Back
ठेकेदारांचे 550 कोटी रुपये थकले; स्वातंत्र्य दिनावर रस्त्यावर आंदोलन!
SKSudarshan Khillare
Aug 16, 2025 02:00:20
Kalwan, Maharashtra
अँकर:- सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कळवण भागातील ठेकेदारांचे थकले तब्बल 550 कोटी रुपये थकले असून वारंवार मागणी करून देखील बिलाची रक्कम मिळत नसल्याचे पाहून संतप्त ठेकेदार आज रस्त्यावर उतरले आणि त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून
कळवणच्या सार्वजनिक बांधकामं विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालया जवळ धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने केली यावेळी ठेकेदारांनी सरकार विरुद्ध जोरदार करत बिले अदा करण्याची मागणी केली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 03:48:20Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_JALNA_POLICE_BYTE(2 FILES)
जालना : आंदोलकांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेल टाकलं,त्यामुळे बळाचा वापर केला,आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याचा खुलासा
अँकर : जालन्यात पंकजा मुंडे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी अखेर खुलासा केला आहे.आंदोलकाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं त्याला ताब्यात घेताना महिला पोलिसांच्या अंगावर देखील त्यांनी रॉकेल टाकलं त्यामुळे बळाचा वापर केल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलकाच्या कमरेत पाठीमागून येऊन लाथ घातली.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
बाईट : अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 16, 2025 03:48:13Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत - खा. प्रणिती शिंदे
प्रणिती शिंदे बाईट पॉईंटर्स
---
ऑन मशाल रॅली
--
एका गरीब व्यक्ती पासून श्रीमंतपर्यंत समान असलेला मतांचा अधिकार चोरला जातोय
मतदानाची जेव्हा चोरी होते तेव्हा यापेक्षा मोठा धोका लोकशाहीला काय असू शकतो
व्होट चोरीच्या विरोधात आम्ही मशाल मोर्चा काढतोय
हा विषय पक्षाचा नाही, संपूर्ण देशाचा हा विषय आहे
ही स्वतंत्र्यची दुसरी लढाई आहे, कोणीतरी तुमच्या हिस्सासाठी लढत आहे, त्या लढाईला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे
या देशात एवढी मोठी चळवळ खूप वर्षांनी निर्माण झाली आहे
ही लढाई लढायला सर्वानी तयार व्हा, या देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून, लोकशाही जी एका हुकूमशाहने आपल्या मुट्ठीत घेतली आहे देशाला मुक्त करा
ऑन निवडणूक आयोग
--
निवडणूक आयोग कोणतेही स्पष्टीकरण देतं नाही, ते पूर्णपणे सरकारच्या बाजूने कामं करतायत
स्वतः भाजपचे खासदर म्हणतायत इतके फेक व्होट वाढलेत
म्हणून आम्ही म्हणतोय की 2024 ची निवडणूक void (रद्दबातल) करा , ते पण ते करत नाहीत
चोरी लपवण्याचे प्रयत्न सुरूय पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी केलंय
ऑन पालकमंत्री जयकुमार गोरे
--
जयकुमार गोरे यांच्याकडून इतकी मोठी घोडचूक कशी होऊ शकते मला माहिती नाही
सोलापूर हे चार हुतात्माचे शहर आहे, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे
पालकमंत्री यांच्यासाठी कदाचीत इतिहास
हा फक्त 2014 पासूनच सुरु झाला असावा
हा देशाचा महाराष्ट्र आणि सोलापूरचा इतिहास आहे
तुम्ही ज्या जिल्हाचा प्रतिनिधित्व करता त्याबद्दल संपूर्ण माहिती असायलाच हवी
जाणीवपूर्वक त्यांनी उल्लेख टाळला का हे पाहावं लागेल
ऑन टेकस्टाईल उद्योग
--
अमेरिका वारंवार टेरिफ वाढवत आहे, हा देश जागतिक पातळीवर इतका कमकऊत कधीच झाला नाही
या सर्वांना फक्त हे केंद्र सरकार जबाबदार आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी याला जबाबदार आहेत
ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याला उत्तर देखील द्यायला तयार नाहीत
आपली परदेश नीती पूर्णपणे अपयशी झाली आहे
विदेश नीती ही केवळ फोटोपुरते नसते
बाईट : प्रणिती शिंदे, काँग्रेस खासदार
