Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531
लातूर में रेड अलर्ट: कल सभी स्कूल बंद, क्या आपका बच्चा सुरक्षित?
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 26, 2025 17:30:15
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर..... हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय... AC ::- हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था उद्या बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पालक व विद्यार्थी यांच्यासाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MAMILIND ANDE
Sept 26, 2025 18:00:33
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग SLUG- 2609_WARDHA_ACCIDENT - वर्ध्यात कार व कंटेनरमध्ये भीषण अपघात - दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गावर समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळली कार - अपघातात दोघे जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी - नागपूर - तुळजापूर मार्गावरील द इव्हेंट जवळची घटना - जखमींवर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरू - सेवाग्राम व वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल - कारमधील सर्वजण वर्ध्यातील असल्याची माहिती अँकर : वर्ध्यात नागपूर - तुळजापूर मार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला.  कंटेनर आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील दोघे जण ठार झालेय. तर तीन जण  गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वर्ध्याच्या इव्हेंट मंगल कार्यालया जवळ घडली आहे. मृतकांमध्ये एक वृद्ध महिला व पुरुषाचा समावेश आहे. वर्ध्यातील पाच जण कौटुंबिक कार्यासाठी नागपूर येथे गेले होते. नागपूर येथून परत येत असताना वर्धेलगत ईव्हेन्ट मंगल कार्यालया जवळ कार वरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडर क्रॉस करून पलीकडे गेली. समोरून येणाऱ्या कंटेनरला कारची धडक लागली. भीषण अपघातात कार समोरून चेंदामेंदा झाली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चांगलीच क्षतीग्रस्त झाली. जखमींना तत्काळ सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 26, 2025 17:02:20
Wardha, Maharashtra:*वर्धा ब्रेकिंग* SLUG- 2609_WARDHA_HOSPITAL - वर्ध्याच्या उपजिल्हा रुग्णालयात 5 तासापासून बत्तीगुल - हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार - रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त अँकर- वर्धेचा हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाच तासा पासून लाईन नाही त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची बेहाल होताना या ठिकाणी दिसून येत आहे या रुग्णालयात इन्व्हर्टर किंवा जनरेटर याची कोणतीही सोय नसल्याचा प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रसुती प्रसूती गृह आणि बालरोग या वार्डामध्ये रुग्णांचे नातेवाईक दुपट्ट्याने हवा मारताना दिसत आहे.पाच पाच तासापासून बत्ती गुल झाल्याने पेशंटच्या नातेवाईकांकडून आरोग्य प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे मच्छरांचा देखील मोठ्या प्रमाणात सामना या रुग्णांना करावा लागत आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय तरी काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बाईट- नागरिक ,रुग्णांचे नातेवाईक
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 14:18:05
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 26, 2025 14:17:33
Pandharpur, Maharashtra:26092025 Slug - PPR_VANDEVI file 01 ---- Anchor - पंढरपुरात रुक्मिणी मातेला वनदेवीच्या रूपात सजवल फुलांची साडी त्यावर सोन्याचा साज, नवरात्रीनिमित्त रुक्मिणीचे सुंदर रूप नवरात्र महोत्सवा निमित्त पाचव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस वनदेवी माता पोषाख परिधान करण्यात आला श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मनी,दंड पेठ्या जोड, हिराचे कंगण जोड, मोत्याची कंठी १ पदरी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार,नेकलेस, शिरपेच मोठा, मस्त्य जोड, तोडे जोड, मोहरांची माळ, तुळशीची माळ १ पदरी, करदोडा,इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच रुक्मिणी मातेस मोठी नथ, ताणवाड जोड, तोडे जोड, पैंजण जोड, चंद्रहार मोठा, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा कंठ लहान, चिंचपेटी तांबडी, अलंकार परिधान करण्यात आलेले आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 26, 2025 14:02:41
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 13:35:50
Yavatmal, Maharashtra:पंजाब सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करू शकते तर महाराष्ट्र सरकार मधील महायुतीच्या हाताला लकवा मारला आहे का असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यवतमाळ च्या बेलोना येथे वडेट्टीवार यांनी अतिपावसाने व येलो मोझॅक मुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. सरकारने दिल्लीकडे बोट दाखवणे बंद करून तिजोरी खाली करावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. शासन सुस्त असल्यामुळे, प्रशासन शेतकऱ्यांसाठी जागरूक नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. बाईट : विजय वडेट्टीवार
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 13:06:29
Washim, Maharashtra:वाशीम : File:2609ZT_WSM_DHANGAR_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:हैदराबाद गॅझेटनुसार धनगर समाजाला आदिवासी एसटी आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच मालेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जालना येथे दीपक बोहाडे यांचे आमरण उपोषण आज दहाव्या दिवशी पोहोचले असून शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.याला पाठिंबा म्हणून वाशीम व मालेगाव येथे धरणे आंदोलन झाले.धनगर समाजाला एसटी आरक्षणाबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही,तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारवर राहील असा इशार देण्यात आला.
