Back
चंद्रपुर में सरकारी ठेकेदार बनकर 40 लाख की कॉपर केबल चोरी: गिरफ्तार अंतरराज्यीय गैंग
AAASHISH AMBADE
Sept 09, 2025 12:47:27
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0909ZT_CHP_420_CONTRACTOR
( single file sent on 2C)
टायटल :--- चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून ४० लाखांची चोरी,आंतरराज्यीय टोळीला एलसीबीकडून अटक
अँकर :----चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून तब्बल ४० लाखांचा कॉपर केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बीएसएनएलच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी कोसारा परिसरात छापा टाकून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी उत्तरप्रदेशातील बदायु येथील असून, त्यांच्या ताब्यातून ४४ लाखांहून अधिक किमतीचा कॉपर केबल ल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
बाईट १) अमोल काचोरे , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 10, 2025 02:47:28Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1009ZT_JALNA_ACCIDENT(5 FILES)
जालना : अंबड-जालना महामार्गावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू
पिकअप चालक फरार
अँकर : जालन्यातील अंबड-जालना महामार्गावरील गोलापांगरी टोलनाक्याजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 30 वर्षीय भगवान काळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचं नाव आहे.काळे हे दुचाकीवरून जालन्याकडून अंबडकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपने त्यांना धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार भगवान काळे गंभीर जखमी झाले.त्यांना नागरीकांनी तातडीने रूग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 10, 2025 02:45:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn gold theft update
Feed attached
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, दरोड्यात चोरीला गेलेल्या ५.५ किलोपैकी केवळ ७८९.११४ ग्रॅम सोने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ४० किलोपैकी ३१ किलो ३८९ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे. त्याचबरोबर २४ लाख रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. हे दोषारोपपत्र १,२८९ पानांचे आहे.
बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या घरी १५ मे रोजी दरोडा टाकला होता. या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार, मुख्य आरोपी अमोल खोतकर एन्काउंटरमध्ये मारला गेला होता...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 10, 2025 02:32:40Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn water scheme av
Free attched
पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी ८२२ कोटींच्या कर्जाला शासनाची हमी मिळाली आहे. हुडकोमार्फत हे कर्ज मिळणार असून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित कामासाठी निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे २,७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेच्या कामाला गती मिळेल. ही योजना 'अमृत-२' अंतर्गत जीवन प्राधिकरणामार्फत राबवली जात आहे. योजनेत केंद्राचा २५ टक्के, राज्याचा ४५ टक्के आणि महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे. केंद्र व राज्य सरकारने आपला वाटा दिला आहे. मात्र, ८२२ कोटींचा हिस्सा देण्यात महापालिका असमर्थ होती. त्यामुळे कामाची गती मंदावली होती. महाराष्ट्र
महापालिकेची आर्थिक अडचण लक्षात घेता शासनाने हा भार थेट उचलावा, अशी मागणी होत होती. मात्र शासनाने तो निधी थेट न देता कर्जरूपी मदत केली आहे..
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 10, 2025 02:17:28Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1009_BHA_OBC_MORCHA
FILE - 9 VIDEO
ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण न देण्याबाबद साकोली तहसीलकार्यलयावर भव्य मोर्चा
Anchor - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी सकल ओबीसी समाज व ओबीसी संघटनेचया वतीने भंडारा जिल्ह्यातील साकोली तहसील कार्यलयावर भव्य मोर्चा काढण्यात आला असून मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावा या करिता मुबंई ला उपोषणला बसले होते. त्याची मागणी सरकार ने हैद्राबाद ग्याझेटीअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातींचे प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे.तर तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. व मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबद कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समजावर होत असून याचा तीव्र परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे.
बाईट - बाळकृष्ण सार्व्हे ओबीसी समाज अध्यक्ष
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 10, 2025 02:16:06Bhandara, Maharashtra:
प्राथमिक आरोग्यकेंद्राला ताडपत्रीचा आधार......रुग्णासह डॉक्टराना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते रुग्णालयात
Anchor :- भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चक्क ताडपत्रीचा ( प्लास्टिक ) आधार घेत सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या आरोग्य केंद्रातील सर्वच खोल्या ह्या पाऊसाचा पाण्यामुळे जीर्ण झालेल्या असून गळती सुरू झालेली आहे.. अनेक ठिकाणी वरील काँक्रिटचे खिपले खाली पडलेले दिसून येत आहेत. मागील अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी गावकऱ्याकडून होत आहे. मात्र शासन याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी नियमित होणारी रुग्ण तपासणी खंडित होऊ नये यासाठी संपूर्ण आरोग्यकेंद्र (पॉलिथिन ) ताडपत्रीने झाकलेले आहे . व ताडपत्रीचा आधारावर हे आरोग्य केंद्र सुरू असून मोठी घटना घडल्यावर प्रशासन लक्ष देणार का...! असा प्रश्न परिसराततील लोकांना पडलं आहे.
