Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

गणेश नाइक: गली-गली घूमकर नगरपालिका जीत की धुन, लोकसभा से भारी मेहनत

SNSWATI NAIK
Dec 06, 2025 10:24:28
Navi Mumbai, Maharashtra
वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रभाग बदलल्यामुळे निराश झालेल्या नवी मुंबईतील माजी नगरसेवकांना कानमंत्र देत त्यांचे मनोबल वाढवलेय. तुम्ही ज्याठिकाणी उभे राहाल त्याठिकाणी जनता तुम्हाला नेतृत्व देईल आणि त्याकरता गणेश नाईक गल्ली गल्ली मध्ये फिरेल आणि लोकसभेला, विधानसभेला जितका झटलो नाही त्यापेक्षा जास्त महापालिकेला मी झटेन. तन मन आणि ज्याठिकाणी गरज असेल तिथे जे पण आपण समजून घ्या(धन) ते पण आपण निर्माण करू असे म्हणत सर्व माजी नगरसेवकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचे काम वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 06, 2025 12:00:11
Kolhapur, Maharashtra:आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे..त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरात शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला...या मेळाव्यात कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले... कोल्हापूर महानगरपालिकेवर यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला... कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे... गेल्या निवडणुकीत सत्तेत असलेले शारंगधर देशमुख आणि विरोधात असलेले सत्यजित नाना कदम हे दोन्ही नेते शिवसेनेमध्ये आले आहेत.... त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी जागा वाटपा संदर्भात लवकरच बैठक केली जाणार आहे.... समाधानकारक जागावाटप होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे... शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत... ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणे शक्य आहे त्या ठिकाणी एकत्र लढले जाईल असेही राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 06, 2025 11:53:09
Kalyan, Maharashtra:श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट काँग्रेसचे पदाधिकारी शिंदे सेनेच्या वाटेवरती? कल्याण डोंबिवलीत काँग्रेसला खिंडार नाराज काँग्रेस पदाधिकार्यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट काँग्रेसचे सचिन पोटे, विमल ठक्कर यांचा शिवसेनेत प्रवेशाचा मुहूर्त ठरला? श्रीकांत शिंदे हे कार्यसम्राट आहेत ते व्यापाऱ्यांना भेटायला आले होते फक्त सदिच्छा भेट दिलेली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीमुळे काँग्रेसमध्ये चल बिचल.. मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही मात्र श्रीकांत शिंदे यांच्या भेटीने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का हे येत्या काही दिवसांमध्येच समजणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावर बोलण्यास नकार
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 06, 2025 11:03:51
Thane, Maharashtra:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली गेली. हा जो काही देश चाललेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे चाललेला आहे. मैं बाबासाहेबांना आजरांजली अर्पण करतो. माझ्या घोडबंदर रोड भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनाच काम सध्या सुरू आहे. त्याचा देखील काम अंतिम टप्प्यावर आहे. घोडबंदर भागात एक चांगले वास्तू निर्माण होत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य कडे पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका राज्य शासनच्या माध्यमातून सगळे काम आम्ही करत आहोत. राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची जी खुर्ची आहे, त्या खुर्चीला महत्त्व असतं... त्यांच्या माध्यमातून राज्य चालत असं. राजाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वे झाला होता. त्यावेळेस उपमुख्यमंत्री दुसऱ्या क्रमांकावर होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे पहिला क्रमांकावर होते. मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ऑटोमॅटिकोर रेशो हा वाढत असतो. त्यामुळे चांगलं काम महायुतीचे नेते करत आहेत. शंभर टक्के महायुतीच्या कामामुळे सगळे जनता खुश आहे ते सगळ्यांना दिसत आहे. मिलिंद नार्वेकर सगळ्यांनाच अभिनंदन करत असतात, ते मुख्यमंत्र्यांचा देखील अभिनंदन करत असतात. