Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
राजू शेट्टीने आंदोलनावर दिली खरी माहिती, सरकारची झोप उघडा!
PNPratap Naik1
Sept 02, 2025 09:36:54
Kolhapur, Maharashtra
*राजू शेट्टी बाईट मुद्दे* *राजू शेट्टी ऑन आंदोलन* 3 महिन्या पूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला होता, मात्र सरकार झोपा काढत राहिले, त्यांनी काहीच केले नाही दोष जरांगेना देण्याऐवजी सरकारला दिला पाहिजे मुंबईत आलेले मराठे हे वेढे नाही, त्यांना आरक्षणाची गरज आहे या आंदोलनांचे कौतुक केले पाहिजे मात्र त्यांची हेटाळणी होत आहे अजूनही वेळ गेलेली नाही, आंदोलकांसोबत चर्चा करावी सरकार ने सर्वांची बाजू समजून परिस्थिती हाताळली पाहिजे *राजू शेट्टी स्वाभिमानी दूध रोखणार* जेवढा वेळ जाईल तेवढ्या प्रतिक्रिया उमटणार मुंबईकरांही आंदोलना संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली नाही फक्त प्रशासन अडथळे आणले आहेत आंदोलकांनी जर काही खेळ खेळलेले तर ती हुल्लड बाजी होत नाही, त्यांनी कोणाला त्रास दिला का, महिलाना त्रास दिला का? आमच्या चळवळीला बदनाम करू नका *या आंदोलन बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक आहे, त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे* आम्हाला सुद्धा या घुसखोरांचा त्रास झाला, आज ही मी कोर्टात खेटे घालत आहे *राजू शेट्टी ऑन महादेवी हत्तीण* सरकारी वकील सुप्रिया कोर्टा समोर जात आहेत, मात्र सुप्रीम कोर्ट दाद देत नाही सुनावणीला घ्यायला तयार नाही, अजून तारीख दिली नाही नुसता टाइम पास सुरू आहे शासना मार्फत आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतो असे म्हणाले राज्य सरकारचे म्हणणे आहे की कायमचा हत्ती आणावा चातुरमास या धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती आणावा अशी आमची भावना आहे आता केवळ टाईमपास सुरू आहे, आमची फसवणूक नको *ज्यांनी खोटा बनाव करून हा हत्ती वनतारा कडे नेला त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार* *राजू शेट्टी ऑन इथेनॉल धोरण* सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने काल एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे या देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण आहे ते धोरण चुकीच नाही, त्याला स्थगिती देता येणार नाही असा महत्त्वाचा निर्णय दिलाय त्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करत आहे हे 20 टक्के इथेनॉल मिक्स केलं जातंय हे प्रामुख्याने देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसापासून तयार झालेले सी हेवी मोलीसेस असेल बी हेवी मोलीसेस असेल उसाच्या रसापासून तयार झालेलं इथेनॉल असेल यातूनच इथेनॉल उत्पादित होतं याबद्दलच अतिरिक्त झालेलं जे धान्य आहे, टाकाऊ जे धान्य तुम्हाला आहे आहे त्याच्यापासून तयार झालेलं हे इथेनॉल आहे *हे साधारण वर्षाला 1685 कोटी लिटर तयार होतं यामुळे एक लाख 44 हजार रुपयांचा परकीय चलन क्रूड ऑइल च्या आयातीमध्ये होणार* परंतु *क्रूड ऑइल आयात करण्यामध्ये ज्यांना रस आहे त्यांना टक्केवारी मिळते असेल, हे दलाल काही व्यापारी यांनी या काही लोकांना पुढे करून याला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी केली होती* त्यांचं म्हणणं होतं की गाड्या नादुरुस्त होतात, एवरेज कमी येत त्यामुळे यांना स्थगिती द्यावी , वास्तविक पाहता या संदर्भात सखोल असा अभ्यास केलेला आहे अतिरिक्त साखरेचे काय करायचं हा प्रश्न निर्माण होता बी हेवी च्या माध्यमातून किंवा उसाच्या रसाच्या माध्यमातून साखरेचे उत्पादन कमी करून ते इथनॉलमध्ये उत्पादन केलं तर साखरेचा भाव नियंत्रित राहतात साखर अतिरिक्त होत नाही ऊस उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळतं त्यामुळे आम्ही इथेनॉलचा समर्थन करत आहे कॅनडा, ब्राझील या देशांनी फार पूर्वीपासूनच इथेनॉलचा वापर सुरू केलेला आहे आपला देश आता इथेनॉल धोरण राबवत आहे पर्यावरण पूरक जर इथेनॉल असेल तर त्याला विरोध करू नये क्रूड ऑइल मध्ये कमिशन मिळतं म्हणून एकाच चांगल्या योजनेला कुणी अडसर आणू नये
