Back
Ajit Pawar ने बारामती में विकास के नए कदम शुरू करने का संकेत दिया
JMJAVED MULANI
Jan 24, 2026 13:53:15
Barhanti, West Bengal
बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉइंटर
BARAMATI में कन्हेरी जगह जिल्हा परिषद और पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार बोलत होते.
दरवेळेसच्या प्रतिमानुसार आपण आपला प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
1967 नंतरच्या काळात बहुतेक प्रचाराचा शुभारंभ आपण हनुमंतरायाच्या मारुतीरायाच्या साक्षीने आपण या ठिकाणी पडतो.
आणखी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे मी परवा काही लोकांशी चर्चा केली
आज आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस यांचा सत्कार मुंबई हायकोर्टाची यांच्या मुंबईमध्ये ठेवलेला होता राज्याचे मुख्यमंत्री आज उशिरा दावोस वरून येणार असल्याने त्यांनी जातानाच मला सांगितलं होतं तुम्ही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारच्या वतीने त्या कार्यक्रमाला हजर राहावा. हा कार्यक्रम संपल्यानंतर मी इकडे आलो.
26 जानेवारीला तुमच्या माझ्या देशाच्या प्रजासत्ताक दिन आहे मोठ्या दिमाखात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि बाहेरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते दिलीप साजरा होतो. किती वेगवेगळ्या राज्याची चित्ररत असतात त्यालाही महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळतो.
यावेळेस आपले राज्यपाल महाराष्ट्रातील प्रजासत्ताक दिन गुजरात मध्ये साजरा करणार आहेत त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा महाराष्ट्रातील मान देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या विकासाकरिता कटिबद्ध आहे हा शब्द मी मारुतीरायाच्या साक्षीने मी पुन्हा एकदा सर्वांना देतो
मागे नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्या काळात 18 च्या 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या.
जिल्ह्याचे पण जिल्हा परिषद आपल्या ताब्यात होती, तिथेही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या नात्याने आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला.
मला पवार साहेबांच्या मुळे ज्यावेळी संधी मिळाली ती संधी मिळाल्यानंतर मी कधीही जातीपाती नातीगोत्याचा विचार केला नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो
यावेळी आठ दिवस बारामती मध्ये कृषी प्रदर्शन होतं अनेकांनी ते पाहिलं असेल त्यातून नवीन शेती कशी केली पाहिजे? ए आयचा वापर केल्यावर शेती कशी होते हे सर्व प्रात्यक्ष तर त्या ठिकाणी ठेवले आहे.
हे जग कायमचं राहणार आहे तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचं आहे.
पण काम करत असताना राजकारण हे सर्वस्व नाही राजकारण होत असतं निवडणुका संपल्यावर ते विसरायचं असतं पण त्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिले पाहिजे.
इंदापूर बारामती तालुक्यात लाकडी निंबोडी योजनेतून पाण्याची सुविधा कशी होईल यासाठी काम सुरू आहे
काही शेतकरी या कामात अडचणी आणत आहेत. शेतकऱ्यांना विनंती आहे तुमची माझी जात एक आहे.
छत्रपती कारखान्याच्या बाबतीत शिस्त आली आहे त्या ठिकाणचा संचालक मंडळ चांगलं काम करत आहे काही चुका दुरस्त करायला वेळ लागेल.
ज्या अडचणी येतील आपण मार्ग काढत आहोत.
छत्रपती शिक्षण संस्था सोमेश्वर शिक्षण संस्था आणि माळेगाव येथील शिक्षण संस्थेच्या बाबतीत मी CSR देण्याबाबत कबूल केला आहे त्याबाबत काम करत आहे
आज सकाळी माळेगाव येथील शिक्षण संस्थेच्या बाबतीत CSR साठी पाच कोटी रुपये मंजूर केले
जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण नव्या शहरांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, 24 पासून 55 वयापर्यंतचे उमेदवार आपण दिले आहेत त्यामुळे काहींना थांबावं लागेल.
