Back
संजय राऊत: महाराष्ट्रात आंदोलन, फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला!
APAMOL PEDNEKAR
Aug 10, 2025 06:04:08
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
*ऑल इंडिया अलायन्स मोर्चा*
* उद्या देशभरात दोन महत्त्वाच्या आंदोलन महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्रत्येक जिल्हा दरात हे जे सरकार आहे फडणवीस मेंदे अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे राज्य लुटण्याचे स्वर यंत्र त्यांचे कलकित मंत्री आणि ड्राय प्रकरण विधिमंडळात अनेकदा आवाज उठवून सुद्धा देवेंद्र फडणवीस या सरकारचे दिल्लीचे बाप मोदी आणि शहा हे ऐकायला तयार नाही आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहे त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे पर्याय उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात या घोटाle सरकारचा आंदोलन आहे
* *स्वतः उद्धव ठाकरे दादरच्या आंदोलनात सहभागी असतील*
* दिल्लीमध्ये महत्त्वाचा आंदोलन ते इंडिया ब्लॉक करत आहे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर लॉन्ग मार्च निघणार आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने घोटाळे करत आहे घोटाळे बाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाने भाजपचा बाहेर काढला पुराव्यासह चुनाव आयोग राहुल गांधी यांना सांगत आहे तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वच्या लोकशाही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते जबाबदारीने बोलत आहेत आणि त्याच्यावरती संशोधन केला आहे
* राहुल गांधी यांनी जे पुरावे समोर ठेवले त्याचे शहानिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केले तर हे निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्याने डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा आहे अशा निवडणूक आयोगामध्ये उद्या लॉंग मार्च असणार आहे
*ऑन व्ही व्ही पॅड*
* हाच एक मोठा घोटाळा आहे वआम्ही मतदान झाला करतो त्याला ते केलं की नाही यासाठी व्हीव्हीपॅड ची घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग मला द्यावे व्ही व्ही पॅड सुद्धा दाखवणार नाही मग आमचे मग कोणाला गेला नाही आम्हाला अधिकार आहे माझे मत कोणाला गेला आहे पाहण्याचे अधिकार आहे
* निवडणूक आयोगामध्ये किंवा मत पत्रिके संदर्भात इतके घोटाळे आहेत मोदी शहा संपूर्ण निवडणूक पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात आणि हायजॅक करून तोडतात
* माननीय शरद पवार यांनी सुद्धा काल महत्त्वाचा विषय मांडला निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटली 160 जागी विजय प्राप्त करून देतील विशिष्ट रक्कम ही त्यांच्याकडे मागणी केली यापैकी काही लोक माननीय उद्धव ठाकरे यांना देखील भेटले आहेत आम्हाला भेटले आहेत ते लोकसभेला आणि विधानसभेला देखील भेटले होते आम्ही त्यांना सांगतो आम्हाला लोकशाहीवर विश्वास आहे
* देशातल्या वातावरण पाहता लोकसभा आम्ही लोकसभा जिंकतो आणि खरोखर आम्ही महाराष्ट्रात यश प्राप्त केलं त्याच्यामुळे घोटाळे करून आम्हाला निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हा ते विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालं विधानसभेत नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा अडचण येतात ते सांगा ते आम्ही तुम्हाला विजय करून देऊ ईव्हीएम च्या माध्यमातून आम्ही म्हटलं तसे आम्हाला आवश्यकता वाटली नाही
* तुम्हाला आवश्यकता नसले तरी समोर हे सरकार मध्ये आहे त्यांनी अशा प्रकारचे योजना ईव्हीएम च्या माध्यमातून आणि जे काम केलं आहे ते अपयश आम्हाला दिसत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करू तरी आमचा विश्वास नेमणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग वर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवाने जे शरद पवार साहेब म्हणत आहेत उद्धव ठाकरे साहेबांना माणसं भेटले त्यांच्या बोलण्यात तथ्य असावा आता हे दिसत आहे राहुल गांधी यांनी जे पुरावे समोर दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे ईव्हीएम मध्ये घोटाळे करून विजय होण्याची शक्यता काही लोक करतात त्यात आता व्ही व्ही पॅड ची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसते
