Back
लातूर शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ, भरपाईची आशा हरली!
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 28, 2025 05:01:04
Latur, Maharashtra
लातूर AVB...
स्किप्ट ::- शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ.... नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज....
AC ::- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पेरा झाला आहे. मात्र, यंदापासून पीक संरक्षणापोटीचा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागत असल्याने बळीराजाने पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४९.९५ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पैसे भरुन पिकांचा विमा उतरायचा. परंतु, नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास वेळेवर आणि व्यवस्थित पंचनामे होत नाहीत. नुकसानभरपाई मिळण्याची शाश्वतीही कमी असते. त्यामुळे शेतकरी पीकविमा काढेल कसा ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत...
बाईट ::- शेतकरी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowJul 28, 2025 11:03:40Yeola, Maharashtra:
अँकर:-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची राज्यस्तरीय बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात संपन्न झाली
सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यासाठी या बैठकीत मसुदा तयार करण्यात आला
नाफेड एनसीसीएफ या संस्थांना शेतकरी पूरक कांदा खरेदी करण्यास भाग पाडणे तसेच पुढील आंदोलना संदर्भात दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती
त्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर ,जळगाव, धुळे संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी दाखल झाले होते या संदर्भात
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Report
KJKunal Jamdade
FollowJul 28, 2025 11:01:23Shirdi, Maharashtra:
Anc - श्रावण महिन्याचा आज पहिल्या सोमवारी असून, संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर हे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर भाविकांनी फुलून गेले. पहाटेपासूनच बोल बम च्या घोषात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. निसर्गरम्य परिसरात वसलेले निझरनेश्वर मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पांडवांनी अज्ञातवासात या ठिकाणी वास्तव्य केल्याचा इतिहास असून, याच ठिकाणी त्यांनी शिवलीगाची स्थापना केल्याची श्रद्धा स्थानिक भाविकांमध्ये आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
0
Report
MAMILIND ANDE
FollowJul 28, 2025 11:01:04Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
NOTE- FEED LIVE ने दिल आहे
SLUG- 2807_WARDHA_WANKHEDE_121
सुमित वानखेडे भाजप आमदार 121
*सुमित वानखेडे ऑन विरोधक टीका*
- निश्चितच पुढचे तीन-चार महिने संघटनात्मक दृष्ट्या गणित कायद्याच्या महत्त्वाच्या आहे सर्वांना माहिती आहे का एक दोन महिन्यांमध्ये निवडणूक आहे जिल्हा परिषद महानगरपालिका त्याला सोमवार जायचं आहे त्यासाठी ही बैठक आहे
*सुमित वानखेडे ऑन विजय वडेट्टीवार*
- त्याच्याशी काही संबंध नाही भारतीय जनता पार्टी नेहमीच वर्धा जिल्ह्यामध्ये बैठका झाल्या विदर्भाचे एकत्रित म्हणून वर्धा जिल्हा निवडला आहे गांधीजींची जोडण्याची काहीच विषय नाही वडेट्टीवर काँग्रेसची मोठी नेते आहेत चरखा चालून गांधीवादी होत नाही काँग्रेसचे सरकार चालवणे स्वतःला गांधीवादी समजलं आहे गोरगरिबांच्या पाठीमागे उभे राहिले आणि गांधीवादी होते
भाजप सरकार जाहीर पाठीमागच्या गरीब माणसाचा लाईनीपर्यंत भाजप काम करते
*सुमित वानखेडे ऑन अर्बन नक्षल*
अर्बन नक्षल विचारसरणीशी संबंध ठेवणारे याचा वावर इथे आहे या संदर्भात मुख्यमंत्री आजही त्यांनी जन सुरक्षा विधेयक यासंदर्भात विस्तृत बोललेले आहे मला वाटते की मी अशी चिंता व्यक्त केल्यावर अस्वस्थ असते ज्येष्ठ व्यक्तींनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे सरकार यामध्ये सरकार चौकशी करणार आहे मला वाटते की सरकारकडे या संदर्भात सरकारकडे माहिती असेलच सरकारकडे निश्चितच असेल योग्य वेळेत योग्य कारवाई केली जाईल.
बाईट- 121 सुमित वानखेडे,
0
Report
PNPratap Naik1
FollowJul 28, 2025 10:47:44Kolhapur, Maharashtra:
महिलेनं पतीला सोडचिठ्ठी द्यावी, म्हणून केला अघोरी प्रकार,कोल्हापूर जिल्ह्यातील कुर मधल्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कहर.