अनेकांना संधी देता आली नाही मात्र पुढे संस्थांमध्ये त्यांना संधी देऊ
वेगवेगळे चढतात अडचणी येत आहेत, साखरेचे भाव एकदम वाढत आहेत कमी होत आहेत.
माझा व्याप जरी वाढला असला तरी माझं बारामतीकडे माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे त्याबाबत काळजी करू नका.
कोणाला तरी सोबत घ्यावा लागतो मग काय होतं यांनीच आपले कान भरले असतील असं म्हणतात मी इतक्या हलक्या कानाचा नाही माझे कोण कान भरू शकत नाहीत हे काय माझी पहिली निवडणूक नाही
1992 ला जिल्हा परिषेदची पहिली निवडणूक लढवली आता ही जवळपास सातवी निवडणूक आहे...
इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांच्या इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं
आम्ही एकत्र आलो की काही लोकांचं फावत त्यांना वाटतं आपल्याला कशी किंमत येणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का
प्रवीण माने प्रदीप गारटकर हे आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते आहेत प्रवीण मानेला मीच सभापती केला होता, कार्यकर्त्यांची संख्या वाढली की कार्यकर्ते थांबू शकत नाहीत, नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात
नवीन पोरं म्हणतात दादा ही संधी आहे मधली चार वर्षे आमचे वाया गेली.
नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत इतरांनाही संधी देता आली पाहिजे...
आरक्षणाप्रमाणे सर्परी दिलेली आहे त्यापेक्षा बाहेर नाही,
उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शेजारचा माळशिरस तालुका त्या ठिकाणी खाटीक समाज हा मागासवर्गीयामध्ये मोडतो त्यांच्याकडे एस सी चा सर्टिफिकेट आहे, मागच्या निवडणुकीला उत्तमराव जानकर यांना आम्ही त्या ठिकाणी तिकीट दिले होते 2019 ला ते त्या ठिकाणी ते पराभूत झाले मात्र 2024 ला ते निवडून आले.
बारामती मध्ये देखील आपण या निवडणुकीत उमेदवारी देताना खाटीक समाजात उमेदवारी दिली मात्र त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे मग ते चुकीचं कसं.
बारामती नगरपरिषद निवडणुकीत सर्वसाधारण जागेत मागासवर्गीय उमेदवार निवडून आणले की नाही
अबात माझ्याकडे चाळीस 42 आमदार आहेत त्यामध्ये सर्व जातीच्या आमदारांना संधी दिली मंत्री पदासाठी हे सगळ्यांचे राज्य आहे
बारामती मध्ये सुद्धा 1967 पासून पवार साहेबांनी सर्वांना संधी दिली.
आपण राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा संधी देतो.
महिलांना देखील आपण संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य सरकारने जेव्हा महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला महिला मिळत नव्हत्या त्यावेळी आम्ही घरी जाऊन महिलांना उमेदवारी देण्या संदर्भात प्रयत्न केले, त्यावेळी महिलांना शोधावं लागायचं घरातल्यांना विनंती करावी लागायचे आता उलट आमच्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येतात मी स्वतः मुलाखती घेतल्या
कोणी कोणाचा पत्ता कापला नाही माझी स्वतःचीच यामध्ये फार ओढाताण झाली कारण सर्वच ताकतीचे उमेदवार होते.
माळेगाव कारखान्याच्या बाबतीतही काहीजण म्हणायचे या चारच बेटाच्या बाहेर उमेदवारी जात नाही, कशाचं आलय भेट आणि काय.काम व्हावं तालुक्याचा विकास व्हावा याला मी महत्त्व देतो, पाठीमागील काळात तुमच्या पंचायत समितीची केलेली इमारत वेगवेगळी केलेली विकासकामे तुम्ही पहा
माझं आणि सुनेत्राचे शिक्षण एकत्र केलं तरी ते या महिला उमेदवाराच्या पुढे कमी पडेल (महिला उमेदवाराची ओळख करून देताना अजित पवारांनी एका महिला उमेदवाराची पीएचडी पर्यंत शिक्षण झाले आहे याचा दाखला दिला)
मी यावेळी उमेदवार देताना जास्तीत जास्त ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टदारांना उमेदवारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे कारण मी नेहमी सांगायचं एक तर राजकारण करा किंवा ठेकेदारी करा
समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे.
