Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपूरात 106 वर्षांचा गणेशोत्सव: बृहदेश्वर शिव मंदिराची भव्य प्रतिकृती!
AKAMAR KANE
Aug 31, 2025 04:33:16
kolhapur, Maharashtra
Ngp Dakshinamurti Ganesh live u ने फीड पाठवले --------------- नागपूर -- तामिळनाडू मधील तंजावर जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक बृहदेश्वर शिव मंदिराचे दर्शन तुम्हाला नागपूरात घ्यायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल महाल भागातील दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळात... नागपुरातील सगळ्यात जुन्या गणेशोत्सव मंडळा असलेल्या दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ यंदा 106 व वर्ष साजर करत असून अगदी कमी जागेत भव्य मंदिर इथं साकारला आहे, बृहदेश्वर शिव मंदिरात असलेल्या 13 फूट उंचीच्या शिव लिंगाची प्रतिकृती इथं साकारली असून 14 फूट उंचीवर बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे, बाप्पांची मूर्ती देखील विलक्षण असून 14 फूट उंचीवरून 11 फुटाचा बाप्पा जणू आकाशातून आपल्याला आशीर्वाद देतोय असा भास होतो.. या देखाव्याचा आढावा घेत मंडळाचा वैशिष्ट्य पाहुयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्यासोबत.. ------- बाईट -- विवेक धाकरस, कोषाध्यक्ष, दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Sept 01, 2025 04:16:50
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_MLA_HELP मुंबईमध्ये आंदोलनासाठी गेलेल्या आंदोलकांची नेरूळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये राहण्या, खाण्याची व्यवस्था. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केली ही व्यवस्था. आंदोलकांना थेट मदत करणारे आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे भाजपाचे एकमेव आमदार. अँकर धाराशिव जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे गेले आहेत . त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था नेरूळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सध्या हजारो मराठा बांधव मुक्कामी आहेत. त्यांची खाण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आंदोलकांना मदत करणारे राणा जगजीत सिंह पाटील हे एकमेव भाजप आमदार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये या असे आवाहन आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केले आहे. Byte आंदोलक
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:46:33
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील करण वानखडे (वय 24) हा युवक काही दिवसांपूर्वी मन नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनेनंतर सुरू झालेल्या शोधकार्याला काल संध्याकाळपर्यंत काहीही यश आले नव्हते..दरम्यान, सुनील कल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड यांनी मोठ्या प्रयत्नांनी शोध मोहीम सुरू ठेवली. अखेर घटनास्थळापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर गावाजवळ करण वानखडे याचा मृतदेह सापडला.या शोधकार्यामुळे गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून, आपत्कालीन बचाव पथकाचे धाडसी प्रयत्न व तातडीने केलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 01, 2025 03:34:45
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या शिवांश गौरव आगाशे या इयत्ता चवथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गणपती बाप्पासाठी १८३ देशांचे ध्वज रंगवून देखावा सादर केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ९ वर्षांच्या शिवांशला या सर्व ध्वजांची ओळख असून त्या देशांची नावे मुखोद्गत आहेत. मुले पुस्तकांमधून कथा शोधत असताना, शिवांश मात्र संपूर्ण जग शोधत आहे. तो देशांबद्दल, तेथील संस्कृतींबद्दल देखील माहिती जाणून घेत आहे. त्याच्या या अद्वितीय कौशल्याचे सादरीकरण तो गणपती बाप्पा पुढे करीत असून विद्यार्थी वर्गाला ते प्रेरणादायी आहे. प्रत्येक देश त्याला आठवतो आणि त्यांचे झेंडे ओळखू शकतो. विद्येची, बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची शिवांश कडून होत असलेली ही आराधना बघून गणेश भक्त कुतूहल व्यक्त करीत आहेत. शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नाही तर ते उत्सव, कला आणि अगदी श्रद्धेतूनही चमकू शकते. यवतमाळच्या उबंटू शाळेत शिकणाऱ्या शिवांशच्या प्रतिभेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:32:48
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यात आला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा परिसरात 29 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कमळगंगा नदीला प्रचंड महापूर आला होता. या अचानक आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, कंझरा ते आरखेड शिवारातून शेतीचे काम आटोपून घरी परतत असताना रेखा रमेश मते आणि त्यांची मुलगी साक्षी रमेश मते कमळगंगा नदी पार करताना पाण्याच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्या. या भीषण दुर्घटनेत मुलगी साक्षी काटेरी झुडपाला अडकून थोडक्यात बचावली, मात्र आई रेखा मते वाहून गेल्या होत्या. आपत्कालीन शोध व बचाव पथक महिलेचा शोध घेत होते.या महिलेचा मृतदेह वीर भगतसिंग आपत्कालीन पथक (कुरणखेड), गाडगे महाराज पथक (पिंजर) व माँ चंडिका पथक (पैलपाडा) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शोधण्यात यश मिळाला..
