Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई महायुति पर रात तक निर्णय: रविंद्र चव्हाण ने संकेत दिए

SNSWATI NAIK
Dec 29, 2025 11:58:26
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेना बीजेपी ची युती व्हावी यासाठी दोन बेथका पार पडला नंतर युती बाबत कोणताही निर्णय होत नसल्याने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वनमंत्री गणेश नाईक याची भेट घेऊन युती बाबत रात्री घोषणा होईल असे सांगितले, तर नवी मुंबई भाजप ने शिवसेना ला 20 जागा देऊ केल्या असून 91 जागा भाजप ने मागितल्या होत्या या प्रस्तावावर शिवसेनेने कोणताच भूमिका स्पष्ट केली नाही, सुरुवातीला भाजपा ने शिवसेनेला 47 जागा देऊ केल्या परंतु शिवसेनेत एम के मढवी यांना पक्षप्रवेश देऊ नका अशी मागणी केली होती, परंतु शिवसेनेनं ही मागणी फेटाळून एम के मढवी यांना प्रवेश दिल्याने भाजप मध्ये नाराजी आहे, याबाबत रवींद्र चव्हाण वरिष्ठ पातळीवर बोलणार असून रात्री याबाबत निर्णय होणार असल्याचे माहिती भाजप कडून देण्यात आली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 13:00:46
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 29, 2025 12:30:38
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग : भाजपचे जालन्यातील नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांच्यासह मुलाने उमेदवारी अर्ज भरला. भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरा. अँकर : जालना महापालिका निवडणुकीत आता चांगलीच रंगत आली आहे. अनेक उमेदवार आपापल्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारीत आहेत. अशातच जालन्याचे माजी आमदार आणि भाजप नेते कैलास गोरंटयाल यांच्या पत्नी संगिता गोरंटयाल आणि मुलगा अक्षय गोरंटयाल या दोघांनी भाजपकडून त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यांनी कोणत्या प्रभागातून हे उमेदवारी अर्ज दाखल केले याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. बाईट 1- संगीता गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष. बाईट 2 - अक्षय गोरंट्याल, इच्छुक उमेदवार भाजपा.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 12:26:13
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोहाडी ( मोकासा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा, चोरट्यांनी लुटले १७० ग्रॅम सोने आणि तीन लाख ६६ हजार रुपये रोख अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाडी ( मोकासा) येथील महाराष्ट्र बँकेत दरोड्याची घटना उजेडात आली आहे. नागभिड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोहाडी ( मोकासा) येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता बँक बंद करण्यात आली. आणि सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता बँक उघडली. बँकेतील स्थिती पाहून बँकेत दरोडा टाकून रोख रक्कम व सोने चोरीला गेले आहे याची व्यवस्थापक यांनी खात्री झाली. त्यांनी पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली. बँकेतील १७० ग्रॅम वजन असलेले सोने व तीन लाख ६६ हजार रुपये दरोडा टाकून चोरून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. नागभिड पोलिसांची चमू आणि ठसेतज्ञ घटनास्थळी रवाना करण्यात आले असून तपास वेगवान करण्यात आलाय.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 11:00:34
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात एकाच वर्षात वाघ हल्ल्यात अबतक 47 झाल्यानंतरही वनविभाग मात्र निष्काळजीच, बांबू तोडीसाठी आलेल्या बालाघाटच्या मजुरांना थेट जंगलात राहू द्या उभारून करू दिले जात आहे वास्तव्य, गेल्या पंधरा दिवसात वाघाच्या हल्ल्यात झाला आहे तीन मजुरांचा मृत्यू , ठेकेदार- वनविभाग यांच्या निष्काळाचीपणाने जात आहेत मजुरांचे जीव, वन्यजीव अभ्यासकांनी यावर तातडीने बंदी घालण्याची केली मागणी चंद्रपूर जिल्ह्यात सध्या विविध जंगलांमध्ये बांबू तोडणीचा हंगाम सुरू आहे. वनविभागाने यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वाघांच्या हल्ल्यामध्ये एकाच वर्षात 47 ग्रामस्थ व नागरिकांचे जीव गेले आहेत. असे असले तरी वनविभाग मात्र निष्काळजीच असून बांबू तोडणीसाठी जुनोना- चिचपल्ली मार्गावर थेट जंगलातच बालाघाटी मजुरांच्या झोपड्या थाटण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात यापैकी दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या हल्ल्यात 3 बालाघाटी मजुरांचा मृत्यू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी 31 मजुरांची वस्ती असलेल्या या ठिकाणी वाघाची डरकाळी ऐकू आल्याने इथले मजूर देखील धास्तावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच जंगलात आता वाघांचे वास्तव्य आहे. अशा स्थितीत पाणवठ्याच्या शेजारी व वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात थेट मजुरांच्या राहुट्या उभारणे टाळावे अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून वनविभाग मात्र सुस्त असल्याची टीका वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 29, 2025 10:53:32
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- मंत्री नितेश राणे --- ऑन बैठका --- Shirodyaला होणारा ताज प्रकल्प बाबत आज बैठक घेऊन चर्चा केली. लोकांच्या मनातील प्रश्न आणि शंका आम्ही सोडवल्या. ऑन वाळू व्यावसायिक --- निलेश साहेबांनी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यवसायिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा केली. त्यांना व्यवस्थित व्यवसाय करता यावा म्हणून आज आम्ही प्रशासन म्हणून मार्ग काढला आहे ऑन ऑल मातोश्री तिकीट वाटप --- मुंबई महापालिकेबाबत सर्व विषयांवर मुंबईत गेल्यावर बोलू ऑन स्टार प्रचारक --- मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. हा आम्ही सर्वांनी निर्धार केला आहे त्यानुसार आमचा प्रचार आणि प्रसार होईल.. ऑन हिंदुत्व विचार ,--- हिंदुत्व विचाराचे सर्व उमेदवार निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे विधानसभेला सुद्धा जनतेने आम्हाला निवडून देऊन हिंदुत्व विचारांचे राज्य बसवले आहे तेच पॅटर्न येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसेल ऑन नारायण राणे/ मुख्यमंत्री भेट --- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राणेसाहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली अशा त्यांच्या भेटी होतच असतात ऑन बांगलादेश ( हिंदी ) ---- बांगलादेश मे हिंदू पर जो अत्याचार किया जा रहा है हम सब हिंदू के साथ खडे है. *किसी के ऊपर अत्याचार करना किसी को जलाना ये अच्छी बात नही है उनके भी नागरिक हमारे देश मे रहते है. उसी तरिका जवाब अगर हम ने देना चालू किया तो उनको अच्छा लगेगा क्या* इस सबका हमको निषेध करना ही चाहिये Byte --- मंत्री नितेश राणे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 09:54:29
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 09:52:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:युती बाबत अजून औपचारिक घोषणा नाही मात्र शिंदेच्या शिवसैनिकांनी आता अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे , आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आईचा फोटो हातात घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, युती बाबत स्पष्टता झाली नाही त्यामुळे संजय शिरसाठ यांनी रात्रीच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अर्ज भरायला सुरुवात झाली आहे आणि नेत्यांचे पुत्रांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे असं म्हणता येईल ,दरम्यान याच प्राभागातनं माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी मुलाला किंवा भावाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती मात्र ऋषी जयस्वाल यांनी अर्ज भरल्याने किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली असल्याचे माहिती आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top