Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

राजगुरुनगर नगरपालिका चुनाव में शिवसेना शिंदे गुट ने पैनल खड़ा कर माहौल गरम किया

HCHEMANT CHAPUDE
Nov 22, 2025 15:31:20
Khed, Maharashtra
राज्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक प्रचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राजगुरुनगर नगरपालिका निवडणुकीत तीन aujourdि माजी आमदारांच्या विरोधात शिवसेना शिंदे पक्षाने आपला पॅनल उभा करून राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय. शिवसेनेचे नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगेश गुंडाळ हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून गेली वीस वर्षे राजगुरुनगरच्या जनतेने आम्हाला संधी दिली असून विकासाच्या मुद्द्यावरती जनता पुन्हा आम्हाला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मंगेश गुंडाळ, अतुल देशमुख (शिवसेना नेते) यांच्याशी बातचीत केली.
116
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:07:48
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भामपूर परिसरात 14 वर्षीय मुलाला शेतात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली आणि, तोला बैलगाडीला बांधून चटके देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यां प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भामपूर गावातील दोन संशयितांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला शेतात पळवून नेऊन, त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चितामण उर्फ चिंटुभाऊ साहेवराव कोळी आणि त्याचा भाऊ सचिन उर्फ डॉक्टर साहेवराव कोळी या दोघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा हिमांशु आणि पत्नी वंदना हे रडत असल्याचे दिसले. मुलाच्या पाठीवर व हातावर भाजल्याच्या जख mannerा दिसल्याने त्यांनी संपूर्ण बाब विचारली. तो सकाळी दहा वाजता भामपूर येथील शिवाजी चौकात बसलेला असताना चितामण कोळी हा तेथे आला. त्याने मुलाला जबरदस्ती मोटारसायकलवर बसवून जळोद रस्त्यालगतच्या त्यांच्या शेतातील विटभट्टीजवळ नेले. त्या मुलाला बैलगाडीवर झोपून लोखंडी बैलगाडीखाली आग लावण्यात आली. आगीमुळे चटके बसू लागल्याने चटके बसत असल्यामुळे मुलगा आरडा ओरडा करत होता. अखेर जीव मुठीत घेऊन हिमांशुने भीतीपोटी “लाईट घरी कोठीत ठेवले आहे, आणून देतो” असे खोटे सांगितले. त्यानंतर चितामणने त्याची दोरी सोडली. यां घटनेनंतर वडील संतोष गवळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली असून मुलाला पळवून नेणे, मारहाण करणे, लोखंडी बैलगाडीला बांधून जाळण्याचा प्रयत्न करणे आणि जीवाला धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपींच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलावर झालेल्या अत्याचाराची ग्रामस्थांतून व्यापक निंदा होत आहे.
19
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:07:28
Dhule, Maharashtra:तापी पुलावरील थरारक घटना समोर आली आहे ,सेल्फी काढतांना युवक पुलावरून तापी नदीपात्रात पडला, तो पाण्यात बुडताना नागरिकांनी दोरखंडच्या मदतीने त्याला वाचवले. तापी पुलावर सेल्फी काढत असताना तोल गेल्याने युवक तापी नदी पात्रात पडल्याची घटना घडली. पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवासींना युवक पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तात्काळ मदतकार्य सुरु करत उपस्थितांनी दोरखंड टाकून त्या युवकाला मरणाच्या दारातून वाचवले आहे.उपस्थितांच्या सज्जकते मुळे युवकाचे प्राण वाचले आहे. हा संपूर्ण थरार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदो तापी पुलावर घडला आहे सावळदे तापी पुलावर साई पाटील हा युवक दुपारच्या सुमारास मोबाईलने सेल्फी फोटो काढत असतांना साई पाटीलचा तोल गेला आणि तो पुलावरुन थेट तापी नदीपात्रात कोसळला. तापीत बुडतांना पाण्यात हात पाय झटकत साई आपला जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत होता.या दरम्यानच या पुलावरुन जाणारे काही प्रवासींना तापी नदीत युवक बुडत असल्याचे आरडाओरड केली. त्यांनी तात्काळ साई पाटील याला वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू केले. पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली होती. साई पाटीलला वाचविण्यासाठी कोणी काय तर कोणी काय प्रयत्न करत होते.यावेळी एका वाहनातील दोरखंड घेत तो दोरखंड तापी नदी पात्रात फेकला तर सावळदे येथील पट्टीचे पोहणारे बोलवून तापी नदीपात्रात साईला वाचविण्यासाठी प्रयत्न केला यावेळी साई पाटीलने दोरखंड कंबरेला बांधून दोरखंड पकडला आणि उपस्थितांनी साईला वेळीच तापी नदीपात्रा बाहेर काढत तात्काळ शिरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपस्थितांनी मदतकार्यासाठी थोडाही उशीर केला असता तर साई पाटील हा पाण्यात बुडाला असता.काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना तापी पुलावर घडली आहे .
