Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवल्या में भटकते कुत्तों ने पांच–छह लोगों को काटा, उपचार के लिए अस्पताल

SKSudarshan Khillare
Dec 05, 2025 13:41:54
Yeola, Maharashtra
येवल्या शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आज सायंकाळच्या सुमारास एका भटक्या कुत्र्याने नगर मनमाड महामार्गावर पाच ते सहा जणांना चावा घेतला या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे अन्यथा भटकी कुत्रे नगरपालिकेत आणून सोडू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 05, 2025 11:47:40
Yavatmal, Maharashtra:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नुकतीच निवड झालेल्या पायल किनाके यांनी महाविद्यालयातील छात्र संघ निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सरकारची घेराबंदी करणार असल्याचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांवर एबीव्हीपीने मोर्चे काढून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच छात्र संघ निवडणुका घेण्याबद्दल मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांपुढेही याबाबत मागणी केलेली आहे, मात्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे धडकेल असा इशारा पायल केला यांनी दिला. एबीव्हीपी चे राष्ट्रीय अधिवेशनात सामाजिक शैक्षणिक प्रस्ताव पारीत झाले असून, जेन झी चळवळ व भारतीय युवा, ए आय चॅट जीपीटी व शिक्षण, बांगलादेशी घुसखोरी व समसामायिक सुरक्षा प्रश्न, लोकसंख्या असंतुलन व विकसित भारताचे उद्दिष्ट, ऑपरेशन सिंदूर व सुरक्षा परिदृश्यातील बदल या विषयांवर सखोल चर्चा झाली. अशी माहिती पायल किनाके यांनी दिली.
120
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 05, 2025 11:23:33
164
comment0
Report
SKShubham Koli
Dec 05, 2025 11:16:21
Thane, Maharashtra:महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेकरांसाठी निधी कमी पडू दिला नाही; विविध प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. ठाणेकरांसाठी एक गोड बातमी: घोडबंदर परिसरात नवीन तिसरं नाट्यगृह निर्माण होत असल्याची घोषणा, 7,350 स्क्वेअर फूट जागेवर भव्य नाट्यगृह. भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो-4 प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वाला; डिसेंबरपर्यंत लोकार्पणाचा प्रयत्न. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी; जोड रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे; 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTओची 5 टीम स्कॉड वाहतूक नियंत्रण देणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वेगाने विकासकामं करीत आहेत. घोडबंदर रोडवरील सेवा रस्तावर ट्रॅफिकचा विचार; 60 मीटरचा रस्ता फाउंटन ते नरिमन पॉइंटपर्यंत; लवकरच एकत्र केला जाईल. एमएमआर क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने पिकल बॉल टर्फ बनवला; उद्घाटन झाले. पावलोफ शेष प्रकल्प ठाणेकरांना देण्यात येत आहेत. 21 तारीख निकालाबद्दल चर्चा; निवडणुकीचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेेत. खापर फोडणार नाही; अधिकारी चांगले काम करतात; 15 तारखेपूर्वी सर्व काम पूर्ण.