दिवस फार कमी आहेत मला महाराष्ट्रात प्रचाराला जावं लागणार आहे.
इंदापूर दौंड पुरंदर मध्ये मला सभा घ्यावे लागणार आहेत.
43 कोटी रुपये खर्चून आपण यशवंतराव चव्हाण अभ्यासिका निर्माण केली आहे.
याचं लवकरच उद्घाटन मी घेणार आहे.
पूर्वीचं बारामतीचे वाचनालय आणि उद्याच्या पिढी करता केलेलं हे वाचनालय पाहून तुम्ही थक्क व्हाल.
15 कोटी रुपयांचा शंभर मुलांचे वस्तीगृह गुणवडीला केले आहे.
394 कोटी रुपयाचे बारामतीकरण करिता आयुर्वेदिक महाविद्यालय केले. 70 ते 90 फूट मला पाया घ्यावा लागला त्या ठिकाणी काय होतं येड्या बाभळी होत्या.
त्या ठिकाणावरून चार पदरी रस्ता करायचा आहे रस्त्याला कोणी विरोध करू नका तुमच्या जमिनीच्या किमती चारपट वाढणार आहेत. रेल्वे लाईन गेल्यावर किमती वाढत नाहीत पण रस्ता गेल्यावर प्रचंड किमती वाढतात कोटीच्या खाली कोण बोलायला तयार नाहीत.
एक हजार रुपये कोटी खर्चून अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज उभा केलं
शिवसृष्टीला 350 कोटी रुपये खर्च केले आहेत आता पुढचा टप्पा मंजूर करत आहे, स्थानिकांना यातून वेगवेगळे छोटे-मोठे व्यवसाय निर्माण होणार आहेत.
बाबूजी नाईक वाड्याला 38 कोटी रुपये खर्च केले आहेत
मी भाषणात सांगणं आणि तुम्ही स्वतःहून उघड्या डोळ्यांनी पाहणं तिथे जाऊन एकदा बघा त्यामुळे तुम्हाला कळेल अजित पवार बोलतो ते करतो की नाही.
दहा कोटी रुपये खर्चून सेंट्रल पार्क उभा करत आहे.
130 कोटी रुपये खर्चून आपण बारामती एसटी स्थानक आणि विभागीय कार्यालय करत आहोत.
करा नदी वरती आपण सात बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बांधत आहोत.
आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठे काय कुठे काय आहे हे किती नवीन टेक्नॉलॉजी आणली तर त्याच्यापुढे चुकीच्या प्रवृत्तीची विकृत लोक त्यातून मार्ग काढतात, कुत्रा असा एक प्राणी आहे की त्याला कुठे चोरी झाली तर त्या ठिकाणी आपण वास देतो आणि तो कुठे चोरटा गेला याचा माघ काढतो अशा पद्धतीचा डॉग्स कोड ट्रेनिंग सेंटर आपण बारामतीत केला आहे, पंतप्रधान राष्ट्रपती यायच्या असतील तर त्यांच्या दौऱ्यात तर ते महत्त्वाचं असतं, 94 कोटी रुपये खर्चून याचं ट्रेनिंग सेंटरचा काम सुरू चालू आहे तो मी म्हणाल अजित पवार 94 कोटी रुपये कुत्र्याला खर्च येड लागले की काय? अरे बाबांनो पण उद्या कोणी सांगितलं की विमानात बॉम्ब ठेवलाय तर ते कुत्र येतं आणि त्याचा वास घेत आणि सांगत कुठे बॉम्ब ठेवलाय की नाही आणि मग ते विमान पुढे जातं,यातून आपल्या बारामतीची देशाला नवीन ओळख होणार आहे
जनाई शिरसाई बंदिस्त पाईप लाईन 438 कोटी मंजूर केली आहे त्याचं काम सुरू आहे, तीनशे कोटी रुपये खर्च करून आपण कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करत आहोत.