BYTE :- डॉ. चंदू वंजारे - प्राथमिक आरोग्य अधिकारी
BYTE :- गोकुळ चुटे - स्थानीक नागरिक
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 10, 2025 01:45:09Parbhani, Maharashtra:
पत्नीने दूध सांडल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला घरी व शेतात काठीने मारून तसेच दस्तीने तिचा गळा आवळून जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील बलसा येथे घडली. सुनीताबाई शिंदे अस मयत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की सुनीताबाई देवीदास शिंदे ह्या पूर्णा तालुक्यातील बलसा येथील देवीदास शिंदे यांच्या पत्नी आहेत. सुनीताबाई शिंदे यांच्याकडून दूध सांडले असता पती देवीदास शिंदे याने याच रागातून त्यांना मारहाण किलो,त्यांचा दस्तीने गळा आवळला यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय.
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 10, 2025 01:30:44Parbhani, Maharashtra:
अँकर- बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात सहभाग करून समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे,हैद्राबाद गॅझेट मध्ये आमच्या एसटी प्रवर्गात नोंदी असल्याचे सांगत परभणीच्या जिंतूर येथे विनोद आडे मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बंजारा समाजाने जिंतूर तहसिलवर विराट मोर्चा काढत एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली.
7
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 10, 2025 00:45:52Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - तासगावनजीक कार व दुचाकीचा भीषण अपघात बुर्लीचे तिघे ठार: चार जखमी
मृतात आजी,आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत..
अँकर - सांगलीच्या तासगाव नजीक चार
कार व दुचाकीचा भीषण अपघातात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात आजी,आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे.शिवाजी बापू सुतार, वय-57, आशाताई शिवाजी सुतार-वय -55 आणि वैष्णव ईश्वर सुतार- वय -5,अशी मृतांची नावे आहेत.हे सर्व जण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील असून दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.परतता असताना तासगाव- भिलवडी मार्गावर समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक झाली,ज्यामध्ये दुचाकीवरील आजी,आजोबा आणि नातू असे तिघे जण जागीच ठार झाले.तर चारचाकी गाडी ही रस्त्याच्या कडेला जाऊन द्राक्षबागेत कोसळल्याने चारचाकी मधील चौघेजण जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्व जखमी हे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कडेपूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून तासगाव मार्गे सांगलीला परतता होते.
12
Report
ABATISH BHOIR
FollowSept 09, 2025 16:33:58Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीतील रेरा घोटाळा प्रकरणातील 65 इमारतीं संदर्भात मंत्रालयात बैठक..
Anc..कल्याण डोंबिवली महानगरपालिका रेरा प्रकरणातील ६५ इमारतीं संदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली. ही बैठक प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात पार पडली.
या आधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते 65 इमारतींमधील कोणत्याही कुटुंबाला बेघर व्हावे लागणार नाही. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत सूचना मांडण्यात आल्या.
या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत. खरे गुन्हेगार विकासक असून त्यांच्यावर कारवाई व्हावी.
शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून जनतेच्या न्यायासाठी ठोस निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.शासन यावर काय निर्णय घेतो याकडे सर्व रहिवासी चा लक्ष लागला आहे.
या बैठकीस कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे , ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे ,महसूल विभागाचे अधिकारी, नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच ६५ इमारत बचाव समितीचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
14
Report
ABATISH BHOIR
FollowSept 09, 2025 16:16:18Kalyan, Maharashtra:
डोंबिवली छेडा रोडवर वृद्ध महिलेला ठेकेदाराच्या गाडीची धडक – CCTV मध्ये कैद!
KDMC पथदिवे दुरुस्तीच्या गाडीने महिलेला उडवले, गंभीर जखमी
अपघातानंतर पाऊण तास उलटला तरी पोलीस घटनास्थळी नाही – नागरिकांचा संताप.
संबंधित ठेकेदार व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
14
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 09, 2025 16:16:08Thane, Maharashtra:
ब्रेकिंग...
रिल बनवण्याच्या नादात दोन बहीणीच्या जीवावर बेतला...
वासुंद्री जवळ काळू नदीत दोन बहिणी बुडाल्या..
ॲंकर...