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 04, 2025 15:01:49
Nashik, Maharashtra:
Nsk_halganesh Feed by mojo Anchor देशाची हवाई सुरक्षा सांभाळणाऱ्या तसेच मी सुख होईल यांचं देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने सुद्धा गणेशोत्सवात भाग घेतला आहे नाशिक शहरात भालेकर मैदानावर त्यांनी पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रतिनिधिक नाट्य सादर केल आहे. हे करताना हवाई दलाने कशा पद्धतीने याचा सामना केला हे दाखवत सिंदूर मोहिमेची प्रात्यक्षिकच सादर करण्याचा प्रयत्न यामधून केला आहे. थेट मिग विमान आणून लोकांना लष्करी ताकद दाखवत देश लष्करी सामर्थ्यामध्ये बळकट होत असल्याचे प्रचिती यामध्ये येतेदाखवण्याचा प्रयत्न केला आहे . संपूर्ण नाशिक मध्ये त्यामुळे हा देखावा देशभक्ती शी संबंधित असल्याने लोकांचा आकर्षण ठरला आहे.
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 04, 2025 15:01:44
Nashik, Maharashtra:
Nsk_mumbainakaganesh Feed by mojo Anchor नाशिक शहरात मुंबई नाका या सर्कलवर युवक गणेशोत्सव मंडळाने जयपुर मंदिराचा देखावा साकारला आहे. जयपुर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे मंदिर किल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तशीच वास्तू महिनाभर काम करून उभारण्याचं कलाकुसर आपल्याला इथे पाहायला मिळते. यामध्ये गणेशाची मूर्तीही आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे. एकूणच इथे करण्यात आलेली दिव्यांची रोषणाई सर्वच नाशिककरांची येताना जाताना लक्ष वेधून घेत आहे. गेल्या चौपन वर्षापासून प्रत्येक वर्षी वेगवेगळी सजावट या ठिकाणी केली जाते इतकच नाही तर वर्षभर विविध सामाजिक कार्यामांद्वारे युवक मित्र मंडळ सातत्याने कार्यरत असतं.
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 04, 2025 14:18:37
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :---  0409ZT_CHP_POLICE_MARCH ( single file sent on 2C)  टायटल:-- ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीसांचा रूट मार्च, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी दोन्ही मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त असेल तैनात, चंद्रपूरकरांनी सण- सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन     अँकर:--ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीसांनी आज रूट मार्च काढला. शहराच्या मुख्य मार्गांवरून फिरून हा मार्च दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखाली असलेल्या इरई नदीच्या काठावरील गणेश विसर्जन स्थळी पोचला. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी दोन्ही मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. यात 1 अपर पोलीस अधिक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी , 40 पोलीस अधिकारी, 800 कर्मचारी आणि 250 गृहरक्षक दलाचे जवान यांचा समावेश आहे. एकूण 1200 हुन अधिक पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसह यंत्रणा सज्ज राहणार आहे. चंद्रपूरकरांनी सण- सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे. बाईट १) मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक,।चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 04, 2025 14:01:05
