Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर–मुंबई-आहमदाबाद हाइवे के पास खैर के अवैध कटान पर वन विभाग की कार्रवाई, लाखों का लकड़ी जब्त

HPHARSHAD PATIL
Nov 03, 2025 04:50:14
Palghar, Maharashtra
पालघर _ मुंबई–अहमदाबाद हायवेलगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करून सोलीव माल साठवला होता. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने दोन पथकासह परिसरात SEARCH मोहीम राबवून कारवाई केली. या कारवाईत अंदाजे दीड लाखांहून अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा पकडला आहे. सध्या हा माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय काष्ठविक्री आगर भराड येथे जमा करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 03, 2025 12:33:30
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात कुजलेले धानाचे पुंजणे घेऊन नाना पटोलेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या समस्या..... सरसकट नुकसान भरपाईची केली मागणी..... शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून धानाला अंकुर फुटले आहेत. अशात नाना पटोले भंडाऱ्यात एका बैठकीसाठी आले असता शेतकऱ्यांनी नाना पटोले यांना वेढा घालत समस्या त्यांना समस्या सांगितल्या. धानाला अंकुर फुटले असून अक्षरशः धान निस्तनाभुत झाल्याचे लक्षात येताच नाना पटोलेंनी उपस्थित शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व जिल्हाधिकारीांना धानाचे कुजलेले पुंजणे दाखवत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बघता सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 03, 2025 12:33:07
Kalyan, Maharashtra:कल्याण नगर मार्गावर शहाड़ उड्डाणपूल देखभाल दुरुस्तीसाठी बंद. अवजड वाहनांसाठी वीस दिवस बंद, पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांच्या सूचना. ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत पुलाचे डांबरीकरण व सशक्तीकरण कामा साठी बंद करण्याचा निर्णय ANC - कल्याण-नगर महामार्गावरील महत्वाचा शहाड उड्डाणपूल पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी २० दिवस बंद राहणार आहे. डांबरीकरण आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्याने वाहतूक पोलीस विभागानं नवीन अधिसूचना जारी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. कल्याण-माळशेज महामार्गावरील शहाड उड्डाणपूलाचे सशक्तीकरण आणि बेरिंग , डांबरीकरण व विविध दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याआधी ही २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या 18 दिवस देखभाल दुरुस्ती साठी या कालावधीत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु पावसाळा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम पूर्ण न होऊ शकल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागानं काम थांबवून वाहतुकीस तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुलावर डांबरीकरण आणि इतर दुरुस्तीचे काम होणार असल्याने, या काळात अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. लहान आणि हलकी वाहने मात्र एकतर्फी मार्गाने ये-जा करू शकतील. तर या कालावधी दरम्यान वाहन चालकाने पर्याय मार्ग वापरावे अशी विनंती देखील वाहतूक पोलिसांनी केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 11:45:14
Nashik, Maharashtra:नाशिक - आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे ना - सेना पण तयार आणि सेनापती पण तयार आहे - सिन्नर ला पक्षांतर नवीन नाही - राजकीय परिस्थिती पाहून पक्षांतर करावे लागले - मला राजकीय वारसा नाही - विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो - पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं - दिलेल्या संधीचे सोनं केलं - पक्षांतर करावे लागले त्याचे कारण सर्वांना माहिती - तालुक्यातील परिस्थिती अशी झाली की पक्षांतर करावे लागले - माघे विधानसभा निवडणूक लढवली - १५ दिवसांत निवडणूक लढवली 1 लाख मत मिळवली - प्रस्थावीत लोकांच्या विरोधात विस्थापित झाली - सामान्य माणसांच्या जीवावर लढलो - सगळे नेते विरोधात गेले - वेदना बघत होतो, निवडणुकीत हरलो - मनाने हरलो होतो - शेरो शायरी करत विरोधकांवर निशाना - नानासाहेब गडाख यांचं पुण्य स्मरण - तुकाराम दिघोळे साहेबांनी कडवा पाट आणला - एमआयडीसी नसती तर काय झालं असतं - शाश्वत विकास या दोन नेत्यांनी केला - मागील 30 वर्षात काहीही