* आम्ही आतापासून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो मुंबई महानगरपालिका परंपरेने शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहे त्या राहू नये यासाठी भारताचा निवडणूक आयुक्ता प्रयत्न करत आहे भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग सुद्धा मराठी माणसाच्या हातात ही मुंबई राहू नये यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा भाग म्हणून व्हीव्हीपॅटची योजना ही रद्द करतो एक दर्दी देऊ नका व्हाव्यात असं काही त्यांच्या लक्षण दिसत आहे का या संदर्भात आम्ही चर्चा करू
*अन अमित शहा खासदार डोळे*
* आमच्या खासदांवरती डोळे असले तरी दे डोळे यशस्वी होणार नाही
*ऑन कबूतर खाना*
* जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो त्याच्या हातात चाकू आणि शस्त्र असले आणि ते जर अशा प्रकारे हिचक आणि आक्रमक होतात तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत याचं कारण या समाजाला अहिंसक बनवण्याचा काम भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी अमित शहा करत आहे त्याच्यामुळे हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसत आहे
*ऑन सामना अग्रलेख*
* देशाचे उपराष्ट्रपती माझे अजूनही उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीश धनकड 21 जुलै पासून बेपत्ता आहेत या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती राज्यसभेचे चेअरमन आहेत 21 जुलैला सकाळी राज्यसभेत आमच्यासमोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले त्यानंतर सभागृह स्थगित झाला त्याची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हास्यविनोद केले असतील त्यांनी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर वृत्त वाहिनी यावर बातमी झळकली जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्यापासून आजपर्यंत जगदीश धनकड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळा ते आहेत ना त्यांना कुठे गायब केला आहे का या शंका आमच्या मनात येत आहेत देशाचे उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाले असतील आणि त्याचा ठाव ठिकाण कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याचे काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे उद्धवजींना भेटले तेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा आमचा असा ठरत आहे आम्ही पिटीशन करू शकतो
*एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौरा*
* ठीक आहे पर्यटनाला जातात येथे महाराष्ट्रात काहीही काम नाही महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी हे मान्य करत नाही त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असले तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे
* कदाचित जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा जम्मू-काश्मीर पाहून येतो ते पाहायला गेले असतील महाराष्ट्रात काही काम नाही जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल
* काल शरद पवार साहेबांनी काल उत्तर दिला आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 10, 2025 12:05:29Bhandara, Maharashtra:
भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात...भर चौकात चाकूने वार करून केली हत्या...जुन्या वैमनस्यातून झाला कांड
Anchor ;- भंडारा शहरात शनिवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली.रात्री उशिरा दुकानात बसलेल्या एका तरुणावर काहीजणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावर देखील आरोपींनी सपासप वार केले.हा हल्ला इतका भयंकर होता की,हल्लात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
Vo ;- जुन्या वैमनस्यातून दोघांचा खून केल्या गेल्याची घटना शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान भंडारा येथील गजबजलेल्या मिस्कीन टैंक परिसरात घडली.या घटनेत टिंकू उर्फ वसीम खान (35) आणि शशांक गजभिये (22) या दोघांचा कुऱ्हाड आणि चाकूचे घाव घालून खून करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांनी रात्रीच फैजान शाकीर शेख (24) , साहिल शाकीर शेख (22), आयुष मुन्ना दहिवले (19, तिघेही रा. भंडारा) व प्रीतम विलास मेश्राम (33, रा. शहापूर )या चार आरोपींना अटक केली आहे.मृतक हे फिर्यादी मोहम्मद यासीन शेख ( 29,रा. अशरफी नगर, तकिया वार्ड, भंडारा) दुकानात बसले असता,लहान कुऱ्हाड व चाकु घेवुन टिंकू याचे मागे धावून गेले.मृतक टिंकूला जमीनवर पाडून कुऱ्हाड व चाकुने मारत असतानी जोर-जोरात शिवीगाळ करीत होते.साहील व फैजान शेख से दुश्मनी करोंगे तो जान से जाओगे.कुत्ते की तरह दौडा-दौडाकर मारेंगे असे जोरात बोलत आरोपीं साहीलने लहान कुऱ्हाडीने आणि फैजान व त्याच्या साथीदारांनी चाकुने टिंकूच्या शरीरावर वार केले.