कोल्हापूर ( प्रताप नाईक ) कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच पुरोगामी म्हणून असणारी जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या पतीपासून ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचे आयुष्य ‘उद्वस्त’ होण्यासाठी हा अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे.
भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद मिळून आला. त्यावेळी तिथं मिळून आलेला कागद उघडून वाचला असता, त्यावर एका महिलेचं नाव नमूद करून "सोडचिठ्ठी द्यावी" असा मजकूर होता. त्याचबरोबर आणखी तिघांची नावं लिहून "त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं. दरम्यान अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 28, 2025 10:45:17Raigad, Maharashtra:
स्लग - कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक ..... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ....... कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी .....
अँकर - कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. विधिमंडळात जुगार खेळणारे कोकाटे यांच्या सारखे कृषी मंत्री शेतकऱ्यांना एक दिवस डावावर लावतील त्यामुळे तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बाईट - रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष
5
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 28, 2025 10:32:57Parbhani, Maharashtra:
अँकर- दुधना नदीला पुर येऊन खराब झालेल्या पिकचे पंचनामे तीन दिवस उलटून ही न झाल्याने परभणी तालुक्यातील धार, मटकराळा, दुर्डी, मुरुंबा व नदीकाठी असलेल्या इतर गावातील सोयाबीन व मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीन दिवस उलटले तरीही अद्याप जिल्हा प्रशासनावतीने पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली नाही. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन घेऊन मटकराळा, धार, दुरडी व मुरुंबा येथील शेतकऱ्यांसह पुराने बाधित झालेले मूग व सोयाबीनचे सडलेले धान घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार मीटिंगमध्ये असल्याने एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नव्हते.
निवेदन घेण्यासाठी कुठलाच वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले व शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच सोबत आनलेले सडके सोयाबीन व मुगाचे धान फेकून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बाईट- शिवलिंग बोधने- जिल्हाध्यक्ष,प्रहार,जनशक्ती पक्ष
7
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 28, 2025 10:01:44Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_WAGHMARE(7 FILES)
जालना | सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईचा स्टंट
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका
जरांगेंनी सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये- वाघमारे
जरांगेंसोबत पाच टक्केपण समाज राहिला नाहीये
जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत नाही
अँकर- सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईचा स्टंट असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलीये. जरांगे २९ आॅगस्टला मुंबईत मोर्चा नेण्यार आहेत. मात्र जरांगेंनी मागच्या सारखं सेटलमेंट करुन स्वतः चं घर भरू नये. जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत. त्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा. असैविधानिक मागणी करून जातीवाद पसरवण्याचं काम जरांगेंनी करू नये असं नवनाथ वाघमारे यांनी म्हंटलं आहे.
बाईट- नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक
9
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 28, 2025 10:01:38Raigad, Maharashtra:
स्लग - सुनील तटकरे निवडून यावेत ही मातोश्रीची इच्छा .....सुनील तटकरे यांना नेहमीच मातोश्रीचा आशीर्वाद ...... आमदार महेंद्र थोरवे यांचा मोठा गौप्यस्फोट .......
अँकर - शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे निवडून यावेत आणि अनंत गीते निवडून येऊ नयेत अशीच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची इच्छा होती असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांना नेहमीच मातोश्रीचा आशीर्वाद राहिला आहे. तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचा डमी उमेदवार असायचा. शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं. या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आम्ही बाजूला झालो असंही थोरवे म्हणाले.
बाईट - महेंद्र थोरवे
12
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 28, 2025 10:01:21Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_godavari_wkt
दोन दिवस झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी पांढरे पातळीत वाढ..