आले नाही - दोन सत्ता केंद्र सिन्नरला आहे - 100 कोटींची योजना होऊनही प्यायला पाणी मिळत नाही - त्या योजनांचे काय झालं - सत्तेचा उपयोग सिन्नरकरांना होतो आहे का - सिन्नर तालुका विकासापासून वंचित का आहे ? - पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हणून जग ओळखत आहे - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अनेक आव्हान आहे पण तरीही महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहे - या विचाराबरोबर जायचे नाही तर मग कुणाबरोबर जायचे - आपले भविष्य उज्वल राहील - सामान्य माणूस फक्त भाजपात पुढे जाऊ शकतो - गिरीश भाऊ शिक्षकाचा मुलगा राज्याचा मंत्री आहे - यामुळे प्रभावित झालो आहे - सिन्नरला विकासासाठी व्हिजन आहे - 5 हजार एकर जमीन इंडिया बुल्स नावाचा प्रकल्प पडून आहे - विकासाचे केंद्र सिन्नर होऊ शकतात - सिन्नर तालुका समृद्ध करायचा आहे - भाऊंना संकतमोचक म्हंटल जात - देवनदीला पूर आला तेव्हा लोकांना भेटायला आले होते - पक्षात आल्यावर मला काहीही मागायचे नाहीत - मला जे काही मागायचे ते तालुक्यासाठी मागायजे आहे - मी दररोज दिव्यांगासाठी काम करतो - आरोग्यासाठी काम करतो - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मी कायम भांडत असतो - घरकुल, अदिवासी साठी काम करायचे आहेत - जिल्हा परिषद असतांना नवीन इमारत मंजूर आपण केली - 55 कोटींची इमारत आपण आणली - मुख्यमंत्री त्याचे उद्घाटन केलं - मी खेळाडू आहे - कुस्तीचा खेळाडू - जंगली रम्मीचा नाही - राज्यस्तरीय कबड्डीचा खेळ आपण घेणार आहोत - खेळाबाबत आपण नेहमी काम करत असतो - जिल्हा परिषद आणि नगरपालिकेला कमळ चिन्ह घराघरात नेईल - पुढील काळात आणखी प्रवेश करायचे आहेत
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 11:44:58
Nashik, Maharashtra:नाशिक : मंत्री गिरीश महाजन भाषण पॉइंट - उदय सांगळे एवढे चांगले भाषण करता माहिती नव्हती - रविंद्रजी मला म्हणाले आपली इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आहे - सिन्नर तालुक्यातील अनेक पक्ष प्रवेश झाला - खूप विकास आपल्याला या सिन्नरचा करायचा आहे - मी सुरुवाती पासून पक्षाचे काम करत आलो आहे - सुरुवातीला विद्यार्थी दशेत काम केले - माझ्या बायकोला पहिल्यांदा निवडणुकीत उभे केले ती निवडून आली.. आणि दोन वर्षांनी मला कन्या रतन झाले ती जिल्हा परिषदेत जायची तेव्हा मी मुलीला घेऊन बाहेर बसायचो (गिरीश महाजन यांनी सांगितल्या आठवणी) - उदय चुकीच्या पक्षात होता चुकीच्या पक्षात गेले की विचार भरकटतो - आता बरोबर ट्रॅक वर आला आहे उदय - भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे कुणा एकट्याच्या मालकीचा नाही - माझ्या मतदार संघात गुजर समाजाचे फक्त तीन हजार मत आहे तरी लोक आम्हाला म्हणता नाही तुम्हीच - कारण भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे - राष्ट्रवादीत बघा तुम्ही अजित दादा योग्य असताना देखील सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले का अजित पवार चांगले काम नाही केलं का - बाळासाहेबांच्या पक्षात ते झाले - काँग्रेसमध्ये देखील गांधी परिवार पैकी कोणी नाही - भाजपमध्ये तसे नाही - अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरातल्याच नाव कधी ऐकले ka तुम्ही - अडवाणी यांच्या घरातले यांचे नाव ऐकले का - मोदी यांच्या घरातून देखील कोणी नाही - कारण हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्याची कदर पक्षात केली जाते - पाणीटपरी लावण्या पासून ते भाजीपाला विकणारे हे मंत्री झाले हे याच पक्षात होते - परिवारवाद मोठा देशात चालतो परंतु भाजपमध्ये तसे चालत नाही - आम्ही दुर्बीण पाहून कार्यक्ते बघत असतो - तुम्ही प्रामाणिक काम करा तुम्हाला कोणीच हलवणार नाही - तुम्ही मला संकटमोचक म्हणतात; ३० दिवसातले २५ दिवस बाहेर असतो - पण माझे कार्यकर्ते मतदारसंघात लक्ष देत राहतात - पूर्वी सारखी परिस्थिती आता राहिलेले नाही - आज काम करणाऱ्यांची किंमत आहे - अमेरिकेचं पंतप्रधान कधी आपल्याला पूर्वी बोलवत नव्हते आता पायघड्या घालतात - आता आपली परिस्थिती बदलेली आहे - मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नावलौकिक झाले आहे - आर्थिक व्यवस्थेत आपण जगात पाचव्या नंबर वर आलेलो आहेत - गरिबी हटवा चे नारे पहिले दिले गेले पण गरिबी काही हटली नाही - देश राज्य आता झपाट्याने पुढे चालले आहे - काही दिवसांनी काही दिसणार नाही सगळे सपाट होईल - सकाळचा भोंगा आता दोन महिने बंद झाला आहे - खोट बोलायचे रेटून बोलायचे - कोरोना काळात घराबाहेर पडले नाही कधी - ठाकरे साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असे मी ऐकले म्हटलो धन्यवाद - कोरोना काळात घराबाहेर पडले नाही आणि पंतप्रधान होणार म्हणे - येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे लोक निवडून आले पाहिजे - पक्ष प्रवेश ज्यांनी केला आहे आता हा शेवटचा पक्ष प्रवेश आहे लक्षात घ्या
