Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
अब्दुल सत्तारच्या शपथपत्रावर न्यायालयात फौजदारी याचिका दाखल!
VKVISHAL KAROLE
Aug 09, 2025 02:47:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn sattar court av Use sattar file shots अब्दुल सत्तार यांच्या २०१९ विधानसभा निवडणुकीमधील नामनिर्देशन पत्रातील शपथपत्राबाबत सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केलेली आहे. शपथपत्रात अब्दुल सत्तार यांनी खोटी माहिती दिली असा त्यांच्यावर आरोप आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत ही सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू होणार आहे.. या बाबत माध्यमांनी  बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज करत, फिर्यादी न्यायालयाचा आधार घेऊन खोट्या बातम्या प्रसिद्ध करून बदनामी करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती... मात्र संविधानाने कलम १९ नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. प्रसार माध्यमांनाही तसे स्वातंत्र्य आहे. माध्यमांनी कोणत्या बातम्या प्रसिद्ध कराव्यात आणि कोणत्या करू नये यावर न्यायालय बंधने आणू शकत नाहीत, असे मत व्यक्त करत सिल्लोड न्यायालयाने माजी मंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळला आहे...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Aug 09, 2025 07:18:15
Beed, Maharashtra:
बीड : शेतातील विहिरीत पडले बिबट्याचे पिल्लू; प्राणीमित्रांनी रेस्क्यू करून वाचवले..! Anc: बीडच्या शिरूर कासार मधील शेतातील एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना घडली. परिसरातील ग्रामस्थांनी ही माहिती प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काळजीपूर्वक आणि कौशल्यपूर्ण प्रयत्नांनंतर बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. योग्य वेळी केलेल्या या रेस्क्यू मोहिमेमुळे बिबट्याच्या पिल्लाचे प्राण वाचले.
0
Report
PNPratap Naik1
Aug 09, 2025 07:18:07
Kolhapur, Maharashtra:
Kop Circuit Bench Feed :- Live U Anc :- कोल्हापूर सर्किट बेंच चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या तीन दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाकडून येत्या तीन दिवसात सर्किट बेंच इमारतीचे हस्तांतर न्यायालयाकडे होणार आहे. 17 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार असून सर्किट बेंच च्या कामकाजाला प्रत्यक्ष 18 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. Anc :- कोल्हापूर सर्किट बेंच सुरू होण्यासाठी नेमकं कोण कोणत्या घडामोडी होत आहेत यावर एक नजर टाकूया.. GFX In सर्किट बेंच इमारतेचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. सर्किटबेंच साठी अहिल्यानगर, पुणे आणि चंद्रपूरच्या विशेष न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर इथल्या 14 विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 तारखेला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सर्किट बेंच उद्घाटनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. GFX Out
0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 09, 2025 07:16:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाठ यांचा बाईट पॉइंटर..* महाराष्ट्रात आनंदात आज रक्षाबंधन साजरा होत आहे. हे नात निर्माण करण्याचा काम शिंदे यांनी केलं आहे.. महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणीनं केलेल्या सहकार्य ची जाणीव करून राज्यभरात बहिणी साजरा करीत आहे. आनंद दिघे यांच्या दोन्ही हातात राख्या बांधायला जागा नसायची. ऑन शिंदे - आदित्य कोळीवाडा. अशा कार्यक्रमामध्ये पाहणे घोषणाबाजी करणे त्याला महत्व देऊ नये. कार्यक्रमात हसून खेळून बोलले पाहिजे. तुमचेमतभेद होऊ द्या मात्र कार्यकर्त्यांना भिडू नका.. मुख्यमंत्री असताना कोळीवाडा जाऊन आले आहे. ते जात नाही. - शरद पवार हे सगळ्यांचे मन ओळखू लागले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मनात काय हे आम्हालाही कळत नाही. - शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट आता दोन्ही साईडने बजाव असती. - जे निवडून आलेले आहेत ते चुकीचे आहे असे ठरवले जाते. राहुल गांधी यांची नौटंकी किती दिवस चालणारा माहिती नाही. आनंद आहे. 16 जागा ubt लढवत आहे.आणि मनसे 2 जागा.. मनपामध्ये युती झाली तर मनसेला काय मिळाले? ऑन कबुतरखाना.. - सरकार स्ट्रीकली कारवाई होईल, इतका जास्त प्रेम नसावं माणसाला धोका होऊ नये. - सरकार कारवाई निश्चित करेल.
