Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में हमीभाव कपास खरीद 15 मार्च तक, किसानों ने तारीख बढ़ाने की मांग

GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 03:49:12
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात सीसीआय मार्फत हमीभावाने कापूस खरेदी सुरू असून या खरेदीची अंतिम तारीख १५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्रीसाठी शिल्लक आहे. विशेषतःकारंजा परिसरातील शेतकऱ्यांना स्लॉट मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांचा कापूस खरेदी केंद्रावर आणता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मुदت वाढविण्याची मागणी होत असून १५ मार्चनंतरही हमीभावाने खरेदी सुरू ठेवावी, अशी अपेक्षा कापूस उत्पादकांनी व्यक्त केली जातंय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 04:15:54
Akola, Maharashtra:अकोला शहर के गांधी मार्ग पर बिंदी घर नामक दुकान समेत चार दुकानों में भीषण आग लगने की घटना सामने आई है। कल मध्यरात्रि के आसपास यह आग लगी और इन चारों दुकानों के पूरी तरह जलकर राख हो गए हैं। इस घटना के बाद नगरपालिका प्रशासन ने साहसिक कदम उठाते हुए विवादास्पद दुकान समेत कुछ अतिक्रमित दुकानों को हटाने की मुहिम चलाई थी। लेकिन कुछ दुकानें अब भी शेष थीं। इसके दौरान कल रात अचानक इन दुकानों को भीषण आग लग गई। प्राथमिक जानकारी के अनुसार शॉर्ट सर्किट के कारण आग लगी। आग की सूचना मिलते ही नगरपालिका अग्निशमन दल की गाड़ियाँ तुरंत घटनास्थल पर पहुंचीं और आग पर काबू पाया गया। हालांकि तब तक चारों दुकानें जलकर राख हो चुकी थीं और संबंधित व्यवसायियों को भारी आर्थिक नुकसान हुआ है।
78
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 04:04:48
Washim, Maharashtra:हिंगणवाडी येथे विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे भीषण आग लागून सुमारे६ एकर गहू जळून खाक झाला.या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज वितरणच्या हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसल्याचे समोर आले आहे.हिंगणवाडी येथील शेतकरी रमेश साबणकर,सतीश साबाणकर आणि शिवदास साबाणकर या तिन्ही भावांनी सुमारे सहा एकरमध्ये गहू पेरणी केली होती.मात्र जीर्ण झालेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे संपूर्ण पीक आगीत जळून गेले.या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यापूर्वीही जिल्ह्यातील सावरगाव,केकत उमरा आणि आमगाव येथे अशाच प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या होत्या.
152
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 14, 2026 03:48:20
Malegaon, Maharashtra:आखाती देशांच्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर बंद यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याला पर्याय म्हणून नागरिक कोळश्याकडे वळालेले आहेत. पर्यायाने कोळशाच्या मागणीत आता वाढ झाली आहे. इराण अमेरिका इस्राईल युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून आला आहे. काही ठिकाणी घरगुती गॅस, CNG आदींचा तुटवडा जाणवू लागला. आता पोट भरण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या ऐवजी चूल पेटवण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी आदींसाठी आता कोळशाची वापर सुरू झाला असून त्याची मागणी वाढल्याने कोळशाचा दरात देखील 5 ते 10 रुपयांनी वाढ होऊन ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. नेहमीपेक्षा आता नवीन ग्राहक कोळसा खरेदी करण्यासाठी येत आहेत तर काही नागरिकांना कोळसा कुठे मिळतो देखील माहीत नसल्याने ते त्याचा शोध घेत आहेत. भविष्यात कोळशाचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता मात्र कोळसा वापरण्यास नागरिकांचा कल वाढला असून त्याची मागणी वाढली आहे. एकंदरीत बघितले तर युद्धाची झळ मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू लागल्याने मोठे आर्थिक संकट देखील उभा राहून जीवनमान खालावण्याची चित्रे दिसू लागली आहेत. लवकरच यावर तोडगा काढावा अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.
