Back
शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे सरपंचाचा राजीनामा, 'शिक्षण वाचवा' मोहिमेला धक्का!
MNMAYUR NIKAM
Jul 26, 2025 05:04:56
Buldhana, Maharashtra
शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरपंचाचा राजीनामा:
"शिक्षण वाचवा" मोहिमेला धक्का
Anchor : बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे एका लोकप्रतिनिधीला आपले पद सोडावे लागले आहे. ही घटना जिल्हा परिषद शाळांच्या भवितव्यावर आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. काय आहे हा सर्व प्रकार पाहूयात...
Vo : बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा हे गाव. या गावाने जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की, जो पालक आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत दाखल करेल, त्याचा वर्षभराचा ग्रामपंचायत कर माफ केला जाईल. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. अवघ्या १६ विद्यार्थ्यांवरून शाळेची पटसंख्या थेट ७५ पर्यंत पोहोचली. हा निर्णय केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चर्चेचा विषय बनला, एक आदर्श उदाहरण म्हणून पाहिले गेले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
Vo २ : शाळेची मोडकळीस आलेली इमारत, अपुऱ्या सोयीसुविधा आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांची उदासीनता, यामुळे पालकांनी पुन्हा एकदा आपल्या मुलांना इतर खाजगी शाळांमध्ये पाठवायला सुरुवात केली. ज्या शाळेसाठी ग्रामपंचायतीने एवढा मोठा निर्णय घेतला, त्याच शाळेची ही अवस्था पाहून सरपंच व्यथित झाले.
Byte - सौ अनुसया खडके, सरपंच
Vo ३ : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी जर एखाद्या लोकप्रतिनिधीला आपले पद सोडावे लागत असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी आहे. हा केवळ भडगाव मायंबा गावाचा प्रश्न नाही, तर राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची हीच अवस्था आहे. लोकप्रतिनिधी आणि गावकरी मिळून जर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी पुढाकार घेत असतील आणि प्रशासन त्यांना साथ देत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे.
Byte - ग्रामस्थ
Final VO : या घटनेने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चांगल्या हेतूने घेतलेले निर्णय जर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे धुळीस मिळत असतील, तर सरकारी शाळांचे भवितव्य काय? लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय?
शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, अशा शाळांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, 'शिक्षण वाचवा' ही मोहीम केवळ कागदावरच राहील. मयूर निकम झी 24 तास बुलढाणा.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowJul 26, 2025 14:17:54Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे
ऑन रत्नागिरी जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका -- स्वबळावर लढावं म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मतांचा आदर केलाच पाहिजे. रत्नागिरी मध्ये आमचा एकही विधानसभा जिल्हा परिषदचा लोकप्रतिनिधी नाही. सावंतवाडी जिल्हाप्रमुखांनी तर आपली 60 टक्के ताकद असल्याचे जाहीर केलेय त्यामुळे आमची ताकद आजमावयाची संधी मिळाली पाहिजे. लोकसभेच्या वेळी रत्नागिरीमध्ये तिन्ही मतदार संघात आमची पिछेहाट होती शिंदे गटाची मते आम्हाला मिळाली नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्री पूर्ण लढू
ऑन लाडकी बहीण योजना --- अशा चुका कोणी केल्या असतील तर आमच्या अदिती तटकरे ताई त्या चुका सुधारतील.
On कोकण रेल्वे रोरो सेवा --- केंद्राकडे बाजू मांडून ती गाडी आपल्या कोकणात कशी थांबेल यासाठी प्रयत्न करू मार्ग काढू
ऑन संजय राऊत मंत्री टीका --- सर्किफिकेट देणाऱ्या माणसाच चारित्र्य काय आहे. खिचडी चोरीत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तो आणि त्याच कुटुंब आरोपी आहे. भांडुपच्या ४२० नी घरात बसून हवेत गोळीबार करू नये
ऑन राहुल गांधी --- कोणाचा तमाशा झालाय हे भारताच्या जनतेला माहीत आहे. सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी साहेब उच्चांक गाठत आहेत तर दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त निवडणुका हरण्यात राहुल गांधी उच्चांक गाठत आहे. कोणी कोणावर टिपणी करावी ह्याला मर्यादा राहिल्या पाहिजेत.
वैभव नाईक / विनायक राऊत गटबाजी -- निष्ठावान विरुद्ध ब्लॅकमेलर असा सध्या सुरू आहे. उपरकर आणि वैभव नाईक हे बंटी बबली आहेत. पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जायला वेळ नसेल नाईक निवेदन देत बसले होते. विनायक राऊत यांच्या पराभवात वैभव नाईक यांची भूमिका काय होती ते राऊत ना समजलं असेल . अजून कपडे फाडणं बाकी आहे.