तुम्ही मला सात वाजता म्हणून मी हे करू शकतो...
मी फिरत असताना कोणी काही चुकीचं येऊन सांगितलं तर मला सांगा की दादा तू तुमच्यापाशी एक बोलतोय आणि बाहेर दुसरे सांगतोय कोणी रात्रीचा जरी फिरत असला तरी पितळ उघडं पडतं, त्यामुळे कोणीही स्वतःला उघडं पाडू नका
स्वप्निल कुठे गेला? तिकीट मारताना कसं येतात आता त्याला संचालक केलं त्याच्या आईला नगरसेवक केलं त्याचं काम संपलं काय उद्या सकाळी करा मला भेटायलाय सांगा
उद्या मी नांदेडला जाणार आहे अमित शहा येणार आहेत
बारामती मध्ये 75 कोटी रुपयांचं आपण क्रीडा संकुल करत आहोत. सर्व सुविधा देत आहोत
जुन्नर मध्येही अतुल बेनके आणि अमोल कोल्हे यांनी सर्वांना एकत्र आणलेल आहे
कृपा करून या निवडणुकीत गाफील राहू नका ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नाही तर बारामती तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही निवडणूक आहे
गेल्या काही वर्षात आपण महाराष्ट्रात काम करत असताना जिल्ह्याचा विकास केला यात बारामती आणि संपूर्ण तालुक्यात जे परिवर्तन झालं आहे ते ऐतिहासिक आहे
या पंचवार्षिक मध्ये मला तुम्हाला कऱ्हा निरा उपसा सिंचन योजना द्यायची आहे, 1000 कोटीची योजना आपण करत आहोत. तिथे बंद पाईपलाईन मधून अडीच टीएमसी पाणी आणत आहोत, जे पाणी निरा नदीतून वाहून जातं ते उचललं जाणार आहे नंतरही त्यामध्ये आरक्षण ठेवल जाणार आहे.
तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून हे सर्व शक्य झालं आहे हे मी कधीही विसरणार नाही.
तांदुळवाडी या ठिकाणी 10 ते 12 एकर जागेत आपण सायन्स पार्क करत आहोत यापूर्वी आपण कृषी विज्ञान केंद्रात देखील आहे.
प Pune जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळेतील गोरगरिबाची मुले मी नासाला पाठवली ती कधीही जाऊ शकली नसती.
मुडवे गावातील मोकार गाईंचा बंदोबस्त करा, एवढं सगळं सांगितल्यावर राग येणार नाही तर काय होणार मी नासाच सांगतोय आणि हा मोकार गाईंचं सांगतोय याचा सत्कार करूया आणि नारळ याच्या डोक्यात फोडूया यात सगळं माझं वाटोळं होतं
एक काळ होता आम्ही ती मोकাট जनावर तानू तानू पकडली आणि उजनीच्या पलीकडे सोडली आणि आता हा मला सांगतोय की तुम्हीच करा.माझंच काम आहे मीच काय करायचे करतो, आता काही पैसे दिलेत नवीन याच्यात काही पैसे देतो
पाच वर्षात पुणे जिल्ह्यात 2000 शाळा विकसित करायचं ठरवलं आहे दरवर्षी 400 शाळा विकसित करणार त्याला डी पी डी सी मधून निधी देणार
पुणे ग्रँड टू स्पर्धा काल झाली.सर्व रस्ते असे चकाचक करून टाकली साडे चारशे किलोमीटरचे रस्ते विविध तालुक्यातील चकाचक करून टाकले पाच दहा वर्ष रस्त्यांना काही होणार नाही असे स्टार रोड झाले आहेत. 40 देशातील विविध स्पर्धका आले होते. कोटी रुपयाच्या सायकली आहेत त्यांच्या.
पाटस पासून जो पालखी महामार्ग येतोय त्याला जर आपण स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याला अर्थ काय.