पहिला श्रावण सोमवार निमित्त रामकुंडावर भाविकांची गर्दी
अँकर
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिप रिप सुरू आहे... यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते आहे... रामकुंड परिसरात गोदावरी नदी पाणी पातळी मध्ये वाढ होतात ना पाहायला मिळत आहे... आज श्रावण मासातला पहिला श्रावण सोमवार असल्याकारणामुळे रामकुंड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते... ज्या ठिकाणी धार्मिक विधी पार पडतो त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याच पाहायला मिळते... पावसाचा ओघ असा सुरू राहिला तर गोदावरी नदी पाणी पातळीत वाढवण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा आवाहन देखील प्रशासन केला आहे... रामकुंड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
9
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 10:01:15kolhapur, Maharashtra:
Ngp parinay fukey 121
live u ने फीड पाठवले
( भंडाऱ्यावरूनही फीड आल आहे)
------
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय. तर महायुतीची सहकार पॅनलचा विजय झाला असून तेरा उमेदवार निवडून आले आहेत. तर नाना पटोळे यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनल मधून फक्त तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे नाना पटोले यांना स्वतःच्या जिल्ह्यातच पराभवाच्या सामना करावे लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.... दरम्यान या विजयानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे
यांनी
--------
बाईट
.आ परिणय फुके
14
Report
PNPratap Naik1
FollowJul 28, 2025 09:45:59Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking
रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग
रूपाली चाकणकर यांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका
स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का
यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडीतांचे भांडवल केले आहे, त्यातून त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतली
न्यायप्रविष्ठ प्रकरणात परिणय फुके सह अन्य प्रकरणांचं भांडवल केलं
यांना न्यायप्रविष्ठ ही बाब ही कळते की नाही हा प्रश्नच आहे
पुणे प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत आहेत त्यांना तपास करू द्या
रोहिणी खडसे कशाची पाठराखण करत आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघत आहे
हनी ट्रॅप बाबत महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेला आहे
11
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 28, 2025 09:45:54Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ranjangaon Vinayak Chaturthi
File:01
Rep: Hemant Chapude(Ranjangaon)
Anc: आज विनायक चतुर्थी आणि श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे लाडक्या बापाचा मंदिर गाभार आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून लाडक्या बाप्पाला 1001 मोसंबीचा महानैवद्य दाखवण्यात आला विनायक चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्तानी दर्शनासाठी गर्दी केली होती...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया रांजणगाव पुणे,..
10
Report
ABATISH BHOIR
FollowJul 28, 2025 09:45:46Kalyan, Maharashtra:
तरुणानी स्वखर्चातून बुजवला रोडवर खड्डा.
खड्यामुळे अनके अपघात होत असल्याने तरुणांचा पुढाकार.
Anc : कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील अमेय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्स्यावर भला मोठा खड्डा पडल्याने वाहनांना व रुग्ण रुग्णालय मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे
वारंवार तक्रार करूनही केडीएमसीचे दुर्लक्ष करून सुद्धा खड्डा भरला नसल्याने चक्की नाका परिसरातील तरुणांनी पुढाकार घेत स्वखर्चातून बुजवला खड्डा,व्हिडियो व्हायरल,
11
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 09:36:29Wardha, Maharashtra:
नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
- विदर्भ विभागाने आज प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवला होता. तयारीच्या निमित्याने काम करण्यात आलं....
- जिथे शक्य आहे तिथं महायुती म्हणून लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू...
On रायगड पदाधिकारी यांचं पत्र...
- मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही, महायुती नियम आहे, हा नियम मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे..काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही.
On जबरदस्तीने पक्ष प्रवेश
- काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आले आहेत... शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नजरेस आणून देत आहे.
On ठाकरे बंधू
- कोण कोणासोबत युती करताय, मुंबईच्या जनतेने मनात ठरवला आहे...कोणासोबत लढायचं हे पुढच्या काळात स्पष्ट होईल.... हे एकत्रित आले किंवा वेगळे लढले तरी महापौर हा महायुतीचाच होईल.
On कदम
रामदास कदम आमचे मित्र आहे.. ते रागाच्या भरात बरंच काही बोलत असतात. सगळ्या गोष्टी सिरीयस घेता येत नाही।
On लाडकी बहीण 26 लाख अपात्र
- महिला व बाल विकास खात्यात 26 लाख असे अकाउंट मिळाले आहे, जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाही. त्यात पुरुष देखील आहे, दुसऱ्या योजना लाभ घेणाऱ्या देखील आहे, वेगवेगळ्या निकषात न बसणारे, खाते आहे. आता सगळे खाते हे तात्पुरते सस्पेंड केलेले आहे. सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल. वरील बाबी सत्य असल्यास ते अकाउंट बंद केले जातील.
