Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

भद्रावती में पांचवीं बार धनुष्यबाण की जीत, शिवसेना-शिंदे गुट का नगराध्यक्ष पद बरकरار

AAASHISH AMBADE
Dec 21, 2025 13:48:52
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिले के भद्रावती में पुर्नएकदा पाचव्या टર્મ नगराध्यक्षपद धनुष्यबाणच कायम राहिलाय, हा एक विक्रमच आहे. यंदा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही तासांच्या फरकाने एकाच मैदानावर सभा झाल्या होत्या. विदर्भात शिवसेना संघटन कमकुवত असल्याचा विरोधकांचा कायम दावा आहे. मात्र पक्षाचे तगडे संघटन अन्य पक्षांच्या नगर परिषदेत तरी टिकाव लागू देत नसल्याचे दिसत आहे. याचा फायदा पक्षात दोनदा फुटीनंतरही धनुष्यबाण हाती घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांना मिळत ihren मोठा विजय झाला आहे. उत्तम व्हॉलिबॉल खेळाडू आणि चिकाटीचे प्रशिक्षक अशी त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे केंद्र-राज्य सत्तेत असलेल्या भाजपचे अनिल धानोरकर तृतीय स्थानी फेकले गेले तर शिवसेना शिंदे गटाची लढत काँग्रेसशी झाली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 21, 2025 15:15:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 21, 2025 14:48:50
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 21, 2025 14:06:19
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरातील पराभवानंतर भाजपात दुफळीचे वादळ घोंगावले आहे. दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने मोठा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली होती; परंतु जिल्ह्यातील माजी भाजप खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विजयासाठी मंत्रीपद कशाला हवे असा प्रश्न विचारला. निवडून आलेल्या आमदार-लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांना निवडून आणायचे असते अशी भूमिका मुनगंटीवार यांना चिडवते. आणखी म्हटलं की मंत्रीपद आणि विजय यांच्यात प्रत्यक्ष संबंध नाही. आम्ही चंद्रपूरचा काँग्रेसचा गड जिद्दीने भाजपकडे खेचून आणला आहे; आगामी निवडणुकात पुन्हा भाजपला विजय मिळवून देऊ, असे त्यांनी व्यक्त केले.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 21, 2025 12:53:59
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 21, 2025 12:53:38
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.. काँग्रेस पक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार आहे... राजाभाऊ पातकर जिल्हाअध्यक्ष ANC- केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या मुलाखतींसाठी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही मुलाखत प्रक्रिया पार पडत असून, संघटनात्मक ताकद, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि पक्षाशी निष्ठा या निकषांवर इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 21, 2025 12:16:28
Yeola, Maharashtra:येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून शहरातील मोमीनپورा भागात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला या घटनेत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी तातडीने येवला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संबंधितांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 21, 2025 12:05:44
Akola, Maharashtra:अकोल्यातील अकोट नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अकोट नगरपरिषद निवडणुकीत जवळपास सर्वच महिला उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजपचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे गटाच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प ) उमेदवार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभी होत्या.या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोटमध्ये ही निवडणुक आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यांचे खंदे समर्थक तथा जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः सभा घेतली होती, मात्र त्यांच्या गटाला केवळ दोन नगरसेवकांपुरतेच समाधान मानावे लागले. दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र तिन्ही प्रमुख ठिकाणी भाजपने बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे.अकोटच्या जनतेने भाजपच्या विकासाच्या कामांवर विश्वास टाकला आहे.तर भाजपने हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केला आहे
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 21, 2025 11:35:59
Bhandara, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्यामध्ये राज्य सरकार ज्याचे असतं त्याच्यात अस्तित्व पाहायला मिळतं. तेलंगणाला आम्ही एक साईड आलो आहे. इथे तर त्यांना तितका निकाल घेता आला नाही. तेलंगणात आम्ही यापेक्षा चांगला निकाल घेतला. देशातल्या अनेक ठिकाणी काँग्रेस पुढे आहे इथे यांची सत्ता असल्यामुळे यांचा वर्चस्व राहतोच. मी आधीही म्हणालो होतो की सरकार ज्यांचं असतं त्यांना लहान मोठे प्रलोभना देऊन आम्ही विकास करू शकतो असे सांगतात तशा प्रलोभनात लोक जातात. एखादा मुद्दा ठेवतात पण त्याच्या मागे जी आर्थिक मानसिकता बीजेपी ची आहे. आणि भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशाची उधळपट्टी ज्याप्रमाणे होते. एक एक मत दहा हजार रुपयांनी विकत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. तरीही लोकांनी एक प्रकारचे त्यांना उत्तर दिलं आहे. आम्ही तुम्हाला असं प्रलोभन देणार नाही. लोकांनी उत्तर दिलं आम्ही याचा आत्मचिंतन करू. नगरपालिकेच्या सदस्यांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी पुढे आहो. नगराध्यक्षांच्या उमेदवारामध्ये आमची पीछेहाट झाली आहे. वोट ऑफ परसेंटेज जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने जास्त आहे. निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तांतून पैसा आणि पैशातून सत्ता हे बीजेपी चे नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक लोक हे प्रलोभन घेतात आणि मग पाच वर्ष महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आम्ही आत्मचिंतन करू. गोंदिया मध्ये काँग्रेस चार पैकी तीन जागेवर आली आहे. त्यामुळे जे काही भंडारा- गोंदियाचा निकाल आहे. मी सांगितलं होतं 80 टक्के काँग्रेस येईल. तर आमचे सदस्य जास्त आहेत माझा अंदाज खरा ठरला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 11:31:46
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपचे उमेदवार चिंतन पटेल हे तब्बल 16 हजार 959 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात सर्वाधिक मताधिक्याने चिंतन पटेल निवडल्याची माहिती समोर येत आहे. चिंतन पटेल यांनी 16,959 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकलेली आहे. एकदारीत राज्य सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले आहेत. त्यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे शिरपूर शहराचा विकास वेगाने सुरू राहील आणि शिरपूर शहराचा लौकिक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं निर्वाचित नगराध्यक्ष चिंतन पटेल यांनी सांगितला आहे. शिरपूर नगरपालिकेमध्ये 32 पैकी 31 जागांवरती भाजप मेळावा विजय मिळवला आहे तर एका जागेवरती एमआयएम ने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत रंगेल असा दिसून येत होत. मात्र निकालांमध्ये ही लढत एकतर्फी राहिल्याच दिसून आल आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 21, 2025 11:31:25
Satara, Maharashtra:सातारा - महाराष्ट्राच्या राजकारणात निर्भीड आणि संघर्षशील नेतृत्वाची ओळख असलेल्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री, खासदार आणि आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर सातारारोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्हा पोलीस दलाने बंदुकीच्या हवेत फेऱ्या झाडून मानवंदना दिली. मुंबईतील माहीम येथे त्यांच्या निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार सातारारोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. सकाळपासून जिल्हा आणि राज्यभरातून आलेल्या मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून निघालेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर उसळला होता. पाडळी स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. मंत्री, आमदार, खासदार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. “अमर रहे… ताईसाहेब अमर रहे”च्या घोषणांत महाराष्ट्राच्या रणरागिणीला भावपूर्ण अखेरचा निरोप देण्यात आला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top