Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपुर में पावर कट: विभागवार शेड्यूल heute लागू
AKAMAR KANE
Sept 10, 2025 03:46:21
kolhapur, Maharashtra
नागपूर - *नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद* - नागपूर महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा असणार बंद, - शहरातील काँग्रेसनगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. - यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणकडून पूर्व सूचना देत केली दिलगिरी व्यक्त.. - महावितरणकडून सकाळी 8 वाजता ते दुपारी 4 दरम्यान वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेत विद्युत पुरवठा असणार खंडित..
9
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 10, 2025 07:34:52
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_NAIKAVADI सातारा - साताऱ्यात 10 सप्टेंबर 1944 रोजी क्रांतिकारी डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सातारा जिल्हा कारागृह फोडले होते या दिवसाला आज 81 वर्ष पूर्ण झाली असून क्रांतिकारी डॉ नागनाथ अण्णा हे प्रती सरकारच्या चळवळीमध्ये पुन्हा सहभागी झाले होते. या स्मृती पित्यर्थ आज सातारा जिल्हा कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्मृती स्तंभाला स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयां कडून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी कारागृह पोलिस अधीक्षक शामकांत शेडगे याबरोबर ज्येष्ठ नागरिक,स्वातंत्र्यसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताच्या नवीन पिढीला त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले देशासाठीचे योगदान स्मरणात राहावे यासाठी हा दिवस दरवर्षी साताऱ्यामध्ये साजरा केला जातो. बाईट:वैभव नायकवडी (नागनाथ आण्णा नायकवडी याचे चिरंजीव)
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 07:34:41
Nashik, Maharashtra:
Nashik break - *नाशिक मध्ये महायुतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर* - इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उदघाटन सोहळ्यापूर्वी वाद विकोपाला - *शिंदे सेनेचे नेते माजी खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने* - भुजबळ आणि गोडसे यांच्यात टेस्टिंग लॅब हून श्रेयवाद उफाळला - भुजबळांकडून वर्तमान पत्रात जाहिराती देऊन भुजबळांचा पाठपुरावा असा उल्लेख तर हेमंत गोडसे यांच्या फलकावर हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा असा उल्लेख
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 10, 2025 07:34:32
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम ....... जिल्ह्यात ९१८ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना ....... अँकर - अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असतानाच रायगड जिल्ह्यात आजपासून साखर चौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आज ९१८ ठिकाणी बाप्पांचे आगमन झालं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर रायगडात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो. अलीकडे दक्षिण रायगड मध्ये देखील याचं लोण पोहोचलं आहे. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 10, 2025 07:32:09
Manmad, Maharashtra:
अँकर-महाराष्ट्र शासनाने विधान सभेत जनसुरक्षा कायदा संमत केला मात्र त्याला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला असून,या कायद्यामुळे लोकशाही चा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने हा कायदा रद्द करावा यासाठी मनमाड येथे तलाठी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 10, 2025 07:31:24
Latur, Maharashtra:
लातूर PKG.... ( यात महत्वाचे डॉक्युमेंट असाइनमेंट नंबर वर टाकला आहे यामध्ये पंकजा मुंडे यांचा बाईट आणि व्हिज्युअल्स वापरावे. ) AC ::- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयावरून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोपीनाथ मुंडेंनी तारलं… पण पंकजा मुंडेंनी साखर कारखाना विक्री करून आम्हाला फसवलं" अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. VO 01 ::- पानगाव आणि पाथरवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या 120 एकर जमीन पणगेश्वर साखर कारखान्यासाठी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडें यांच्या शब्दावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला गेला. या कारखान्याची जबाबदारी प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे या चेअरमन म्हणून सांभाळत होत्या. सुरुवातीला कारखाना चालूही झाला… मात्र आता कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पानगावसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिल्या होत्या. लोकनेत्याच्या स्वप्नासाठी आम्ही जमिनी दिल्या, मात्र त्या स्वप्नाचा शेवट विक्रीने झाला. आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि कारखाना विकला गेला. मंत्री पंकजा मुंडे यांनी आमचा विश्वास घात केलाय अशी भावना कर्मचारी आणि शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे.... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 02 ::- पन्नगेश्वर साखर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल अॅग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या हंगामावेळी हा प्रकार उघड झाला. यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा कारखाना काही काळ यशस्वीरित्या सुरु होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनावर परिणाम झाला आणि तो हळूहळू मोडकळीस आला. पंकजा मुंडेंनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण आर्थिक तोट्यामुळे किंवा व्यवस्थापन अडचणीमुळे तो यशस्वी झाला नाही. अखेर, मंत्री असतानाच त्यांनी हा कारखाना विक्री केला.या घटनेवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत मंत्री असताना पंकजा मुंडेना कारखाना विकावा लागतो, हे दुर्दैव नाही का? आमच्या जमिनी दिल्या, पण आमच्याच परवानगीशिवाय हा निर्णय घेतला गेला. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत... बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 03 ::- हा प्रकल्प केवळ एक उद्योग नव्हता, तर शेकडो कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला होता. कारखान्यामुळे रोजगार, स्थानिक विकास आणि ऊस उत्पादकांसाठी एक स्थिर बाजार निर्माण झाला होता. त्यामुळे या विक्रीमुळे अनेकांची जीवनशैली आणि अर्थव्यवस्था डगमगली आहे. या प्रकरणात पंकजा मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. तसेच, जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. ............ वैभव बालकुंदे ZEE 24 तास लातूर...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 10, 2025 07:30:32
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_ObsceneMessege Feed on - 2C ---------------------------- Anchor - बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने मेसेज केला. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये. --------------------
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 10, 2025 07:16:23
Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash big Breaking नगर मनमाड महामार्गावर रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक... रस्ता कृती समितीच्या वतीनं सुरू आहे रास्ता रोको आंदोलन... *रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ...* *आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन अडविले...* अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचं शासकीय वाहन आंदोलकांनी अडवले... बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन दुसऱ्या मार्गाने वळविले... अहिल्यानगरहून शिर्डीकडे निघाले होते जिल्हाधिकारी....