On गोटलरनट्याल पक्षप्रवेश
- या संदर्भात भाजपने कोणाचा प्रवेश असेल तर रवींद्र चव्हाण बोलतील.. नंतर ते मला सांगतात
- यात नवीन काही नाही एअर स्ट्राईकवरती प्रश्न उपस्थित करत होते..त्यामुळे जनतेने यांच्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे, या मानसिकतेचा काहीच करता येत नाही.
On उबठा राज्यपाल तक्रार
- एक नरेटीव तयार करण्याचं काम सुरू आहे..काही प्रकरणात चुका आहेत, काही बोलणं झालेल आहे. सरकारच्या विरोधात कोणी फेक नेरेटिव्ह केला तरी कोणाच्या तक्रारी आहे, कोण बोलत आहे याच्याकडे लोक बघत असतात..
On मिशन सिंदूर विरोधक चर्चा.
विरोधकांना मिशन सिंधुदुर्ग चर्चा करायची नाही. कारण या भारतीय सैन्याने पाकिस्तान धडा शिकवला आहे, सगळं सत्य समोर आला आहे... एक युद्धाचे नीती असते. चर्चा करण्यात त्यांची हिम्मत नाही.
On रेव्ह पार्टी
- रेव पार्टी संदर्भात चर्चा करणे सातत्याने कारवाई करण्याचे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाऊन कारवाई केली आहे. रक्षा कारखाना पकडलेला यात मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे.
On निवडणूक आयोग रिविजन
- स्पेशल इंटेनसिव्ह रिव्हिजन झाला पाहिजे, मतदाता सूची मध्ये सूची नसल्यामुळे मागील वीस वर्षात अनेक नाव आहे... जे जिवंत नाही पत्ता सोडून गेले, तरी नाव आहे, इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालाच पाहिजे. 2012 मध्ये मी यासाठी हायकोर्ट मध्ये गेलो. निवडणूक आयोगाचे आभार आहे.
On खडसे कारवाई राजकीय द्वेष
- यावर मी फार काही बोलणार नाही, पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सगळे त्या ठिकाणचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहे. व्हिडिओ शूटिंग झाली आहे. अपारमेंट कोणाच्या नावाने ते बुक झाले आहे, अनेक पुरावे आहे, माझ्यासाठी हा प्रश्न राजकीय नाही, गुन्हा घडला आहे...
On rss मोहन भागवत भारत
- जर आम्ही भारत म्हटलं तर चांगलं होईल आम्ही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशात अनेक असे देश आहे ज्यांचे नाव एक, जुना नाव आहे, एक ऐतिहासिक स्वरूपातून मिळालेल्या नाव आहे... मोंहनजी यांनी काही वाद केलेला नाही आणि विवाद होण्याचं काही कारण नाही.
On गांधीवादी जिल्ह्यात अर्बन नक्षलवाद
- मागील काळात जिथे जिथे गांधी जिल्ह्यात कार्यक्रम झाले त्या ठिकाणी अशा संघटनांचे कार्यक्रम झाले ज्या पोलीसच्या रेकॉर्डवर अर्बन माओवादी कारवायांमध्ये आहे सेवाग्राम गांधी आश्रम हे सर्वांसाठी खुले आहे त्यावर बंधन टाकण्याचा आवश्यक नाही. अशाच संस्थेत जागेचा वापर चुकीच्या कार्यासाठी होत असेल तर ते योग्य नाही, त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
On कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अर्बन गांधी..
- तर त्यांनी जे मान्य केलं ते अर्बन गांधीवादी आहे, चांगलं आहे, आम्ही अर्बन गांधीवादी आहे, रूरल गांधीवादी आहे, आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी यावर आम्हाला गांधीवाद मान्य आहे.
On सुधीर मुनगंटीवार.
- काही लोकांचे निययोजित कार्यक्रम होते, त्यामुळे दौरा असल्यामुळे आम्ही ते येऊ शकले नाही त्यांनी कळवलं होतं कोणी नाराज नाही आहे....
On अमित शाह आष्टीकर शुभेच्छा.
- मी पण काल उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या... यात राजकारणाचा काही संबंध नाही.