आता आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत
गट तट बाजूला ठेवा काही काहींना फार पुढचं बोलायचं आहे आणले की नाही तिकीट अरे काय तिकीट आणलं ते काय देवळात वाजवायची घंटा आहे का? असं कोणालाही बोलायं नाही सर्व लोक आपली आहेत
बारामतीकरांच्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या बळावर मी ही सर्व काम करत आहे तुमच्या सर्वांचा विश्वास ही माझी खरी शक्ती आहे आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे हे मी विसरू शकत नाही
नगरपरिषदेच्या निवडणुकीला फार माझी धावपळ झाली, पण शेवटी हे करावं लागतं.
तीस लाख घर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या साठी घर हे स्वप्न त्यांचा आहे ती योजना आपण बारामती शहरात आणि ग्रामीण भागात राबवायचे आहे.
पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण करत आहे 1385 हेक्टर म्हणजे 3250 एकर क्षेत्रावर डबल धावपट्टीचे हे विमानतळ होणार आहे ते विमानतळ झाल्यावर सुपा परगाण्याला खूप वेगळं महत्व प्राप्त होणार आहे कोणी जमिनी विकायच्या भानगडीत पडू नका
शेतकरी पूरक धोरण असल्याने 94% लोकांनी संहमती दिली आहे यात आपण कार्गो ची व्यवस्था करणार आहे मोठी मोठी विमान उतरणार आहेत, जगात जेवढी मोठी विमानतळ आहेत त्यातील एकोणिसाव्या क्रमांकातील हे विमानतळ असेल. भारतातील नवी दिल्लीचे सर्वात मोठे विमानतळ आहे त्यानंतरच नंबर दोनच देशातील विमानतळ कुठलं तर ते आपल्या पुरंदरचं होणार आहे
मागील काळा आपण साहेबांनी मिळून सर्वांनी अनेक प्रोजेक्ट आणले आहेत. आता दोन प्रोजेक्ट आणखी एक येत आहे.मिल्कीमिस्ट आणलं अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक आहे ते 50 एकरात होणार आहे.
अब चर्चा उठेल की दादांना 18 उमेदवार उभा करते आले नाहीत पण तसं नाही केंद्रात आपण ND(A) सरकारसोबत आहोत आणि महाराष्ट्रात पण आपण महायुती सोबत आहोत
माझा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्याचं स्वप्न होतं ते राहिलं बाजूला आणि माळेगावचाच चेअरमन झालो
लग्नाच्या अगोदर तुम्ही छत्रपती कारखान्याचे संचालक केलं त्यामुळे माझं लग्न जुळलं डायरेक्टर आहे डायरेक्टर, मी डायरेक्टर झाल्यामुळे आम्हाला स्वीकारला नाही तर कोण स्वीकारतोय
हलक्या कोणाची राहू नका कोणाची गंमत करण्याच्या भानगडीत पडू नका.
समोरच्यांनी मला सांगितलं की दादा आम्हाला दोन जागा द्या आणि बाकीच्या दहा जागा तुम्ही लढवा. आणि जिल्हा परिषदेच्या सर्व सहा जागा तुम्ही लढवा.
बारामती नगर परिषदेला जसं तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक निवडून दिले तशी साथ द्या.
आताच्या काळात प्रशासक असला तरी पालकमंत्री म्हणून मी आढावा घेत असतो लक्ष असतं माझं
इंदापूर तालुक्यात आठ जिल्हा परिषदेच्या जागा आणि 16 पंचायतीच्या जागा आहेत तिथल्याही सर्वच्या सर्व जागा निवडून आणायचा आहेत
उमेदवारी मागे घेण्याची सत्तावीस जानेवारीपर्यंत मुदत आहे त्यामुळे काहींना समजवून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा.
सहयोगला मी आता मीटिंग घेणार आहे त्या ठिकाणी मला नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि माळेगाव नगर पंचायतीचे सर्वच्या सर्व नगरसेवक उपस्थित हवे आहेत मी सर्वांची हजेरी घेणार आहे.
प्रत्येक संस्थांची संचालक बोलवा प्रत्येकाचे चार दोन चार दोन मत म्हटलं तरी उपयोग होतो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 15:32:120
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 15:01:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 14:38:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 12, 2026 13:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 13:09:120
Report