2
Report
SMSarfaraj Musa
Aug 09, 2025 07:16:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थि आणि शिक्षकांसोबत साजरा केला रक्षाबंधन.. अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या रेठरे धरण येथे सैनिकी शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा केला आहे.एस के इंटरनॅशनल सैनिक शाळेमध्ये सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षकांच्या सोबत सदाभाऊ खोत यांनी रक्षाबंधन साजरा केला आहे.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांकडुन पारंपारिक पद्धतीने औक्षण करत आमदार सदाभाऊ खोत यांना राख्या बांधण्यात आल्या.
4
Report
GMGANESH MOHALE
Aug 09, 2025 07:00:40
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0908ZT_WSM_TURMERIC_PRICE_FALL रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये स्थीर असलेल्या हळदीच्या दरात आता घसरण सुरू झाली आहे.रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती त कांडी हळदीला किमान १० हजार ५०० ते १२ हजार रुपये प्रती क्विंटल, तर गट्टू हळदीला किमान १० हजार १०० ते ११ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला. तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र हळदीच्या दरात आणखीच घसरण दिसली. या ठिकाणी कांडी हळदीला किमान १० हजार १६० ते कमाल ११ हजार ९७५ रुपये प्रती क्विंटल, तर गट्ट हळदीला किमान ९ हजार १०० ते कमाल १० हजार ९११ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले.
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 09, 2025 06:46:39
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयाचं उद्घाटन संपन्न! मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती Amb court Anchor : अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयाचं आज उद्घाटन झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण आणि फीत कापून न्यायालयाचं उद्घाटन पार पडलं. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. Vo : अंबरनाथच्या चिखलोली परिसरात मैत्री कट्टा हॉटेलच्या मागे न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आलीये. या न्यायालयामुळे उल्हासनगरच्या न्यायालयावरील भार कमी होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा यांचीही बचत होणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल हेदेखील याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
9
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 09, 2025 06:32:56
Beed, Maharashtra:
बीड: वाल्मीक अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही; कराडच्या समर्थकांनी पीडित तरुणाकडून माफी नाम्याचा व्हिडिओ घेतला बनवून... जुना व्हिडिओ व्हायरल..! (note या प्रकरणात कसलीही तक्रार नाही त्यामुळे पीडित तरुणाच्या चेहरा ब्लर करावा ही विनंती ) Anc : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सध्याला जेलमध्ये आहे. कराडच्या समर्थकांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. परळीच्या पांगरी येथील राजेश नेहरकर या तरुणाने वाल्मीक कराडच्या विरोधात सोशल माध्यमात पोस्ट केली होती. याच प्रकरणी कराड समर्थकांनी त्याच्याकडून माफीनाम्याचा एक व्हिडिओ तयार करवून घेतला. हा व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर येतेय. अण्णांची माफी मागतो नाक घासतो पुन्हा काहीही बोलणार नाही. कुठेही तक्रार करणार नाही. असा माफी नाम्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट करून घेतला होता. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
14
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 09, 2025 06:32:37
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील दोन मंडळ अधिकाऱ्यांचे शासनाकडून निलंबन करण्यात आल्याच्या विरोधात विदर्भ मंडळ अधिकारी संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील दोन मंडळ अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने परिपत्रक काढून निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन अन्यायकारक आहे असा आरोप करण्यात आला. दोन्ही निलंबित मंडळ अधिकाऱ्यांना कामावर रजू करण्यात यावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा विदर्भ मंडळ अधिकारी संघाने दिला. बाईट :
13
Report
KJKunal Jamdade
Aug 09, 2025 06:30:54
Shirdi, Maharashtra:
अकोले – जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले शहरात आज भव्य उत्साहाचे वातावरण असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली आणि जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात पहाटेपासूनच आदिवासी बांधव, कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.अकोले शहरातील प्रमुख रस्ते, चौक, आणि सभास्थळ परिसरात विविध पक्ष व संघटनांचे बॅनर, फलक आणि स्वागत कमानी लावण्यात आल्या असून, त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक वेशभूषेत, नृत्य, ढोल-ताशा, लेझीम आणि आदिवासी कलांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाचा रंगतदार माहोल तयार झाला आहे.सभेच्या ठिकाणाहून आढावा घेत कार्यक्रमाच्या तयारीबाबत आयोजकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Wkt kunal jamdade shirdi
11
Report
SMSarfaraj Musa
Aug 09, 2025 06:17:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_padalkar स्लग - आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरा केला रक्षाबंधन.. अँकर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केला आहे. सांगलीच्या पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीकडुन राखी बांधून घेतली आहे.औक्षण करत पारंपरिक पद्धतीने बहीण अनुसया सरंगर यांनी गोपीचंद पडळकर यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला आहे.
