: सात युवक गेल्या आठ दिनांत वाशिमाच्या पोहरादेवी इथं संत रामराव महाराजांच्या समाधी समोर उपोषण सुरु केलं होतं. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने बंजारा धर्मगुरू तथा विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढील १५ दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन देत उपोषण सोडवलं. यावेळी उपोषणकर्त्यांनी एसटी आरक्षणासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीनं आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती जाहीर करावी अशी भूमिका घेतली असून. मुख्यमंत्रींशी सकारात्मक चर्चा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.0
0
Report
Advertisement
गंगापुर रोड वृक्षतोड पर बड़ी कार्रवाई; 6 गिरफ्तार, चार दिन की पुलिस कस्टडी
Nashik, Maharashtra:नाशिक गंगापूर रोड वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई; सहा जणांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी जाहिराती दिसाव्यात म्हणून झाडांची कत्तल? CCTV नंतर पोलिसांचा दणका; सहा जणांवर कारवाई गंगापूर रोडवरील ५० हून अधिक झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना अटक नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह कारवाई सर्व आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी गंगापूर पोलिसांची कारवाई; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप गंगापूर रोडवरील दुभाजकावरील झाडे तोडल्याच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला होता जाहिराती दिसाव्यात या उद्देशाने रात्रीच्या वेळी झाडे तोडल्याच पोलिस तपासात समोर आले आहे, दुभाजकावरील ५० हून अधिक झाडे तोडल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते, रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर आणि नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सहाही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात असून, वृक्षतोडीच्या या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातील पोलीस कारवाई आणि तपासाबाबत नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाला नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी वाचा फोडत आशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे... त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचे कुठले अधिकारी यामध्ये जर शामिल असेल त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उपमहापूर विलास शिंदे यांनी केलीये. नाशिकमध्ये तब्बल ५० झाडे तोडल्याच्या प्रकारावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांशी आपले बोलणे झाले असून, संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता जनतेनेही पुढे आले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र झाडे तोडण्याचे आदेश किंवा सांगणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतील काही अधिकारी संबंधित लोकांना सांभाळत असल्यामुळेच त्यांच्या दादागिरी वाढत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. झाडे तोडण्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तींसोबतच जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. गंगापूर रोडवरील झाडतोड प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, झाडतोडीच्या या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित जाहिरातदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मात्र, केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील झाडांची अशाप्रकारे बेकायदेशीर तोड करणाऱ्या मुजोरांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे...0
0
Report
अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, किसानों पर असर सवाल
Buldhana, Maharashtra:अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त... अकोल्यात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली; मात्र याच बैठकीत काही अधिकारी चक्क मोबाईलमध्ये व्यस्त असल्यांचं पहायला मिळालं... कुणी व्हॉट्सएप किंवा सोशल मीडिया पाहण्यात मग्न असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे... तर एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे... दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने चर्चा होणाऱ्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं... त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती गंभीर आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो...0
0
Report
अकोल्याकी बैठक में अधिकारी सोते दिखे, किसानों की त्रस्त स्थिति पर सवाल
Akola, Maharashtra:अमरावती विभागातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यातील कृषी विद्यापीठात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच काही अधिकाऱ्यांना डुलक्या लागल्याचे आणि काही काळ मोबाईल मध्ये रमतांना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे बैठकीतील अधिकाऱ्यांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, नांदेडच्या बैठकीत काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चर्चेत आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. "नांदेडच्या बैठकीत माझ्यासमोर काजू-बदाम आलेच नाहीत," असे वक्तव्य त्यांनी केले. तर अकोल्यातील बैठकीत अधिकारी झोपल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, फोटो काढताना अधिकाऱ्याचा डोळा लागला असेल, असे म्हणत कृषिमंत्रीांनी अधिकाऱ्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना, त्यावर उपाययोजनांसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतच अधिकारी डुलक्या घेताना दिसल्याने प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकरीांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीबाबत सरकार आणि प्रशासन खरोखरच किती गंभीर आहे? असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
Advertisement
कृषि मंत्री भरणे का किसानों के लिए आश्वस्तजनक बयान, मदद के कदम तेज होंगे
Akola, Maharashtra:शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारए कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया नांदेडच्या बैठकीत माझ्या समोर काजू-बदामच आले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती गंभीर असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांनी वेगळा विचार करू नये, असं आवाहनही भरणे यांनी केलंय. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बैठकीदरम्यान फोटोमध्ये अधिकारी झोपलेला दिसत असल्याच्या मुद्द्यावरही भरणे यांनी स्पष्टीकरण दिलंय. फोटो काढला तेव्हा अधिकाऱ्याचा डोळा लागला असेल, असं ते म्हणाले.अधिकारी आणि सरकार शेतकऱ्यांसोबत असून, अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कशी देता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही भरणे यांनी स्पष्ट केलं. शेतकरी संकटात असल्याची बाब सरकारच्या बैठकीत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.0
0
Report
दानवे के अनुसार मंत्री संवेदनहीन, किसान सवालों से जूझते महाराष्ट्र में drought की मांग
Navi Mumbai, Maharashtra:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नवी मुंबईतील गणरायाचे घेतले दर्शन. राज्यात चांगला पाऊस पडुदे, राज्यात सुरु असलेला अन्याय अत्याचार विरोधात लढायला शिवसैनिकांना ताकद देण्याचे मागितले साकडे. पीक पूर्णपणे संपलेलं आहे, कर्नाटकात दुष्काळ जाहीर झालाय त्याप्रमाणे महाराष्ट्रतही दुष्काळ जाहीर करावा. मंत्री मंडळात बसलेल्यांना जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संवेदना नाही, अश्या संवेदनाहीन लोकांमुळेच राज्यात ईश्वराचा कोप झालाय. बाईट - अंबादास दानवे (नेते शिवसेना ठाकरे गट)0
0
Report
गुहागर-रत्नागिरी के पाचेरी सडा में सड़क नहीं, बारिश में डोली से मरीज पहुँचाने मजबूरी
Ratnagiri, Maharashtra:गुहागर-रत्नागिरी स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही पाचेरी सड्यात रस्ता नाही; जीर्ण साकवामुळे रुग्णांना डोलीतून नेण्याची वेळ.. रत्नागिरीच्या गुहागरमधील पाचेरी सडा गावात आजही पक्का रस्ता नाही.. खोत वठार आणि ब्राह्मणवाडीला जोडणारा लोखंडी साकव जीर्ण झाल्याने पावसाळ्यात पूर येताच गावाचा संपर्क तुटतो.. अशा वेळी रुग्णांना चक्क डोलीतून न्यावे लागत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.. रस्ताच नसल्याने गावाकडे परतायचे तरी कसे,असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत असून,प्रशासन याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत..0
0
Report
Advertisement
