Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

31 मार्च को भारी आंधी-तूफान के साथ ग्यारपीट और 60 किलोमीटर प्रति घंटे तक हवाओं की चेतावनी

VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 02:47:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. मात्र, या तापमानासोबतच आता जिल्ह्यावर अस्मानी संकट घोंगावत आहे. येत्या ३१ मार्च रोजी शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, ३० मार्चपासून ढगाळ वातावरण निर्माण होईल. मात्र, खरा धोका ३१ मार्चला आहे. या दिवशी थंडरस्कॉलचा इशारा देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. यामुळे झाडे पडणे किंवा पत्रे उडण्याचे प्रकार घडू शकतात. एप्रिलच्या सुरुवातीला तापमानात २ अंशांची घट होऊन ते ३६ अंशांपर्यंत खाली येईल, मात्र पावसाचा जोर कायम राहील
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 04:04:02
1079
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 04:03:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आसेगावात मृत आढळलेल्या महिलेचा खून; पोस्टमॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासा ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा-आसेगाव मार्गावरील पुलाखाली आढळलेल्या अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूबाबत मोठा खुलेआला झाला आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणात आता पोस्टमॉर्टेम अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अहवालात महिलेच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, या मारहाणीमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दौलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे तसेच आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
1035
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 28, 2026 03:50:06
Vasai-Virar, Maharashtra:सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या काळात नालासोपारा पूर्वेतील धानिव परिसरातील गुजरात गॅसच्या CNG पंपावर ग्राहकांकडून जादा पैसे उकळल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत पंप सील केला है. इंधन दरवाढीच्या अफवांचा फायदा घेत वाहनचालकांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी छापा टाकून कर्मचाऱ्यांना जादा पैसे घेताना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान त्यांच्यावर धक्काबुक्की करत घेराव घालण्यात आला होता. या प्रकरणी पंप मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पंप कारवाई दरम्यान सील करण्यात आला आहे.
1097
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 28, 2026 03:48:56
999
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 28, 2026 03:32:38
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारंजा जवळील लोहार परिसरात लोकेशन क्रमांक १९७ भीषण अपघाताची घटना घडली आहे.नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकचा इंधन पुरवठा करणारा पाइप तुटल्यामुळे तो ट्रक रस्त्यावरच बंद पडला.हा ट्रक १०० किमी वेग मर्यादेच्या मार्गावर उभा राहिल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.सदर घटनेनंतर ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणा व वाहतूक पोलिसांना पहाटे ५ वाजल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र, दीर्घ वेळ कोणतीही मदत न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली.दरम्यान,मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला.अपघातामुळे बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबली होती.घटना घडल्यानंतरही मदत यंत्रणा सुमारे दीड तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.या विलंबामुळे एकाचा जीव गेला तसेच इतर वाहनचालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
1015
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 28, 2026 03:32:15
Amravati, Maharashtra:मेळघाटात जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार; युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्याकडून कामाची पोलखोल. जुना पाण्याच्या टाकीला नवीन दाखवून पैसे काढल्याचा आरोप. अँकर: अमरावतीच्या मेळघाट मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. केवळ कागदोपत्री काम झाल्याचं दाखवून लाखों रुपयांचे बिल लाटल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. या संदर्भात राहुल येवले यांनी कामाची पाहणी करत कामाची पोलखोल केली आहे. 2022 मध्ये मेळघाटातील चिलाटी येथे जुन्या पाण्याच्या टाकीला कलर देऊन नवीन दाखवली मात्र आता ती टाकी जीर्ण झाली आहे. तसेच सरवारखेडा येथे पाण्याची टाकी असूनही त्या पाण्याच्या टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही. तरीही दुसरी नवीन टाकी बांधली आता दोन्ही टाकीत एकही दिवस एकही थेंब पाणी गेलेले नाही. रुईपठारला नवीन टाकी बांधली व डोमी वरून पाईप लाईन टाकून पाणी आणले परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी बांधली तेव्हा पासून गेलेलं नाही. सुमिता येथील जूनीच टाकी नवीन दाखवून पैसे काढ़लेत. हातरू भागातील 20/25 गावानं मध्ये 80% गावातील पाणी पुरवठा बंद आहे. युवक कॉंग्रेस पुराव्या सहित संपूर्ण प्रकार उघड करनार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा युवक कॉंग्रेस च्या वतीने टाकिवर चढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी राहुल येवले यांनी दिला आहे.