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_RAJY_UTSAV_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी, सांस्कृतिक सभागृहात गणेशोत्सव राज्योत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणेशोत्सव थीम आधारित भजन, गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची चंद्रपूरकरांना मेजवानी      अँकर:--चंद्रपुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात गणेशोत्सव राज्योत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा राज्योत्सव अधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठी गणेशोत्सव थीम आधारित भजन, गायन, नृत्य नाटिका आणि  विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळाली.  बाईट १) संजय पवार, उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर ------ सांस्कृतिक कार्यक्रमांची झलक----- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
comment0
Report
SKShubham Koli
Sept 04, 2025 13:35:58
Thane, Maharashtra:
*राष्ट्रवादी अजित पवार गट प्रवक्ते आनंद परांजपे बाईट पॉइंटर* *ऑन अजित दादा वायरल व्हिडिओ* - महिला यांना झापले चुकीची बातमी - ips अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित दादा कोण असे विचारत असेल तर चुकीचे - शेतकऱ्यांची बाजू ऐकणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य - शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत थांबवावे अशी मागणी होती - गावातील शेतकरी तहसीलदाऱ्याच्या कारवाई विरुद्ध एकवटले होते - शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत कारवाई थांबवावी असे निर्देश दिले होते - कार्यकर्ता चुकला असेल तर त्यावर कारवाई करा असा त्यांचा स्वच्छ स्वभाव आहे *ऑन obc आंदोलन* - मुख्यमंत्री फडणविसांनी स्पष्ट केले आहे भुजबळ यांची नाराजी दूर करू - मंत्रिमंडळात त्वरित obc समाजासाठी उपसमिती नेमण्यात आली - उपसमितीत बावनकुळे,गणेश नाईक पंकजा मुंढे दत्त भरणे , छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, असे नेते आहेत - मराठा विरुद्ध obc असा संघर्ष महायुती सरकार होऊ देणार नाही *ऑन संजय राऊत* - छगन भुजबळ obc समजाबद्दल आवाज उठवत असतात - अजित पवार यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रिपद दिले - भांडुप च्या भोंग्याने स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे *ऑन मिलिंद देवरा पत्र* - एकनाथ शिंदे त्या पत्रवाबद्दल सहमत असतील असं वाटत नाही - गुहखात्याच्या मार्फत शांतपणे संयमाने नीटपणे हाताळले आहे - मुंबई महाराष्ट्रची राजधानी आहे, प्रतेकाला आंदोलन करण्याचा अधिकारी *ऑन ओबीसी आरक्षण* - कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले - जीआर चा अभ्यास करू वकिलांमाफत समजाऊन घेऊ *ऑन जीएसटी* - देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे - शाळेतील पेंसिल वह्या कंपास यावर झिरो gst केला आहे करावे तेवढे कौतुक कमी आहे *ऑन शेती जीएसटी* - शेतीच्या भरपूर साहित्यावरील जीएसटी कमी केला आहे - मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार, आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होणार *ऑन पक्षप्रवेश* - आव्हाड उत्तर देतील - गेलेल्या माणसांना बोलून त्यांना जास्त महत्व देणार नाही - जे पक्ष सोडून गेले आहेत त्यावर ठाण्यातील कलाकार, नकलाकार भूमिका मांडतील (आव्हाडांना टोला)
14
comment0
Report
SKShubham Koli
Sept 04, 2025 13:18:19
Thane, Maharashtra:
*ठाणे फ्लॅश* *तोल गेल्याने रेल्वे मधून युवक थेट विटावा खाडीत पडला* मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेनी प्रवास करत होता... मात्र ठाण्यातील विटावा खाडी जवळ ट्रेन येताच त्याचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला... युवक कळव्यातील, गोलाई नगर येथे राहणार आहे 19 वर्षाचा हा तरुण मुलुंड वरून कळव्याच्या दिशेने ट्रेननी प्रवास करत होता... घटनेची माहिती मिळताच तरुण युवकाचा शोध अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार 2 बोटीच्या सहाय्याने शोध घेत आहे...