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 11:44:44
Nashik, Maharashtra:- नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष र Raviendra चव्हाण भाषण पॉइंट - भाजप म्हणून या ठिकाणी यावे लागेलं असे अनेकांनी सांगितले आणि या पक्ष प्रवेशासाठी तळमळ बघितली आणि येण्याचा निर्णय घेतला - येताना अनेक ठिकाणी बॅनर बघितले - एखादा कार्यकर्ता पक्ष प्रवेश करतो तेव्हा वाटते की यांच्यामागे काय आहे हे मी आज बघतं आलो - नवा अध्याय सुरू झाला आहे - एक व्हिजन घेऊन काम करणारा नेता आज भाजप पक्षात आला आहे - प्रत्येक गावात समृद्धी गेली पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहे - प्रत्येकाच्या जीवनाला आकार कसा देता येईल या प्रत्येकाला दिशा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे - पायाला भिंगरी लावणारा कार्यकर्ता.. डोक्यावर बर्फ ठेवणारा आणि जिभेवर sाखर असणारा कार्यकर्ता उदयच्या रूपाने आज भाजप मध्ये आले आहे
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 03, 2025 11:21:26
Chendhare, Alibag, Maharashtra:वोटचोरीच्या आरोपांचे रामदास आठवले यांनी केले समर्थन. वोटचोरी होता कामा नये याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी. हा सत्याचा नव्हे पत्त्याचा मोर्चा होता. जे वोटचोरी करून यापूर्वी सत्तेत आले ते आज ओरडताहेत. पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार व्हावा. रामदास आठवले यांनी व्यक्त केले मत. राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोटचोरीच्या आरोपांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केलं आहे. अशा प्रकारे मतांची चोरी होता कामा नये याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन झालं पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले. हा मोर्चा सत्याचा नव्हता तर पत्त्याचा होता. यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडत आहेत. परंतु त्यांनी जे उघडकीस आणलं आहे त्याच्यावर विचार व्हायला हवा असंही रामदास आठवले म्हणाले.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 03, 2025 11:20:05
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 03, 2025 11:08:05
Nanded, Maharashtra:अचानक आलेल्या पावसामुळे धबधब्याला पाणी येऊन सात जण अडकले. तिथे असलेल्या एका होमगार्डच्या जवानाने आणि स्थानिकांनी मानवी साखळी करून या सातही जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील काल सायंकाळची ही घटना आहे. माहूर तालुक्यातील शेख फरीद येथे दर्गा आहे. डोंगर कपारीत असलेल्या या दर्जाच्या ठिकाणी नैसर्गिक धबधबा आहे. काल काही पर्यटक या ठिकाणी आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सात जण पाण्याच्या पलीकडील बाजूस अडकले होते. एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष असे सात जन अडकले होते. मानवी साखळीच्या साह्याने या सर्वांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 03, 2025 10:25:25
Nagpur, Maharashtra:नागपूर - - पंचनामे करणारे अधिकारीच उठले शेतकऱ्यांच्या जीवावर - शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्याचा ऑडिओ viral - शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांत फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल - व्हायरल ॲाडीओ क्लिपची zee २४ तास ’पुष्टी करत नाही - शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून केली पैशाची मागणी - नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील पेठमुक्तापूर येथील प्रकार - पैशाच्या आधारे नुकसानीचे पंचनामे. - ग्राम पंचायत मधील कर्मचाऱ्याच्या मार्फत पैशांची मागणी. - शेतकऱ्यांनी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली तक्रार. - शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानात मोठा घोळ असल्याचा आरोप.. ग्रामसेविकेच्या नावाने पैसे मागत असल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल
0
comment0
Report
Advertisement
Back to top