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 03:19:33
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_ganpti_godavri *दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदी आणि रामकुंड प्रतिकृतीचा देखावा साकारत दिला गोदा स्वच्छतेचा संदेश* अँकर गणेश उत्सवानिमित्त भाविक विविध देखावे साकारत असतात घरगुती गणेशोत्सवात देखील आकर्षक देखावे बनविण्यात येतात... यातच नाशिकच्या राहुल शिंपी यांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संदेश देत रामकुंड परिसराचा देखावा आपल्या घरात साकारला आहे.... दक्षिणगंगा समजल्या जाणारी गोदावरी नदी स्वच्छ कशी राहील याचा संदेश यातून देण्यात आलाय... आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक हे नाशिक मध्ये येणार आहे... यामुळे गोदावरी नदी प्रवाहित राहिली पाहिजे या अनुषंगाने गोदाकाठचा हा देखावा साकारण्यात आलाय... शिंपी कुटुंबीयांनी रामकुंडाची पर्यावरण पूरक प्रतिकृती साकारात एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय... या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी नो टू प्लास्टिक बॅगचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे... ही घरगुती गणेशाची आरास साकारण्यासाठी शिंपी कुटुंबीयांना दोन महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.... बाईट : राहुल शिंपी
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:19:12
Akola, Maharashtra:
Anchor : मुलीच्या लग्नाची जबाबदारी साकार करणारा देखावा ज्येष्ठा गौरीसमोर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा येथील गजानन खवले यांनी साकारला आहे.ज्येष्ठा गौरी-गणपती आगमनानिमित्त हा एक आगळावेगळा देखावा साकारण्यात आला आहे. गजानन खवले यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी हा सामाजिक संदेश देणारा देखावा उभारला आहे.मुलीचं लग्न ही आई-वडिलांसाठी मोठी जबाबदारी असते, हाच संदेश देत त्यांनी लग्नाची सुरुवात – म्हणजेच वधू-वर एकमेकांना पाहण्यापासून ते लग्नसोहळ्याच्या विविध टप्प्यांतून अखेरच्या विदाई क्षणापर्यंतचा प्रवास या देखाव्यात मांडला आहे.या देखाव्यामुळे गावातच नव्हे तर परिसरातही उत्सुकता वाढली असून, अधिक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या या देखाव्याला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.या माध्यमातून मुलीच्या लग्नाची जबाबदारी आणि त्यामागील सामाजिक वास्तव अधोरेखित करण्यात आले आहे.
