Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर: कार्तिकी यात्रेत 5 कोटी 18 लाख दान
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 11:05:14
Pandharpur, Maharashtra
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांनी केले 5 कोटी 18 लाखाचे दान, अतिवृष्टी , महापूर असतानाही 1 कोटी 61 लाख रुपयांची झाली वाढ कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्रींच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली. कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दिनांक 05 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 48,08,289 रुपये अर्पण, 1,27,19,520 रुपये देणगी, 54,16,500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 71,59,910 रुपये भक्तनिवास, 1,77,15,227 रुपये हुंडीपेटी, 50000 रूपये पुजा तसेच 33,36,876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 67,09,06 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन 2024 च्या कार्तिकी यात्रेत रू. 3,57,47,322/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 5,18,77,228/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 1,61,29906/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 12:19:24
Latur, Maharashtra:लातूरमध्ये साखर कारखान्यांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा समोर आला असून भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नाव न घेता माजी मंत्री अमित देशमुख यांच्या परिवारावर टीका केली आहे. लातूर जिल्ह्यातील इतर काही साखर कारखाने आणि स्वतःला सहकार महर्षी म्हणवून घेणारे लोक उसाच्या वजनामध्ये काटा मारतात. परंतु, आमच्या साखर कारखान्यात मात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही काट्यावर वजन करून उस आणावा... ते वजन आम्ही जसेच्या तसे स्वीकारणार आहोत असा दावा त्यांनी केला आहे. श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी चा 42 वा गळीत हंगाम शुभारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनीही टीका केली है
30
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 10, 2025 12:03:40
Vasai-Virar, Maharashtra:वसई सत्र न्यायालय में पेशी दौरान आरोपी भागने की कोशिश, टंकी में छुपकर पकड़ा गया। पुलिस को चकमा देकर आरोपी पलायन कर गया। अर्ध საათ खोजबीन के बाद पुलिस ने आरोपी को पुनः पकड़ लिया। सिंटेक्स के टाकी में छिपा पाया गया, फिर से पुलिस के कब्जे में लिया गया। Ankar -- वसई सत्र न्यायालय में पेशी के लिए लाए गए एक आरोपी ने पुलिस की गिरफ्त से पलायन करने का प्रयास किया। पोस्को कानून के तहत गिरफ्तार यह आरोपी टॉयलेट जाने के बहाने से भाग गया, जिससे पुलिस प्रशासन में खलबली मच गई। आरोपी की तलाश के लिए तुरंत पुलिस ने धावा बोला; फिलहाल जांच जारी है और आसपास की सुरक्षा व्यवस्था पर प्रश्न उठ रहे हैं।
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 10, 2025 12:02:47
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 11:52:13
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या सोनई येथील संजय वैरागर या युवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून तातडीने कठोर शासन करावे या मागणीसाठी सकל मातंग समाजाच्यावतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला...अहिल्यानगर शहरातील लहुजी वस्ताद चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली... अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड वर्गीकरणाची त्वरीत घोषणा करावी , संजर वैरागरवर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे...दलित समाजातील युवकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला...या मोर्चात मोठ्या संख्येने मातंग समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते...मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 11:50:31