51
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:04:46
Dhule, Maharashtra:धुळे शहर में प्रारूप मतदाता सूची प्रकाशित की गई है। इस प्रारूप मतदाता सूची में पहली जाँच में 28 हजार मतदाओं के नाम दुबार होने की बात कही जा रही है। हरकतों को दर्ज कराने के लिए प्रशासन ने कम समय दिया गया है, इस पर शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने आरोप लगाए हैं। समय की कमी की भी मांग उठी है। शहर में पिछले सात वर्षों में एक लाख मतदाताओं की वृद्धि हुई है। आने वाले कुछ दिनों में महानगरपालिके의 चुनाव संभव है, इसलिए सभी मतदाओं की सूची की प्रतीक्षा जारी है। इच्छुक उम्मीदवार पहले से मतदाता सूची खरीदी कर रहे हैं और उनकी सत्यापन प्रक्रिया चल रही है। इस दौरान मतदाता सूची प्रकाशित करने की प्रक्रिया में तकनीकी त्रुटियाँ रहने से ठाकरे गुट नाराज है।
31
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 22, 2025 16:04:25
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका शांतता पार पाडवा यासाठी मतदान ते निकला दरम्यान तीन दिवस ड्राय डे ठेवण्यात आलेला आहे. मतदान आणि निकाल लागण्याच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखावी यासाठी हा तीन दिवसाचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक काळात शांतता व सुरक्षितता सुनिचित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश पारित केले आहेत. शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेर आणि शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी हा ड्राय डे असणार आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियान प्रशासनाकडून राबवला जात आहे. महिला बचत गट, युवक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यात करण्यात येत आहे. युवाशक्तीचा सहभाग हा लक्षणीय असून, युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असं आवहान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 1 डिसेंबर पर्यंत हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासन या अभियानांतर्गत विविध स्तरावरील नागरिकांना आणि विशेषता युवा मतदारांना सहभागी करून घेत नियोजन करीत आहे. लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक बळकट व्हावी हा प्रयत्न प्रशासनाचा या माध्यमातून आहे。
81
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 22, 2025 15:45:25
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेच्या 31 नगरसेवक पदांसाठी 109 उमेदवार निवडणणिकेच्या रिंगणात आहे..तर नगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आज कराडमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचां शुभारंभ करण्यात आला. कराडच्या बाजार पेठेतून मंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. कराडमध्ये शिवसेना यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव आणि शरद पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येऊन कराड नगरपरिषद निवडणुक लढवत आहेत. कराड नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी भाजपच्या विरोधात हात मिळवणी केली आहे. त्यामुळे या कराड येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. असं देसाई यांनी सांगितले आहे.
44
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 22, 2025 13:45:18
117
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 22, 2025 12:49:01
Ambernath, Maharashtra:निवडणूक प्रचाराने घेतला, चौघांचा बळी? 'अंबरनाथ मधल्या अपघाताला उमेदवाराची घाई कारणीभूत' काँग्रेसचा शिवसेना उमेदवार चौबेंवर आरोप Amb accident प्रचार सभेतील चौबे यांचा फोटो आहे अंबरनाथ मध्ये काल झालेल्या भीषण अपघाताला निवडणूक प्रचाराला जाण्याची घाईच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केلाय. ज्या गाडीने चार वाहनांना उडवलं, त्या गाडीत शिवसेनेच्या उमेदवार किरण चोबे होत्या. त्यांच्या प्रचार सभेला तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील पांडे जी उपस्थित राहणार असल्यामुळेच चौबे त्यांचा चालक वेगाने गाडी चालवत होता असाही आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलाय. अंबरनाथ रेल्वे उड्डाण पुलावर काल संध्याकाळच्या सुमारास एका भरधाव वाहनाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली. या अपघातात चौबे यांच्या कारचालकासह चार जणांचा मृत्यू झालाय. मरण पावलेल्यांमध्ये पालिकेचे दोन कर्मचारी देखील आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या कारमुळे अपघात झाला त्या कारमध्ये शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे या होत्या. सभेला जाण्यासाठी त्या घाईत निघाल्या होत्या. अपघात झाल्यानंतर त्यांनी संवेदनशीलता दाखवून कार्यक्रम स्थळी जाणं टाळायला हवं होतं. मात्र तसं न करता त्या सभास्थळी गेल्या आणि प्रचाराचं भाषण केलं. हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असून शिवसेनेसारख्या पक्षाकडून अशी कृती निश्चितच निंदनीय आहे असही प्रदीप पाटील यांनी म्हटलय.