14
Report
VKVISHAL KAROLE
Aug 09, 2025 06:16:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ambadas rakhi av Feed by I've u राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राहत्या घरी राखी पौर्णिमा साजरी केली यावेळेस त्यांच्या तीन बहिणींनी त्यांनी राखी बांधली अंबादास दानवे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या,  राखी ही माझ्यासाठी फार महत्त्वाची असते या निमित्ताने बहिणींची भेट होते एक वेगळाच आनंद असतो अशा भावना बहिणींशी बोलताना दानवे यांनी व्यक्त केल्या
13
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 09, 2025 06:16:29
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यातील सांगवी येथे धक्कादायक घटना उघड…... जमीन विक्रीच्या वादातून मुलाकडून वयोवृद्ध आईचा खून…..खून केल्यानंतर मनस्ताप झालेल्या मुलानेही गळफास घेतला… घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त….. AC ::- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून, त्यानंतर झालेल्या मनस्तापातून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. सुमिंद्रबाई जाधव या 70 वर्षीय महिलांच्या नावावरची शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने, संतापाच्या भरात शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकल्यानंतर, काकासाहेब गावातून गायब झाले. दरम्यान, पोलिसांनी शोध सुरू केला असता रेणापूर शिवारातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. दोन्ही मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस या दुहेरी मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लातूर जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे. बाईट::- पोलीस अधिकारी
14
Report
VKVISHAL KAROLE
Aug 09, 2025 06:15:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर.. *विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे पत्रकार परिषद पॉइंटर* ऑन कबुतरखाना.. - कबुतरांना खाद्य देऊ नये असे न्यायालयाने आदेश दिले आहे. त्याचे पालन करणे मनपाने सुरू केले आहे.  तिथं  चाकू घेऊन येणे सुरुय ताडपत्री फाडले जाते... हीच गोष्ट मराठी माणसांनी आणि इतक्या मुस्लिमांनी केली असती तर किती आगडोंब झाला असता...जैन बांधवासह सर्वांना पक्षासाठी प्रेम आहे.   स्वतःच्या घराला जाळ्या लावायच्या आणि दुसऱ्याच्या घरासमोर जायचे ...? चाकू घेऊन आलेल्यावर गुन्हे दाखल का झाले नाही. ऑन मुंबई मनपा ठाकरे बंधू एकत्र. - दोघे एकत्र येतील हे नक्की मात्र महाविकास आघाडी नसेल असे नाही. शिवसेनेचा वाटा असेल. - या सर्व निवडणुका स्थानिक आहे.कुठे कुठे पक्षाचा चिन्ह नसते. - घोडामैदान आजुन लांब आहे. तीन चार महिने आहेत. भविष्य वर्तविणे चुकीचे आहे. पतपेढी युती. - सुरुवात झाली पाहिजे, नाशिक मध्ये एकत्र बैठक झाली. सहकार क्षेत्रात संस्था सुरक्षित राहणे गरजेचे आहे. ह्या संस्था मोडीत काढण्याचा काम भाजप करते. ऑन भुमरे चालक जमीन. - कोणता जमाना सुरू आहे.आज रक्षाबंधन आहे. इथे बहीण भावाची नाही, भाऊ बहिणीचा नाही. आणि संदीपान भुमरे यांच्या चालकाला शेकडो कोटीची जमीन बक्षीस दिले जाते. - गिफ्ट दिला तरी त्याला टॅक्स लागणार आहे. मुद्रांक शुल्क 37 ते 38 कोटी रुपये लागतील. जर चालक एवढा मुद्रांक शुल्क आणू शकता तर भुमरे किती  आणू शकता.. आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आणू नका. सरकारच्या चौकशीमध्ये दम नाही. नियम आणि कायद्या मधे काम झाले पाहिजे.  हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. ही कारवाई संशयास्पद आहे. भूमरेंच्या चिरंजीव आमदार विलास भुमरे यांचा CDR काढला पाहिजे. त्यांचा हैदराबाद कनेक्शन समोर येईल. माझ्या कडे माहिती आहे. पण पुरावा नाही. आम्ही याबाबत रस्त्यावर उतरू... याबाबत काल्डा व कोठारी आशा दोघांचा  जमिनी बाबत नयायालयात वाद सुरू आहे. यामध्ये सालराजंगचा भूमरे यांच्या चालकाचा काहीही सबंध नाही. सालारजंग याचा मालक नाही... कोळीवाडा... - आदित्य ठाकरे रोज कोळीवाडा येथे जात असतांत. कोळीबांधव हे मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. एकनाथ शिंदे हे कोळीवाडा येथे नाटक करायल गेले असतील ऑन अजित पवार. - बारामती बंद करा, चाकण बंद करा, टी डी आर एफएसआय घ्या, तुमचे धंदे सुरू ठेवा.. ऑन देखावा.. - पाच कलंकित मंत्र्यावर देखावे करणार..या मंत्र्यांना ताबडतोब पायउतार करावा अशी आमची मागणी. या साठी सोमवारी राज्यभर आंदोलन ऑन चित्रपट - या चित्रपटाची मला स्टोरी माहिती नाही. एखाद्या मुस्लिम व्यक्तीच शिवाजी बाबत प्रेम असू शकते. - सरकारला हिंदू मुस्लिम मधील वाद संपू नये असे वाटते. समजात फूट पडावी असे वाटते. शिवाजी महाराज कुणाच्या बापाचे नाही ते जगाचे आहे. चित्रपट म्हणून स्वीकारायला काय अडचण आहे. ऑन विरोधी पक्ष नेते पद तीन वर्ष पूर्ण, काही दिवस उरले.... - मी सामान्य शिवसैनिक आहे. मी सध्या वस्तीत राहतो.मला मोठी काम करण्याची संधी मिळाली. मला वाटलं होत तीन महिन्याच्यावर मी विरोधीपक्ष नेते राहील म्हणून..मात्र मी तीन वर्षे राहिले.कुणाच्या कपाळावर पद लिहिलेले नसते. एक प्रक्रिया असते ती मान्य केली पाहिजे. - येणाऱ्या काळात यापेक्षा मोठी जबाबदारी मला मिळू शकते अशी आशा मी बाळगतो.. काही नसलो तरी मी शिवसेनेचा नेता आहे....
12
Report
AKAMAR KANE
Aug 09, 2025 06:02:36
kolhapur, Maharashtra:
Ngp shashikant शिंदे live u ने फीड पाठवले ------- नागपूर - बाईट - शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी,SP On विदर्भ दौरा - - आज शरद पवार यांच्या उपस्थितीत विदर्भात मंडल यात्रा सुरू होत आहे, सर्व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे - ही सुरुवात आहे, विदर्भ हा राष्ट्रवादीच्या विचारांचा विदर्भ राहिलेला आहे, केंद्रात आणि राज्यातही सत्तांतर झालं तरी विदर्भ या विचारांच्या पाठीमागे उभा राहिला आहे - आज अनेक लोक सोडून गेले तरी नवीन कार्यकर्ते नवीन पक्ष उभारणी करणार On मंडल यात्रा - - आम्ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख या माध्यमातून दाखवणार आहोत - ओबीसी समाजाला मंडल आयोग अंमलबजावणी या महाराष्ट्रात शरद पवार यांनी केले आहे, त्याच अंमलबजावणीनंतर ओबीसी समाजासाठी वेगळं काही सरकारने केला असे चित्र सध्याच्या सरकारमध्ये पाहायला मिळतो - वेगवेगळे भाषावाद आणि जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे,या मंडल आयोगाच्या माध्यमातून ची यात्रा काढतो आहे त्यामध्ये समाजाला आम्ही सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहोत On आदित्य ठाकरे- शिंदे अमोरा समोर - - राज्याच्या राज्यकर्त्यांनी कुठेतरी समजदारीची भूमिका घ्यावी, एखाद्या वेळेस आमोरासमोर आल्यावर कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे - एकमेकाला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असेल आणि ते सरकार कडून होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे सरकारमधल्या लोकांनी On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत, आम्ही प्रयत्न करतोय मविआ म्हणून समोर जायला, महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाताना चर्चा करून निर्णय घेणार On बेस्ट निवडणूक - - आताच्या घडीला ते दोघे एकत्र लढत असेल पण महाविकास आघाडी मध्ये तसा प्रस्ताव आला नाही, तसा प्रस्ताव येईल तेव्हा चर्चा करू, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकसभेत लोकांनी ऐतिहासिक मताने निकाल दिला आहे, विधानसभेत त्याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे विधानसभेला मतांची चोरी झाली, त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात मताचे विभाजणी न होता भविष्यकाळात चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातून हे सरकार हे बाजूला काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू On कबूतरखाना - - हायकोर्टाने निर्णय दिला असेल तर त्याचा पालन होणे आवश्यक आहे, दाना पाणी देण्यास विरोध नाही पण कोर्टाच्या आदेशाचा पालन करणे हे मनपाची जबाबदारी आहे - हा विषय भाजपच्या आमदाराने काढला, उत्तर सरकारने दिलं, म्हणजे भाजपच्या लोकांनी हा विषय मांडला आणि त्या संबंधात निर्णय झाला असेल तर समाजातील भावना घेणे आवश्यक आहे - कोर्टाचा निर्णय मानला पाहिजे आणि त्याची अवहेलना होऊ नये
13
Report
AKAMAR KANE
Aug 09, 2025 06:02:27
kolhapur, Maharashtra:
Ngp Rohit Pawar byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर - बाईट - आ. रोहित पवार,नेते,राष्ट्रवादी, SP On बेस्ट निवडणूक - (उद्धव -राज एकत्र) - बेस्ट हा मुंबईचा विषय आहे आणि ती अतिशय महत्त्वाची संस्था आहे, ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल,सरकारकडून बेस्ट कडे दुर्लक्ष केले जातात, हे दुर्लक्ष बघून उद्या जर संस्था अडचणीत येऊ नये आणि या दृष्टीने जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्र येत असेल तर त्याच्या स्वागत केलं पाहिजे - हे केवळ आता बेस्ट पुरते आहे, पुढे मुंबई महापालिकेत काय होतं ते पाहावे लागेल, कॉमन अजेंडा घेऊन एकत्र येत असतील तर काही वावगे नाही On महिला आयोग पुणे मुली प्रकरण - - मातंग समाजाच्या मुलीवर अन्याय झाला आहे, कुठेही सर्च वॉरंट नसताना घरी आणि ऑफिसला जाऊन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न इथे चालला आहे - मुलींच्या घरी पोलिस गेल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या काय भावना व वाटणार, वॉरंट नसताना ताब्यात घेतात, इंटररोगेशन वेगळ्या पद्धतीने वाद निर्माण झाल्याचा आपण बघितला आहे - मुलींचे नाव पोलिसांनी प्रसिद्ध केले नाही, आम्ही प्रसिद्ध केले नाही मात्र महिला आयोगाने त्या मुलींचे नाव प्रसिद्ध केले आहेत, हा गुन्हा आहे मग महिला आयोगाच्या बाबतीत काय केलं जातंय - महिला आयोगाला डोकं नाही आणि त्या आयोगाच्या अध्यक्षांनी, मुलींचे नाव पब्लिश करून बदनामी करणे योग्य नाही, आयोगालाही ते योग्य दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही On पवार ओबीसी - - महाराष्ट्रात समाजात वाद निर्माण केला जातोय, मुंबईचा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी मराठीचा वाद केला जातोय - राजकीय पोळी भाजून घ्यायचा भाजपच्या दृष्टिकोन आहे मंडल आयोग लागू केल्यावर महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू करण्यात आला होता - राजकीय आरक्षणासाठी गोष्टी असेल त्याचा भाजपने विरोध केला होता, कमंडल यात्रा काढली होती - मात्र सध्याचे जे विविध प्रश्न आहेत ते बाजूला राहिले आहेत आणि निवडणुका या जातीयवाद भाषावाद धर्मावादावर लढले जात आहे - आज मंडल यात्रा आमच्या पक्षाच्या ओबीसी विभागातर्फे करण्यात येत आहे -
13
Report
Advertisement
Back to top