Back
खेड तालुक्यातील भयानक अपघात: 10 महिला भाविकांचा मृत्यू!
HCHEMANT CHAPUDE
Aug 12, 2025 10:30:42
Khed, Maharashtra
Feed 2C
Slug: Khed Pait Accident 10 Death Spot
File:02
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या 40 महिला भाविकांच्या पिकअप गाडीचा घाटाच्या मध्यावर अपघात होऊन 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय,तर 29 महिला भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती सध्या रूग्नालयात उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेनंतर या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून कुंडेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचे झाल्यानंतर या परिसरात झालेल्या विकास कामांमधील रस्ते खड्डेमय झाले घाट तयार करताना तांत्रिक बाबी न तपासल्याने घाटाचा भाग मोठा झाला अशातच भाविकांनी घेऊन जाणारे पिकअप गाडी घाटाचा चढ चढण्याऐवजी माघारी रिटन परत खाली आली, आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली, महत्त्वाचं म्हणजे ही गाडी ओव्हरलोड असल्याची माहिती स्थानिक नागरिक सांगत असून,या अपघाता नंतर चालकावरती ही संदोष मनुष्यवधाचा चा गुन्हा म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल झालाय, त्यामुळे या अपघाताला जबाबदार कोण याची चौकशी व्हायला हवी अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत यावेळी घटनास्थळावरून या अघाताचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To ग्रामस्थ प्रथम दर्शनी
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 12, 2025 13:05:42Shirur, Maharashtra:
Feed 2 C
Slug: Ranjangaon Traffic
File:02
Rep: Hemant Chapude(Ranjangaon)
Anc: पुणे नगर महामार्गावरील रांजणगावच्या मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून आज अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगावच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महामार्गावरती वाहतूक कोंडी झालीय, या वाहतूक कोंडीचा मात्र सर्वसामान्य प्रवाशांसह कामगार आणि भाविकांनाही मोठा फटका बसलाय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया रांजणगाव पुणे...
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 12, 2025 13:04:18Nagpur, Maharashtra:
NGP Rss Smruti Mandir
live u ने फीड पाठवले
------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराचे व्हिडिओ HD मध्ये शूट केलेले आहे... ते दिल्ली ऑफीसला पाठवले आहे... मुंबई ऑफिसलाही पाठवले आहेत... ते लायब्ररीत संग्रहित करावे
7
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 12, 2025 13:01:55Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - झी 24 तासचा बातमीचा दणका, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौक झाला खड्डेमुक्त
- झी - 24 तासचा बातमीचा दणका
- झी 24 तासवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य चौकात पडलेले खड्डे दाखवल्यानंतर अखेर प्रशासनाला आली जाग
- आज सकाळी झी 24 तास नाही खड्ड्याविषयी बातमी दाखवल्यानंतर आठ तासाच्या आत प्रशासनाने बुजवले खड्डे
- शहरातील अनेक विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना करावा लागत होता खड्ड्यांचा सामना
- झी 24 तासच्या बातमीच्या दणक्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातील सर्व खड्डे बुजवले प्रशासनाने
याच विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
3
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 12, 2025 13:01:05Vasai-Virar, Maharashtra:
Date-12aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BUS
Feed send by 2c
Type-aVb
Slug - पालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचा अचानक संप
वाहतूक सेवा ठप्प ; प्रवाशांचे हाल
अँकर - वेतन वेळेत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संप पुकारला आहे. या संपामुळे शहरातील परिवहन सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.
परिवहन सेवेत काम करणारे चालक व वाहक यांना ठेकेदाराकडून वेळेत वेतन आणि वेतन वाढ यासह इतर सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानकपणे संप पुकारला आहे. त्यामुळे सकाळपासून पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जो पर्यंत वेतन दिले जाणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. तसेच ४० ई बस चा समावेश आहे. दररोज बसेस मधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात.
Byte - बस कर्मचारी.
