Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई के तुर्बे मार्केट में दिव्यांग स्टॉलों पर आग, 9 जले; अज्ञात पर आरोप

SNSWATI NAIK
Nov 04, 2025 07:35:39
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई ब्रेकिंग तुर्भे जनता मार्केट में दिव्यांग स्टॉलला आग. दिव्यांगचे 9 स्टॉल जळून खाक. अज्ञात माथेफिरूने आग लावल्याची स्टॉल धारकांनी केला आरोप. आगीत दिव्यांग नागरिकांचे मोठे नुकसान. महापालिकेने नुकसान भरपाईबद्दल दिव्यांग स्टॉल धारकांची मागणी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Nov 04, 2025 12:22:32
Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशनवरून आठ महिन्याच्या बाळाचं अपहरण, CCTV च्या माध्यमातून आरोपी गजाआड.. अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या पोलीस सतर्कतेमुळे बाळासह आरोपीचा लागला शोध.. बाळाची चोरी करणारया अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या, पुण्याहून आलेले दापत्या निलेश पोंगले आणि पूनम पोंगले हे मुलांसोबत कल्याण रेल्वे स्टेशनच्या पुलावर गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याच्या कुशीतुन आठ महिन्याच्या बाळाचे एका तरुणाने अपहरण केलं, जाग आल्यानंतर या दाम्पत्याला बाळ दिसले नाही, त्यांनी थेट रेल्वे पोलीस स्थानक गाठले, रेल्वे पोलिसानी शहर पोलिसांना देखील यांची माहिती दिली पोलिसांनी गंभीर दखल घेत कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलीसानी तपासाची चक्रे फिरवली. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपीची ओळख पटवली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश सोनवणे, यांनी आरोपीला तत्काळ ओळखले त्याच्या घरी जाऊन तपासले असता बाळ त्याच्या घरी आढळले. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षय खरे, आणि त्याची आत्या सविता खरे, या दोघांना बेड्या ठोकल्या, बाळा सुखरूप त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अवघ्या काही तासात बाळ पुन्हा आई वडिलांना मिळाले, दरम्यान अक्षय ने बाळ का चोरले, तो या बाळाला विकणार होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत. बाईट, पूनम पोंगरे बाळाची आई, बाईट, कल्याणजी घेटे, ACP कल्याण
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 11:43:02
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड़च्या भिरा-पाटणूस परिसरातील टाटा विद्यालयाने अचानक नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. पालकांनी सांगितले की, शाळेने कोणतीही पूर्वसूचना न देता वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हीच शाळा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध आहे. दोन्ही वर्ग अनधिकृत असल्याने ते बंद करावेत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याचे शाळेचं म्हणणं आहे. दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला वर्ग बंद करण्याबाबत नोटीस बजावली असून, त्यांनी तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 04, 2025 11:41:39
Parbhani, Maharashtra:अँकर - हिंगोलीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि त्याचे बंधू श्रीराम बांगर हे मतदारांना साड्या आणि रेशन किट वाटप करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्यांचे आमिष दाखवत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्या जाळत आंदोलन केल आहे. हिंगोली शहरातील गांधी चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केलेल्या साड्या गोळा करून जळून निषेध केलाय. आमदार बांगर आणि त्यांचे बंधू मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या राशन किट वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय, निवडणुकांची घोषणा होण्याच्या अगोदरच हिंगोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापलय, प्रशासनाने साड्या वाटप करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 10:59:28
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:59:12
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 10:39:34
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:19:12
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतल्याला जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:18:59
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतला नाही जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याच खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 10:06:41
Kolhapur, Maharashtra:ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार मागील हंगामातील RSF प्रमाणे हिशोब दिल्याशिवाय आणि सुरू गळीत हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करता येत नाहीत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच कारखाने कायद्याचे उल्लंघन करून सुरू केलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सर्व संघटनाने एकत्रित आज पत्रकार बैठक घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. यानुसार 6 नोव्हेम्बर पासून कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत साखर सहसंचालक हे कारखान्यांचे चेअरमन, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक यांच्यावर नियम भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतकरी संघटनानी दिलाय. इतकच नव्हे तर यावर्षीच्या हंगामातील एफआरपी अधिक 200 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी देखील त्यांनी केलीय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 04, 2025 10:04:08
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 09:51:34
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्ठा यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतलेला नाही जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्ठा यांनी केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 04, 2025 09:51:00
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन मधील वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकरांनी सुरू केलं आमरण उपोषण संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करा जालनातील भोकरदन शहरातील बायपास अर्थात वळण रस्ता जमीन अधिग्रहण करून तातडीने मार्गी लावावा तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पाठवण्यात आलेले प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. भोकरदन मधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकर आणि दिनकर थोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा ईशारा सुरेश तळेकर यांनी दिलाय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 09:45:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं पैलवान चंद्रहार पाटलांकडून आयोजन,फॉर्च्यूनर,थार, ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी अँकर - देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी अधिवेशन ९ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या तासगाव मध्ये पार पडतोय डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून या श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी अधिवेशन आणि शर्यती पार पडणार आहेत ,या शर्यतीच्या विजेत्यांसाठी भव्य दिव्य असे बक्षीस चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये फॉर्च्यूनर ,थार,ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकींचा समावेश आहे,नेमके कशा पद्धतीने बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार आहे,याबाबत पैलवान चंद्रहार पाटलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 09:40:20
Washim, Maharashtra:वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या कार्यरत असलेले काही शिक्षकही विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करत आज विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला.विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा आणि शाळेत आवश्यक शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.जर प्रशासनाने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर ते तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. या आंदोलनामुळे परिसरातील शैक्षणिक व्यवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top