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 16, 2025 03:46:38Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातील आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला, वसंत विहार परिसरातील अनेक नागरिकांच्या दारापर्यंत पाणी
- गेल्या आठ दिवसांपासून सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती
- सोलापूर शहर परिसरातून वाहणाऱ्या आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला
- आदिल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील वसंत विहार राजे गणपती परिसरात अनेक नागरिकांच्या दारात पाणीच पाणी
- पाण्याचा प्रवाह आणखी सुरूच राहिला तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या शक्यतेने नागरिक चिंतेत
- सोलापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली मात्र पाण्याचा ओघ कायम
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 16, 2025 03:46:15Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद परिसरात सतत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बोरगडी येथील नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण शेती जलमय झाली. तर उभे पीक मातीत आडवे झाले. सोयाबीन, कापूस, हळद, तूर ह्या पिकांना पुराच्या पाण्याने जमीनदोस्त केल्याने शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
प्रशासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 16, 2025 03:32:16Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रानमसले - खुनेश्वर पूल गेला पाण्याखाली
सोलापूर जिल्ह्यात मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहू लागले
उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे रानमसले - खुनेश्वर पूल गेला पाण्याखाली
रानमसले - खुनेश्वर पुलावरून पाणी ओसंडून लागले वाहू
रानमसले - खुनेश्वर पूल पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट काढत जीव मुठीत धरून नागरिक करतायत प्रवास..
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 16, 2025 03:31:03Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, पूर्णा तालुक्याला याचा अधिज तडाखा बसलाय. महेर,लिमला,काळे धानोरा,देऊळगाव,फ़ुलकळस या भागात अतिमूसळधार पाऊस झाल्याने शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून पीक पाण्याखाली गेल्याने येथील शेतकेयांची पीक सडून हंगामच धोक्यात येणार आहे.
2
Report
SNSWATI NAIK
FollowAug 16, 2025 03:30:55Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये पावसाचा जोर पोलीस ठाण्यात पाणी
नवी मुंबई मे जमकर बारीश
FTP slug - nm rain
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई पनवेल मद्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली होती, पहाटे पावसाने चांगलाच जोर धरला होता ,गेल्या 12 तासात नवी मुंबई मद्ये 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे , यात वाशी ,तुर्भे ,बेलापूर मधील सखल भागात पाणी साचले होते , तुर्भे पोलीस ठाण्यात देखील पाणी साचले होते ,तर वाशी ,तुर्भे मधील पावसाचे पाणी साचले होते , अत्ता मात्र पावसाचा जोर ओसरला असून , अधून मधूब रिमझीम पाऊस बरसत आहे ।
gf -
-------------
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 16, 2025 03:30:27Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn apegaon av
Feed attached
माऊलींचा 750 व्या जन्मोत्सवानिमित्त आपेगावनगरीत भाविकांची मांदीयाळी दिसतेय, माऊली जन्मस्थळ आसलेल्या आपेगाव येथे माऊलींचा 750 वा जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे त्यासाठी
राज्यभरातुन भाविक माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी करत असून, मंदिर परिसर भाविकांनी फूलून गेला आहे
जन्मोत्सवानिमित्त आपेगाव नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 16, 2025 03:30:09Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संगमेश्वरमध्ये जोरदार पाऊस
पावासमुळे माखजनमध्ये पुरजन्य परिस्थिती
गडनदीला पूर आल्यानं पूरचं पाणी माखजन बाजारपेठेत
जवळपास 10 दुकानांत शिरलं पुराचं पाणी
दुकानांत पाणी शिरल्यानं व्यापा-यांच मोठं नुकसान....