6
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 01, 2025 03:18:50
Yavatmal, Maharashtra:
AVB यवतमाळच्या दिग्रस येथील श्री पाळेश्वर मंडळ परंपरेला अधोरेखित करत समाजप्रबोधनाचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. संस्कृतीचे संवर्धन, समाजजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे अनोखे उदाहरण मंडळाने घडवले आहे. यंदा मंडळाने हेमाडपंथी मंदिराची अप्रतिम प्रतिकृती साकारली असून त्यात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. “झाडे लावा – झाडे जगवा” या उदात्त संदेशावर आधारित उपक्रमांसोबतच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशोगाथा आणि विष्णुपुराणातील भगवान श्री विष्णूच्या दशावतारांचा देखावा हा मंडळाचा आकर्षणबिंदू ठरत आहे. बाईट :
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:18:40
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0109ZT_MAVAL_DEHU_HELP Total files : 03 Headline : देहूतून पाच टेम्पो भरून अन्न मुंबईला रवाना देहूगाव व पंचक्रोशीतील मराठा एकवटला Anchor : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्ध मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन करीत आहेत.या आंदोलनात जरी काही मराठा बांधवाना सहभागी होता आले नाही ,तरी एक कृतज्ञता म्हणून समस्त देहूगाव व पंचक्रोशीतील समस्त मराठा समाजाने एकत्र येऊन आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी भाजी भाकरी संकलन करण्याचा निर्णय घेतला आणि ही भाजी,भाकरी,चटणी, पाण्याच्या बाटल्या देहूगाव येथील हनुमान मंदिरात जमा करण्याचे आवाहन केले. देहूकरांनी भाकरी भाजी ,चटणी, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे ,राजगिरा लाडू असे अन्न जमा केले.त्याप्रमाणे भाकरीचे पाच टेम्पो एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुंबईच्या दिशेने रवाना झाले .या भाकरी चटणी संकलनास देहूगाव व पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
6
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:18:34
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0109ZT_MAVAL_KEDARNATH Total files : 03 Headline : मावळात प्रशांत भागवत यांनी साकारला केदारनाथ देखावा बाप्पांच्या मूर्तीवर पडणारी थेट सूर्याची किरणे पाहण्यासाठी होत आहे गर्दी Anchor: मावळ तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त घरगुती देखावे म्हणजेच गणेशभक्तांच्या कलेचा उत्सव असतो. याच पार्श्वभूमीवर इंदोरी गावातील प्रशांत भागवत यांचा केदारनाथ थीमवरील गणपती देखावा यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणरायाच्या मूर्तीवर पडणारी सूर्याची थेट किरणे... भक्तिभावाने नटलेला हा क्षण पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे करतो. भागवत कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झालेला हा देखावा अल्पावधीतच परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ती, निसर्गाची किमया आणि कलेचा अनोखा संगम घडवणारा ‘केदारनाथचा बाप्पा’ इंदोरीकरांना आणि गणेशभक्त यांना अद्वितीय अनुभव देतोय. बाईट : प्रशांत भागवत (file no.03)
5
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 01, 2025 03:17:54
Kalyan, Maharashtra:
कल्याणचा रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. मुंबईमध्ये मराठा आंदोलन च्या पार्श्वभूमी वरती कल्याण मधून देखील मराठा बांधव ते मुंबईच्या दिशेने जात आहेत का जाताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्याच्या रेल्वे कल्याण रेल्वे स्थानका बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 03:17:46
kolhapur, Maharashtra:
Ngp Bhoyar 121 live u ने फीड पाठवले -=-------- मराठा आरक्षणाकरिता मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे... विकेंड नंतर सोमवारी पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमानी दक्षिण मुंबईत कामाच्या निमित्ताने पोहचेल.. यावेळी सरकारकडून कोणती व्यवस्था करण्यात येत आहे.. आंदोलकांना कोणत आवाहन करण्यात आले.. याबाबत जाणून घेतले आहे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण) पंकज भोयर यांच्याकडून ------ नागपूर पंकज भोयर, राज्यमंत्री (121) ( सोमवारी मुंबईतील आझाद मैदान आंदोलनचा 4चौथा दिवस--मुंबईतील चा करमानी यांना त्रास होणार?) -- आंदोलकांनी याचा विचार करायला हवा.. लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करावे... मात्र हे आंदोलन करताना आपल्या गावातील लोकांना त्रास होतो आहे का? लोकांचा विचार लोक आंदोलकांनी केला पाहिजे ( ओबीसी पुन्हा लेखी आश्वासन हवे ) -- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देतील यासाठी प्रयत्न --- सरकार म्हणून ओबीसी आंदोलनाची नक्कीच भेट घेऊ... ओबीसी समाजाला केवळ धास्ती आहे मुंबई सुरू असलेल्या आंदोलनामुळे (मार्ग कसा निघेल) --- उप समितीच्या सदस्यांच्या बैठका सुरू आहे... चर्चा करून नक्कीच चांगला मार्ग काढेल ( आंदोलकांना रसद कोण पुरवत आहे ) -- मुख्यमंत्र्यांना माहिती आहे.... योग्यवेळी (सुप्रिया घेराव ) ---हे साहजिक आहे.... शरद पवार हे अनेक वर्ष राज्य सत्तेत होते, मुख्यमंत्री होते,... मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी कोणती कार्यवाही केली नाही.. आणि आता लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.... लोकांचे लक्ष विचलित करण्याकरता ते मार्ग सुचना करतात... लोकांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड असंतोष आहे (on छगन भूजबळ बैठक obc) --- मी स्वतः ओबीसी समाजांमधून येतो आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात बहुजन समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी सरकारमध्ये काम करत आहे... ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाला आरक्षण देऊ
3
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 03:02:47
kolhapur, Maharashtra:
नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे... ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे... तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी साखळी उपोषणाच्या दोन दिवसात दिवशी प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली... भाजपाचे आमदार प्रविण दटके,आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी,खासदार नामदेव किरसान या सह अनेक आजी-माजी आमदार तसेच काही नेत्यांनी उपस्थिती या आंदोलनाला पाठिंबा दिला... दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडून पुन्हा लेखी आश्वासन मागितले आहे.