13
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 28, 2025 09:31:20Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_MSRTDC_PKG(17FILES)
जालना | प्रवाशांच्या तिकीटात हेराफेरी करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या 68 वाहकांना 200 किलोमीटर दूर बदल्यांची शिक्षा
प्रवाशांच्या तिकिटात करत होते हेराफेरी
(पॅकेज)
अँकर | राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील 68 बस वाहकांना दोषी ठरवण्यात येऊन या वाचकांची जालना,छत्रपती संभाजीनगर विभागाबाहेर 200 किलोमीटर बदलीची शिक्षा करण्यात आली आहे.ही शिक्षा बस वाहकांना का करण्यात आली.? आणि हे वाहक तिकीटात हेराफेरी कशी करायचे बघूया या वरचा हा स्पेशल रिपोर्ट.
व्हिओ :०१:राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात एसटी वाहक हेराफेरी करत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे. परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या दीर्घ चौकशीत आणि तपासणीत हा प्रकार समोर आलाय.तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील या 68 बस वाहकांची विभागाबाहेर 200 किलोमीटर बदलीची शिक्षा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे.या वाहकांकडून प्रवाशांच्या तिकीटात कशी हेराफेरी केली जात होती हे बघूया
ग्राफिक्स | बदली करण्यात आलेले 68 वाहक हे दक्षता पथकाची नजर चुकवून प्रवाशांच्या तिकीटात हेराफेरी करत होते.उदाहरणार्थ एखादा प्रवासी जालन्याहुन छत्रपती संभाजीनगरकडे बसने प्रवास करत असेल तर त्या प्रवाशाला जालन्याहुन प्रवासाचं तिकीट न देता बदनापूर येथून छत्रपती संभाजीनगरचं तिकीट दिलं जात होतं.मात्र भांडं जालना ते छत्रपती संभाजीनगरचंच वाहकांकडून वसूल करण्यात येत होतं.मात्र प्रवाशाचं तिकीट हे बदनापूर ते छत्रपती संभाजीनगरचंच काढल्यानं परिवहन महामंडळाला तेवढंच भाडं मिळायचं. मात्र तोच प्रवासी जालन्याहुन बसलेला असल्यानं जालना ते बदनापूर हे भांडं वाहकाच्या खिशात पडायचं.ही तिकीटात होणारी हेराफेरी दक्षता पथक ज्या मार्गावर आहे तिथे न करता ज्या मार्गावर दक्षता पथक नाही त्या मार्गावर केली जायची.दक्षता पथक ज्या मार्गावर आहे त्याची माहिती वाहकांकडून व्हॉट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दिली जात होती.या ग्रुपवर दक्षता पथक ज्या मार्गावर असेल त्यांचे फोटो देखील वाहकांकडून शेअर केले जात होते.या ग्रूपमध्ये अनेक वाहक असल्याचं आढळून आल्याचं तपासात समोर आल्यानंतर परिवहन महामंडळाच्या 68 वाहकांना थेट जालना आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सोडून 200 किलोमीटर दूर असलेल्या विभागात बदलीची शिक्षा देण्यात आलीय.
ग्राफिक्स आऊट
बाईट :कल्पेश सोळंकी,सुरक्षा आणि दक्षता अधिकारी,राज्य परिवहन महामंडळ,जालना
व्हिओ : ०२: विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.पण जिल्ह्यातील अंबड बस स्थानकात दक्षता पथकाचे अधिकारी गेलेले असताना बसचा एक वाहक त्याच्या मोबाईल मध्ये दक्षता पथकाचे फोटो काढताना दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला आणि या प्रकरणाचं गौडबंगाल समोर आलं. पथकाच्या अधिकाऱ्यांनी फोटो काढणाऱ्या वाहकाच्या मोबाईलमधील व्हॉट्स अँप ग्रुपचे स्क्रिन शॉट मिळवले.दक्षता पथकाने त्याची गोपनीय चौकशी सुरू केली.त्यात तिकीटात हेराफेरी करणाऱ्या बस वाहकांचा व्हॉट्स अँप ग्रुप आढळून आला.या ग्रुपवरून दक्षता पथकाच्या लोकेशनबाबतची माहिती वाहक एकमेकांना देत असल्याचं निष्पन्न झालंय.
बाईट :०२:कल्पेश सोळंकी,सुरक्षा आणि दक्षता अधिकारी,राज्य परिवहन महामंडळ,जालना
व्हिओ :०३:जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे.मात्र दररोज शेकडो गाड्या जाऊनही परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परीणाम होत होता.आता परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा विभागाच्या या कारवाईनं दोषी वाहकांच्या पायाखालची वाळू सरकली असणार हे निश्चित
नितेश महाजन ,झी-२४ तास,जालना
12
Report