115
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 03:48:00
Ahilyanagar, Maharashtra:अमेरिका- इस्राईल और इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक ‘एलपीजी सिलिंडर’ पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत... अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यवसायिकांची व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक हतबल झाले असून आता हॉटेलमध्ये विटांची चूल तयार त्यावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.. ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे... नगर शहरातील सावेडी परिसरात असलेल्या जय आनंद या खानावळ चालकाने व्यवसाय टिकवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे... सामान्य कष्टकऱ्यांचं हॉटेल अशी ओळख असलेल्या जय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आणि शहरातून जाणारे प्रवासी जेवण करतात
98
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 03:31:40
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचा फार्मर आयडीच निघत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे, शासनाने बहाल केलेल्या नवीन शर्तीच्या जमिनी या जिरायत म्हणून शेतकऱ्यांना बहाल केल्या मात्र कालांतराने या जमिनी शेतकऱ्यांनी बागायत केल्या पण सातबारा वरती त्या जिरायत म्हणून तशाच राहिल्या त्याचा सातबारा वरती बदल न झाल्याने शेतकऱ्यांना जिरायत पोटखराबा असलेल्या जमिनींचें फार्मर आयडीच निघत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा महत्वाचा प्रश्न शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अधिवेशनात मांडला त्यामुळे शासनाने तातडीने या मध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार कटके यांनी अधिवेशनात केलीय.
144
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 02:32:41
Akola, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका अनेक उद्योगांना बसत आहे. अकोला शहरात सुमारे ४०० हॉटेल व्यवसायिक आहेत. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. तरीही ग्राहकांची सेवा थांबू नये या उद्देशाने काही व्यवसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. चुलीवर स्वयंपाक करणे कष्टदायक आणि वेळखाऊ असले तरीही अनेक वर्षांपासून या भोजनालयांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेल मालकांनी हा मार्ग स्वीकारला आहे. काही हॉटेल्समध्ये चूल पेटवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही व्यवसायिकांना हॉटेलच्या बाहेरच चूल मांडून स्वयंपाक करावा लागत आहे. धुरामध्ये आणि वाढलेल्या कष्टांमध्येही हे कुटुंब ग्राहकांना जेवण मिळावं म्हणून दिवस-रात्री मेहनत करत आहे. अकोला शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण, व्यापारी तसेच पर्यटक यांना दशकांपासून येथील भोजनालयांनी सेवा दिली आहे. आज गॅसच्या तुटवड्याच्या संकटातही ही सेवा खंडित होऊ नये म्हणून अनेक हॉटेल व्यवसायिकांनी चुलीवरच जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या भोजनालयांमध्ये शेकडो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक सुरू ठेवत त्यांनी कर्मचाऱ्यांचा रोजगारही टिकवून ठेवला आहे. ग्राहकांनाही या परिस्थितीची जाणीव असल्याने तेही या व्यवसायिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. गॅसचा तुटवडा, वाढलेली मेहनत आणि अनेक अडचणी, तरीही ग्राहकांची सेवा थांबू नये आणि आपल्या कामगारांच्या घरातील चुल पेटती राहावी, या भावनेेतून अकोल्यातील हॉटेल व्यवसायिकांनी चुलीचा आधार घेतला आहे. संकटाच्या या काळातही सेवा, जिद्द आणि माणुसकी जपणाऱ्या या हॉटेल व्यवसायिकांची ही लढाई खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.
111
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:31:02
176
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 14, 2026 02:17:55
181
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:17:25
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा परिषदेने 2026-27 वर्षासाठी 59 कोटी 55 लाख रुपयांचा वार्षिक अंदाजपत्रक जाहीर केलं आहे. मागील चार वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी और लेखाधिकारी यांनी विशेष सभा घेऊन अंदाजपत्रक सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न आणि प्रत्येक विभागाचा खर्चाचा मेळ घालणार हे अंदाजपत्रक असून प्रत्येक विभागाला पुरेल असा निधी देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. या वर्षाखेर पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजपत्रकात काही बदलही होऊ शकतात.
240
comment0
Report
Advertisement
Back to top