5
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 12, 2025 12:52:10Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1208ZT_CHP_RAINS
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात बरसत आहे आवश्यक असलेला पाऊस ,जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी आहे चिंताजनक
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या निम्मा पाऊस पडलाय. त्यामुळे प्रमुख पिकं असलेल्या धान, सोयाबीन, कापूस यासाठी पावसाची कमतरता आहे..अशातच संध्याकाळी पावसाने शहर जिल्ह्यात हजेरी लावली असून उकाड्याने त्रस्त।नागरिकांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील मध्यम आणि।लघु सिंचन।प्रकल्प अद्याप निम्मेच भरले असून आगामी 3 दिवसांसाठी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी उचित खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
------पावसाचे vis-----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 12, 2025 12:48:13Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika slaughter av
15 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट रोजी महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय संभाजीनगर महापालिकेने घेतलाय, 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिवस आहे सोबतच जन्माष्टमी आहे तर 20 ऑगस्टला जैन धर्मियांचा पर्युषण पर्व सुरू होतंय यामुळे या दिवशी हे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येतील आणि गुन्हेही दाखल करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे
5
Report
UPUmesh Parab
FollowAug 12, 2025 12:46:32Oros, Maharashtra:
PKG ---
छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार मोजतायेत अखेरची घटका ??
छत्रपतीनी उभारलेले किल्ले सांभाळताना 20 व्या दशकातील मावळ्यांची होतेय दमछाक
अँकर --- हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले तर काही किल्ले पराक्रमानी मिळविले. आज हे किल्ले छत्रपतींच्या जाजवल्य इतिहासाचे साक्षीदार आहेत. मात्र तेच किल्ले सांभाळताना किंबहुना त्या किल्ल्याचे संवर्धन करताना पुरातत्व विभागाची उदासीनता दिसून येतेय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयदुर्ग किल्ला ढसाळत असल्याने पुरातत्व विभागाच्या कामाबद्धल प्रश्नचिन्ह उभ राहिलंय
V.O -- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग किल्ला. अरबी समुद्राच्या किनारी असलेला हा जलदुर्ग गेली अनेक वर्ष समुद्री लाटा आणि सोसाट्याची वादळे सोसून उभा आहे. मात्र सद्य परिस्थितीत विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज कोसळत आहेत. विजयदुर्ग किल्ल्यावर तब्बल 20 बुरुज असून त्यातील तीन ते चार बुरुज ढासळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विजयदुर्ग किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. मागील अनेक वर्ष या किल्ल्याची डागडुजी झाली नसल्याने किल्ल्याची दुरावस्ता होत असून याला पुरातत्व विभागाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप शिवप्रेमीनी केलाय.
Byte --- प्रसाद देवधर, शिवप्रेमी विजयदुर्ग
V. O ---- पुरातत्व विभागासोबत राजकीय नेते किल्ल्याच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचा थेट आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय. राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा असो वा किल्ल्याची डागडुजी असो यात राज्य कर्त्यांनी लाखो रुपये उखळले असल्याचे सांगत राऊत यांनी थेट सत्ताधाऱ्यांना किल्ल्याच्या दुरावस्थेला जबाबदार धरलंय.
Byte --- विनायक राऊत,माजी खासदार उबाठा
V. O --- राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याचा युनिसकोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. आणि त्यांच्या माध्यमातून किल्ल्याचे संवर्धन होईल आणि युनिस्को हाच एक आशेचा किरण असल्याचे शिवपप्रेमीना वाटतंय. त्यासोबत किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्यास छत्रपतींचा इतिहास पुसला जाण्याची भीती देखील शिवप्रेमिनीं व्यक्त केलीय.
Byte --- प्रसाद देवधर, शिवप्रेमी
End --- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आणि पर्यटन क्षेत्रात देशाला जगात अग्रस्थान मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अशा प्रकारे ढासळत राहिले आणि त्यांचे संवर्धन करताना 20 दशकातील मावळ्यांची दमछाक होत असेल तर मात्र शिव प्रेमिनीं व्यक्त केलेली भीती सत्य होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आपली उदासीनता दूर करुन केंद्रीय पुरातत्व विभाग किल्ल्याच्या संवर्धानाकडे गंभीर्याने पाहिल का ? आणि आपल्या किल्ल्याचे जतन करेल का ?.........
उमेश परब, सिंधुदुर्ग
व्हिडिओ byte, wkt 2c ( बातमी सोबत )
विनायक राऊत byte - on desk
6
Report
JMJAVED MULANI
FollowAug 12, 2025 12:45:53Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1208ZT_BARAMTIIGLOLE
BYTE 1
जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून राज्यात खाटीक समाज करणारा आंदोलन...
