Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

महेगांव में रानडुकरों के हमले से किसान भयभीत, फसलों को खतरा

KJKunal Jamdade
Feb 17, 2026 10:20:49
Shirdi, Maharashtra
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात आधीच बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत असताना आता रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. सचिन बाबुराव भगुरे हे शेतात काम करत असताना अचानक रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.. या हल्ल्यात रानडुकरांनी भगुरे यांच्या हात पायाचे lचके तोडून गंभीर जखमी केले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. माहेगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा उच्छाद वाढला असून कळपाने फिरत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड झाले आहे.. उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Feb 17, 2026 11:48:02
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर परिसरात असलेल्या स्मशानातील राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सोनं चांदीचे दर वाढल्यानंतर राख चोरीच्या घटनांची संख्या वाढल्याचं स्मशान भूमीत काम करणारे स्थानिकांनी सांगितले. अस्थीच्या चोरींबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला असून, मयत सरला देसले यांच्या अस्थीतील सोने-चांदीचे दागिने गायब असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या चोरीच्या घटनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी झाली आहे. मयत सरला यांच्या अंतविधीच्या वेळी अनेक सोने-चांदीचे दागिने होते, मात्र दुसऱ्या दिवशी अस्थी जमा करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर चोरीची बाब समोर आली. अस्थीमधून दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. या घटनेने धार्मिक भवन दुःख झाल्याने नाराजी व्यक्त झाली, CCTV आणि सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 17, 2026 10:49:48
Vasai-Virar, Maharashtra:मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस भरती लांबणीवर, आता 16 ऐवजी 21 तारखेला होणार प्रक्रिया मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत १००० शिपाई पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया आता १६ फेब्रुवारीऐवजी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर होणाऱ्या या प्रक्रियेची तारीख प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. तारखेत बदल झाल्यामुळे विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांनी प्रवासाचे आणि राहण्याचे नियोजन नव्या वेळापत्रकानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीची तारीख ५ दिवसांनी पुढे गेल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असून, प्रशासनाकडून लवकरच सविस्तर अधिकृत सूचना प्रसिद्ध केल्या जातील.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 17, 2026 10:47:37
Kolhapur, Maharashtra:Kolhapur शहरातील लक्ष्मीपुरी परिसरात भरदिवसा एका युवकाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. हॉटेल मालकाने युवकाच्या आईला अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लक्ष्मीपुरीतील स्वस्तिक हॉटेलवर संबंधित युवकाने अचानक दगडफेक करत काचा, फर्निचर व इतर साहित्यांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रकार सुरू असतानाच नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल तरी देखील हा युवक ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याला पॉलिसी खात्या दाखवला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 17, 2026 10:32:17
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 17, 2026 10:20:08
Washim, Maharashtra:टो येथील श्री मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई करत परीक्षा केंद्रावर कार्यरत 26 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली. भौतिकशास्त्राच्या परीक्षेदरम्यान तपासणी केली असता उत्तरपत्रिकांमध्ये समानता आढळली, याचा प्रस्ताव अमरावती शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात आला. परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर तात्कालिक प्रशासकीय कारवाई झाली. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 10:18:37
Akola, Maharashtra:अकोला शहरातील अकोट फायल परिसरात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या आठ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या माता-वडिलांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना तीन मुली असून काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, कौटुंबिक वाद आणि आईचे आरोपी सोहेल खान याच्याशी असलेले कथित संबंध यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला. वडील पत्नीपासून विभक्त राहू लागले, तरीही मुलींच्या भेटीसाठी अधूनमधून घरी येत असत. घटनाच्या दिवशी पाच वर्षीय मुलीने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर वडील तत्काळ घरी पोहोचले असता, आई घरात नसताना आरोपी घरात घुसून आठ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपी हा गुन्हेगारांना स्पर्श करून मारहाण केल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. या धक्कादायक माहितीनंतर वडिलांनी अकोट फाईल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,पुढील तपास सुरू आहे. संतापाची लाट,कठोर शिक्षेची मागणी. या घटनेनंतर विविध हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना समाजासाठी घातक ठरत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली. समाजासाठी चिंतेचा विषय.. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कौटुंबिक वादांमध्ये मुलांचे संरक्षण कोठे हरवते?आई-वडिलांच्या मतभेदांचा फटका निरपराध मुलांना का बसावा? अशा आरोपींना वेळीच आळा घालण्यासाठी काय यंत्रणा मजबूत करणार? लहानग्यांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, समाज आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी अधिक सजग होण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.पीडित मुलीला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 17, 2026 10:17:33
Yeola, Maharashtra:बांग्लादेश नेपाळ श्रीलंका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची भारतातून निर्यात केली जात होती मात्र केंद्र सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणाचा फटका निर्यातीला बसला असून मागणीच्या तुलनेत देशांतर्गत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सरासरी दर गेल्या काही दिवसांपासून एक हजार रुपयांच्या आत 700 ते 900 रुपये दरम्यान मिळत असल्याने यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला एक हजार रुपये अनुदान द्या अन्यथा गांजा लावण्याची परवानगी द्या अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करू लागले आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 17, 2026 10:15:04
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाकडून वनमंत्री गणेश नाईक यांना डीवचणारी बॅनरबाजी करण्यात आलेय. स्मृतिभंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करुन मिळेल असा आशय लिहिलेले बॅनर नवी मुंबईत लावण्यात आलेत. गणेश नाईकांकडून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन अश्या प्रकारचे आव्हान देण्यात आले होते. यावर खासदसरा श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना स्मृतिभंश झक्याची टीका केली होती. यावरूनच शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम यांच्यामार्फत शहरभर स्मृतिभंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करुन मिळेल असा आशय लिहत नाईकांना डीवचणारे बॅनर लावण्यात आलेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 17, 2026 10:11:56
Dhule, Maharashtra:धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. या दरम्यानच आज अतिक्रमण मोहिमेदरम्यान प्रशासन आणि नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडली. धुळ्यात महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान अतिक्रमण धारक नागरिकांमध्ये व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये हातपाई बघायाला मिळाली. महानगरपालिका अतिक्रमण पथक प्रमुख अधिकारी व जेसीबी चालक यांना स्थानिकांतर्फे धक्काबुक्की करण्यात आली. अतिक्रमण मोहिमेला विरोध केल्यामुळे झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरत आहे. आमदार अनुप अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार फारुक शहा यांच्या प्रतिष्ठेची ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम झालेली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top