Back
70 वर्षीय शेतकरी नदीत वाहून गेला, ग्रामस्थांची धावपळ!
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 17:01:13
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1808ZT_JALNA_FARMER_CARRY_R1(4 FILES)
जालना : बहिरी नदीत वयोवृद्ध शेतकरी पाय घसरल्याने गेला वाहून
अँकर : चालताना पाय घसरल्यानं तोल जाऊन एक शेतकरी नदीत वाहून गेलाय.जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील एकरूखा गावात ही घटना घडलीय.70 वर्षीय अण्णासाहेब सानप असं नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अण्णासाहेब सानप हे त्यांच्या शेतातून घरी परतत असताना बहिरी नदीत पाण्याच्यां प्रवाहात पाय घसरुन वाहून गेले.वाहून गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तहसीलदार यांना माहिती दिली. घटनास्थळी तहसील,आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच पोलीस प्रशासन दुपार पासून वृद्ध शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत.रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरूच होतं.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 18, 2025 17:46:30Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरातील रस्त्याची चाळण,
खड्ड्यांमुळे होत आहेत रोज अपघात
Ulh potholes
Anchor उल्हासनगर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा मोठे अपघात होत आहेत, उल्हासनगर शहरातील कॅम नंबर तीन भागातील गुरू नानक शाळेजवळ रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे एक मालवाहू टेम्पो पलटी झाला सुदेवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाहीये धक्कादायक मध्ये याच ठिकाणी सकाळी एक टेम्पो पलटी झाला होता. उल्हासनगर शहरात रोज अपघात घडत असताना प्रशासन आणि राज्यकर्ते मात्र झोपले आहेत असा आरोप नागरिक करत आहेत.
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 17:01:04Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_JALNA_FARMER_CARRY(1 FILES)
जालना : बहिरी नदीत वयोवृद्ध शेतकरी पाय घसरल्याने गेला वाहून
अँकर : चालताना पाय घसरल्यानं तोल जाऊन एक शेतकरी नदीत वाहून गेलाय.जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील एकरूखा गावात ही घटना घडलीय.70 वर्षीय अण्णासाहेब सानप असं नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अण्णासाहेब सानप हे त्यांच्या शेतातून घरी परतत असताना बहिरी नदीत पाण्याच्यां प्रवाहात पाय घसरुन वाहून गेले.वाहून गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तहसीलदार यांना माहिती दिली. घटनास्थळी तहसील,आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच पोलीस प्रशासन दुपार पासून वृद्ध शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत.रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरूच होतं.
13
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 18, 2025 15:50:52Beed, Maharashtra:
बीड : चाकरवाडी येथे दुकान लावण्यावरून तुफान हाणामारी; चार जणांवर गुन्हा दाखल
Anc- बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील मंदिर परिसरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तांच्या या गर्दीत अचानक दोन व्यवसायिकांमध्ये दुकान लावण्यावरून वाद निर्माण झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच तुफान हाणामारीत परिवर्तित झाला.
दोन्ही गटाकडून नारळ फेकून हाणामाऱ्या झाल्या. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा राडा झाला. भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 15:50:07Raigad, Maharashtra:
स्लग - कोलाड इथं सात जणांची सुखरूप सुटका ......
अँकर - कोलाड येथील संजय नगर मध्ये पुराच्या पाण्यामुळे घरात अडकून पडलेल्या सात जणांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. एका घरात वृद्ध जोडपे राहत होते ते माळ्यावर जाऊन बसले होते. त्यातील एक महिला आजारी होती. या दोघांना समजावून बाहेर काढण्यात आले. शेजारच्या एका घरातील पाच जणांना रबर बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 18, 2025 15:45:24Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1808ZT_INDAPURINDRESHWR
FILE 5
इंदापूरच्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील चौथ्या सोमवारी
फुलांची आरास ...
भाविकांची गर्दी...
