Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

उल्हासनगर में काँग्रेस माजी नगरसेवक पर हमला, CCTV में कैद

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 24, 2025 10:49:00
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा झाला कैद anchor उल्हासनगर कॅम्प 4 मधील श्रीराम चौकाजवळील वसीटा कॉलनीमध्ये 70 वर्षीय काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे . आरोपी अजय बागुल हा परिसरात नशेचे पदार्थ विकण्यासाठी येत असतो. मंगळवारी सायंकाळी वसीटा यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी अजय बागुल याने कमरेला असलेला कोयता काढून वसीटा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसीटा थोडक्यात बचावले.या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अजय बागुल विरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणी धमकावणे या गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte तुलसी वसीटा चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 12:17:38
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_RiverDrone Feed on - 2C ----------------------------- Anchor - धारणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आलाय. 27 दरवाजे उघडून जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नांदेड मधील विष्णुपुरी प्रकल्पापर्यंतच्या सर्वच धरणाचे दरवाजे उघडन्यात आले आहेत. वरच्या भागातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीत मोठया प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी नांदेड मध्ये गोदावरी नदीला पूर आलाय. पात्राबाहेर जाऊन पुराचे नदी काठच्या शेतात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. नदी काठी असलेल्या काही नागरी वसाहतीत देखील पाणी शिरले आहे. गोदावरी नदीच्या पुराचे हे ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्य. ---------------------------
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 12:06:28
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Drowning Feed on - 2C ----------------------------- Anchor - पुराच्या पाण्यात बुडत असलेल्या आपल्या घरातून सामान काढण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील दुल्हेशाह रहमान नगर येथे आज सकाळी ही घटना घडली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड शहरातील सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. दुल्हेशाह रहमान नगर या भागात आज सकाळी चार ते पाच फूट पाणी साचले होते. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मिन्हाज खान घरातील सामान बाहेर काढत होता. मात्र पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर मिन्हाजचा मृतदेह सापडला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पुर वाढत असताना प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नाही. शिवाय प्रभावित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नाही. --------------------------------
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 24, 2025 12:03:30
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* महाराष्ट्र विषयी यांच्या मनात जो द्वेष आहे तो संकट काळामध्ये देखील दिसतो... दहा हजार कोटीची मागणी तत्काळ द्यावी हे उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे गुजरातला वाऱ्याने शिंक जरी आली प्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा लष्कराचा विमान घेऊन तत्काळ जातात विमानातूनच पाच पंचवीस हजार कोटीची मदत जाहीर करतात तुफान कुठेही असला तरी गुजरातला पहिली मदत जाहीर करतात मराठवाड्याचा अनेक भाग पाण्यात वाहून गेला आहे पंधरा लोक मरण पावली आहेत पीक नाहीतर शेत जमीन ही वाहून गेली आहे तरी केंद्राच्या काही नेत्याला इथे यावं आणि परिस्थिती बाबत मदत देता येईल का ते पाहावं याची चिंता वाटत नाही याचा अर्थ महाराष्ट्राचे नेतृत्वाचे पाणी त्यांनी चोखले आहे स्वतःच्या फोटोचे बॉक्स घेऊन मदत केला जातात... ३६ लाख शेतकरी ग्रस्त झाला आहे... हे दोन-चार टेम्पो घेऊन काय करणार आहे याला लाजा वाटल्या पाहिजेत आपण राजाचे उपमुख्यमंत्री आहात मंत्री आहात आपल्याला हे शोभत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्राला इंटरेस्ट यासाठी आहे का त्यांना मुंबई उठायची आहे गौतमदाणीच्या मुंबईचा तुर आला असता आणि संकट आलं असतं तर ते आले असते अंबानी अडाणी चे प्रॉपर्टीचा वाहून गेली असती तर कदाचित त्यांना दिल्लीत दुःख झालं असतं पण आमचा गरीब शेतकरी मेला तर जमिनीत अदारीला इंटरेस्ट नाही किती २२२१ रुपये? 