वैभव नाईक यांनी उबाठा ही नाईक प्राइवेट लिमिटेड कंपनी केली आहे.
ऑन कार्यकर्ते धमकी --- कार्यकर्त्यांना धमकावून महायुती टिकेल का ?? उबाठा पक्षाला टार्गेट कराव.. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत मात्र आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही
ऑन उदय सामंत ( संख्याबळ ) --- ते एवढे ताकतीचे लोक असतील तर आम्ही काय गोटया खेळत आहोत का ?? एवढे मातब्बर असतील तर त्यांनी एकट लढाव..आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोण आलं तर सोडत नाही
byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग
feed on desk
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 26, 2025 14:17:49Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोट बुडाली ...... पाच खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा ...... उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू ....... 5 खलाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ......... मासेमारीवरील बंदी उठण्यापूर्वीच बोटी समुद्रात .........
अँकर - अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे. आज सकाळी 7 वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारी साठी निघाली. सकाळी आठ वाजता खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून ते दिघोडी किनाऱ्यावर लागले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात आणले. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 26, 2025 14:16:02Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात आज सकाळ पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून यामुळे सखल भागात पाणी साचलय, अनेक दिवसापासून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज झालेल्या या पावसामुळे पिकांना पोटभर पाणी मिळणार असून जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पिंगळी लिमला रोडवरील ओढ्याला पूर आल्याने नागरिकांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास सुरु आहे. पुलाच्या पलीकडे महामंडळची बस सुद्धा अडकून पडलीय. तर सेलू तालुक्यातील वालूर मोरेगाव मार्गावरील साळेगाव परिसरातील खडकी आणि हातनूर येथील भट्टी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग दोन तासापासून वाहतुकीसाठी बंद पडलाय...
बाईट- नागरिक
5
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 26, 2025 14:15:20Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग ..
महिला पुरात वाहून जाताना युवकांनी वाचविले ..
लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथील घटना ..
शेतातून घरी परतत असताना घडली घटना ..
पावसामुळे सावरगाव तेली नदीला आला पूर ..
यशोदा चव्हाण महिलेचे नाव .
3
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 26, 2025 14:01:53Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_TALAV_BREAKK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शिरपूर गावात शिरले तलावाच्या सांडव्याचे पाणी, चिमूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव झाला ओव्हर फ्लो
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचे पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे शिरपूर गावाजवळ असलेला तलाव ओव्हर फ्लो झाला. तलावाच्या सांडव्याचे पाणी गावात शिरल्याने घरांना फटका बसलाय.सध्या महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रभावित गावकऱ्यांना आणि त्यांचं सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 13:32:16Dhule, Maharashtra:
ANCHOR - मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याच्या शिरपूर नजीक असलेल्या पळासनेर जवळ ट्रॉला आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. स्पीड ब्रेकर जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मोठा ट्रॉला थेट सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातांनंतर सर्वत्र पळापळ झाली. अपघाताच्या आवाजाने कणखल्या बसल्या होत्या. मालवाहतूक वहाणामाचा हा अपघात झालायने मोठी जीवित हानी टाळली. यां मार्गांवर अनेक सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
9
Report
AKAMAR KANE
FollowJul 26, 2025 13:16:41kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
--=----
नागपूर
साउंड बाईट - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
नागपुरात 300 स्टेडियम खेळासाठी उभारायचे माझी खूप इच्छा आहे...पण मागील चार वर्षांच्य जीवनातील अनुभवातून एवढं लक्षात आलंय की, सरकार म्हणजे निक्कमी यंत्रणा आहे... (सरकार बहुत निकम्मी चीज होती है)... अशा शब्दात गडकरी यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली...एनआयटी, महापालिका, किंवा इतर शासकीय यंत्रणांवर कामाचा पद्धतीवर बोलताना यांच्याकडे चालती गाडी पंचर करायचा अनुभव आहे...असा खरमरीत टोला गडकरींनी प्रशासकीय यंत्रणेचा कामावर लगावला...
- सुरेश भट सभागृहात आयोजित खेळावर आधारित करिअर या विषयावर व्याख्यानावर नितीन गडकरी बोलत होते...
14
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 26, 2025 13:16:25Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2607ZT_WSM_ADANA_DAM_GATES_OPENED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या सांतधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ प्रकल्प असलेल्या अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.सध्या धरण 64 टक्के भरलं असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 3 दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, यातून 29.91 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. आता तिसरा दरवाजा उघडण्यात आल्यानं अडाण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
10
Report
KJKunal Jamdade
FollowJul 26, 2025 12:46:47Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
Big Breaking
संत युवराज पुन्हा बरळले...
गुन्हा दाखल झाल्यानंतरही हिंदू सेनेचे संत युवराज वक्तव्यावर ठाम...
