Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में देवी महाकाली यात्रा का भव्य शुभारम्भ, 51 फुट ऊँचा ध्वज

AAASHISH AMBADE
Mar 26, 2026 07:16:21
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या ऐतिहासिक यात्रेची सुरुवात Ram Navmi निमित्त यात्रा परिसरात 51 फूट उंच यात्रा ध्वज भरण्यात आला. येत्या काळात चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येण्याचा आहे अंदाज. चंद्रपूर शहरातल्या देवी महाकालीच्या वार्षिक यात्रेची उत्साही सुरुवात झाली आहे. राम नवमी हा या यात्रेतील महत्त्वाचा दिवस असतो. हजारो यात्रेकरूंच्या साक्षीने आज रामनवमी निमित्त यात्रा परिसरात 51 फूट उंच यात्रा ध्वज उंचावण्यात आला. ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. यंदा माता महाकालीच्या वार्षिक यात्रेसाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी काळात लाखो भाविक चंद्रपूर शहरात देवी महाकालीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. याच काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील होत आहे. चंद्रपूर शहर महापालिका, महाकाली यात्रा ट्रस्ट यासह चंद्रपूर जिल्हा व पोलीस Administração भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 26, 2026 08:21:51
Washim, Maharashtra:देशभरात रामनवमी उत्साहात साजरी होत असताना,बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथेही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले असून,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविक जगदंबा माता,संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज व संत रामराव महाराज यांचे दर्शन घेऊन नवस फेडण्याची परंपरा आहे.मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असून,सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.जागृत देवस्थान असून आपले मागने पूर्ण येथे होत असल्याने येथे दर्शनासाठी येत असल्याचे भाविक सांगातात
238
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 26, 2026 08:06:36
Satara, Maharashtra:सातारा: पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे आज त्यांचा पोलीस मुख्यालयात हजर झाल्याचे आणि दैनंदिन कामकाजाला केली सुरुवात केल्याचे पहायला मिळाले. जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी विधानपरिषदेत सातारा पोलिस प्रमुख तुषार दोशी आणि त्याच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित कराव अशी मागणी केली होती या मागणी नंतर सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करावे असे निर्देश दिले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असं सांगितले होते. या घटनाक्रमानंतर पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
892
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 26, 2026 08:06:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - लाल मिरचीचे दर भडकले,दुप्पट वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका.. अँकर - सांगलीमध्ये लाल मिरचीचे दर चांगलेच भडकले आहेत. 100 ते 300 रुपये किलो असणारया मिरची दरात दुपटीने वाढ झाली आहे.त्यामुळे आधीच महागाई आणि गॅस दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना मिरची दरवाढीचा झटका बसत आहेत.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक दरवर्षी होत असते,मात्र यंदा मिरची उत्पादन घटला आहे त्यामुळे आवक देखील कमी प्रमाणात येत आहे.परिणामी लाल मिरच्यांचे दर हे दुप्पट झाले आहेत प्रामुख्याने सांगली बाजारात संकेश्वरी,ब्याडगी,गुंटूर, तेजा आणि सीजेंड या मिरच्यांना चटणी बनवण्यासाठी मोठी मागणी असते , प्रामुख्याने आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतले जाते,मात्र गतवर्षी अवकाळी पाऊस आणि घसरलेले दर,यामुळे यंदा मिरची उत्पादन घटल्याने लाल मिरच्यांचा दर गगनाला भिडले आहेत. परिणामी मिरचीची विक्री देखील घटली असून सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर लाल मिरची गेली आहे.
1000
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 26, 2026 07:46:07
1064
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 26, 2026 07:20:05
Malegaon, Maharashtra:राज्यातील 15 अधिकाऱ्यांना जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करने भोवलं... मालेगावच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पदाचा गैरवापर करणाऱ्या 13 गंभीर प्रकरणात राज्यातील वेगवेगळ्या 15 अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले सक्तीच्या रजेवर... मालेगावच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदाचा गैरवापर करत पुणे येथील जमिनीच्या वर्गात केला बेकायदेशीर बदल ANC :-जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध शासनाने कडक भूमिका घेत ज्या 13 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले त्यात मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ही समावेशा आहे ज्योती देवरे पुण्याच्या खेड येथें तहसीलदार असताना त्यांनी जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले पुणे जिल्ह्यातील जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करून जमिनीचा वर्ग, क्षेत्र आणि भोगवटदार यामध्ये बेकायदेशीर बदल केल्याच्या आरोप या अधिकाऱ्यावर असून शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मात्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
947
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 26, 2026 07:03:27
Nagpur, Maharashtra:नागपुरातल्या अनेक पेट्रोल पंपावर आज *नो स्टॉकचा* बोर्ड लागला आहे.. प्रशासनाकडून मुबलक पेट्रोलसाठा असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागल्याचं दिसून आलं. वाहनधारक विविध पेट्रोल पंपवर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी धावाधाव करताना दिसून येत आहे.. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी कोणता पेट्रोल पंप सुरु आहे याचा शोध घेत आहे..काल झी 24 तासची टीम उंटखाना येथील पेट्रोल पंपवर सकाळी पोहचलली होती ...त्यावेळी पेट्रोल धारकांची झुंबड होती... मात्र काल दुपारी 3 वाजेनंतर तिथेही पेट्रोल नो स्टॉक होते.. आज सकाळी 11 च्या दरम्यान तिथे नो स्टॉक होता,एक पेट्रोलचा टँकर पोहचला होता... आणि तिथे बाहेर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी अनेक वाहधारक अगोदरच प्रतीक्षेत आहे.. यावेळी तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
1063
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 26, 2026 06:48:30
Beed, Maharashtra:जय श्रीराम… जय श्रीराम… या गजराने आज बीड शहर अक्षरशः दणाणून गेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा उत्साह शहरात शिगेला पोहोचला असून रस्त्यावर भक्ती, उत्साह आणि भगव्या रंगाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. बार्शी नाका येथील गणपती मंदिरापासून निघालेली भव्य दुचाकी शोभायात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली. शेकडो दुचाकींवर भगवे झेंडे फडकत आहेत, तर तरुणांच्या तोंडी जय श्रीरामचा गजर घुमतोय. डीजेच्या तालावर ताल धरत आणि घोषणांच्या आवाजात संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. बीड शहर आज भक्ती, उत्साह आणि अभिमानाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे हे चित्र पाहायला मिळाले.
1041
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 26, 2026 06:45:44
966
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 26, 2026 06:19:25
1093
comment0
Report
Advertisement
Back to top