Back
नाशिकच्या मुसळधार पावसाने जायकवाडी धरण भरले, दरवाजे उघडले!
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 03:15:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi update av
Feed attched
नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. सध्या धरणात ९६% पाणीसाठा असून धरण भरल्याने त्याचे १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडून ४७ हजार १६० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे ३१ जुलै रोजी पहिल्यांदा जलपूजन करून धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक पैठणकडे येत आहेत आणि या पांढऱ्याशुभ्र पाण्याचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढवल्याने शेवगाव संभाजीनगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 23, 2025 05:32:50Bhandara, Maharashtra:
लाखनी शहरात काढण्यात आली मारबत
Anchor :- पारंपरिक सणांमध्ये मारबात काढण्याला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी पोल्याच्या पाळव्याला ही अनोखी मिरवणूक काढली जाते. मारबात म्हणजे समाजातील वाईट प्रथा, दुष्ट शक्ती व अनिष्ट गोष्टींचे प्रतीक. मोठ्या जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे मिरवणुक काढण्यात आली. या सोहळ्याला सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते. "वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय" हा संदेश देणारा मारबात उत्सव, दरवर्षी पोल्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो.
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 23, 2025 05:32:29Raigad, Maharashtra:
स्लग - वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत ......
मुंबई गोवा महामार्गावर पोलिस प्रशासन सज्ज ....
चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी पोलिसांनी कसली कंबर ........
अँकर - मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची हालचाल, गर्दीचे ठिकाण, कोंडी होण्याची शक्यता याचा अंदाज घेऊन त्वरित उपाययोजना करता येणार आहेत
माणगावमध्ये नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना माणगावमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास अधिक होऊ नये यासाठी माणगाव पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी 15 पोलिस अधिकारी, 120 कर्मचारी, 30 वाहतूक कर्मचारी, 30 होमगार्ड आणि 30 अपदा मित्र अशी मोठी टिम माणगावमध्ये तैनात करण्यात आली आहे तर या व्यतिरिक्त क्रेन, ॲम्ब्युलन्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये आणि झाल्यास ती लगेच सोडवली जावी यासाठी ए आय देखील वापर मुंबई गोवा महामार्गावर केला जाणार आहे.
बाईट - निवृत्ती बोराडे, पोलिस निरिक्षक माणगाव
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 23, 2025 05:31:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2308ZT_CHP_GHODAZARI
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात मागील काळातील संततधार पावसाने घोडाझरी सिंचन प्रकल्प वाहतोय ओसंडून, ड्रोन मध्ये मनोहारी दृश्य कैद
अँकर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव हा मागील काही दिवसा पासून ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यात दोन मोठी धरणे आहेत. त्या पैकी घोडाझरी हे एक मोठं धरण आहे. या धरणाचे मनमोहक दृश्य केशव कुंभलकर या युवकाने ड्रोनद्वारे टिपले आहे. तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांमध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. निसर्गाने या तलावावर नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे गर्दी करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील पर्यटकही येथे येतात. सध्या मात्र वर्षा सहलीचे हे केंद्र पर्यटकांसाठी नागपूर ते बंद ठेवण्यात आले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 23, 2025 05:31:28Kalyan, Maharashtra:
न्यूज फ्लॅश..
कल्याण निक्की परिसरातील धक्कादायक घटना..
सकाळी सातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला ट्रक ची धडक धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू..
ट्रक चालक पसार,
ट्रक चालकाचा पोलिसाकडून शोध सुरु.
महिलेची ओळख पटली असून रिंकू आरव असे महिलेचे नाव
खडकपाडा पोलिसांनी ट्रक घेतले ताब्यात.
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 23, 2025 05:30:40Shirdi, Maharashtra:
Anc - गणरायाचे लवकरच आगमन होणार असून मुर्तीकारांची उत्सवमुर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे.. तीन दिवसावर आलेल्या गणेशउत्सवासाठी लागणा-या मूर्त्यांवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथिल कारागीर अखेरचा हात फिरवत आहेत..
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आतुरतेने ज्याची सर्वजण वाट पाहत असतात त्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे..राहता तालुक्यातील मूर्तीकारांची मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग बघायला मिळतेय.. या वर्षी पंधरा दिवस अगोदरच गणपती आल्याने मोठी कसरत करावी लागत असून मोठ्या मुर्तीना मागणी वाढली त्यातच कच्चा मालाच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत.. गणपती मूर्ती कारखान्याहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
wkt kunal jamdade
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 23, 2025 05:01:25Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - म्हाडा कॉलनी मधील घरांना गळती
म्हाडा कॉलनी के घर मे लिकेज
FTP slug - nm mhada home
Shots- video and photo
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - शीळफाटा येथील भंडार्ली गोटेघर येथे नवीन म्हाडा वसाहत बनवली आहे , या वसाहती मद्ये पहिल्याच पावसात घरांना गळती लागली आहे , पाच हजार घरांची कॉलनी असून येथे सुखसुविधा चा अभाव असून नवीन घरांना गळती लागल्याने सदनिका धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,
बि जी शिर्के कंपनी ने हे बांधकाम केले असून ,घरांची दुरुस्ती करून देण्याची मागणी राहिवाशियानी केली आहे।
Gf-
===========
1
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 23, 2025 04:46:23Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि अर्धवट सोडलेल्या कामामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. दिग्रस आर्णी ह्या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, शालेय विद्यार्थी, पादचारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. गेल्या चार महिन्यांपासून येथील काम ठप्प आहे. संबंधित यंत्रणा, प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदारीपासून हात झटकत आहेत. सहा महिन्यांपूर्वी मानोरा चौक ते आर्णी बायपास मार्गाचे कामाला सुरुवात झाली, त्यानंतर तीन महिन्यांपासून काम ठप्प आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावी अशी मागणी दिग्रस करांनी केली आहे.