दरम्यान, टिंकू याला वाचविण्याकरीता शशांक गजभिये हा गेला असता तेव्हा चारही आरोपींनी शशांकलाही चाकु व कु-हाडीने मारुन खाली पाडले.विशेष म्हणजे, ळचारही आरोपींनी अत्यंत निर्दयपणे दोघांवरही घाव घातले.ते निपचित पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळपर्यंत ते दोघेही तसेच पडून होते. काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रुग्णालयात पाठविले.दरम्यान वसीम खान व शशांक गजभिये यांचे मरणास कारणीभुत झाले असल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अधिकारी यांचे अभिप्रायवरुन चारही आरोपींविरुध्द विविध कलमांव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Byte ;- निलेश मोरे , अप्पर पोलिस अधीक्षक
1
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 10, 2025 12:02:36Dhule, Maharashtra:
Anchor शिरपूर शहरात रस्त्या लगत असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.झाडांमुळे बिल्डींग झाकले जात असल्याने सावली देणाऱ्या उभ्या झाडांची कत्तल करण्यात आली असून हे कृत्य करणाऱ्या विरोधात कडक शासन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रीन आर्मी च्या वतीने करण्यात आली आहे.शिरपूर शहरात ग्रिन आर्मी या सामाजिक संघटनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात येते.त्यांची निगा राखण्यात येत असते.काल शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावरील मेन रोडवर असलेल्या सावली देणारे १८ ते २० फुटांच्या तीन झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र सिमेंट रस्ते आहेत दिवसेंदिवस शिरपूर शहरात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे.रस्त्यावरुन उन्हात पायीपीट करणाऱ्यांसाठी हे झाड सावली देण्याचे काम करतात.यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणे अपेक्षित असल्याने ग्रीन आर्मी या सामाजिक संघटनेकडून शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत.मात्र यातील तीन झाडांची काही एक कारण नसतांना कत्तल करण्यात आल्याने ग्रीन आर्मी संघटनेस शिरपूर संतप्त झाले आहेत.
Byte धिरज माळी ,ग्रीन आर्मी संघटना
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 10, 2025 11:50:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले, आंबेडकर व साठेंचे विचार केवळ मतांच्यासाठी - डॉ. महेशकुमार कांबळे.
अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर व साठे यांचे विचार केवळ मतांच्यासाठी असल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केलाय.आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव आहे.पण तरी देखील गेल्या 40 वर्षात जयंत पाटलांनी आमदार मंत्री असून देखील अण्णाभाऊ साठेंचा स्मारक करू शकले नाहीत,कारण जयंत पाटलांचे राजकारण हे स्वार्थाचे आहे,त्यामुळेच आत्तापर्यंत जॉईंट पाटलांनी अण्णाभाऊ साठेंचे स्मारक केलं नाही असा आरोप देखील महेश कांबळेंकडून करण्यात आला आहे.इस्लामपूर मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करावं यासाठी एक ऑगस्टपासून मातंग समाज व सह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं,त्यानंतर जयंत पाटलांनी आंदोलनाची दखल घेत,अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे, यावरून महेश कांबळे यांनी जयंत पाटलांच्यावर टीका केली आहे.
बाईट - डॉ.महेशकुमार कांबळे - नेते, आंबेडकर चळवळ ,सांगली.
4
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 10, 2025 11:50:00Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_PoliceCar
Feed on - 2C
----------------------------------
Anchor - संशयित कारचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी पलटून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमध्ये ही घटना घडली. बारड येथील महामार्ग पोलीस चौकी समोर वाहनांची तपासणी सुरु असताना एका इंडिका विस्टा कारमधून लाल रंगाचे पाणी निघत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार भरधाव वेगात निघून गेली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. संशयित गाडी गावाकडील छोट्या रस्त्याकडे वळाली. गाडीचा पाठलाग करत असताना पोलिसांचे टाटा सुमो वाहन उलटले. गाडीतील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान संशयित गाडीला तोरणतांडा येथील ग्राणास्थानी पकडले. गाडीचालक आणि अन्य एकाला पकडण्यात आले. या गाडीमध्ये गोमांस आढळले.