14
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 04, 2025 13:18:10
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींच पलायन  चार मुलीना पोलिसांनी घेतले ताब्यात   सुधारगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह Anchor उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे .यापैकी चार मुलीना  पोलिसांनी ताब्यात घेतले   असून, दोन मुलींचा शोध  सुरु आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही या सुधारगृहातून आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले होते. त्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात, “आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो” असे सांगितले. मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयीही उघड झाल्या आहेत.  उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी माहिती देताना सांगितले की, दुपारच्या वेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केले. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनांमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, प्रशासन आणि महिला बालविकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. Byte सचिन गोरे ,डीसीपी चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
14
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 04, 2025 12:49:05
Kolhapur, Maharashtra:
Story : Kop IG Press Feed :- Live U Anc : कोल्हापूर परिक्षेत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.. अनंत चतुर्थी दिवशी कोल्हापूर सांगली, सातारा ,सोलापूर आणि पुणे ग्रामीण पाचही विभागात जवळपास १४ हजार सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात ७०० वरिष्ठ अधिकारी आणि 9 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एस आर पी एफ आणि होमगार्डच्या तब्बल ५० तुकड्या परिक्षेत्रात बंदोबस्तासाठी असणार आहेत. इतकचं नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन च्या माध्यमातूनही नजर असेल अशी माहिती देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली आहे.. गणेश आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या परिक्षेत्रातील 800 हून अधिक मंडळांवर कारवाई केल्याची माहिती सुद्धा सुनील फुलारी यांनी दिली आहे.. Byte : सुनील फुलारी , विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
14
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 04, 2025 12:36:56
Ambernath, Maharashtra:
मोरीवली एमआयडीसीतून वायुप्रदूषण परिसरात पसरला रासायनिक धूर  Amb gas leak Anchor अंबरनाथच्या मोरीवली  एमआयडीसी परिसरात रासायनिक धूर पसरला असून या धुराला प्रचंड दुर्गंधी येते आहे , एमआयडीसी मधील कंपन्यांमधून जाणून बुजून अशा प्रकारे पावसाळी वातावरणाचा फायदा घेऊन हा रासायनिक वायू सोडला जातोय, कल्याण बदलापूर महामार्गवर या  रासायनिक वायू मुळे धुक्या सारखे वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे रस्यावर दृश्यमानता ही कमी झाली होती वारंवार या एमआयडीसीतील काही कंपन्यांमुळे येथील नागरिकांना वायू प्रदूषण त्रास सहन करावा लागत आहे सदर कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 04, 2025 12:20:39
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_OBC_GR_FIRE ( single file sent on 2C)  टायटल:-- राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्षांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, हैद्राबाद गॅझेट आधार मुद्द्यावर भडकले ओबीसी, चंद्रपुरात ओबीसी विरोधी नव्या शासन जीआर ची ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होळी, गांधी चौकात झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडी घटक पक्षातील नेते कार्यकर्ते झाले सहभागी अँकर:-- मराठा समाजाला ओबीसी घटकांच्या आरक्षणाचा लाभ देण्यास ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला आहे. राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारावर राज्यातील मराठा समाजाला नोंदी पाहून ओबीसी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी समाज भडकला आहे. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शहरातील गांधी चौकात नव्या जीआरची होळी केली. महाराष्ट्र शासनाने हा जीआर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. चंद्रपुरातच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे वास्तव्य आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास हंसराज अहिर यांना जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही असा इशारा ओबीसी कार्यकर्त्यांनी दिलाय. हंसराज अहिर यांनीच आता राज्य सरकारला हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बाईट १) प्रदीप देशमुख, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 04, 2025 12:06:44
Yavatmal, Maharashtra:
शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या रक्तचंदनाच्या झाडाचा ५ कोटी रुपये मोबदला मिळावा असा दावा करणाऱ्या यवतमाळच्या शेतकऱ्याला आता मध्य रेल्वेच्या दाव्या मुळे मिळालेले एक कोटी रुपये व्याजासह परत देण्याची वेळ आली आहे. कारण झाड रक्तचंदनाचे नसून ते बिजासाल चे झाड असल्याचा दावा रेल्वे ने न्यायालयात केला. पुसदच्या खर्षी येथील शेतकरी केशव शिंदे यांनी त्यांच्या शेतातील झाड रक्तचंदनाचे असून ते वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित होत असल्याने त्याचे ५ कोटी रुपये मोबदला मिळावा असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला होता, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे ने एक कोटी रुपये शेतकऱ्याला दिले. त्यातील ५० लाख रुपये काढण्याची परवानगी देखील दिली, तर उर्वरित ५० लाख मूल्यांकनानंतर देण्याचे आदेशात नमूद आहे. त्यानंतर आता या प्रकरणाला युटर्न मिळाला आहे, बंगळुरू येथील संस्थेकडून परीक्षणाचा अहवाल सादर करीत ते झाड रक्तचंदन नसून बिजासाल आहे. त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये आहे. 10,000 रुपये कापून आम्हाला उरलेले पैसे परत हवे आहेत. असा अर्ज रेल्वे ने केला आहे. या मूल्यांकनावर शेतकऱ्यानं शंका उपस्थित केली आहे. झाड बिजासालचं होतं तर मग अधिकाऱ्यांनी 2015 पासून आम्हाला का सांगितलं नाही? त्यांनी मोबदल्याच्या अवार्डमध्ये कागदपत्रांवर हे रक्तचंदन असल्याचं का म्हटलं? असे प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सुनावणी कडे लक्ष लागले आहे.
