Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

अहेरी में 100 बिस्तर का सरकारी महिला-शिशु अस्पताल: मुख्यमंत्री ने उद्घाटन किया

AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 07:21:26
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे शासकीय महिला-बाल रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांचे लोकार्पण, औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप असल्याचे प्रतिपादन अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे १०० खाटांच्या शासकीय महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न झाले. गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत. अहेरी येथील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून, येथे मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, जारावंडी व ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांतील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. गडचिरोलीतील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासावर बोलताना लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्हा देशातील स्टील हब बनत आहे, पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला ग्रीन हब बनवायचे आहे. त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. दळणवळण सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, पूल व नाले बांधकामाची कामेही वेगाने सुरू आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 04:32:50
Pandharpur, Maharashtra:मराठा समाजाला दिलेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही असा दिलासा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिले आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत चार-पाच दिवसानंतर राज्यातील सर्व दौरे एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे माझी संपत्ती समाज आहे आयुष्यात मी एक रुपया कमावला नाही माझं कुटुंब डावावर लागलं कोणी कधी मला मारून टाकतील माझ्या कुटुंबाला त्रास देतील तरी मी मागे हटत नाही रात्र दिवस समाजासाठी बाहेर फिरतो आहे मला धमक्या येत आहेत हे करणार ते करणार कोणीतरी म्हणाला भंडारा लावून मारून टाकतो गरिबाचं काम करतोय म्हणून मला मारायचा ठरलंय का मी मरायला भीत नाही माझी कधी पण तयारी आहे माझा समाज पण सज्ज आहे असं प्रति आव्हान जरांगे यांनी धमक्या देणाऱ्यांना दिलेला आहे
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 04:17:17
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 04:05:02
Solapur, Maharashtra:आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यातील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्स साठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजऱाईल युद्धमुळे भारताकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झालेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधिनी केलीय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 04:04:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 03, 2026 04:04:09
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 03, 2026 04:02:36
Dhule, Maharashtra:राज्यातील आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा सण होळी ... होळी म्हणजे आदिवासी बांधवांसाठी दिवाळी दसरा असतो ... यंदा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळीचा उत्साह दांडगा पाहायला मिळाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी होळीला हजेरी लावत दोन कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली. त्यामुळे ही होळी आदिवासी बांधवांसाठी विशेष आहे. प्रत्येक आदिवासी बांधव सर्व काम सोडून होळी साजरा करण्यासाठी आपल्या पाड्यांवर परतला आहे ... काठीच्या राजवाडी होळीपासून आठवडाभर सातपुड्यात होळी साजरी होते .. होळी उत्सवामुळे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहण्यास मिळत आहे... काठीच्या या होळी साठी देशभरातून पर्यटक हजेरी लावली ... विशेष म्हणजे होळीचे नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधवानी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा या लक्षवेधी ठरल्या ... डोक्यावर मोरपिसांचा टोप, कमरेला दुधडी बांधलेल्या आदिवासी तर कमरेला घुंगरू असलेला बावा अश्या सर्वानी होळी रात्र बेधुंद होत उत्साहात काठीची होळी साजरा केली ... ज्या पुरुषांनी महिलेचे सोंग घेतलेले होते अश्या ढानकाडोको तर महिलेच्या वेशात हे पुरुष आहेत हे हि ओळखता येत नव्हते ... या निधीमुळे आता काठीच्या होळीला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. यावर्षी होळीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हजेरी लावली. उईके यांनी या परिसराच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या निधीतून भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. पुढच्या होळीपर्यंत या सुविधा पूर्ण करण्याचे माझे वचन आहे, असे आश्वासन उईके यांनी दिले. या निधीमुळे आता काठीच्या होळीला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळण्यास मदत होणार आहे. रात्रभर ढोल, बासरीच्या आवाजात पारंपरिक नृत्य.... महिल्यांच्या वेषातील पुरुष मंडळी ..... डोंगर उतारावर बसलेली हजारोंच्या गर्दी ..... आणि भव्य अग्नी ज्वालांच्या साक्षीने काठीची होळी यंदा मोठ्या थाटात संपन्न झाली. होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा , आळस , दारिद्र्य , आजार यांचा नाश होईल या ऊर्जेने समृद्ध शांततामय जीवनाची आस घेऊन काठीला सर्वानी होळीला नमस्कार केला आणि आपल्या घराची वाट धरली ..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 03:50:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आखाती देशातील युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेज मध्ये पडून राहिल्याने शेतकरी अडचणीत - आखाती देशातील युद्धामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत - सोलापूर जिल्ह्यातील अनेक कोल्ड स्टोरेज मध्ये परदेशात निर्यात होणारे 400 टनापेक्षा जास्त द्राक्षे पडून - सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे रशिया, युरोपला पाठवण्यात येणारा शेकडो टन माल जैसे थे - सुवेझ कालव्यातील वाहतुकीवर निर्बंध आल्याने आता अनेक पट पैसे मोजून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून द्राक्ष निर्यात करण्याचा पर्याय उपलब्ध - युद्धाची परिस्थिती आणखी चिघळल्यास एक्सपोर्ट दर्जाचा माल शेतकऱ्यांवर स्थानिक बाजारपेठेत मिळेल त्या भावात विकण्याची वेळ
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 03:50:36
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 03, 2026 03:48:38
Latur, Maharashtra:मुरूड ब्रेकिंग न्यूज... मुरूड शहरासह परिसरात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आता महिलांसह गावातील तरूण आणि वयोवृद्ध नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध दारूविक्री, मटका, जुगार आणि गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोणतीही ठोस कारवाई मुरूड पोलीसाकडून होत नाही हे अवैध व्यवसाय खुलेआम पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सुरू असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, अवैध दारू, मटका आणि गुटखा विक्री तात्काळ बंद करण्यात यावी म्हणत आंदोलकांनी मुरूड पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केले. वेळीच कारवाई झाली नाही तर रणरागिणी रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 03:35:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_kombdi_vikri स्लग - ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटक.. अँकर - धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते,कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत.पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने,त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे. बाईट - कोंबड्या विक्रेता -विटा
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 03:32:06
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 03, 2026 03:20:05
Akola, Maharashtra:होळीची धूम देशभरात सुरू झाली आहे रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगउत्सवाचा आनंद सर्वजण लुटत आहे. अकोल्यात ही धूम पाहायला मिळत आहे, शहरात अनेक ठिकाणी रंग उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरात श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात आलं होतं..गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटला..श्रीराम समूहा तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक रंगांच्या होळीच आयोजन करण्यात येत आहेय यामध्ये शहरातील नामवंत डॉक्टर , व्यापारीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून आनंद लुटला.तर एकमेकांवर रंगांची उधळण करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या ..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top