-----------------------------
2
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 10, 2025 11:49:50Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_HAKE_PAWAR
साताऱ्यातील फलटण येथील जावली येथील एका कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवारांची ओळख दगाबाज नेता म्हणून असल्याचे सांगितलं
*बाईट: लक्ष्मण हाके पॉईंटर*
निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत
ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचा आंदोलन उभं करणारे अशी त्यांची ओळख आणि तेच ओबीसींच्या बाजूने मंडळ यात्रा सुरू करत आहेत
जरांगे पाटील यांनी लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसींचे पंचायत राज मधील आरक्षण असो किंवा शिक्षण आरक्षण उध्वस्त केले आहे.
शरद पवारांचा ही मंडळ यात्रा काढून नेमका काय उद्देश आहे.
मंडल आयोगाच्या 38 योजनांपैकी दोन योजना भारतीय व्यवस्थेत लागू झाले आहेत.
शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणाला किंमत दिली नाही.
ज्याप्रमाणे इच्छाधारी नागा प्रमाणे शरद पवार वेटोळे घालून बसले आहेत.
जरांगेंचं आंदोलन उभे राहतंय तर ओबीसी मध्ये फुट कशी पाडायची ही फोडा आणि जोडा ही राजनीती शरद पवार यांची आहे.
शरद पवार ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागतात..
महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं. तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतले
शरद पवार हे दगेबाज नेते आहेत
ओबीसी बांधवांना आवाहन करतो की अशा दगाबाज नेत्यांना खड्यासारखे बाजूला करा.
*ओबीसी आणि मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस वाद तयार करत आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर लक्ष्मण हाके यांचे उत्तर*
मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काहीही बोलतात. फडणवीसांचा अपमान म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान... त्यामुळे त्यांनी त्यांच्या पात्रतेनुसार आणि कुवतेनुसार बोलावे.
लाखो कुणबी सर्किट मुळे ओबीसी आरक्षण उध्वस्त होणार असेल तर तुम्ही या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभे रहा.
यापुढे पंचायतराजच्या निवडणुकीमध्ये गावोगावी बोगस कुणब्याची सर्टिफिकेट 25 हजारापासून पाच लाखापर्यंत ही सर्टिफिकेट जरांगेंच्या पिलावळीने काढलीत आणि ओबीसी आरक्षण संपवल आहे. मराठा बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये निवडणुकीमध्ये गावच्या सरपंच की मध्ये फडणवीस टिकतील का
याविषयी फडणवीस यांनी ठाम भूमिका घ्यावी लागेल. जरांगेंच्या भूमिकेला बळी पडला तर ओबीसी या पुढील काळात मोठं जन आंदोलन उभारेल
29 ऑगस्टला मुंबईला येण्यासाठी मराठ्यांना जरांगे यांनी आवाहन केलं तरी ओबीसी ची एक संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत... भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी एक आहेत 27% आणि एसबीसी चे दोन टक्के असे मिळून 29 टक्के आरक्षण ओबीसींचे आहेत. याचा आम्ही प्रसार करणार आहोत
5
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 10, 2025 11:49:11Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीत भाजपाचा काँग्रेससह विशाल पाटलांना धक्का..माजी महापौर सह विशाल पाटलांचे कट्टर समर्थकांचा उद्या भाजप प्रवेश..
अँकर - सांगलीमध्ये भाजपाने खासदार विशाल पाटलांसह काँग्रेसला पुन्हा खिंडार पाडले आहे.खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक नगरसेवक मनोज सरगरसह काँग्रेसच्या माजी महापौर आणि नगरसेविकेचा भाजपा प्रवेश उद्या सांगली मध्ये होणार आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.यामध्ये माजी महापौर कांचन कांबळे,नगरसेविका शुभांगी साळुंखे, नगरसेवक मनोज सरगर आणि काही काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.