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 01, 2025 03:02:42
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात श्वास गुदमरल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध तर यापैकी दोघां बहिण भावांचा घटनेत दुर्दैवी मृत्यू - सोलापुरात गॅस गळतीमुळे पाच जणांचं कुटुंब बेशुद्ध अवस्थेत तर बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू - सोलापुरातील लष्कर भागातील घटना, सकाळी 11:00 च्या सुमारास घटना आली उघडीस - वडील, आई, आजी या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू - रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केला नव्हता आणि त्याच दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत पाच जणांचा कुटुंब झोपले होते. - यातच पाच जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडल्याचा प्राथमिक अंदाज. - युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय : 40), रंजना युवराज बलरामवाले (35), विमल मोहन सिंग बलरामवाले (60) यांच्यावर उपचार सुरू आहेत तर हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. - सदर पाच जणांच्या कुटुंबातील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.. - बलरामवाले कुटुंब दोन दिवसापूर्वीच तिरुपती वरून दर्शन घेऊन परतले होते.. - लष्कर परिसरातील बेडर फुल जवळ युवराज बलराम वाले हे आपल्या कुटुंबासह राहतात.. - युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते, आई विमल ही एका रुग्णालयात कामाला होती. - रंजना हिच्या सोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते आणण्यासाठी गेले असता परत आल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आलं आढळून. - या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून याचा पुढील तपास होत आहे Byte : प्रत्यक्षदर्शी
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 01, 2025 03:02:32
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_old_man_Education ( साक्षर अभियानाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा) नाशिक जिल्ह्यात तब्बल २८ हजार ज्येष्ठ झाले साक्षर अँकर शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे प्रत्यक्षात उतरवत नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी नवीन आदर्श घालून दिला आहे. वयाच्या ६५ वर्षापुढे जाऊनदेखील ज्ञानाची ओढ कायम ठेवत तब्बल ५० ज्येष्ठ नागरिकांनी यंदा परीक्षेत सहभाग नोंदवला आणि उल्लेखनीय यश मिळवले आहे....'उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत जिल्ह्यातील ३,१४६ केंद्रांवर एकाचवेळी परीक्षा घेण्यात आली. यातून जिल्हाभरातील २९ हजार १५ पैकी २८ हजार २६२ परीक्षार्थी उपस्थित राहिले. त्यापैकी तब्बल २८ हजार २४० जण उत्तीर्ण होऊन नाशिकने ९९.९९ टक्के निकालाचा विक्रम नोंदवला आयए इमेज नागरिकांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे आहे. या यशामुळे नाशिक जिल्हा राज्यातच नव्हे तर देशभरात साक्षरतेचा नवा दीपस्तंभ ठरत आहे. ज्येष्ठ तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १८ हजार ०६१ स्त्रियांचा समावेश होता. तर पुरुषांची संख्या ही १० हजार १९५ एवढी होती. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या सुमारे दुप्पट होती. त्याशिवाय ६ ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही परीक्षेला हजेरी लावली....
3
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 01, 2025 03:01:57
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0109ZT_MAVAL_VANRAI_KARAR Total files : 05 Headline : मावळात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मोठं पाऊल… Anchor: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मावळात मोठं पाऊल… सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय यांच्यात करार झाला असून मावळातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरातील विदेशी झाडे हटवून स्थानिक भारतीय वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमामुळे मावळची जैवविविधता वाचेल, हिरवेगार जंगल फुलेल आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध नैसर्गिक वारसा निर्माण होईल. या करारावेळी सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे, मावळचे आमदार सुनील शेळके तसेच उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते..
4
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top