कल्याण तालुक्यातील मांडा-टिटवाळा परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मांडा येथील पाटील नगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी रिल बनवण्यासाठी वासुंद्री जवळ काळू नदीकाठी गेल्या असता नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साधारण सव्वा दोनच्या सुमारास पाटील नगरातील आलिया अन्सारी (१८) आणि तिची लहान बहीण सना अन्सारी (८) या दोघी रिल बनवण्यासाठी वासुंद्री जवळ काळू नदीकाठी गेल्या होत्या. दरम्यान, नदीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने व प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघींचा तोल गेला व त्या पाण्यात बुडाल्या. काही क्षणात ही घटना घडल्याने आसपासच्या लोकांना मदतीला धाव घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एपीआय नलावडे यांनी तातडीने केडीएमसीच्या अग्निशमन दलाला संपर्क साधून मदतीसाठी बोलावले. अग्निशमन दलाचे सब फायर ऑफिसर तडवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. सब फायर ऑफिसर जयेश मोरे यांच्यासह दलातील जवानांनी नदीत शोधमोहीम राबवली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आलिया अन्सारीचा मृतदेह सापडला व तो बाहेर काढण्यात आला. दुर्दैवाने ती वाचू शकली नाही. मात्र तिची लहान बहीण सना अन्सारी हिचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या शोधमोहीमेकरिता पथक नदीच्या खोल भागात जाऊन प्रयत्नशील आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पाटील नगर परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. पाण्यात बुडून झालेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा नदीकाठच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
14
Report
ABATISH BHOIR
FollowSept 09, 2025 15:48:03Kalyan, Maharashtra:
टिटवाळा मध्ये काळूनदीत दोन बहिणी बुडल्याची दुदैवी घटना...
Anc...कल्याण-टिटवाळातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरातील गणेश नगर परिसरातील राहणाऱ्या दोन बहिणी दुपारी कपडे धुवण्यासाठी काळूनदी शिवमंदिर येथील नदी काठी गेल्या असता.नदीत पाणी वाढले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी बहिणी पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात शोककळा पसरली.
केडीएमसीच्या अग्निशमन दलाला कळविले असता अग्निशमन दलाचे टीमला पाठविले दोन तासाच्या अथ्थक प्रयत्नाने रिया अन्सारी 18 वर्षे वय हिचामुत्यु देह अग्निशमन दलाच्या हाती लागला तो पाण्याबाहेर काढण्यात आला.तर आठ वर्षीय सिना अन्सारी हिचा शोध सुरूआहे अग्निशमन दला कडून मिळाली. लागला नव्हता., तर बुडण्याचा आगोदर पाण्यात कपडे धुण्याचा व्हिडीओ हा अखेर चा ठरला आणि काळाने घाला घातला.
14
Report
MAMILIND ANDE
FollowSept 09, 2025 14:50:39Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 0909_WARDHA_SCHOOL_LOCK
शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप
जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी पालकांचा एल्गार
चार शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीनंतर तात्काळ शिक्षक देण्याची मागणी
वर्धेच्या विजयगोपाल येथील प्रकार
विजयगोपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर विद्यार्थ्यांसह पालकांचा ठिय्या
अँकर : वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील जिल्हा परिषद शाळेला चक्क शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेच्या प्रवेश द्वारालाच कुलूप ठोकले आहे. 130 इतकी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते. अचानक चार शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आलीय. त्यामुळे विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरनिवर आलाय. कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी होत आहेय. पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत शाळेसमोर ठिय्या मांडलाय. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत कुलूप उघडदार नसल्यांचा पालकांनी पवित्रा घेतलाय. शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा पालकांनी निषेध नोंदविला. चार शिक्षकांची ऑनलाइन बदली झाल्याने एका शिक्षकावर 130 विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भार आल्याने पालक संतप्त झाले.
बाईट - किरण ठाकरे, आंदोलक
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 09, 2025 14:49:42Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील रामदास पेठ परिसरात अचानक एका चारचाकी वाहनाला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास रामदास पेठ पोलिसांकडून सुरू आहे.
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 09, 2025 14:49:28Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांमुळे मालवाहु टेम्पो पलटी
Ulh potholes
Anchor उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ते धोकादायक बनले आहेत .या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आज दुपारी शहरातील कॅम्प नंबर 5 भागातील आनंद पुरी दरबार रस्त्यावर एक मालवाहतूक टेम्पो खड्ड्यात अडकून पलटी झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही मात्र यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले .या रस्त्यामुळे शहरात रोज अपघात होत असतानाही महापालिका मात्र काहीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.तर शहरातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झालय,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
14
Report