Anchor:- पुणे जिल्ह्यातील
इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील चौथ्या सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात चौरसाकृती रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास साकारण्यात आलीय
. सोमवारी १८ ऑगस्ट रोजी इंद्रेश्वर मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक घालण्यात आला.
ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शास्त्रीय अभंग वाणीची अभंग संध्या हा कार्यक्रम गायक निखिल कुलकर्णी व तबलावादक महेशकुमार
झगडे यांची सुरेल मैफिल पार पडलीय
दिवसभराच्या काळात
इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील आलेल्या भक्तिभावाने इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेत होते. मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी स्वस्तिक तसेच आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 15:03:45Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_JALNA_GORANTYAL(7 FILES)
जालना :भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर शिविगाळ
शिविगाळ करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करा
कैलास गोरंट्याल यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
सायबर पोलिसांकडेही केली तक्रार
अँकर :जालन्यातील भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर एकाने शिविगाळ केलीये.तेजू नावाचं हे अकाऊंट असून रहिम तांबोळी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर गोरंट्याल यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर शिविगाळ करणाऱ्याला तात्काळ अटक करावी यासाठी गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलीये.सायबर सेलकडे देखील तक्रार करण्यात आलीय. ही पोस्ट करण्या मागे कोण आहे याचीही चौकशी पोलिसांनी केली पाहिजे अशी मागणी गोरंटयाल यांनी केलीय. दरम्यान शिविगाळ करणाऱ्याला अटक न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा ईशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.दरम्यान ज्याने हे कृत्य करायला भाग पाडलं त्याच्या अंगात 50 जणांचं रक्त असल्याचा खळबळजनक आरोप गोरंटयाल यांनी केलाय.
बाईट- कैलास गोरंट्याल, नेते, भाजप
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 18, 2025 15:02:16Bhimashankar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Bhimashankar DCM Shonde
File:07
Rep: Hemant Chapude(Bhimashankar)
भीमाशंकर
एकनाथ शिंदे बाईट
- भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्त येत असतात. ही परंपरा कैक वर्षांपासून सुरुये. त्याप्रमाणे मी सुद्धा शेवटच्या श्रावणी सोमवारी दर्शन घेत असतो. खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा सुरु केली होती, ती परंपरा सुरु असल्याचं मला आनंद आहे, समाधान आहे. श्रावण महिन्यात देशभरात असंच वातावरण पहायला मिळतं. मी लाखो शिवभक्तांपैकी एक आहे.
- इथले रस्ते मी पाहिले, चांगला रस्ता आपण करु. 280 कोटींचा विकास आराखडा तयार केलेला आहे. भक्तांची गैरसोय होणार नाही, याची काळजी सरकार नक्की घेईल.
*ऑन अतिवृष्टीमुळं संकट*
- वरुणराजाचे आगमन झालेलं आहे. आज भीमाशंकर कडे साकडं घालतो. आमचा बळीराजा सुखी होऊ दे, संकटातून मुक्त कर, त्यांना सुख समाधानाचे दिवस येऊ दे.
*ऑन शिवभोजन थाळी निधी*
- ज्या काही अडचणी आहेत, ते सरकार दूर करेल. सर्व सामान्यांना न्याय देईल.
*ऑन रोहित पवार भरष्टाचाराचे आरोप*
- भीमाशंकर ने सर्वांना सदबुद्धी आणि सुबुद्धी द्यावी.
Byte: एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया भिमाशंकर पुणे..
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 18, 2025 14:47:53Raigad, Maharashtra:
स्लग - अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ...... पुराचे पाणी नागोठणे शहरात शिरण्यास सुरुवात ..... व्यापाऱ्यांची आवराआवर, नागरिकांची धावपळ .......
अँकर - अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नागोठणे शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. शहरातील एसटी बस स्थानक, टेम्पो स्टँड, भाजी मार्केट, कोळीवाडा परिसर पाण्याखाली गेल्याने नागरिक सतर्क झाले असून व्यापाऱ्यांनी सामानाची आवरा आवर करायला सुरुवात केली आहे. बसस्थानकात पाणी आल्याने एसटी बसची वाहतूक शहरा बाहेरून सुरू होती. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असं आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीने केलं आहे.