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब तसेच परिवहन मंत्री म्हणून माझे देखील अभिनंदन करत असतात. उद्धव ठाकरे हे तिसरा क्रमांक वर 14% जे काही लोकांचे पसंती मिळाली आहे. त्यांना देखील ते अभिनंदन करत असतात. आता मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय नेते झाले आहेत. ते उद्धव ठाकरे नाराज. ते आता मिलिंद नार्वेकर यांना माहिती. ते त्यांना विचारायला हवं ते सर्वांचे पसंतीचे एमएलसी आहेत. ते जे काही बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष देत असतो. मिलिंद नार्वेकर कडून बऱ्याच पक्षाच्या नेत्यांना सूचना येत असतात. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री पद रद्द करा. उद्धव ठाकरे जे म्हणतील ते राज्य सरकार थोडी ना करणार आहे. आमचं बरं चाललं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजित दादांना सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेला आहे. कोण काय म्हणताय त्याकडे लक्ष न देता. आम्ही राज्याचा विकास कसा होईल त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. तपोवन, ठाणे वृक्ष कत्तल. काही ठिकाणी विकासासाठी झाड तोडावी लागतात. त्या ठिकाणी नवीन झाड मोठ्या प्रमाणात लावावी लागतात. तपोवन या ठिकाणी झाडांच्या बाबतीत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची आंदोलन चालू आहेत. परंतु त्यांच्या मागची पार्श्वभूमी देखील तपासणं गरजेचं आहे. राहायला प्रश्न ठाण्याचा ठाण्यामध्ये कमीत कमी झाड तोडून शहरातील काही गरज आहे. ते कशाप्रकारे पूर्ण करता येईल. मनोरुणालयाच्या बांधकामासाठी काम करत असताना. कमीत कमी झाड कशी तोडावी लागतील. त्याप्रमाणे जास्तीत जास्त झाड कशाप्रकारे लावायचे त्याप्रमाणे चा आराखडा बघूनच योग्य ते निर्णय घेऊ... प्रत्येक नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधीचा हे वृक्ष वाचवण्याचं कर्तव्य आहे. नागपूर अधिवेशन. एका आठवड्याचा अधिवेशन आहे. सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्टपणे सूचना दिलेले आहेत. २१ तारखेच्या आत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्या. आणि १५ तारखेच्या आत कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या अधिकारी यांना आलेले आहेत. त्यामुळे दोन आठवड्याचा अधिवेशन आता एक आठवड्यावर आला आहे. शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दरम्यान अधिवेशन चालणार आहे. जनता के प्रश्न एक आठवड्यात सोडवण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करणारं आहे. विरोधक बहिष्कार. विरोधकांना दुसरं काही काम नाही. कुठेतरी हातात हात घालून राज्याचा विकास कशाप्रकारे होईल. त्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी जर आमच्या सोबत प्रयत्न केले तर आम्ही निश्चित त्यांच्यासोबत आम्ही घेऊन काम करू... धनंजय मुंडे अधिवेशन राजकारण. मला त्याबाबतीत काही कल्पना नाही. विरोधी पक्षाचे नेते कधी काय भूमिका घेतली हे सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या महिलांचे प्रश्न सुधरा शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हा महत्त्वाचा अधिवेशन है.
138
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 06, 2025 11:02:36
Shirdi, Maharashtra:राहाता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.. जिल्हा पशु वैद्यकीय पथक sाकुरी गावात दाखल झाले असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहेत.. अहिल्यानगरच्या पशु वैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते.. साकुरी गावातील डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून त्यांना आफ्रिकन स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झालंय.. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. मानवी आरोग्यास यापासून धोका नसला तरी साकुरी परिसरातील इतर गावांमध्ये डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू आढळ्यास पशु वैद्यकीय पथकास संपर्क करावा असे आवाहन पशू शल्यचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केलंय..
75
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 06, 2025 10:53:52
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी धुक्यांची लहर देखील पाहायला मिळते, त्यामुळे आता जिल्ह्यातील द्रাক্ষ बागायतदारांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर देखील वाढत आहे, यातच सलग 3 दिवस झाले सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम, अधिक संकटात असलेल्या द्राक्षबागांवर होताना पाहायला मिळत आहे, दक्ष पिकासाठी फुलोरा मणीघड आणि वाढीचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असताना बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असल्याने शेतकरयां अधिकची फवारणी घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट देखील वाढला आहे.