5
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 23, 2025 04:35:00Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon Dimbhe Dam Nature
File:02
Rep:Hemant Chapude(Ambegaon)
Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डिंभे धरण परिसरातील निसर्ग वैभव बहरलं असून उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे ,डिंभे धरणाचा हिरवागार निसर्गमय परिसर मन प्रसन्न करून टाकतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 04:34:45Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed attached
*पोळ्यानिमित्त अनोखी परंपरा,एक एक बोटाने उचलला तब्बल 100 किलोचा दगड,
राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोळा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पोळा सणानिमित्त एक घर पाडळी येथील बुरा दिन बाबा यांच्या प्रसिद्ध दर्ग्यासमोर 100 किलो वजनाचा दगड आहे. हा दगड बारा जणांनी एक एक बोट लावून उचलत पोळा सण साजरा केला. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेतील वैशिष्ट्य म्हणजे बारापेक्षा एक व्यक्ति देखील अधिक झाला तर दगड उचलला जात नाही असे या गावचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी दगड उचलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 23, 2025 04:32:04Nashik, Maharashtra:
nsk_uposhan
Anc:- नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी - तळवाडे भामेर या 27 किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचे काम गेल्या 45 वर्षांपासून अपूर्ण असल्याने शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला.कालव्याचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी. तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.महिलाही आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.उलट कालव्यासाठी मंजूर निधीमध्येही गैरव्यवहार केला त्यामुळे कालव्याचे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप आंदोलकानी केला.काम पूर्ण न झाल्याने शेती नापिकी होऊन शेतकऱ्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.
कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
2
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 23, 2025 04:15:44Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागरचना अखेर निश्चित करण्यात आलीय. प्रारूप प्रभागरचनेवर आलेले 11 आक्षेप विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी फेटाळल्यामुळे कोणताही बदल न करता तीच रचना अंतिम करण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयाने 14 जुलै रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. यावर 21 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परभणी तालुक्यातील दैठणा, पोखर्णी, उमरी आणि जांब गणाबाबत 5, जिंतूर तालुक्यातील बोरी गटाबाबत 2, सेलू येथील वालूर गटाबाबत 1, मानवत तालुक्यातील कोल्हा आणि ताडबोरगाव गटाबाबत 1, पाथरीतील लिंबा गटाबाबत 1 तसेच गंगाखेड तालुक्यातील खंडाळी आणि गुंजेगाव गटाबाबत 1 असे एकूण 11 आक्षेप नोंदविण्यात आले होते. सदर आक्षेपांवर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये सर्व आक्षेप फेटाळण्यात आले. परिणामी प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांनी जशी जाहीर केली होती, तशीच अंतिम घोषित करण्यात आलीय. अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये,जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलीय...
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 23, 2025 04:01:50Beed, Maharashtra:
बीड: आश्चर्य.. बंद पडलेल्या हात पंपातून अचानक उसळतय पाणी..!
Anc: गत आठवड्यात बीड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने नदी, नाले आणि तलाव तुडुंब भरले असताना हातपंपातून पाणी ओसंडून वाहत आहे. बीडच्या कोरडेवाडी गावात हे चित्र समाधानकारक म्हणाव लागेल. 200 फूट उंच हातपंपातून पाणी खळखळून वाहतय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान आहे. एका डोंगर माथ्यावर कोरडेवाडी हे गाव वसलेलं आहे. असं असताना देखील जवळपास दोनशे फूट उंच यातून पाणी वाहत आहे.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 23, 2025 04:01:36Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उजनी, वीर धरणातील पाण्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र राज्याचा संपर्क तुटला, 150 हेक्टर वरील पिके पुराच्या पाण्यात
- उजनी, वीर धरणातील पाण्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक राज्याचा संपर्क तुटला
- अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधारा पाण्याखाली गेल्याने अक्कलकोट मार्गे कर्नाटकात होणारी वाहतूक ठप्प
- हिळ्ळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 150 हेक्टर वरील पिके पुराच्या पाण्यात
- उजनी धरणातून भीमा नदीत 1 लाख 51 हजार 600 क्युसेस पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती
- कोर्सगांव, कलकर्जाळ , शेगाव, धारसंग, आळगी, खानापुर, म्हैसलगी , अंदेवाडी, देविकवठा अशा अनेक गावातील खरिपाची पिके पाण्यात
- लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
8
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 23, 2025 03:46:23Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R1_PATEL
शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला.
सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही ,हात झटकले.
अँकर
365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भूक आता भोगावे लागणार आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले. धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.
Byte पाशा पटेल
अध्यक्ष केंद्रीय कृषी मूल्य आयोग
8
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:32:16Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn tupe ubt av
Photo attached
माजी महापौर तथा उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्धवसेनेला सोडचिठ्ठी देणारे तुपे हे शहरातील उद्धव सेनेचे सहावे माजी महापौर आहेत. सेनेत ३८ वर्षापासून असलेले तुपे यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना पत्र पाठवून राजीनामा दिला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेणार असल्याचे तुपे यांनी सांगितले. दरम्यान, हे तुपे यांचे ठाकरे गटावर विशिष्ट पदासाठी दबाव तंत्र असल्याची चर्चा आहे.. तर त्र्यंबक तुपे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील याही चर्चांना उधाण आलय.. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे नियोजन ठरल्याचे सूत्रांची माहिती आहे..
5
Report