Back
परभणी खासदार संजय जाधवने वंदेभारत ट्रेनच्या उदघाटनावर केली गंभीर टीका!
GDGAJANAN DESHMUKH
Aug 28, 2025 09:15:55
Parbhani, Maharashtra
अँकर- नांदेड येथून मुंबईसाठी वंदेभारत ट्रेन सुरू करण्यात आलीय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने या ट्रेनचे उदघाटन केले,पण ही ट्रेन सुरू करावी अशी मागणी आपण केली होती,त्यासाठी पाठपुरावा मी केला असतांना याचे श्रेय मला मिळेल म्हणून वंदेभारत ट्रेनच्या उदघाटनाला मला डावलण्यात आला असल्याचा आरोप परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलाय,स्थानिक लोकप्रतिनिधीलाच आमंत्रण दिल्याच रेल्वे प्रशासन सांगत आहे तर मग नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदार संघात दोन मतदार संघात नांदेडचे आहेत,मग त्यांना का आमंत्रण दिले गेले नाही,पण सरकारमधील भाजप शिवसेनेच्या मात्र जिल्हाबाहेरील आमदार खासदारांना तुम्ही बोलावले,बर मला परभणी येथे सुद्धा रेल्वेच स्वागत करण्याची परवानगी दिली नाही,मग रेल्वे सरकारची आहे की भाजपची आहे असा सवाल परभणीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी विचारलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय,आमचे परभणीचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
121 संजय जाधव- खासदार परभणी
पण ट्रेनच्या उदघाटनप्रसंगी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजप सरकार आणि रेल्वे प्रशासनावर पार्शलिटी करीत असल्याचा आरोप केलाय.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 28, 2025 15:30:12Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरालगतच्या गुडधी गावात आज ढगफुटीसदृश पावसाने चांगलाच कहर केला. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे अन्नधान्य, वस्त्र व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या पावसामुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे त्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 28, 2025 14:32:04Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_GAD_NAX_IDENTIFIED
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोपर्शी जंगलात पोलीस नक्षल चकमकीत ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांची ओळख पटली, एक पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन सदस्य टिपले, शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस, 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात घटनास्थळावरुन 01 एस.एल.आर., 02 इन्सास व एक .303 रायफल अशी एकूण 04 अग्निशस्त्रे जप्त
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्यातील नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तळ करून बसलेल्या 4 नक्षलवाद्यांना टिपण्यात सुरक्षा दलांना यश आले. अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सतत सुरु असलेल्या पावसादरम्यान सलग दोन दिवस अभियान राबवून पोलीस पथके सदर जंगल परिसरात पोहचली होती. चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 01 पुरुष व 03 महिला असे एकुण 04 नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले.
1) मालु पदा, वय 41 वर्षे, रा. बुर्गी (रेंगावाही), ता. बेटीया, जि. कांकेर (छ.ग.)
दलमचे नाव - कंपनी क्र. 10
पद – पीपीसीएम
बक्षिस – 06 लाख रुपये
कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 05, खून – 01, जाळपोळ – 01, इतर – 01 - एकुण – 08
2) क्रांती ऊर्फ जमुना रैनु हलामी, वय 32 वर्षे, रा. बोधीनटोला, तह. धानोरा, जि. गडचिरोली
दलमचे नाव - कंपनी क्र. 10
पद – कंपनी सदस्य
बक्षिस – 04 लाख रुपये
कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 13, खून – 06, जाळपोळ – 03, इतर – 05 - एकुण – 27
3) ज्योती कुंजाम, वय 27 वर्षे, रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड
दलमचे नाव - अहेरी दलम
पद – दलम सदस्य
बक्षिस – 02 लाख रुपये
कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 07, खून – 01 – एकूण – 08
4) मंगी मडकाम, वय 22 वर्षे, रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड
दलमचे नाव – गट्टा दलम
पद – दलम सदस्य
बक्षिस – 02 लाख रुपये
कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 02, इतर – 01 – एकूण – 03
जप्त शस्त्रे
1. SLR रायफल - 01
2. INSAS रायफल – 02
3. .303 रायफल – 01
4. जिवंत काडतूस – 92
5. वॉकी टॉकी – 03
सन 2021 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 91 कट्टर नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले असून, 128 नक्षल्याना अटक करण्यात आली आहे तर 75 नक्षल्यानी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 14:17:03Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Student
Feed on - 2C
-------------------------
Anchor - पुराच्या पाण्यामुळे पलीकडे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून सुखरूप काढण्यात आले. नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील हळदा रोडवर पाणी आल्याने विद्यार्थी अडकून पडले होते. नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे नदी नाल्याना पूर आलाय. या पुरात हाळदा - कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती. बस मध्ये 18 विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक होता. या सर्वांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक आणि आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून या सर्व विध्यार्थाना सुरक्षितपणे बाहेर काढले.