Anchor _जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती 14 ऑगस्ट पर्यंत जर कारवाई झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर 15 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात खाटीक समाज आंदोलन करणार आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांत कार्यालयाच्या बाहेर खाटीक समाजाकडून अर्जुन खोतकर यांच्या विरोधात 15 ऑगस्ट पासून कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन घंटानाद आंदोलन केला जाणार असल्याचा इशारा हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील इंगुले यांनी दिला आहे.
अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना मुलाखत देत असताना खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह उदाहरण देऊन गोष्ट बोलली होती. त्यांच्या विरोधात चार तारखेला बारामती शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तक्रारी अर्ज दिला होता. महाराष्ट्रामध्ये खाटीक समाजाने वेगवेगळ्या 22 ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी अर्ज दिला पण होता परंतु अद्याप पर्यंत अर्जुन खोतकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही किंवा कोणतीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे जर 14 ऑगस्टपर्यंत ही कारवाई झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर 15 ऑगस्ट पासून खाटीक समाजाने महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिलाय.
बाईट_करण सुनील इंगुले, कार्याध्यक्ष हिंदू खाटीक समाज संघटना बारामती
9
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 12, 2025 12:39:01Nashik, Maharashtra:
Nsk_yutipkg
Feed by live u 51
Anchor राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे उबाठा युतीची नांदी नाशिकमध्ये पाहायला मिळतेय. लागोपाठ एकत्रित बैठकांचे सत्र नियोजनासाठी सुरु झालेय. बघू या कधीकाळी दोघांच्या या बालेकिल्लामध्ये सध्या काय राजकीय खिचडी पिकते आहे..
Vo 1 लोकांच्या मूलभूत समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,वादग्रस्त मंत्री याच मोदी आणि फडणवीस सरकारच्या रामभरोसे कारभाराबाबत उबाठा सक्रिय झाली आहे . सरकार विरोधात जनजागृती करण्यासाठी गेल्या आठवड्यात उबाठा गटाच्या कार्यालयात झालेल्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्याच्या नियोजनाबाबत आज मनसे कार्यालयात उबाठा गटाने हजेरी लावत वेळेचे आयोजन आणि गर्दी नियोजन केले...त्यावेळी दोघां पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन आणि समन्वय पाहायला मिळाला.
Byte दिनकर पाटील प्रदेश सरचिटणीस मनसे
Vo 2दोन्ही पक्षांचे एकच लक्ष्य म्हणजे महानगरांमधल्या महापालिका आहेत. उबाठाला मुंबईसह राज्यातील चार महापालिका तर मनसेला गतकाळातील नाशिक महापालिकेप्रमाणे इतर महापालिकांमध्ये पुन्हा आपली सत्ता आणायची आहे.
GFX
मनसे वर्चस्व
2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर २००७ च्या निवडणुकीत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते. ऑक्टोबर २००९ मध्ये शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. यात नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते, पश्चिम मतदारसंघातून नितीन भोसले आणि दिवंगत नेते उत्तमराव ढिकले हे आमदार झाले.
२०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले. राज्यातला मनसेचा पहिला महापौर नाशिकने दिला. त्यावेळी अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये महापौर झाले. २००९ मध्ये मनसेने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याविरोधात हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला मागे टाकले
शिवसेना वर्चस्व
नाशिक मधील शिवसेनेचे वर्चस्व दोन हजार च्या दशकात आपल्याला पाहायला मिळाले.. नाशिक महापालिकेसह विधानसभेमध्ये शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युतीच्या काळात नाशिकने शिवसेनेला भरभरून मते दिली होती . तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका सुद्धा ताब्यात होती. मात्र राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून यशाचा हा आलेख घसरू लागला
आता हे दोन्ही पक्ष पुन्हा गमावलेले बालेकिल्लातील वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकात त्यावेळी असलेला सदस्यांसह ग्रामीण भागही ताब्यात घ्यायचा आहे. विधानसभा लोकसभा निवडणुकीचे पायाभरणी करण्याची ही वेळ आहे.