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 07:01:28
Nashik, Maharashtra:
nsk_teacherscam feed by 2C अँकर - मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मध्यरात्री धडाकेबाज कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांचा समावेश आहे. यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती. आता या अधिकाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. byte बाळासाहेब पाटील एस पी नाशिक
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 10, 2025 07:01:20
Mumbai, Maharashtra:
अँकर -- दादर पश्चिम येथील कबूतर खाना पूर्णतः प्लास्टिकच्या कापडाने झाकून ठेवला आहे.यामुळे या ठिकाणी कबुतरही या ठिकाणी येत  नाहीत.झाकून  ठेवल्याने कोणीही कबुतरांना खाद्य देत नसल्याने कबुतरांचा वावर या ठिकाणचा बंद झाला आहे.या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त दिवसरात्र तैनात करण्यात आला आहे.परिसरातील काही इमारतींवर मात्र अनेक कबूतर अजूनही दिसतात.या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४८ Slug -- Kabutarkhana Wlt 
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 10, 2025 07:00:50
kolhapur, Maharashtra:
Ngp Chavhan Byte live u ने फीड पाठवले ------- नागपूर रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष.. श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमासाठी आलो आहेय.. कालच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आहे, विजय कसा झाला यांची चर्चा न करता, विजय चांगल्या मताने झाला याचा आनंद आहे, भाजपचा या On ठाकरे गट मत फुटले मतदान गुप्त असते, गुप्त मतदान प्रक्रिया ही त्यासाठी आहे, यात प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार योग्य उमेदवाराला देणं गरजेचं असते... त्यामुळे या सगळ्यांनी NDA च्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मतदान केलं, त्याचा सर्वांच अभिनंदन....
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 10, 2025 06:50:11
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Job_Frod Feed on - 2C ------------------------------- Anchor - चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने एजंट कडून परदेशात जात असाल तर सावधान. एका एजंट कडून युवक कंबोडिया देशात गेला. पण तिथे गेल्यावर त्याचे अपहरण करून त्याला मारहान करून कुटुंबीयांकडून खंडणी मागण्यात आली. युवकाचे एक बोट छाटण्यात आले. खंडणी देऊनही सुटका झाली नाही. अखेर पोलीस आणि विदेश मंत्रालयाने मदत केल्यानंतर युवकाची सुटका झाली. Vo - विदेशात चांगली नोकरी मिळेल असे स्वप्न पाहून नांदेडमधील युवक समीर मेहबूब शेख हा एका एजंट कडून कंबोडिया देशात गेला. पण तिथे गेल्यावर त्याची फसवणूक झाली. अनेक प्रयत्नानंतर कसेबसे समीर जिवंत मायदेशी परतला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून समीरची एका एजंट शी ओळख झाली. एक वर्ष फार्मसी शिकलेल्या समीर ला कंबोडिया मधील एका फार्मा कंपनीत एक लाख रुपये महिना पगाराची नोकरी लावण्याचे अमिष एजंट ने दाखवले. फेब्रुवारी महिन्यात समीर कंबोडिया मध्ये पोहोचला. एजंट ने सांगितलेल्या ठिकाणी तो पोहोचला पण त्याला नोकरी मिळाली नाही. बसल्या ठिकाणी दोन महिने त्याला चाळीस हजार रुपये पगार देण्यात आला. त्यानंन्तर एका गँगने समीरला ऑनलाईन स्कॅम करण्यास सांगितले. समीरला मारहान करून त्याचे व्हिडीओ कुटुंबाला पाठवून 50 लाख रुपये मागण्यात आले. समीरला मारहान न करता सुरुवातीला खोटे व्हिडीओ कुटुंबाला पाठवण्यात आले. पण पैसे पाठवण्यात न आल्याने समीरला लाईव्ह व्हिडीओ कॉल वर मारहान करत त्याचे एक बोट छाटण्यात आले. मुलाचे बोट छाटल्याने कुटुंब प्रचंड दहशतीत आले. कुटुंबाने कसेबसे पैसे जमा करत दहा लाख रुपये अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवर पाठवले. त्यानंतरही मात्र समिरची सुटका काही झाली नाही. Byte - समीर Vo - पैसे पाठवूनही मुलाची सुटका होत नसल्याने वडिलांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि नातलगाना दिली. पोलीस अधीक्षकांना घडलेला प्रकार सांगण्यात आला. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, स्थानिक आमदार, खासदारांनी लक्ष घालत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयापर्यंत विषय पोहोचवला. वेळोवेळी पाठपुरावा केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कंबोडिया मधील भारतीय दुतावासाशी संपर्क केला. त्यानंतर कंबोडिया पोलीसांनी समीर ची सुटका केली. काही दिवसांपूर्वी समीर सुखरूप मयदेशी परतला. Byte - मेहबूब शेख - समीर चे वडील Byte - शेख असलम - नातलग Vo - चांगली नोकरी मिळेल या आशेने कोणत्याही एजंटच्या फसव्या अमिषाला बळी न पडता पूर्ण खात्री केल्यानंतरच परदेशात नोकरीला जावे हे या घटनेवरून समोर आले. --------------------- मारहान व्हिडिओत युवकाचा चेहरा दाखवू नये. युवकाची तशी विनंती आहे. त्यानंतरच त्याने व्हिडीओ दिले.