36 लाख रुपये शेतकरी म्हणजे त्यांचे कुटुंब... पशुधन शेत वाहून गेला त्याचं काय करणार *पंकजा मुंडे* कृषी मंत्रांना अडवले आहे पर्यावरण, ग्राम विकास मंत्री यांना अडवले आहे ... अजून काही केलं ...त्यांना उदवस्थ शेतकरी यांनी अजून काही केलं तरी वेगळे वाटणार नाही इतका संताप शेतकरी यांच्यात आहे. वोट चोरी च्या माध्यमातून यांचे आमदार निवडून दिले आहेत... byte -- संजय राऊत मनोज कुळकर्णी feed send OB slug -- Shivasena Bhavan sanjay raut byte
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:55:23
Nashik, Maharashtra: Anchor - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरनंतर वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील पार्किंग व्यवस्थेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. रोपवे पार्किंगवर पत्रकारांनाच नव्हे तर सर्वसामान्य भाविकांनाही अवाजवी पैसे आकारले जात असल्याचे समोर आले. दिल्या जाणाऱ्या पावतीवर ना कंपनीचे नाव आहे, ना रजिस्ट्रेशन नंबर, इतकेच नव्हे तर किती रक्कम घेतली याची माहितीही नसल्याचे दिसून आले. आज टीव्ही 9 चे पत्रकार मनोहर शेवाळे, लोकशाही न्यूजचे विशाल मोरे, पुढारी न्यूजचे प्रदीप पाटील यांना देखील या अरेरावीचा अनुभव आला. त्र्यंबकेश्वरनंतर आता सप्तश्रृंगी गडावरील पार्किंग कर्मचाऱ्यांचीही उद्धट वागणूक समोर आली आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांवरील अशा बेकायदेशीर पार्किंग आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीवर तातडीने अंकुश आणण्याची मागणी होत आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:53:21
Nashik, Maharashtra:Nashik breaking - *नाशिकच्या वडनेर गेट परिसरात चिमुकल्याचा मृतदेह आढळला काल संध्याकाळी करण्यात आला होता पुन्हा बिबट्याचा एका लहान मुलावर हल्ला* - *वडिलांसोबत घराबाहेर खेळत असताना बिबट्याने दोन वर्षीय श्रुतीक वर हल्ला करत नेले होते उचलून* - लहान मुलावर बिबट्याने हल्ला करत उचुलन नेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश - वडिलांसमोर बिबट्याने या लहान मुलाला उचलून नेल्याने परिसरात होते भीतीचे वातावरण - रात्री उशिरापर्यंत श्रुतीक चे शोध वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक घेत होते - श्रुतीकचे वडील आर्मी मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे आर्मीचे जवान देखील रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम करत होते - या आधी देखील या परिसरात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करत नेले आहे उचलून
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:50:12
Nashik, Maharashtra:Nashik break - नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गावगुंडांचा हैदोस - *कोयत्याने एकावर केला हल्ला तर कोयता नाचवत केला सेल्फी व्हिडिओ* - देवळाली परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - संतोष जाधव यांना रस्त्यात थांबवत केली पैशाची मागणी; पैसे देण्यास नकार दिल्याने गावगुंडांनी केला कोयत्याने हल्ला - संतोष जाधव यांच्या खिशातील 3600 रुपये बळजबरीने काढत केली मारहाण - संतोष जाधव यांच्यावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचार सुरू - संशयित योगेश जाधव, ऋषिकेश लोखंडे, यश मोरे यांचा विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - भर रस्त्यात कोयता नाचवत मारहाण केल्याने नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण - नाशिक पोलिसांचा धाक राहिला नसल्याची नागरिकांची ओरड
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:45:16
Nashik, Maharashtra: Anchor - हैद्राबाद गॅझेटियर नुसार एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज हुतात्मा चौक ते नवीन तहसील कार्यालय, नांदगाव येथे सकल बंजारा समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात आला..या मोर्चात बंजारा समाजाचा पारंपरिक पेहराव घालून मोठ्या संख्येने महिला तर हातात सफेद झेंडे घेऊन तरुणाई देखील मोठ्या संख्येने सहभागी झाली.. तहसील कार्यालय परिसरात सभेचे आयोजन करण्यात येऊन बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली..दरम्यान, आरक्षण न मिळाल्यास आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबई, मंत्रालय व दिल्लीत धडक मारण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आला..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 24, 2025 11:38:49