साई बाबांविषयीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा व्हिडिओ केला व्हायरल...
मी केवळ साई मूर्ती गटारात फेकण्याचे विधाना मागे घेतोय..
ज्यांना पूजा करायची त्यांनी घरात आणि शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन करावी...
सनातन हिंदू मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवणारच...
ब्राम्हण सभा, बजरंग दल, शिवसेना, करणी सेना, सनातन धर्म सभा आपल्यासोबत असल्याचा दावा...
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 26, 2025 12:35:37Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R3_CRIME
शंभर रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार करत दहा हजार रुपयाला मुलाची विक्री ?
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील धक्कादायक घटना, सोलापुरातील दांपत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप
चिमुकल्या मुलाची आई , तिच्या मामी यांनी चाळीसगाव इथ आपल्या नातवाची विक्री केल्याचा आजीचा गंभीर आरोप , गुन्हे दाखल करण्याची मागणी
चिमुकल्या मुलाच्या आईच चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न , पहिल्या पतीचे निधन झाले असून दुसरे लग्न करायचे आहे त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेलं मूल दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख
चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडिल यांनी दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
सुनेने नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचाही आजीचा आरोप
सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रार आजीने यापूर्वीच धाराशिवच्या मुरूम पोलिसात दिली होती, त्यानंतर सुनेचा दुसरा लग्न आणि नातवाला विक्री केल्याचं समजल आजीने सांगितलं
सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केल , धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात चिमुकल्या मुलावर उपचार सुरू
दत्तक करार करत ज्यांना मुलाची विक्री केली त्या ठिकाणी मूल जुलाब आणि तापीने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती
मुलगा दत्तकप्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष, गुन्हा नोंद करण्याच्या सूचना
बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची शिशुग्रह चालक डॉक्टर दापके यांची माहिती
चिमुकल्या मुलावर धाराशिव येथे उपचार सुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये धाराशिवच्या सरकारी रुग्णालयासमोर शाब्दिक बाचाबाची
Byt: लता तळभंडारे , चिमुकल्याची आजी
Byt: सत्यभामा सौंदरमल, सामाजिक कार्यकर्त्या
Byt: डॉ. दिग्गज दापके, सह्याद्री अंकुर शिशुग्रह
- *लहान मुलाचा व्हिडीओ ब्लर करावा*
11
Report
PNPratap Naik1
FollowJul 26, 2025 12:18:13Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking
आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल कडून 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड क्लार्क आणि शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल.
हेड क्लार्क संतोष मारुती पानकर याला शाहूपुरी पोलिसांनी केली अटक. तर महिला पोलीस कर्मचारी धनश्री जगताप हिच्यावर गुन्हा दाखल
दोन पोलिसांवरच खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 26, 2025 12:16:19Parbhani, Maharashtra:
हिंगोली
अँकर - हिंगोली जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे ओढे नदी नाले खळखळून वाहत आहेत, या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने वाहतूक बंद पडलीय,
या रस्त्यावरून सायंकाळच्या सुमारास सेनगाव हिंगोली या शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक नागरिकांना गावाकडे जाता येत नाहीये. तर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांची बस अडकून पडलीय... सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ताटकळलेत. परिणामी काही गावांचा संपर्क तुटलाय...
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 12:06:26Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव येथे जलवाहिनी फुटल्याने महामार्गावर पाणीच पाणी
पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी
पैठण ते छत्रपती संभाजी नगरला जल पुरवठा करणारी जलवाहिनी,
ड्रेनेस लाईनचे काम ग्रामपंचायत कडून चालू होते.
त्या कामांमध्येच त्या पाईपलाईन आचानक फुटली ती पाईपलाईन फुटल्यामुळे चितेगाव मध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले
14
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 26, 2025 12:05:46Pandharpur, Maharashtra:
26072025
slug - PPR_MIL_ROLAR
feed on 2c
file 01
----
Anchor - पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मिल रोलर पूजन चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी या वर्षीच्या हंगामात १५ ते २० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती दिली. गत वर्षी 2 हजार 803 प्रति टन प्रमाणे ऊस बिले दिली आहे. यावेळी संचालक अधिकारी आणि सभासद उपस्थित होते
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 12:05:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn flood av
feed attached
मुसळधार पावसाने पुर्णा नदीला पुर, सावरगांवाचा संपर्क तुटला.
कन्नड तालुक्यातील सावरगांव परिसरात आज सकाळ पासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. पावसाने सावरगांव येथील पुर्णा नदिला पुर आल्याने दोन्ही कढील बाजूने गावांचा संपर्क तुटला आहे. तर सकाळ पासून जनजीवन विस्कळीत झाले आहा.
13
Report