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 12:47:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात सोशल मीडियावर पोस्ट करत रिलस्टारने केली आत्महत्या - सोलापुरात रीलस्टारने सोशल मीडियावर पोस्ट ठेवत केली आत्महत्या, शेळगी भागातील धक्कादायक प्रकार. - प्रज्वल कैनूर असं रीलस्टार असलेल्या युवकाचे नाव, प्रज्वल यांनी गळफास घेऊन केली होती आत्महत्या. - 'आज हम है, कल हमारी याद होगी' असा इंस्टाग्रामवर मेसेज करून आपल्या भावना केल्या होत्या व्यक्त. - प्रज्वल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला होता. - प्रज्वल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन फोटो शेअर करत संदेश देत आपलं दुःख दाखवण्याचा केला प्रयत्न. - तर दुसऱ्या पोस्टमध्ये 'सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेत आहे, माझी आई माझा भावाची काळजी घ्या, इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. - याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद झाली आहे..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 26, 2025 12:34:17
Nashik, Maharashtra:feed by amar kahaane Anchor देशाच्या संरक्षण क्षेत्रावर अमिट ठसा उमटवल्याने नाशिककरांच्या सार्थ अभिमानाचा विषय असलेली 'मिग २१' ही लढाऊ विमाने इतिहासजमा करण्यात आलियेत. त्या विमानांच्या निर्मितीमागील राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत नाशिकच्या योगदानासह विमानाच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. Vo 1 1964 मध्ये यशवंतराव चव्हाण यांना नाशिकने खासदार म्हणून निवडून दिले आणि देशाचे संरक्षणमंत्री करत पंडित नेहरू यांनी देशाच्या सुरक्षेची कमान त्यांच्या हाती सोपविली. त्यावेळी देशाची हवाई सुरक्षा करण्यासाठी रशियाची मदत घेण्यात आली. भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार १९६४ ते १९९५ या सुमारे तीन दशकांच्या कालावधीत ८७४ मिग २१ लढाऊ विमाने निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील तब्बल ६५७मिग २१ विमानांची निर्मिती प्रक्रिया नाशिकनजीकच्या ओझर एचएएलमध्ये करण्यात आली.मिग २१ चे टाइप ७५, टाइप ७७, टाइप २६ आणि बायसन, अशा स्वरूपातील अपग्रेडेड विमानांची निर्मिती करण्यात आली. ओझर एचएएलच्या कारखान्यालगतच भारतीय हवाई दलाचे देखभाल व दुरुस्ती केंद्र १९७४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यामुळे हे केंद्र आणि ओझर एचएएल या दोन्ही ठिकाणी मिग २१ विमानांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत होती. प्रारंभी रशियन अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ विमानांचे असेम्ब्लिंग झाली. त्यानंतर ओझर येथे सर्व सुट्या भागांची जुळणी आणि मिग २१ विमानाची निर्मिती करण्यात आली. Byte अमर कहाणे यांनी पाठविला आहे Vo 2 १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धातील पराभवानंतर भारतात लढाऊ विमान निर्मिती सुरू करण्यासाठी रशियाने तंत्रज्ञानासह तांत्रिक आणि कुशल मनुष्यबळासह सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नाशिकनजीकच्या ओझरची जागा निश्चित झाल्यावर १९६४ पासूनच या विमानांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून रशियन इंजिनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंते, तंत्रज्ञांनी तब्बल ३० वर्षे दरवर्षी किमान २० ते २५ विमानांची निर्मिती केली. GFX मिग चा पराक्रम १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात याच मिग-२१ विमानांनी पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली होती. दोन एफ ६ विमाने, एफ-८६ साब्रे ॐ विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्म्युलस विमान यांचा धुव्वा उडवला होता. या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-२१ या विमानांकडे वेधले गेले होते. त्यानंतर १९९९ मध्ये 3 कारगिलवरून भारत-पाक युद्ध छेडले गेल्याने या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अलांटिक विमान पाडले होते. Byte अमर कहाणे यांनी पाठविलेला Vo आता फ्रान्स शी झालेल्या करारानुसार राफेल हायप्रसनिक विमानाची निर्मिती आणि तेजस या भारतीय बनावटीच्या विमानांची निर्मिती करत भारतीय सीमा अधिक बळकट केल्या जाणार आहेत. मात्र मिगच्या इतिहासातील पाऊलखुणावर आता हवाई सुरक्षा अधिक गडद होणारे
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top