14
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 04, 2025 12:03:50
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: ऐरोलीत दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती, भाविकांची मोठी गर्दी. ganpati story ftp slug - nm ganpati story shots- byet- ganesh deshmukh reporter- swati naik navi mumbai Anchor -: ऐरोलीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. मंडळाचे यंदाचे दुसरे वर्षं असून यावर्षी देखील दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बसविण्यात आलेय. हुबेहूब दगडूशेठ गणपतीची मूर्ती बसविल्याने ज्यांना प्रत्यक्ष पुण्याला जाने शक्य नाही अश्या भक्तांना प्रतिदगडूशेठ गणपतीचे दर्शन यामाध्यमातून होत आहे. मंडळातर्फे प्रसाद म्हणून बीजमोदक देण्यात येत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतोय. यागणेशोत्सवा संदर्भात मंडळाचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी अधिक माहिती दिलेय. Byte -: गणेश देशमुख अध्यक्ष
14
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 04, 2025 11:50:16
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_OBCAgitation Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढला. यावेळी आंदोलकानी मुख्यमंत्री आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली या जी आर मुळे ओबीसी च्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली. जी आर रद्द न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. Byte - सकल ओबीसी आंदोलक Byte - सकल ओबीसी आंदोलक -------------
14
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 04, 2025 11:46:45
kolhapur, Maharashtra:
Ngp Sawe Visit live u ने फीड पाठवले ------- उपोषण मागे घेतले त्याविषयी संपूर्ण शॉटस आणि बबनराव तायवाडे यांचा 121 आणि परिणय फुके यांचा 121 ---------- नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात सुरू असलेले साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले. ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावेने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.तर दोन मागण्यांकडे कॅबिनेट स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोष ची आज सांगता करण्यात आली. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले तर आमदार परीणय फुके उपस्थित होते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी यांनी पाणी पीत साखळी उपोषण थांबत असल्याचे जाहीर केल ------ बाईट बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ 121 केलाय ------- बाईट आ परिणय फुके,(121 केलाय ) ------ खालील मागण्या होत्या 1. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. 3) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवुन 200 विद्यार्थी करण्यात यावी. 3) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक 28 आक्टो. 2021 च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे. 5) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणा-या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे. 6) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत्त बांधलेले 200 मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले 200 मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुलींचे वसतीगृह सुरू करण्यात यावे. 7) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाख व 15 लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बाबींचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, 500 सीबील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी. 9) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे. 8) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे. 9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा. 10) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरुयांना 100 टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरु करण्यात याव्यात. 11) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरीत सुरु करण्यात याव्यात. 12) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी. 13) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. (बैठक) 14) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास 100 टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. (बैठक)
14
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 04, 2025 11:35:45
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0409ZT_WSM_GANAPATI_COLLECTION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिमच्या कारंजा येथील गोपाल आणी नरेंद्र खाडे या बंधूंनी 'मोरया आम्हा तुझा छंद' या नावाने अनोखा छंद जोपासला आहे. त्यांनी दहा हजारांहून अधिक गणेशाची चित्रकात्रणे आणि शेकडो गणपती मूर्तींचा संग्रह केला आहे.एका लग्नपत्रिकेवरील सोनेरी गणपतीपासून सुरू झालेला त्यांचा हा छंद आज जगभरातील २२देशांतील गणेशमूर्तींच्या चित्रांपर्यंत पोहोचला आहे.राशीनुसार गणेशरूपे,विषयांनुसार तयार केलेली चित्रे, बाल गणेश,ध्यानस्थ गणेश, लॅपटॉपवर काम करणारा गणेश अशा अनोख्या व सूक्ष्म कलाकृती या संग्रहात आहेत.त्यांच्या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, ‘एक ऊब जाणीवेची’ संस्थेसाठी त्यांनी ५० हजारांचा निधीही संकलित केला.आज 'गणपतीवाले खाडे बंधू' म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. श्रद्धा, कल्पकता आणि सामाजिक भान या तिन्हींचा संगम असलेला त्यांचा संग्रह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बाईट: गोपाल खाडे
14
comment0
Report
Advertisement
Back to top