97
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 06, 2025 10:35:50
Akola, Maharashtra:अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने केवळ सहा तासांत जबरी चोरीतील आरोपीला अटक करून संपूर्ण चोरीस गेलेला ₹1,20,000 नगदी तसेच एकूण ₹1,80,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौरक्षण रोडवरील चार बंगला परिसरात मोटारसायकलस्वाराने फिर्यादीच्या डोळ्यात लाल मिरची फेकून हातातील बॅग हिसकावून घेतली त्या बॅगेत ₹1,20,000 होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवली. पोलिसांनी अवघ्या सहा तासातच या चोरट्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.खदान पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
178
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 06, 2025 10:20:32
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील काही भागांत सध्या बिबٹ्याच्या हालचालींची चर्चा असून नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवार परिसरात रानमांजर, तडस आणि बिबट्याचे दर्शन झाल्याच्या वार्ता पसरत आहेत. त्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी या काळात तडस आणि रानमांजर बाहेर पडतात, त्यामुळे त्यांचे दर्शन होणे स्वाभाविक आहे. यावरून अनाठायी भीती बाळगू नये, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे. वन विभागाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करताना गावकऱ्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.
100
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 06, 2025 09:46:28
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत पुन्हा एकदा हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या प्रयत्न, सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - बार्शी शहरात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, दुकान तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद - बार्शीत मोबाईल दुकानदाराला धमकवत कोयत्याने दुकान फोडले, रिचार्ज करण्यावरून झाला वाद - कोयता हातात घेऊन दहशत माजवत दुकानाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा कैद - मोबाईल दुकानदाराकडून बायकोच्या मोबाईलचा रिचार्ज केल्यानंतरही झालं नसल्यामुळे रागातून दुकानाची केली तोडफोड - बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, आरोपी फरार.. - बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे अधिक तपাস करत आहेत..
149
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 06, 2025 09:39:01
Virar, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज वसई विरार दौऱ्यावर बविआला शह देण्यासाठी भाजपची ताकद स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अँकर - राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आज वसई–विरार आणि नालासोपारा दौऱ्यावर आहेत. विरार येथील जीवदानी देवी मंदिर पायथ्याशी हेलिकॉप्टर उतरल्यावर आमदार राजन नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. आज दिवसभर मंत्री विखे पाटील भाजप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून विविध विकासकामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केल्याचे या दौऱ्याने स्पष्ट होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
171
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 09:36:40
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाणात अचानक वाढ झाली.. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलीस सतत गस्त वाढवून संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, माने प्लॉट परिसरात काही संशयित व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चार चोरटे एका घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पाहिले आणि इतर सहकाऱ्यांना बोलावून या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस जवळ पोहोचताच यातील चोरटे आक्रमक होत पोलिसांवर हल्ला चढवून पळ काढला. ही सर्व दृश्ये CCTV मध्ये कैद झाली आहेत.
180
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 09:30:19
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी स्पष्ट सवाल केला आहे की महाविकास आघाडी आमचा वापर करून घेणार का? प्रत्येक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, पण यावेळी हे होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटिल आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना काय निधी दिला, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे शिवसेनेकडे सक्षम उमेदवारांची मोठी फळी असून 61 जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र आघाडीचा सन्मान राखत फक्त 33 जागांची मागणी आम्ही केली, असं इंगवले म्हणाले. वरून ग्रीन सिग्नल मिळाल्यास आम्ही कोणाशीही युती करू शकतो, असं सूचक विधान करत त्यांनी नवे राजकीय संकेत दिले. शहराध्यक्ष सुनील मोदी यांनीही जिथे ठाकरे शिवसेनेकडे मजबूत उमेदवार आहेत, त्या जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत, असा ठाम पवित्रा घेतला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे कोल्हापूर महाविकास आघाडीत तणाव वाढला असून सीटवाटपाची लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
72
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 06, 2025 09:16:04
Shirdi, Maharashtra:माजी राज्‍यसभा खासदार तथा सिने अभिनेत्री जयाप्रदा यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीचा लाभ घेत साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले...मी चित्रपट सृष्टीत आल्यापासुन नेहमी शक्य होईल तेव्हा साईदर्शनासाठी येत असते...साई मंदिराचा विकास आणि येथील दर्शन व्यवस्था कौतुकास्पद असुन देशातूनच नव्हतर विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात... या जन्मात आणखी काही नको , साईबाबांचे आशिर्वाद सोबत राहोत ,ते आपली रक्षा करत राहो एवढीच साईचरणी प्रार्थना असल्याच जयाप्रदा यांनी बोलताना सांगितलय...दरम्यान दर्शनानंतर साईबाबा संस्‍थानचे वतीने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्कार केला.
96
comment0
Report
Advertisement
Back to top