Byte डी जी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख नाशिक
Vo 3 मराठीसाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित एकदाच उतरले असले तरी राज्यामध्ये त्याची सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळते.. . सध्या त्यांनी युतीबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर बघू असा पवित्रा घेतला असला तरी पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनातला हा समन्वय बघता दोन्ही पक्ष प्रमुखांना आता एकत्रित येण्याच्या निर्णयावर शिक्कामोरताब करावे लागणार हेच खरे
8
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 12, 2025 12:37:44Mumbai, Maharashtra:
अँकर -- दादर मधील कबूतर खाना बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.यावर कबूतर खाण्या जवळ आंदोलनही झालं होत.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.महापालिकेने पुन्हा कबूतर खाण्यावर ताडपत्री टाकली. आता या परिसरात असलेल्या इमारतीवरील गच्चीवर काही लोक कबुतरांना दाणे टाकत असल्याचे दिसत आहे त्यामुळे कबूतर खाण्यावर बंदी घालून काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी wkt
Byte -- प्रमोद चितारी स्थानिक
मनोज कुळकर्णी.
काही विडीओ whats aap वर पाठवलेत
Feed send TVU ४८
Slug -- dadar kabutar khana wkt
11
Report
ABATISH BHOIR
FollowAug 12, 2025 12:06:54Kalyan, Maharashtra:
कल्याण ब्रेकिंग
केडीएमसी चिकन मटन मच्छी बंदी प्रकरण
मनसे नेते राजू पाटील आक्रमक
केडीएमसी आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा
पोलिस आयुक्तांना ट्वीटद्वारे केली विनंती
चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा
१५ ऑगस्टला मांसाहारी हा’टेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड्स सारखे उपहारगृह बंद ठेवणार का असा केला सवाल
कल्याण डोंबिवलीला लागून असलेल्या उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे या महापालिकांनी असा फतवा काढलेला नाही.
10
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 12, 2025 12:06:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी
- शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी
- शरणु हांडे यांना मारहाण करून अपहरण केल्याप्रकरणी सात आरोपींना करण्यात आली होती अटक
- आज आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी
- पोलिसांनी आणखी दोन आरोपीना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी
- मात्र न्यायालयाने सर्वांनाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे
14
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 12, 2025 11:50:46Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1208ZT_WSM_MUNICIPAL_COUNCIL_RISOD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती अधिकृत तारखेच्या आधीच बाहेर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख १८ ऑगस्ट असूनही, जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली प्रत काही लोकांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.आधीच प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना, या ‘माहिती लिक’ प्रकरणामुळे संशयाची सुई संबंधित अधिकाऱ्यांकडे वळली आहे. या प्रकरणी रिसोड येथील इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, प्रकरणाची चौकशी करून पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिसोड येथील प्रारूप प्रभाग रचनेची प्रत मुंबईतील मंत्रालयासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती.मात्र ही गोपनीय प्रत अधिकृत प्रसिद्धीपूर्वीच रिसोडमध्ये पोहोचणे ही गंभीर बाब असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी सांगितले.याबाबतची सविस्तर माहिती मंत्रालयाला कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आणि ज्यांनी कोणी ही माहिती बाहेर दिली त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
बाईट : इरफान कुरेशी,रिसोड,वाशिम.
बाईट : बुवनेश्वरी एस .जिल्हाधिकारी वाशिम
13
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 12, 2025 11:50:17Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DRAGJ
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक. अटक आरोपी पैकी एक जण पुजारी
आत्तापर्यंत तीस आरोपी अटक तर आणखी आठ जण फरार.
अँकर
धाराशिव _ बहुचर्चित तुळजापूर ट्रक तस्करी प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघा आरोपींना अटक केली आहे. तुळजापूर येथील जगदीश पाटील या आरोपीला लातूर येथून तर अभिजीत पाटील या आरोपीला सोलापूर मधून पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी तस्करी प्रकरणातील आहेत. विशेष म्हणजे जगदीश पाटील हा तुळजाभवानी देवीचा पुजारी आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचे ते चुलत बंधू आहे. पोलिसांनी तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आत्तापर्यंत तीस आरोपींना अटक केली असून आठ आरोपी फरार आहेत.
13
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 12, 2025 11:49:40Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेची पोलखोल विधानमंडळ समिती समोर झाली आहे. समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांना गांढा येथील शाळेची सुरक्षा भिंत बांधकाम व उमरी पिंपळगाव पांदन रस्त्याबाबत शंका उत्पन्न झाल्याने समितीने बीडीओ व ग्रामसेवकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मजुरांचे जॉब कार्ड वापरून मशनरीने काम झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर चौकशीअंती कारवाईचा इशारा देखील आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
बाईट : आमदार सुनील शेळके : समिती प्रमुख
आमदार किशोर दराडे : समिती सदस्य
13
Report