Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चांदोली धरणात 91% पाणीसाठा, वारणा नदीत विसर्ग सुरू!

SMSarfaraj Musa
Aug 18, 2025 06:19:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चांदोलीत अतिवृष्टी,धरण 91 टक्के भरल्याने धरणातून साडेसहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 83 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून चांदोली धरण 91.80 टक्के भरले आहे.त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात साडे सहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात आता 31.58 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने प्रशासनाकडून धरणातून पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे,असा आवाहन करण्यात आले आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Aug 18, 2025 09:10:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
सांगली ब्रेकिंग Sng_bhajipala स्लग - शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने संतप्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी शेतीमाल फळमार्केटच्या दारातच रस्त्यावर फेकला भाजीपाला. अँकर - सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये संतप्त व्यापारी व शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला आहे.बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा येणारा शेतीमाल लिलावासाठी जागा उपलब्ध नसल्याने संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या शेतीमाल रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केलाय. विक्रीसाठी आणलेला शेतीमाल करण्यासाठी लिलाव करण्यासाठी असणारे ठिकाणाचे काम सुरू असून ते रखडले आहे,पर्यायी जाग नसल्याने पावसात भिजून नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावरच नुकसान झालेला भाजीपाला फेकून कृषी उत्पन्न बाजार समितीचा निषेध नोंदवत लिलावासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 09:09:53
Parbhani, Maharashtra:
अँकर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण अशी ओळख असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्याने येलदरी धरणाने पाण्याचा विसर्ग वाढवून 10 गेट मधून 60 हजार 60 क्यूसेक्सने पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय.जिंतूर सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून धरणाने सोडलेले पाणी वाहत असल्याने धरणासमोरील जिंतूर सेनगाव हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय. या मार्गे मराठवाड्यातून विदर्भात ही जाता येते पण हा मार्ग हा बंद पडलाय याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 09:08:29
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BYTES(5 FILES) नांदेड :मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील बचावलेल्या महिलांच्या प्रतिक्रीया,महिलांच्या अश्रूंचा फुटला बांध अँकर : नांदेडमधील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय.त्यामुळे गावात सध्या SDRF च्या पथकाकडून बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.मुखेड तालुक्यात काल रात्री पासून 100 पेक्षा अधिक लोक पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले होते.मात्र सकाळपासून बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलं आहे.त्यामुळे अनेक महिला आणि पुरुषांना बचाव पथकाने पाण्याबाहेर काढलं आहे.SDRF च्या पथकाने बचाव कार्य सध्या वेगाने सुरू केलं असुन बचावलेल्या महिलांनी प्रतिक्रिया दिल्यात.यावेळी पावसाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना महिलांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. बाईट : महिला
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 18, 2025 09:08:19
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई पाऊस wkt FTP slug -nm wkt byet- wkt shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मद्ये पावसाचा जोर वाढला आहे ,यामुळे एपीएमसी ,मॅफको ,सानपाडा येथे रस्त्यावर पाणी साचले असून , सकाळी 8.30 ते 11.30 पेटीत 30 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे , नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन यासाठी सज्ज असून, याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनिधी स्वाती नाईक यांनी बाईट- wkt --/---------------------------
3
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 18, 2025 09:00:35
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1808ZT_MAVAL_PAVANA_DAM Total files : 02 Headline -पवना धरणातून 800 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anchor: कालपासून मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळ ला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा हा 98 टक्के इतका झाला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्हा व घाटमाथा परिसराकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने धरणात मोठा येवा येत आहे. आज दुपारी दोन वाजता जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. पावसाच्या व येव्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. तरी नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. असं आवाहन पवना धरण पाटबंधारे विभागाने केले आहे...