मनोज सरगर हे खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे,तर कांचन कांबळे या मदन भाऊ गट समर्थक आहेत.त्यांचा हा पक्ष प्रवेश आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पखासदार विशाल पाटील आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
बाईट - मनोज सरगर - नगरसेवक, विशाल पाटील समर्थक-सांगली.
6
Report
KJKunal Jamdade
FollowAug 10, 2025 11:45:41Shirdi, Maharashtra:
Anc - आम्हाला पोरा बाळांवर बोलायला लावू नका.. पोरा बाळांना सांगा काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा.. असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना लगावला होता.त्या वक्तव्याला सुजय विखे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं."जर पोरांबाळांवर बोलायचं नव्हतं , तर विधानसभेत माझ्यावर का बोललात..? अमोल खताळला खबरी का म्हणालात..? सुजय विखेंना काट्यात लपला का म्हणालात..? तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो , पण पराभवानंतरच पोरंबाळ झालो का..? आणि लक्षात ठेवा , एका पोराबाळानेच तुमचा पराभव केलाय असे उत्तर देत बाळासाहेब थोरात यांना चांगलचं सुनावले...
बाळासाहेब थोरात ऑन सुजय विखे
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो सुजय विखेंवर काय बोलायचं.....?
आम्हाला पोरा बाळांवर चर्चा करायला नका लावू....
*पोरा बाळांना सांगायचंय काळ खूप मोठा आहे ,काळजीपूर्वक जा.......*
काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांचा सुजय विखेंना सल्ला...
सुजय विखे बाईट ऑन बाळासाहेब थोरात पोरंबाळ टीका
ते मोठे नेते ते सल्ला देण्यासाठीच आहे..
जी भूमिका ते आज घेताय तीच भूमिका त्यांनी विधानसभेवेळी घेतली पाहिजे होती...
जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले..?
का..तुम्ही अमोल खताळ ला खबरी म्हणाले...?
सुजय विखेला आम्ही पळवून लावलं काट्यात लपला..का म्हणाले..?
तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो...
तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरंबाळ झालो...
माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो...
आम्हाला पोरंबाळ म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरंबाळानेच तुमचा पराभव केला...
मुलांमध्ये युवाशक्ती प्रचंड , सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो...
हे त्यांना आजही पचत नाही...
काळ प्रदीर्घ आहे , हे मान्य करायला आम्ही तयार...
आमचे मागील ४० वर्ष संघर्षात गेले , पुढचे ४० वर्ष आम्ही संघर्ष करत राहणार...
जी परिस्थिती येईल ती हाताळायला आम्ही समर्थ आहोत...
सुजय विखेंचे बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मुलांबाळांच्या वक्तव्यावर जोरदार उत्तर...
bite - सुजय विखे माजी खासदार
3
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 10, 2025 11:02:58Ambernath, Maharashtra:
शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी
मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत केली घोषणाबाजी
आता तुम्ही निवडून येऊनच दाखवा!
मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांचा इशारा
Anchor : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. हे नगरसेवक नोटांसाठी गेल्याचा आरोप।करत मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत घोषणाबाजी केली.