76
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 05, 2025 11:08:42
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथील आर्थिक फसवणुक प्रकरण चांगलं गाजलं होतं. आता याप्रकरणी शनीशिंगणापूर देवस्थानचे दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे..सचिन शेटे आणि संजय पवार असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत...गुरुवारी मध्यरात्री सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक घोटाळा झाला आहे. या माध्यमातून जमा झालेला देणग्यापैकी काही निधी दोघा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वगळला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे.. या दोघांबरोबरच अजून काही बडे मासे हाती लागतात का याचा पोलीस तपास करत आहेत
132
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 05, 2025 11:06:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या भूमीवरून राज्यातील सर्व नागरिकांना नमन करून धन्यवाद देतो... वर्षभरापूर्वी मोठा आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिले. हा एक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित वर्ष आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता वेगवेगळ्या योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या.. वर्षभरानंतर पुन्हा जनतेला अस्वस्थ करते, असाच महाराष्ट्र पुढे जात राहील, जात राहील , जात राहील. २०१४ते १९ या काळात दोन वेळा दुष्काळाचा सामना करावा लीगल. त्यावेळी एकीकडे विजेची आणि दुसरीकडे पाण्याची अडचण असल्याची गंभीर समस्या होती. शेतकऱ्यांची मागणी असायची दिवस १२ तास वीज द्या.... आपण जलयुक्त शिवार योजना केली. आणि रिपोर्ट मध्ये आले महाराष्ट्राची पाणी पातळी वर आली , महाराष्ट्राची पाणी पातळी वर आली. रात्री अनेक अडचणी शेतकऱ्यांना होती, शेतीवर अनेक बंधने त्या काळी शेतीवर आली होती. फिडर वयक्तिक करायचे निर्णय केला होता, याचा पाहिला प्रयोग राळेगण सिद्धीमध्ये केला आणि तो यशस्वी झाला.... दुर्दैवाने मध्यंतरी सरकार म्हणते त्या काळी योजना बंद पडली ... पुन्हा सरकार आले तेव्हा हक्काने मी ऊर्जा विभाग मागून घेतले.. आपली महाराष्ट्राची योजना केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून लागू करण्याचे सांगितले.... सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी केंद्राने समाविष्ट केली त्यानंतर महाराष्ट्र थांबला नाही.. देशात कुसुम अंतर्गत ९ लाख पंप आहेत. त्यापैकी ७.५ लाख पंप फक्त महाराष्ट्राने लावले... देशात आज आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. २०१३- १४ साली चार चार वर्षाचा पेंडिंग असायचं... विधानसभेत यावर सर्वात जास्त चर्चा व्हायची. आम्ही पेड पेंडिंग संपवली. दरवर्षी २०-२५ लावणारा महाराष्ट्र एक महिन्यात ४५ हजार पंप लावू शकला.... ज्यावेळी मी ही योजना विधानसभेत घोषित केली त्यावेळी विरोधकांनी याचा मजाक उडविले मात्र आम्ही ही करून दाखविले. एका महिन्यात लोकांचे पंप शेतात लागायला लागले आहेत. एक नवीन रेकॉर्ड आपण तयार केलेलं आहे. हा आमचा रेकॉर्ड आम्हीच पुन्हा तोडून दाखवू. पुढच्या वर्षी १० लाख पंप पूर्ण झाले पाहिजे. आपण आता कुठेही अडकणार नाहीं. महाराष्ट्र आता पहिले राज्य होत आहे. शेतकऱ्यासाठी वेगळी कंपनी तयार करून वीज देणार. १६ हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना मिळेल. दिवसा वीज, २५ वर्षे बिल भरावे लागत नाही, पाच वर्षे आम्हीच बिल घेणार नाही, मात्र पाच वर्षानंतर कुणाला काय माहिती सूर्याच्या आशीर्वादाने सौर ऊर्जेत परिवर्तित केल्याने पर्यावरणाची हानी टाळणार आहे. सव्वा रुपया आणि दीड रुपया एवढा शेतकऱ्याकडून बिल करायचा ६.५० रुपयाचा लॉस असायचा. ही वीज सरासरी ३ रुपयांनी पडत आहे. साडेतीन रुपये आताच कमी झाले आहे. दरवर्षी वीजच भाव कमी करणार आहे. 3 टक्क्यांनी विजेचे भाव कमी केले जाणार. या योजनेमुळे करू शकलो. ज्या 6 पुरवठादार कंपन्या होत्या, त्या मोठ्या कंपन्या झाल्या आहेत. 1 लाख रोजगाराची संधी ग्रामीण भागात तयार झाली आहे. ऊर्जा क्षेत्र करिता नवीन दिशा महाराष्ट्राने निर्माण केली आहे. यात मराठवाड्याने त्याची छत्रपती संभाजीनगर ने लीड घेतली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागात सर्वाधिक स्वागत या कृषी पंपाचे होत आहे. मागेल त्याला शेततळे, आच्छादन, विविध औजारे, ड्रिप ९० ते १०० टक्के सबसिडीवर दिली जात आहे. शाश्वत भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याचे प्रयत्न सरकार करीत आहेत. नदीजोड प्रकल्प सरकारने हातात घेतले आहे. यापिधीने दुष्काळ पहिला, पुढची पिढीने पाहू नये म्हणून नदीजोड प्रकल्प हातात घेतले आहे. सांगली आणि कोल्हापूरचे १०० TMC वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणार आहे. यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त पाहायला मिळेल, सरकारने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे.... विदर्भातही दुष्काळमुक्त होणार आहे. पुढील चार वर्षात मोठा परिणाम शेतीक्षेत्रात पाहायल मिळाले.. एक वर्षे पूर्ण झाले आहे काय काय सांगावे आणि काय नाही असे मला झाले आहे... अतिवृष्टीने शेततकऱ्यांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या खात्यात पैशे पोहोचवण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकरी जोपर्यंत शाश्वत शेतीकडे वळत नाही, तो पर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील...