Nashik, Maharashtra:*विशाल मोरे, मालेगाव* Anc: मालेगाव तालुक्यातील देवारपाडे गावात कान्होळी नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. त्या नदीतून एक मृतदेह वाहत आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली. काल पासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, आणि या पुरामुळे त्या महिलेचा मृतदेह वाहून आल्याचं सांगितलं जातं. मृत महिलेचं वय साधारणतः 30 ते 35 वर्षांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. गावातील नागरिक मधुकर सरोदे व रवींद्र गलांडे यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करत मृतदेह पाण्यातून काढण्याचं काम केलं. यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी. आय. प्रीतम चौधरी, पी. एस. आय. कोळी, दिपक फुळमाळी, खुरसाने रतीलाल वाघ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह मालेगांव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 24, 2025 11:35:43
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- अतिवृष्टी पूर केस स्टडी फीड 2C Anc- अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे जिल्ह्यातील 755 गावातील 3 लाख 23 हजार शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून 2 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अनेक कुटुंबावर आभाळ कोसळला आहे सर्वात जास्त हानी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात झाली आहे शेवगाव तालुक्यातील वरुड गावात सबंध गावात पाणी शिरल्याने घरातही काही राहिलं नाही आणि शेतातही काही राहिलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व्हीओ:- हे आहे शेवगाव तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार लोक वस्ती असलेलं वरुड गाव गावात सतत दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतात कमरे एवढं तर घरात गुडघ्या एवढं पाणी साचलं होतं कालपासून पावसाने उघडीप दिली आहे घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान अजूनही पाहायला मिळत आहे पाऊस उघडला असला तरी ग्रामस्थ शेतकरी अतिवृष्टीच्या या धक्क्यातून सावरले नाहीत बाईट:- आसराबाई खराडे, महिला, वरूर व्हीओ:- गावाच्या परिसरात असलेली आठ ते दहा हजार हेक्टर शेती आणि शेतीतील पीक या मुसळधार पावसामुळे पूर्णतः नष्ट झाले आहेत पाऊस उघडून पूर्ण एक दिवस उलटून गेला आहे तरी शेतामध्ये अडीच फुटापर्यंत पाणी आहे या भागातील ऊस कापूस कांदा तुर सोयाबीन हे पीक पूर्ण पणे नष्ट झाला आहे अगदी हातात तोंडाशी आलेला घास फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे 121:- गणेश वावरे,शेतकरी, वरूर व्हीओ:- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या भागाचा दौरा केला आहे ज्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्या भागातील सरसकट पंचनामे करून दिवाळीच्या आधी मदत देणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितला आहे बाईट:- दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री एफ व्हीओ:- जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे लाखो रुपयांचं हातात तोंडाशी आलेलं पीक उध्वस्त झाल आहे घर उध्वस्त झाले शेती उध्वस्त झाली आहे अशात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदत सर्व नुकसान भरून काढू शकत नाही मात्र मिळणाऱ्या मदतीची रक्कम तरी वेळेत मिळते का हेच पाहणं महत्त्वाचं आहे लैलेश बारगजे झी 24 तास अहिल्यानगर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 11:32:24
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_CHP_TIGER_ATTACK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर भामडेळी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू,  अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गेटजवळील सितारामपेठ बिटात वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केलाय. घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून मृताचे नाव अमोल बबन नन्नावरे, वय 38, रा. भामडेळी आहे. इरई धरणाच्या बाजूला शेतातील  कापूस पिकावर फवारणी करीत असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे वडील आणि मित्र त्या ठिकाणीच काम करीत होते. आरडा ओरड केल्यानंतर काही वेळाने वाघ मृतदेह सोडून जंगलात गेला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतकाची पत्नी प्रेमिला नन्नावरे यांना तत्काळ 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले असून, शेतात काम करताना सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे.      आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 24, 2025 11:31:36