986
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 03:04:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पेट्रोल टंचाईमुळे रस्त्यात ड्राय झालेली दुचाकी बैलगाडीतून पंपावर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवराई फाटा येथे पेट्रोल टंचाईची झळ प्रत्यक्षात पाहायला मिळाली. एका तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडली. पेट्रोल मिळत नसल्याने त्या तरुणाने थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ sध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे परिस्थितीची तीव्रता अधोरेखित होत आहे.
989
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 28, 2026 03:03:42
Ahilyanagar, Maharashtra:स्लग: पालिकेच्या मालकीच्या जागेवरून सर्वसाधारण सभेत गोंधळ अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिकेच्या मालकीच्या असलेल्या जागेवरून मोठा गोंधळ झाला महानगरपालिकेला स्वतःचं मोठं उत्पन्न नाही त्यामुळे शहरातील विकास कामाला गती मिळत नाही अशी ओरड प्रशासना करून करण्यात येते मात्र शहर आणि शहराच्या परिसरामध्ये हजारो कोटींची पालिकेच्या मालकीची जागा आहे मात्र या जागेवर अतिक्रमण झाली आहेत पालिकेने बांधलेले व्यावसायिक संकुलांचं देखील व्यवस्थापन केलं जात नाही त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात कसलीच भर पडत नाहीत असं मुद्दा उपस्थित करत भाजपचे नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रशासनाला धारेवर धरलं आणि एक समिती स्थापन करून शहर आणि शहर परिसरामध्ये पालिकेच्या मालकीच्या जागा आहेत त्यांची नोंदणी करावी आणि त्या जागेवर विकास करण्याची मागणी केली आहे
1038
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 28, 2026 03:02:21
Dharashiv, Maharashtra:सभापती निवडीनंतर शिवसेनेत वादाची ठिणगी; गटबाजी पुन्हा उफाळली! एकनाथ शिंदेंच्या आदेशालाच स्थानिक पातळीवर धाब्यावर बसवले? आनंद पाटलांचा गंभीर आरोप; आईसह सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा निष्ठावंतांना डावलून “दुसऱ्यांना” संधी; पक्षातच वाढ रोखली जातेय? धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पक्षात गटबाजी उफळून आली असून, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशालाच स्थानिक पदाधिकारी जुमानत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांनी हा आरोप करत, स्वतःसह त्यांच्या मातोश्रींच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही दिलाय. जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेत सुरू असलेली खदखद अजूनही शांत झालेली नाही. सभापती पदाच्या निवडीत निष्ठावंतांना डावलून, इतरांसोबत गेलेल्या सदस्यांना संधी दिल्याचा आरोप आनंद पाटील यांनी केलाय. वरिष्ठांच्या आदेशानंतरही शेवटच्या क्षणी डावलण्यात आल्यामुळे नाराजी वाढली असल्याचं त्यांनी म्हटलंय. पक्षाच्या वाढीला पक्षातूनच खोडा घातला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.
1084
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 03:00:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या पाणी पुरवठा योजनेच्या आतापर्यंतच्या कामाची सद्यःस्थिती तपासण्यासाठी सर्वच यंत्रणांनी संयुक्त पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले... वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे काम अपूर्ण आहे. पाण्यावर क्लोरिनेशन प्रक्रियेची रूमही तयार नसल्याचा दावा मनपातने केला. त्यावर कंत्राटदार कंपनीतर्फे मनपाचा दावा फेटाळत वॉटर ट्रीटमेंट प्लांट पूर्ण झालेला असल्याचे तसेच क्लोरिनेशन रूमही तयार असल्याचे सांगितले. मात्र क्लोरिनेशनचा परवाना घेतला नसताना केवळ रूम असल्याचं मनपाचे म्हणणे आहे... योजना एक वर्षापर्यंत कंपनीतर्फे चालवली जाणार असून ५ वर्षांची देखभाल दुरुस्तीही त्यांच्याकडे राहील. सध्या शहराची लोकसंख्या १८ लाख आहे. २०३७ पर्यंत ती २७ लाख तर २०५२ पर्यंत ३३ लाख १७ हजारांवर जाणार आहे. योजनेचे आयुष्य ३० वर्षे गृहीत धरले आहे. सध्या एका पंपाद्वारे १०० एमएलडी पाणी सुरू करून पाइप स्वच्छ करीत असल्याचे कंपनीने कोर्टातनसांगितले. यानंतर २ पंपांद्वारे २०० एमएलडी आणि अंतिम टप्प्यात ६ पंपांद्वारे ६०० एमएलडी पाणी येणार आहे.
1060
comment0
Report
Advertisement
Back to top