203
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 05, 2025 11:02:02
Parbhani, Maharashtra:नवरी मुलीचा फोटो 2c केला आहे हल्ली लग्नानंतर नवरी पळून जाण्याच्या घटनेत वाढ झाली असून नवर्या मुलाची फसवणूक करणारी टोळी समोर आलीये, सोने आणि पैसे घेऊन नवरी भुर्रर्र झाल्याची घटना घडलीये, नवरदेवाचे 2 लाख 90 हजार रुपयाने फसवणूक झाल्याचा गुन्हा परभणीच्या पालम पोलीस ठाण्यात दाखल झालाय, पुणे येथील एका तरुणाला ईचलकरंजी येथील एजटाने उपवर मुलीचे फोटो दाखविले, त्यापैकी एक मुलगी या कुटुंबाला पसंत आल्याने पुणे येथील कुटुंब थेट परभणीच्या पालम शहरातील केरवाडी येथे पोहोचले,येथे एका घरात मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाला मुलगी पसंत आल्यानंतर एका मंदिरात लग्न लावून देण्यात आलं, मुलीला पुणे येथे घेऊन जात असतांना गाडी आंबेजोगाई येथे थांबली असता नवरी मुलगी सिने स्टाईलने पाठीमागून येत असलेल्या कारमध्ये बसून पळून गेली, मुलीचे आई- चेहरा ब्लर्क करणे, सरला मदुकर कोलते अश्या नावाचे बनावट आधार कार्ड बनवून मुलीच्या आईची खूप गरीब परिस्थिती आहे असे सांगत,मुलीने एजंटमार्फत 2 लाख 90 हजार रुपये उकळले,लग्नात मणी मंगळसूत्र जोडवे असे 35 हजार रुपयांचे दागिने तिच्या अंगावर घालण्यात आले, मुलगी दाखवताना केरवाडी येथील दोन महिलांना पाचशे पाचशे रुपये देऊन त्या मुलीचं हेच घर आहे असं सांगण्यात आले,त्या महिलांना चहा फराळ पाण्याची नवरा मुलाची सोय केली, पुणे येथील फसवणूक झालेल्या या कुटुंबाच्या कोल्हापूर सोलापूर नांदेड,लातूर आणि परभणी येथील एजंट संपर्कात आले होते, विवाह-जुळवणीच्या नावाखाली अशा प्रकारची अचूक योजना आखून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे, पालम पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून 11 जणांवर फसवणुकीसह विविध कलमानव्ये गुन्हे दाखल केले असुन आरोपीच्या मागावर पथके पाठवली आहेत, गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी
208
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 05, 2025 10:51:46
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये शिवसेना भाजप मध्ये श्रेयवादा स्वर्गीय आनंद दिघे पुलावरून श्रेयवादाची लढाई भाजपाचे उद्घाटन पाच वाजता त्या आधीच शिवसेनेने पूल वाहतुकीसाठी केला खुला. कल्याणचा एफ केबिन जवळील स्वर्गीय आनंद दिघे ब्रिजच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून देखभाल दुरुस्ती च्या कामासासाठी दहा दिवस ब्रिज बंद करण्यात आले होते आज या ब्रিজ चे काम संपूर्ण झाल्याने संध्याकाळी पाच वाजता हा ब्रिज नागरिकांसाठी खुला करण्यात येणार होतं भाजपाचे आमदार सुलभा गायकवाड यांनी या पुलाची पाहणी केली व पाच वाजता हे नागरिकांसाठी खुला करणार होते याआधीच शिवसेनेने नागरिकांसाठी ब्रिज खुला करण्यात आले आहे त्यामुळे श्रेयवादाची ची लढाई समोर आली आहे यामुले शिवसेना भाजपमधील संघर्ष वाढणार का? असा सवाल उपस्थित होतं आहे. Byte :- संपर्क प्रमुख महेश गायकवाड शहर प्रमुख निलेश शिंदे byte.. सुलभा गायकवाड आमदर
87
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 05, 2025 10:48:44
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिले में बहुचर्चित पुणे–नाशिक हाईस्पीड रेल प्रकल्पाला अखेर ब्रेक लागला. जुन्नर मार्गे खेड, आंबेगाव सहित स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रश्नानुसार जुन्या मार्गाला रद्द करण्यात आला. संसदेत आमोल कोल्हे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन मार्गाची घोषणा केली आणि जुन्या मार्गाला रद्द केलं. नव्या नियोजनानुसार रेल्वे आता अहिल्यानगर–शिर्डी मार्गे नाशिककडे जाईल. या निर्णयामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर भागातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा तात्पुरत्या धक्क्यास होत्या. विज्ञान प्रकल्प व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचं मंत्रालयाचं मत आहे.