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील आलेगाव-पातुर मार्गावरील खड्डे आणि डबक्यांच्या समस्येमुळे संतापलेल्या ग्रामस्थांचा आज रस्त्यावर संताप फुटला. ग्रामस्थांनी थेट तीन फूट खोल डबक्यात उतरून प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखे आंदोलन छेडले. तब्बल तीन तास ठिय्या दिल्याने वाहतूक ठप्प झाली होती.गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. वाहनधारकांची इंजिनं बंद पडण्याच्या घटना, विद्यार्थ्यांचा तसेच नोकरदार वर्गाचा होणारा उशीर यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढत गेला अखेर आज मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आले आणि डबक्यात उतरून आंदोलन केले.तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या व नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अखेर तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले, तर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट फोनवर ग्रामस्थांशी संवाद साधून उद्या प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आलेगाव-पातुर मार्गावरील खड्डा व डबक्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून, तोडगा निघाला नाही तर आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 24, 2025 11:31:11
Buldhana, Maharashtra:ASSIGNED CASE STUDY SPL PKG स्वप्नांचा चिखल आणि वास्तवाचा गाळ दिवाळी नव्हे दिवाळाची अतिवृष्टी Anchor - बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा काठ... हिरवीगार शेती... आणि शेतामध्ये डौलत असणारी पिकं... पण आज ही परिस्थिती बदलली आहे. आज इथे हिरवीगार शेती नाही, तर फक्त चिखलाने माखलेल्या सोयाबीनच्या फांद्या आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आहेत. या अश्रूंमागे आहे अतिवृष्टीने केलेला घात आणि एका कुटुंबाचे उद्ध्वस्त झालेले स्वप्न. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... VO 1 - पैनगंगा नदीच्या काठावर वसलेलं पाडळी गाव. याच गावात राहणाऱ्या उषाबाई राजेंद्र मानेकर यांच्या चेहऱ्यावर आज चिंतेची एक गडद छटा आहे. त्यांच्या डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं. उषाबाईंच्या कुटुंबाची गुजराण एका एकर शेती आणि पतीच्या मजुरीवर होते. या एका एकर शेतीत त्यांनी स्वप्नं पेरली होती. मात्र, अस्मानी संकटाने त्यांची स्वप्नं क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. VO 2 - शेतकरी कुटुंबाची अवस्था नेहमीच कठीण असते. पण यावर्षी अतिवृष्टीने या कुटुंबाचं कंबरडं पूर्णपणे मोडलं आहे. उषाबाईंनी मोठ्या आशेने यावर्षी सोयाबीन लावलं होतं. पेरणीपासून कापणीपर्यंत कुटुंबाने अक्षरशः घाम गाळला. २५ हजार रुपयांचा खर्च करून त्यांनी पीक जगवलं. मात्र, अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं. सोयाबीनचं पीक पूर्णपणे सडलं. BYTE - उषाबाई मानेकर, नुकसानग्रस्त ग्राफिक्स: * शेती: १ एकर * पीक: सोयाबीन * लागत खर्च: २५,००० रुपये * अतिवृष्टीमुळे: पीक नष्ट Vo3- या कुटुंबाला पतीच्या मजुरीचा आधार आहे. उषाबाईंचे पती बांधकाम मजूर आहेत ... गुडघ्याचे शस्त्रक्रिया होऊनही त्यांना कामावर जावेच लागते.... कारण आधीच खासगी बँकेचं कर्ज आणि जुनं कर्ज माफ न झाल्यामुळे चिंता वाढली आहे. आता समोर दिवाळी-दसरा असे सण आहेत, ते साजरे कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. Vo 4 - या कुटुंबात दोन मुले आहेत. एक आठवीत आणि एक तिसरीत शिकतो. आई-वडिलांनी मुलांना चांगलं शिक्षण देऊन मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं आहे. पण मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, ही भीती उषाबाईंना सतावते आहे. परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शासनाकडून मदत मिळेल, अशी आशा त्यांना आहे. पण ही मदत वेळेत मिळेल का, हा हृदय द्रावक प्रश्न उषाबाईंचा छोटा मुलगा कृष्णा विचारतोय..... Byte - कृष्णा मानकर End PTC - मयूर निकम, प्रतिनिधी
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top