Pune, Maharashtra:नरहरी झिरवळ के नेतृत्व में महायुती बनाम वैकल्पिक स्वतंत्र लड़ाई की चर्चा अहिल्यनगर यहाँ अजित पवार पाहिल्या राष्ट्रवादीची निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक प्रभारी आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मार्गदर्शन केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच सर्व स्तरावर महायुती म्हणून लढाईचे अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर आहे मात्र तसे आदेशात आले नाहीत असं देखील झिरवळ स्पष्ट केला आहे. तसेच कार्यकर्त्यांचा दोन्ही बाजूने सूर असून युती झाली तर युतीच्या बाजूने अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं मंत्री झिरवळ यांनी म्हटलं आहे. नरहरी झिरवाल ऑन भाजप नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत अहिल्या नगर जिल्ह्यात भाजप कडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे यावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व पक्ष स्वबळावर लढण्याचे म्हणत असतील मात्र तिन्ही पक्ष मिळून एक कमिटी निवडली आहे त्यात चर्चाहून निर्णय घेतला जाईल, मात्र अद्याप कोणताही आदेश आला नसल्याचं हिरवळ यांनी म्हटल आहे. नरहरी झिरळ ऑन संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्वचा भूमिकेवरून आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी देणार का या प्रश्नावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फार पूर्वी ही भूमिका घेतली होती , निवडणूक आली की तशी री ओढली जाते मात्र सर्व समाजाला सामावून घेतलं जाईल असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 11:49:47
Satara, Maharashtra:सातारा- आज साताऱ्यात भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आल्या.या वेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघा नेत्यांच्या आघाडीचे इच्छुक उमेदवार या मुलाखतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या.या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला.त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत.मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिली आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे.नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबत ची यादी फायनल करतील.सेवेन राजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 10, 2025 11:44:30
Jalna, Maharashtra:2 सप्टेंबरला जो जीआर काढला आहे. हा जीआर योग्य नाही.यावर औरंगाबाद न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सुप्रिम कोर्टानं देखील निकाल दिलेला आहे .मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद मितवायचा असेल तर हा जीआर रद्द केला पाहिजे.मराठा ओबीसी वेगळं आरक्षण हवं भाजपने हा वाद लावला आहे ओबीसींचा सगळ्यात मोठा राजकीय विरोधक भाजप आहे त्यांना मतदान करू नये. स्थानिक स्वराज्य निवडणूकीत उलट्या सुलटया आघाड्या सुरू आहे कोकणात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. ओपनचया जागेवर ओबीसी उमेदवार दिलेच पाहिजे. *ऑन शरद पवार मूळ ओबीसी- मि 40 वर्षांपासून त्यांना ओळखतो त्यांनी A म्हटलं की मि त्याचा अर्थ Z काढतो म्हणजे एकाही ओबीसीला ते उमेदवारी देणार नाही* *जरांगे यांच्या आंदोलनाचा ओघ कमी झाला आहे.* *ऑन जरांगे धमक्या* त्यांच्यातील अंतर्निर्देशित वाद मला माहित नाहीत.जुने सहकारी त्यात आहे याचा अर्थ आतच काहीतरी असेल*
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 11:41:47
Pune, Maharashtra:श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तयारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे राज्यात सर्वत्र या निवडणुकीची तयारी पाहायला मिळत आहे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच दोन गट होऊन लढत पाहायला मिळणार आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहिला मिळते, भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी देखील तसे संकेत दिले आहे. श्रीगोंदा शहरात महाविकास आघाडीक ताकद कमी असून महायुतीतील पक्ष एकमेकांच्या आमनेसामने लढतांना दिसतील. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती करण्याच्या तयारीत आहेत मनोहर पोटे पंचवीस वर्षांपासून नगरपरिषदेत काम करतात एक वेळेस नगराध्यक्ष तर एक वेळेस त्यांची पत्नी नगराध्यक्ष ही राहिलेली आहे त्यामुळे नगरपरिषदेवर असलेलं वर्चस्व सर्वश्रुत आहे तर तालुक्या च्या राजकारणातील कायम मुख्य घटक असलेल्या बाबासाहेब भोस यांनी देखील महाविकास आघाडीतून आपलाच नगराध्यक्ष बसवण्यासाठी कंबर कसली आहे बाईट:- विक्रम पाचपुते, आमदार भाजप बाईट:- मनोहर पोटे, माजी नगराध्यक्ष बाईट:- बाबासाहेब बोस, महाविकास आघाडी गेल्या वर्षी परिस्थिती श्रीगोंदा नगरपरिषद (2016-21) 19 जागा 1 नगराध्यक्ष भाजप- 11 राष्ट्रवादी- 8 यावेळी 22 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 10, 2025 11:41:22