151
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 05, 2025 10:19:24
Kalyan, Maharashtra:कल्याणात जलवाहिनी फुटल्याने शाळा सलग 3 दिवस बंद ठेवण्याची वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय परिणाम कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरातील मेट्रोच्या कामामुले केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे. त्यातच आता दुसरीकडे रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होतं आहे तसेच दुसरी कडे या परिसरातील के.सी. गांधी शाळाही सलग तीन दिवस बंद ठेवावी लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी के.सी. गांधी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
175
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 10:05:23
Dharashiv, Maharashtra:धाराशिव — छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड विजयानंतर तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अर्पण केलेली कवड्यांची पौराणिक माळ… आणि आई तुळजाभवानीने भवानी तलवार देताना दिल्याची लोकआख्यायिका! इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेली ही माळ आजही तानाजींच्या वंशजांकडे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता हीच माळ तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी आणावी, अशी मागणी जोर धरतेय. सिंहगडाच्या गडकोटावर तानाजींनी प्राण अर्पण केले… आणि त्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गळ्यातील कवड्यांची माळ तानाजींना अर्पण केली—अशी परंपरागत माहिती इतिहासात नोंदली आहे. तानाजींच्या वंशजांकडे ही माळ अजूनही जपली जात असल्याचे सांगितले जाते. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना हीच माळ दिल्याची लोकआख्यायिका… म्हणून या माळेला धार्मिक आणि ऐतिहासिक—दोन्ही प्रकारचा अफाट मान आहे. “ही माळ म्हणजे मराठा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. तुळजापूर मंदिरात काही दिवसासाठी का होईना—दर्शनासाठी आणावी. हजारो भाविकांना ही परंपरा प्रत्यक्ष पाहता येईल.” Byte सुनील नागने,मराठा क्रांती मोर्चा “कवड्यांची माळ ही केवळ दागिना नाही… ती शिवछत्रपती आणि तानाजींच्या नात्याचं प्रतिक आहे. तुळजाभवानी परंपरेशी जोडलेली असल्याने तिचं सांस्कृतिक मूल्य प्रचंड आहे. संवर्धनासह सार्वजनिक दर्शन ही योग्य दिशा ठरेल.” BYTE सतीश कदम इतिहास तज्ञ भाविक आणि मराठा संघटनांकडूनही ‘इतिहास लोकांसमोर आला पाहिजे’ अशी मागणी सुरू आहे. राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पुजाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक परंपरा आणि शिवकालीन वारसा— या सर्वांचा संगम असलेली कवड्यांची माळ आता तुळजापूर मंदिरात आणावी, ही मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे भक्त-इतिहासप्रेमींचं लक्ष लागलंय.
190
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 09:45:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात,या मागणीसाठी व्यापाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते, अशा अनेक गोष्टींमुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मात्र राज्य शासनाकडून व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी आज मार्केट यार्ड मधील सर्व व्यवहार बंद पाळत आंदोलन केलं आहे.
102
comment0
Report
Advertisement
Back to top