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 08:34:34
Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत असून त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नदी काठच्या पीकांचे नुकसान होणार आहे. या पैनगंगेने आता रोद्र रूप धारण केले असून पैनगंगा धोक्याच्या पातळीने वाहत आहे, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. हिंगोलीच्या कण्हेरगाव नाका येथील पैनगंगेच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... wkt गजानन देशमुख
4
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 18, 2025 08:34:27
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_DIMAGE_R3 धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा – 38 हजार एकरवरील पिकांचे नुकसान धाराशिव : मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 38 हजार एकरांवरील खरीप पिके बाधित झाली आहेत. महसूल व कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल सादर केला असून 108 गावांच्या शेतशिवाराला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 38 हजार 315 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर ओढे-नद्यांना आलेल्या पुराने 53 जनावरे वाहून गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा मोडून पडला आहे. दरम्यान, अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. परंडा तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून विशेषतः मिरचीच्या शेतात पाणीच पाणी दिसत आहे. पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. BYTE : लवंगे महिला शेतकरी BYTE : शेतकरी BYTE : शेतकरी
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 08:33:40
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_COLLECTOR(1 FILE) नांदेड : ब्रेकिंग : सध्या पाण्याने वेढलेल्यांना सोडवण्याचे काम सुरू जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज उर्वरीत बचाव कार्य तातडीने पूर्ण करणार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची माहिती पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा,जिल्हाधिकारी कर्डिले यांचं आवाहन अँकर : नांदेड जिल्ह्यात सध्या पाण्याने वेढलेल्यांना नागरीकांना सोडवण्याचे काम सुरू असून उर्वरीत बचाव कार्य तातडीने पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे. जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत माहिती माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणालेत.पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश देण्यात आले असून महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना केलं आहे. बाईट : राहुल कर्डीले, जिल्हाधिकारी, नांदेड
7
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 08:33:20
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार Anchor :- कल्याण डोंबिवली चा आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावली. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. पावसाला जोर नसला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार कोसळत आहेत. एकीकडे पाऊस दुसरीकडे खड्डे चुकवुन वाहनचालवताना वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसून येतेय . पावसाचा जोर कायम राहील्यास कल्याण डोंबिवली मधील सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
7
comment0
Report
SGSagar Gaikwad
Aug 18, 2025 08:23:57
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_tribal_121 *नाशिक ब्रेकिंग* - *25 ऑगस्टला नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी संघटना एकवटणार* - *आदिवासी बांधवांचा निघणार विराट मोर्चा* - गेल्या 40 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन - सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आदिवासी संघटना संतप्त - *काम करत असलेल्या पदावर कायम नियुक्तीसाठी कंत्राटी कर्मचारी गेल्या 40 दिवसापासून करत आहेत आंदोलन* - नाशिकच्या तपोवन परिसरातून मोर्चाला होणार सुरुवात - काल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली होती भेट... याच मोर्चा संदर्भात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
9
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 08:23:35
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BODY_CARRY( 1 FILE) नांदेड :ब्रेकिंग अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून न्यावा लागतोय मृतदेह नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावातील घटना नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस अनेक गावांना पाण्याने घातला वेढा, पाण्यात अडकलेलंय लोकांना काढले बाहेर अँकर : नांदेड जिल्ह्यात अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मृतदेह न्यावा लागतोय.नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावातील ही घटना आहे.मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.यामुळे अनेक गावांना पाण्याने वेढा घातलाय, पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात असलं तरीही पूर परिस्थिती अजूनही कायम आहे.अंत्यविधी क्रिया उरकण्यासाठी मृतदेह नदीच्या पुराच्या पाण्यातून नेऊन अंत्यविधी क्रिया पार पाडावी लागत असल्याचं वास्तव समोर आलंय
13
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 18, 2025 08:18:28