Nanded, Maharashtra:विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यावर थेट टीका केली असताना त्यांना उत्तर देण्याऐवजी चव्हाण यांच्यातर्फे त्यांच्या समर्थकांनी मात्र विनंती करणारी प्रतिक्रिया दिली. नांदेड महापालिकेच्या सार्वजनिक वापराच्या सर्व जागा अशोक चव्हाण यांनी बीओटी च्या नावाखाली बिल्डरांना विकल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी थेट नाव घेऊन केला. त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी त्यावर स्वतः प्रतिक्रिया देत व्हिडीओ माध्यमाना दिला. राज्यात महायुतीची सत्ता आहे, हेमंत पाटील यांनी संयम बाळगावा, समंजस्याची भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती आहे अशी प्रतिक्रिया राजुरकर यांनी दिली. आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर न देता त्यांना विनंती करण्याची प्रतिक्रिया चव्हाण समर्थकांकडून आल्या ने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 10, 2025 11:27:51
Shirdi, Maharashtra:येसगाव शिवारात बिबटयाच्या होल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू... परिसरातील पाच दिवसातील हि दुसरी घटना , अगोदरच्या घटनेत चार वर्षीय नंदिनी चव्हाण या चिमुकलीचा झाला होता मृत्यू... ग्रामस्थांनी आक्रमक होते तिन तास अडवला होत नगर - मनमाड महामार्ग... महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा... बिबटयाला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिका-यांनी दिले आश्वासन... बिबटयाला ठार मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन तुर्द मागे... वनविभागाकडून शोधमोहीम सुरू... वनअधिकारी , वनकर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू... नरभक्षक बिबटयाला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 10, 2025 11:06:37
Kalyan, Maharashtra:भाजप - शिवसेनेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणात.. भाजपा ने सेनेचे नगरसेवक फोडले तर सेनेने भाजपा चे नगरसेविक फोडले. सेना भाजपा मध्येच ठिणगी.. सेना भाजपा मध्ये महापौर मध्ये रस्सीखेच. महापौर कोणाचा यावरून युतीवरून फोडा फोडी... महाविकास आघाडीच काय होणार? महाविकास आघाडीकडे उमेदवार उरणार का? येत्या काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर.. Anc... भाजप आणि शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुका महायुतीमध्ये लढवण्याची घोषणाबाजी केली असली तरी दुसरीकडे मात्र एकमेकांचे नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला कल्याण डोंबिवलीमध्ये सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून काल काही तासही उलटले नसताना भाजपच्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत शिवसेनेने भाजपला जशास तसे उत्तर दिल्याचे दिसून आले. Vo-कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आपणच महापौर देऊ अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली असतानाच आपलाच महापौर बसणार यासाठी शिवसेनेकडूनही दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही 2015 प्रमाणे शिवसेना – भाजप या महायुतीतील मित्र पक्षांभोवती आणि मित्र पक्षांमध्येच पाहायला मिळेल. हे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. शिवसेना फुटीनंतर सेना भाजपा युती झाली, या युती मध्ये ठरलं होतं की भाजपा सेने चे पदाधिकारी घेणार नाही तर सेना भाजपा चे येणार नाही असं असताना अंबरनाथ पासून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहेत... रविवारी डोंबिवली मध्ये सेनेच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे, देवानंद गायकवाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला तर काही तास उलटताच भाजपा चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे यांनी प्रवेश केल्याने दोन्ही पक्षा मध्ये ठिणगी पडली आहे.. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज पर्यत वेगवेगळे निवडणुक कढून एकत्र सत्ता स्थापन केली आहे आता फोडा फोडीच्या राजकारणामुळे येणाऱ्या निवडणुकीत दोघान मध्ये युती करून निवडणूक लढवतात की स्वबळावर निवडनुक लढतात हे बघावं लागणार आहे.
4
comment0
Report
Advertisement
Back to top