------------------------
13
Report
KJKunal Jamdade
FollowAug 28, 2025 13:50:17Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर्स -
ऑन मनोज जरांगे -
मनोज जरांगे यांना न्यायालयाने परवानगी दिली..
आमचीही त्यांचेशी चर्चेची तयारी...
उद्या मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर धोरण ठरेल...
ऑन राहुल गांधी -
राहुल गांधी यांनी धोरण ठरवाव..
ओबीसीत मराठ्यांना आरक्षण देवू...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हि सरकारची अगोदर पासुन भुमिका ..
ऑन विरोधी पक्ष आरक्षण भुमिका -
शरद पवार , उद्धव ठाकरे , कॉग्रेसचे पुढारी बोलायला तयार नाही...
त्यांनी चुप्पी साधू नये , त्यांचेवर दायित्व होत त्यांनी तेव्हा केल नाही...
सर्व ओबीसी बांधवांना विनंती की संघर्ष यात्रा काढू नये...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...
ऑन जरांगे सरकार चर्चा -
उद्या समितीची बैठक होणार नाही , उद्या संध्याकाळपर्यंत ठरेल केव्हा जरांगे यांचेशी बोलायच...
मुंबईत आल्यावर चर्चा होईल अशी अपेक्षा...
एका आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे त्यात सरकारकडून काय मदत देता येईल त्यासाठी प्रयत्न करू...
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 28, 2025 13:48:22Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील देवलफडी परिसरात अनेक घरातील पावसाचा पाणी शिरल असून, लाखोंचे साहित्य वाहून गेले आहे. पाणीचा निचरा होत नसल्याने घरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्याना तलावाचे रूप मिळाले असून, जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य वेगात सुरु आहे. पाणीचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. चार ते पाच फुटांपर्यंत पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी साहित्य खराब झाले असून, जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
13
Report
ABATISH BHOIR
FollowAug 28, 2025 13:46:18Kalyan, Maharashtra:
कल्याण पश्चिम संदीप हॉटेल जवळ घटना..
दुचाकीवर असलेल्या " माई लेकीला "
भरधाव गाडीची धडक..
गाडी चालक पसार, अपघातात आई लेक जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू,
Anc : कल्याण पश्चिम संदीप हॉटेल जवळ एका भरधाव गाडीने दुचाकीवर असलेल्या माई लेकीला जोरदार धडक दिली, या धडकेत माई लेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, धडक दिल्यानंतर हा गाडी चालक मात्र पसार झालाय, जखमी महिलेचे नाव रेखा पाटील, आणि कांचन पाटील, असे मुलीचे नाव आहे, रेखा पाटील, यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर कांचन पाटील, यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, या घटनेमुळे या भरधाव गाडी चालवत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गाडी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे,
Vo रेखा पाटील, या आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहतात त्या पोळी भाजी केंद्रावर स्वयंपाक करण्याचं काम करतात, आज दुपारच्या सुमारास रेखा पाटील, या काम आटपून घरी निघाल्या होत्या, याचवेळी त्यांची मुलगी कांचन पाटील, आपल्या आईला कामावरून घरी दुचाकी घेऊन जात असताना संदीप हॉटेल जवळ पोहोचतात एका भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत रेखा पाटील, आणि कांचन पाटील, दोघे गंभीर जखमी झाले, असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर या घटनेनंतर हा गाडी चालक पसार झालाय,
बाईट, रेखा पाटील, जखमी,
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 28, 2025 13:05:58Raigad, Maharashtra:
स्लग - दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप .....
रायगड जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका सूरू ........जिल्ह्यात १२ सार्वजनिक तर २५ हजार ५३९ खाजगी गणेश मूर्तींचे होणार विसर्जन
अँकर - दीड दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपतींना आज निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपतींचे विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात १२ सार्वजनिक तर २५ हजार ५३९ खाजगी इतक्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे. सायंकाळी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. पारंपारिक खालू बाजा आणि ढोल ताशा, डी जेच्या तालावर ठेका धरत लहान थोर मंडळी, महिला गुलाल उधळत मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपारिक लेझिम नृत्य सुरू होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सुरू होता. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या मात्र गणेश भक्तांचा उत्साह तसुभरदेखील कमी होत नव्हता.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 28, 2025 13:05:49Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याच उदाहरण पाहायला मिळालं आहेय.. शहरातिल आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोल्यात ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलाय...यासाठी हिन्दू-मुस्लीम गठबंधन करण्यात येवून श्री गणेशोत्सव व ईद-ए मिलादुन्नबी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहेय..अकोला शहरातील गणेश मंडळाचे गत 132 वर्षांपासून सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईद-ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या पाधिकाऱ्यांच्या समन्वय कमिटीच्या झालेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलं...श्री विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर आणि ईद-ए- मिलादुन्नबीचा जुलूस 5 सप्टेंबरला येत आहेय.या दोन्ही उत्सवाचं मार्ग एकच असल्याने आणि दोन्ही उत्सवात एकाच दिवसाच अंतर असल्यामुळे एकतेच उदाहरण देत मुस्लिम बांधवांनी मोठं मन करीत ईद-ए-मिलादून्नबीचा जुलूम तीन दिवसानंतर म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी आपल्या पारंपारिक मार्गाने निघणार असल्याची घोषणा केली आहेय...तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा ईद-ए-मिलादून्नबी जुलूस कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय..दोन्ही समाजाच्या वतीने समाजात सामंजस्य, शांती व सौहार्दता निर्माण होऊन हिंदू -मुस्लिमांने हे दोन्ही सण आनंदाने पार पाडता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय..