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 10, 2025 06:49:18
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1009ZT_CHP_ANTI_SUICIDE ( single file sent on 2C)  टायटल: --- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त चंद्रपूर कारागृहात मानसिक आरोग्य कार्यशाळेचे आयोजन, ताण-तणाव टाळण्यासाठी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे तज्ज्ञांनी केले आवाहन अँकर: -- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. २००३ पासून दरवर्षी १० सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना ‘आत्महत्येवरील कथन बदलविणे’ अशी असून त्याद्वारे मानसिक आरोग्य कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या वतीने समाजात जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. मानवजीवनात अडचणी आणि ताण-तणाव हा अविभाज्य भाग असतो, मात्र आत्महत्या करणे हा कधीही पर्याय ठरू शकत नाही. अशा वेळी विश्वासू व्यक्तीजवळ मन मोकळे करणे आणि आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेत कारागृह अधिकारी, कर्मचारी आणि कैदी बांधव सहभागी झाले. या उपक्रमामुळे सहभागी कैदी बांधवांचे मानसिक आरोग्य स्थिर ठेवण्यास मदत आणि ताण-तणाव कमी करण्यास हातभार लागणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 10, 2025 06:48:59
Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash नगर - मनमाड महामार्ग अडवला.. रस्त्याच्या कामासाठी नागरीक आक्रमक... अनेक वर्षापासून महामार्गाची दुरावस्था... अपघातात अनेकांना गमवावा लागला जिव... महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालवणे जिवघेणे... रस्ता कृती समीतीने महामार्ग अडवला... राहुरी फॅक्टरी येथे नागरिक उतरले रस्त्यावर... शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा... काय आहेत मागण्या - 1) नगर-मनमाड महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे... 2) रोडवर पडलेली खड्डे तात्काळ बुजवण्यात येऊन खड्डे विरहित रस्ता बनविण्यात यावा. 3) रोडवर ज्या ठिकाणी काम सुरू होते त्या ठिकाणी सूचना फलक दिशा दर्शक फलक लावावेत. 4) नगर मनमाड रोडचे काम, वर्क ऑर्डर, साईट गटाराचे आराखडे जनतेसाठी प्रसिद्ध करणे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 10, 2025 06:48:15
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1009ZT_CHP_BAD_ROAD ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहराला जोडणारा घुग्गुस मार्ग झाला खड्डेमय ,टोल भरूनही नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास ,डागडूजी करण्यासाठी वापरलेली चुरी ठरतेय प्रदूषणकारक, सातत्याने पाठपुरावा करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत हयगय      अँकर:-- चंद्रपूर शहर जिल्ह्यातील घुग्गुस हा भाग म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे. कोळसा, वीज सिमेंट आदी कारखाने घुग्गुस परिसरात आहेत. चंद्रपूर शहर ते घुगुस जोडणारा मार्ग मात्र खड्डेमय झाला आहे. या मार्गावर सातत्याने मालवाहू वाहनांची ये-जा असते. परिणामी हा संपूर्ण मार्ग उखडला असून वाहने चालवणे कठीण झाले आहे. हा मार्ग अपघाताचे कारण ठरला आहे. या मार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला मात्र तरीही दुरुस्तीबाबत कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. या मार्गावर टोल देखील आहे. टोल भरूनही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बाईट १) त्रस्त नागरिक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 10, 2025 06:32:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn congres protest av Feed by tv u छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौकात महाविकास आघाडी कडून जन सुरक्षा विधेयका विरोधात आंदोलन केले , यावेळेस सरकारच्या या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला सरकारची हुकूमशाही चालणार नाही आंदोलकांना नक्षलवादी ठरवणे योग्य नाही आणि त्यामुळेच या कायद्याचा काँग्रेस आणि सोबतचे पक्ष रस्त्यावर उतरून निषेध करणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे...
2
comment0
Report
Advertisement
Back to top