Vo : मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर।हे चार।माजी नगरसेवक शनिवारी मनसेला रामराम करत शिवसेनेत गेले. यानंतर रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या सर्वांचा निषेध केला. या सर्वांच्या ऑफिसबाहेर जाऊन घोषणाबाजी करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटा दाखवून घोषणाबाजी केली. यानंतर हे चौघेही पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतात ते आम्ही बघू, असं म्हणत कुणालाही प्रचाराला आणलं तरी तुम्हाला पाडणारच, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, माजी नगरसेवक दत्ता केंगरे, प्रशांत नलावडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Byte : शैलेश शिर्के, उपजिल्हाध्यक्ष, मनसे
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
12
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 10, 2025 11:02:41Pandharpur, Maharashtra:
10082025
slug - PPR_MODNIMB_BUS
file 04
----
Anchor - माढा तालुक्यातील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब बस स्थानकात राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते बारामती बस पावसामुळे झालेल्या चिखलात अडकली .मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून जेसीबी मदतीने काढली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे यांनी राज्य परिवहन महामंडळाने तातडीने बस स्थानकाची आणि परिसराची दुरुस्ती करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला
12
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 10, 2025 11:00:19Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी
शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी समर्थ वासुदेव भैरी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर
आरोपी समर्थ भैरी देखील शरणू हांडे याचे अपहरण करण्यासाठी गाडीत होता असा आरोप
दरम्यान या अपहरण प्रकरणातील सर्व 7 आरोपी 12 ऑगस्ट पर्यंत राहणार पोलीस कोठडीत
12
Report
KJKunal Jamdade
FollowAug 10, 2025 10:45:47Shirdi, Maharashtra:
Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहूल असणाऱ्या अकोले तालुक्यात काल आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दोन वेगवेगळ्या आदिवासी दिन साजरे केले... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली नंतर बाजारतळ या ठिकाणी जाहिर सभा पार पडली.. मात्र याचवेळी सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची रॅली देखील त्या परिसरातून जात होती... एकीकडे शिंदे यांचे भाषण सुरू असताना डीजेचा आवाज देखील येत होता.. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी भाषणात याचा उल्लेख देखील केला...तो आपलाच भाऊ आहे ना असा उल्लेख देखील केला...सभा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परतीचा मार्ग तोच असल्याने पोलिसांनी रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच दरम्यान आदिवासी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली अस ट्विट रोहित पवार यांनी केलय..मात्र लाठीचार झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्पष्ट केलय.
रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आदिवासींना लोटलं.. मला सांगितलं असत तर रस्ता मोकळा करून दिला असता.. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रतिक्रिया दिलीये...या झटापटीचा मी निषेध व्यक्त करतो मला सांगितलं असतं तर रस्ता मोकळा करून दिला असता असं वक्तव्य लहामटे यांनी केलय...
बाईट - डॉ. किरण लहामटे, विद्यमान आमदार, अकोले विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी, अजित पवार गट...
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 10:45:22Beed, Maharashtra:
बीड: वैद्यनाथ बँकेची निवडणूक; आमदार धनंजय मुंडेनी केले मतदान
Anc- वैद्यनाथ बँकेच्या 13 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया सध्यांतरी उस्फूर्तपणे पार पडत आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. थोड्याच वेळापूर्वी पंकजा मुंडेंनी देखील मतदान केले होते. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 10, 2025 10:32:02Akola, Maharashtra:
Anchor : नागपूर–पुणे वंदेभारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेगवान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला..विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे, विशेषतः विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय होणार आहे..देशात सर्वात लांब पल्ल्याची ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी आहेय , मात्र आज ठिकठिकाणी गाडीचे स्वागत असल्याने पहिल्याच दिवशी ही रेल्वे सुमारे एक तास उशिराने धावत आहे..अकोल्यात भाजपाचे खासदार अनुप धोत्रे , तसेच भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने वंदेभारत एक्सप्रेसचे अकोला रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 10, 2025 10:01:49Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1008ZT_CHP_CANAL_BREAK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातला चंदई कालवा फुटला, आधीच पाऊस काळ कमी असताना कालवा फुटल्याने लाखो लिटर शेत पिकांसाठीचे पाणी गेले वाया, या काळव्यामुळे सुमारे 6000 एकर परिसरात सिंचनाची होते सोय, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान
अँकर:---- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून चंदई कालवा आहे. रात्री हा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. निमढेला तलावाचे पाणी चंदई कालव्याद्वारे 20 किलोमीटर पुढे जाते. तब्बल 6000 एकर भागातील शेती ओलीता खाली येते. या तलावाचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले असून शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार चंदई कालव्याची दुरवस्था अवगत केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री अर्जुनी- झरी गावाजवळ वीस फूट लांब कालवा फुटला. या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकावर संकट ओढवले आहे. त्यातच कालवा फुटल्याने धान पिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 09:49:16Beed, Maharashtra:
बीड: बीड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
Anc- गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र दुपारी पुन्हा संतदाधर पावसाने मुसंडी मारली आहे. बीड शहरात अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज रविवार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा सुट्टीचा बेत असतो अशात पावसाने हजेरी लावल्याने बच्चे कंपनीच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.
14
Report