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 14:47:41Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
slug name -SAT_RICKSHAW_POLICE
सातारा - साताऱ्यात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत बेभान झालेल्या रिक्षाचालकाने थेट महिला पोलीस कॉन्स्टेबललाच रिक्षासोबत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबा माळ येथून मार्केट यार्ड पर्यंत सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
विओ 1-मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवणाऱ्या चालकाला अटकाव करण्याचा प्रयत्न महिला पोलिसांनी केला. मात्र याच दरम्यान चालकाने अचानक रिक्षा वेगात चालवत महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याच दरम्यान बेभान रिक्षाने ६ ते ७ दुचाकी व चारचाकींना धडक दिली. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 18, 2025 14:47:32Nashik, Maharashtra:
nsk_cylinderblast
Anchor - चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे पत्र्याच्या घरामध्ये ठेवलेला गॅस सिलेंडर अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर धावले.सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याची नासधूस झाली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले..
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 18, 2025 14:47:22Nashik, Maharashtra:
nsk_alert
fed by 2C
Breaking image attached
नाशिक शहरात जलसंपदा विभागाचा नागरिकांसाठी अचानक अलर्ट जारी
पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने वर्तविला धोका
पाणी सोडावे लागल्यास गोदावरीची पातळी अचानक वाढू शकते
गोदाकाठावरील सर्व गावांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा
येणाऱ्या तीन दिवसात केव्हाही सोडले जाऊ शकते धरणातून पाणी
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 18, 2025 14:47:11Kalyan, Maharashtra:
डोंबिवली अंबनापूर बदलापूर रस्त्याला नदीचा स्वरूप..
डोंबिवली एमआयडीसी अंबरनाथ बदलापूरला जोडणाऱ्या रस्त्यावरती कटाई नाका ते नेवाळी परिसरातील दोन्ही बाजूला रस्त्याला नदीचा स्वरूप रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचल्याने अनेक गाड्या बंद पडल्या
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 14:31:04Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BFLO_DEATH(1 FILE)
नांदेड :मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या,शेतकऱ्याचं 50 लाख रुपयांचं नुकसान,जिल्ह्यातील 200 जनावरे वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं दीड ते दोन कोटी रुपयांचं नुकसान
अँकर :नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या आहेत.या म्हशींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्यानंतर यातील काही म्हशी या वाहून गेल्या आहेत.यामध्ये या शेतकऱ्याचं 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.जिल्ह्यात तब्बल 200 जनावरे वाहून जाऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अंदाजे दिड ते 2 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.वाहून गेलेल्या जनावरांची प्रत्यक्ष आकडेवारी अजूनही समोर आलेली नसली तरी प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे.मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.दरम्यान 50 म्हशींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याचं तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 18, 2025 14:30:27Kolhapur, Maharashtra:
Kop Ashim Sarode PC
Feed:- Live U
Anc:- राजकीय सोयीसाठी पडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे... ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते... सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हेतूने प्रभाग पाडून घेतले, त्यामुळं वार्डात एक मत आणि एक नगरसेवक ही पद्धत बाजूला पडली...प्रभाग पडणं हे राज्य सरकारच्या अधिकारात येत असलं तरी त्याचा हेतू वेगळा आहे. आपल्या सोयीच्या उमेदवारासाठी सोयीनुसार प्रभाग पडून घेतले जातात त्यामुळे एखाद्या वार्डात प्रामाणिकपणे समाजसेवा करणारा कार्यकर्ता बाजूला पडतो. शिवाय बहुसदस्यीय प्रभागात कुणावर कुठली जबाबदारी हे स्पष्ट केलेले नसते, त्यामुळं जनतेने कुणाकडे दाद मागायची हा देखील प्रश्न निर्माण होतो...शिवाय महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही असेही सरोदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीय.
Byte:- असीम सरोदे, वकील
14
Report