196
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 12:16:20
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली... पक्ष चिन्ह ऐवजी सिंह या निशाणीवर बाळासाहेब थोरात यांची संगमनेर सेवा समिती रिंगणात आहे... काँग्रेस मधून निलंबित असलेले नाशिक पदवीधर चे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणूक रिंगणात आहे. आज संगमनेर शहरात संगमनेर सेवा समिती या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मागील 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली... *काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात साउंड बाईट पॉइंटर* संगमनेर तालुका म्हणून चर्चा करायला हवी.. तालुक्यातील सहकारामुळे शहरात विकास झाला.. आपण काम करताना विरोधकांना देखील शिक्षण संस्थानची परवानगी मिळून दिली.. (थोरात्बभाषण करताना कचरा घंटागाडी त्याभागात पोहचली) हा कार्यक्रम दुर्गा ताईंनी सुरू केला.. आता यात गोंधळ सुरू झालाय.. जीव घालून काम केल्यामुळे प्रशासक असताना देखील कचरा नियोजन काम व्यवस्थित सुरू होते.. शिर्डीचे विमानतळ देखील जवळ आले ते माझ्यामुळे.. आपण अनेक रस्ते केले मात्र अजूनही नगर मनमाड रस्ता दुरुस्त होत नाही... ज्यााला अंग मोकळे करून घ्यायचं त्यांनी तिकडून एकदाच जा.. तो रोड का नाही होत हे तुम्ही तपासा.. ( नाव न घेता विखेंवर टीका) पुणे नाशिक रेल्वे साठी मी प्रयत्न केले.. समनापूर येथे स्टेशन देखील ठरलं.. जमीनही संपादित केली... कुठ गेले ते ? विचारलं का कोणाला तुम्ही.. प्रचाराला येणाऱ्यांना विचारा रेल्वेचे काय झालं ? आपण पाण्याची व्यवस्था केली अनेक कामे केली.. मात्र गेल्या वर्षभरात शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न निर्माण झालाय..
111
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 12:00:29
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – सिंधुदुर्गमधील वाटचाल नारायण राणे यांच्‍याशी चर्चेअंतीच ........ मंत्री उदय सामंत यांचे स्‍पष्‍टकरण .......... आम्‍ही शेवटच्‍या क्षणापर्यंत वाट पाहिली .......... अँकर - सिंधुदुर्ग जिल्‍हयात नारायण राणे यांच्‍याशी चर्चा करूनच निर्णय घ्‍या असे स्‍पष्‍ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्‍यांच्‍याशी चर्चा करूनच आम्‍ही पुढची वाटचाल केल्‍याचे उदय सामंत यांनी स्‍पष्‍ट केले. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणूकीत भाजप शिवसेनची युती झाली नाही त्‍यावर ते बोलत होते. महायुती व्‍हावी अशी नारायण राणे यांची भूमिका होती. मी, केसरकर आणि निलेश राणे तिघांनीही नारायण राणे यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यासाठी आम्‍ही शेवटपर्यंत थांबलो होतो. शेवटी नारायण राणे यांनी सांगितल्‍यानुसारच आम्‍ही पुढे गेलो. सावंतवाडी कुडाळ आणि मालवणमध्‍ये आम्‍ही स्‍वबळावर लढत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बाईट – उदय सामंत, उद्योग मंत्री
269
comment0
Report
Advertisement
Back to top