15
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 28, 2025 12:50:46Beed, Maharashtra:
बीड: सलग दुसऱ्या दिवशीही बीडमध्ये दमदार पाऊस; मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ..!
Anc: आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार आणि जोरदार पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर शहर आणि परिसरात तुफान पाऊस बरसला आहे. त्यामुळे पावसानं नागरिकांची तारांबळ उडालीय. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाला मागील पाऊण तासापासून पुन्हा झोडपण्यास सुरुवात झाली. या पावसानं खरिपांच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पाणी प्रकल्पाची पाणी पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे.
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 28, 2025 12:49:39Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पाऊस
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते तर सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र पावसाने दडी दिली होती. मात्र आज सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पाऊस पडला. त्यानंतर मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 28, 2025 12:49:16Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_CHP_ROAD_ACCIDENT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकची ऑटोला जोरदार धडक, प्रवासी ऑटो मधील 4 जणांचा जागीच मृत्यू तर 3 गंभीर आणि 1 किरकोळ जखमी
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. प्रवासी ऑटो मधील 4 जणांचा यात जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर तर 1 किरकोळ जखमी झालाय. आटो राजुरा शहराकडून खामोना-पाचगाव येथे जात होता ट्रक गडचांदूर येथून राजुऱ्या कडे येत होता. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर ऑटो चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये ऑटो चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली. प्रकाश मेश्राम (ऑटो चालक, 48/पाचगाव), रवींद्र बोबडे (48/पाचगाव), शंकर पिपरे (50/कोची) आणि वर्षा मांदाडे (50/खामोना) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे तर एक प्रवासी राजुरा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 28, 2025 12:33:37Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या वणी नगरपालिकेवर शिवसेनेचे चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी धडक देऊन पालिकेतील अनियमित कामांबद्दल जाब विचारला, शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरली आहे, पथदिवे बंद आहेत, शासनाचा निधी खर्च होऊनही अनेक कामे अपूर्ण आहे, शहरातील डुक्कर शहराबाहेर शेतकऱ्यांच्या शेत शिवारात सोडल्या जात आहे, या समस्यांवर मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या समस्या आठ दिवसात सोडविण्याचा अल्टीमेटम शिवसेनेने दिला आहे.
बाईट : विश्वास नांदेकर: माजी आमदार
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 28, 2025 12:20:09Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सकल मराठा समाजाचे नवी मुंबई महापालिकेत घोषणाबाजी
महापालिका पर आंदोलन
FTP slug - nm nmmc maratha aandolan
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई मद्ये मराठा आंदोलकांना विश्राती अंघोळ आणि शौचालय पाणी सुविधा पूरण्यासाठी महापालिका तसेच एपीएमसी आणि सीडको प्रशासनाने परवानगी मागितली परंतु मराठा आंदोलकांना प्रशासनाने कोणतेही सहकार्य करत नसल्याने आज सकल मराठा समाजाच्या कमिटी ने नवी मुंबई म्हाप्लीकेत जाऊन आंदोलन केले
Gf
14
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 28, 2025 12:19:55Washim, Maharashtra:
वाशीम:
File:2808ZT_WSM_RAIN_28AUGUST
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वाशीम जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कारंजा,मंगरूळपीर,मालेगाव, वाशीम व मानोरा तालुक्यात ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.खरीप पिके,भाजीपाला तसेच फळबागांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 11:50:50Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_RescueWKT
Feed on - 2C
----------------------------
Anchor - मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्याला फटका बसलाय. नायगाव मधून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नायगावला पाण्याचा विळखा बसला आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. रेसक्यु ऑपरेशन चालवून नागरिकांना पाण्याबाहेर काढले जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
WKT
---------------
14
Report