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 16, 2025 03:17:55Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- देशांतर्गत मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी प्रमाणात दाखल होत असल्याने आज टोमॅटोला लासलगाव बाजार समितीमध्ये 700 ते 800 रुपये सरासरी एक 20 किलोच्या क्रेट्सला बाजार भाव मिळत आहे चांगला बाजार भाव असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे लासलगाव येथून दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये टोमॅटो पाठवला जात आहे तर येणारे दिवसात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होणार असल्याने केंद्र सरकारने बांगलादेशात टोमॅटोची निर्यातीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करत आहे
बाईट :- संजय साळुंखे (टोमॅटो निर्यातदार व्यापारी, लासलगाव)
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 16, 2025 03:17:46Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attached
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, उपपरिसरातील विविध अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीअखेर १,२२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी २,३९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेतील गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र इतर अभ्यासक्रमांना फारसा प्रतिसाद नसून ५० टक्के जागा अजूनही रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली. काही विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली, तर ठिकाणी विद्यार्थीच नाही असं चित्र आहे..
3
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 16, 2025 03:16:46Niphad, Maharashtra:
अँकर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोळगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची 750 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत महिलांनी टाळ-मृदूंगाच्या तालावर ठेका धरला होता ज्ञानेश्वर माऊलीच्या जय घोषणे संपूर्ण कोळगाव नगरी दुमधुमान निघाली या पालखी मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर तुळशी कळश धारण केले होतो
3
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 16, 2025 03:16:28Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn police action av
Feed attached
लग्न, धार्मिक कार्यक्रम, सण, जन्म-मृत्यूची घटना तसेच ट्रॅफिक सिग्नल किंवा रस्त्यावर नागरिकांकडून पैशांची जबरदस्तीने मागणी करणाऱ्या तृतीयपंथीय आणि इतर गटांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत मनाई आदेश निर्गमित केला आहे. तो १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू राहील. या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे लग्नसोहळा, धार्मिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देऊन पैसे मागण्यास बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 16, 2025 03:16:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn school action av
Feed attached
शहरात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासन मान्यतेशिवाय पालकांकडून विविध नावांनी अवैध शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी शिक्षण विभागात प्राप्त झाल्या आहेत. याअनुषंगाने आता कारवाईची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. असा प्रकार अनेक खासगी अनुदानित शाळांत सुरू आहे. पडताळणीत दोषी आढळणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे.
शाळांकडून पालकांना विविध कारणांच्या माध्यमातून शुल्क मागितले जाते. ते वसूल केल्याची तक्रार आहे.. यामध्ये बिल्डिंग फंड, विकास निधी, प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने शाळांवर अचानक तपासणी पथक पाठवण्याची तयारी केली आहे. नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांवर वेतनेतर अनुदान थांबवण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सर्व अनुदानित शाळांनी दर्शनी भागात कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही, असा फलक लावण्याचे आदेशही माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
8
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 16, 2025 03:15:47Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn registry close av
Feed attached
नोंदणी विभागाच्या मुख्य सर्वर साठी तांत्रिक देखभालीचे काम १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू होणार असून हे काम १७ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. या काळात आयसरिताअंतर्गत दस्तऐवजीकरण आणि सर्व संबंधित सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक यांनी दिली.
संभाजी नगर शहरातील पाच कार्यालयांमध्ये दररोज सुमारे ५०० पेक्षा अधिक दस्त नोंदणी केल्या जातात. या माध्यमातून लाखो रुपयांचा - महसूल प्रशासनाला मिळतो. मात्र पुढील तीन दिवस हे कार्यालय बंद राहिल्यास - प्रशासनाला मोठे नुकसान सहन करावे - लागणार आहे. दस्तऐवजीकरण करणाऱ्या व्यावसायिक आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे....
4
Report