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहर डॉलीमुक्त करण्यासाठी सरसावले विद्यार्थी, सह्यांच्या मोहिमेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( WKT ) - सोलापूर शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी सरसावले विद्यार्थी, सह्यांच्या मोहिमेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - सोलापूर डॉल्बीमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी - सोलापुरातील लाखो नागरिकांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे डॉल्बी मुक्तीची होणार मागणी - सोलापूरकरांना विविध जयंती उत्सवाच्या निमित्ताने करावा लागतोय कार्ड कर्णरकश्य डॉल्बीचा सामना - सोलापूर डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी देखील व्यक्त केल्या भावना याच विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT ) बाईट - विद्यार्थिनी
6
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 18, 2025 08:05:58
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_SHINDE_SHETKARI सातारा - राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी साठी तत्काळ अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे.राज्यात विदर्भ, मराठवाडा त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.मात्र अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही त्यामुळे राज्य सरकार ने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजारांची मदत करावी अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे. byte -शशिकांत शिंदे byte - या सरकारची घोषणाच कर्जमाफी ची होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्ज माफी करता येत नाही असं वक्तव्य केलं आहे .यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली असून जर सरकारने लवकरच सरसकट कर्ज माफी ची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे. byte -शशिकांत शिंदे
11
comment0
Report
WJWalmik Joshi
Aug 18, 2025 08:04:45
Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi AVB FEED ON  2C SLUG- 18 08JALG_JAMNER_BETAVAD_ABU_AZMI Assigned by - Date- 18-08-25 File _VDO 4Photo Byte -1 जळगाव,जामनेर जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावद येथील तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामनेर मध्ये पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांच्या उपस्थितीमध्ये जामनेर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला तरुणाच्या हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी इतरही फरार आरोपींना अटक करावी या सह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला भर पावसामध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते या दरम्यान अबू आझमी यांनी बेटावद येथे जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन देखील केलं पोलीस स्टेशन येथे मोर्चा पोहोचल्यानंतर अबू आजमी यांच्यासह कुटुंबीयांनी पोलिसांची भेट घेत त्यांना मागण्याची निवेदन दिले. स्थानिक पोलिसांमार्फत नव्हे तर बाहेरच्या पोलीस अधिकारांमार्फत या घटनेचा तपास करावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी अबू आजमी यांनी बोलताना केली आहे एवढ्या अमानुषपणे मारहाण होत असेल तर या देशात नेमकं काय चाललंय असा प्रश्न देखील यावेळी अबू आजमी यांनी बोलताना उपस्थित केला. मुंबईत वरिष्ठ पातळीवर देखील या घटनेच्या संदर्भात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच घटनेचा पादर्शक निपक्षपणे तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अबू आजमी म्हणाले.. बाईट _अबू आझमी,( नेते, समाजवादी पार्टी)
14
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 18, 2025 08:02:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवित हानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा बळी गेला आहे. 107 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 698 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 1 लाख 19 हजार 964 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे. gfx मराठवाडा पाऊस परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जनावरांचा मृत्यू : 07 पडझड झालेली घर-गोठे : 71 बाधित गावं : 09 बाधित शेतकरी : 2160 शेती नुकसान : 3 हेक्टर हिंगोली मयत व्यक्ती :01 जनावरांचा मृत्यू : 16 पडझड झालेली घर-गोठे : 26 बाधित गावं : 185 बाधित शेतकरी : 9023 शेती नुकसान : 10789 हेक्टर नांदेड मयत व्यक्ती : 05 जनावरांचा मृत्यू : 181 पडझड झालेली घर-गोठे : 181 बाधित गावं : 363 बाधित शेतकरी : 91559 शेती नुकसान : 84188 हेक्टर बीड मयत व्यक्ती : 01 जनावरांचा मृत्यू : 01 पडझड झालेली घर-गोठे : 06 बाधित गावं : 24 बाधित शेतकरी : 1465 शेती नुकसान : 930 हेक्टर लातूर ल पडझड झालेली घर-गोठे : 11 बाधित गावं : 09 बाधित शेतकरी : 161 शेती नुकसान : 184.5 हेक्टर धाराशिव जनावरांचा मृत्यू : 53 पडझड झालेली घर-गोठे : 64 बाधित गावं : 108 बाधित शेतकरी : 15590 शेती नुकसान : 15326 हेक्टर एकूण मराठवाडा जखमी :01 मयत व्यक्ती : 05 जनावरांचा मृत्यू : 107 पडझड झालेली घर-गोठे : 350 बाधित गावं : 798 बाधित शेतकरी : 119964 शेती नुकसान : 111420.55 हेक्टर
12
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top