Back
नितीन गडकरींचा कृषी विकासाचा मंत्र: AI आणि तंत्रज्ञानाची शक्ती!
AKAMAR KANE
FollowJul 19, 2025 04:03:09
kolhapur, Maharashtra
2c ला दोन साउंड बाईट जोडले आहे...
-------
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय...त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते.
भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
-----
नागपूर
नितीन गडकरी, पॉइंटर...
- *आर्टिफिशियाल इंटेलिजन्सवर काम करत आहे... यात झाडाला उत्तम वाढ करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल काम करत आहे..अमेरिकेमध्ये लागलेल्या सॅटॅलाइटच्या माध्यमातून शेतात असलेल्या संत्राच्या झाडाची परिस्थिती काय आहे हे कळणार आहे... तेही मोबाईलवर येणार आहे. त्यासाठी प्रत्यक शेतात मध्ये आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आहे. तो खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे, याची यंत्र हे सॅटेलाईट सोबत कनेक्ट असणार आहेत. त्यावरून झाडाला तहान लागली आहे, हे कळेल आणि लगेच AI च्या माध्यमातून डीप इरिगेशनने पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल*.
- *झाडाला कुठल्या विटामिन्स कमी आहे. हे कळणार आहे. त्या झाडावर कुठला रोग येणार आहे आठ दिवसापूर्वीच कळेल त्यामुळे त्या माध्यमातून स्प्रे करता येईल*.
- स्पेन मधील व्हॅलेन्शियां आहे हे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहर आहे.... तिथे एका एकरात 340 झाडं लावतात आणि 30 ते 40 टन उत्पादन घेतात.. आपल्या एका एकरात फक्त शंभर झाडे लावली जाते आणि 3 ते 4 टन उत्पादन होत. संत्राहा दर्जनाने पॅक करून विकतात. पण आपल्या संत्र्याची लूट होते..
- तिथं या सगळ्याच शूट केलं आणि नागपूरला आलं यावर ऍग्रो व्हिजन च्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना दाखवलं..
- *दाखवताना फुकट देण्याची किंमत होत नाही. माझा अनुभव खराब आहे.. जरी राजकारणात असलो तरी विचार स्पष्ट आहे गरज असेल तर मत द्या नाहीतर देऊ नका... (दारू) हे पाजणार नाही, आणि ते(मटन) खायला देणार' नाही".
- अडीचशे रुपये तिकीट लावल्यावरही साडे सहाशे शेतकरी आले. साडेचार तास त्यांनी व्हॅलेंशीया मधील संत्रा उत्पादनाचा तंत्र समजून घेतलं आणि त्याचा अवलंब केला... याचा परिणाम झाल.. शेतकऱ्यांनी ते तंत्रज्ञान अवलंबला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढतील यासाठी प्रयत्नशील झालेले आहे.
- यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावल्यास उत्पादनात वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने तुकडोजी महाराजांचे कृषी आणि ग्रामीण विकासाच स्वप्न पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
2
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 19, 2025 11:32:48Parbhani, Maharashtra:
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनूकीच्या धर्तीवर त्यांनी कार्यकर्ता सवांद मेळावा घेतला,त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली...
अजित पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त संबंध देशभरात अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम दिले आहेत. अजित दादा प्रशासन बरोबरच क्रीडा सांस्कृतिक कला साहित्य पर्यावरण या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेले आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून 22 जुलै ते 30 जुलै असा राज्यव्यापी उपक्रम दिलेत. त्याचीही माहिती आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना देत आहोत.
जो उत्साह विधानसभा निवडणुकीमध्ये त्यापेक्षा थोडा जास्त का होईना परंतु कार्यक्रम त्यांचा उत्साह या निवडणुकांमध्ये अनुभवायला मिळतोय उत्तर महाराष्ट्रातील दौरा असो किंवा मराठवाड्यातील आजची तिसरी बैठक असो यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह अनुभवायला मिळतोय इतर पक्षात वेगवेगळ्या पदावर काम करणारी कार्यकर्ते आज आमच्या प्रवाहात येत आहेत याचं कारण सत्तेत असलं तरीही आमच्या मूळ विचारसरणी प्रेमाने राहिलो
धर्मनिरपेक्ष विचार फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी विचारधारा घेऊनच आम्ही सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे हे विश्वास सार्हता अधिक भारतीय त्यामुळे वाढलेल्या विश्वासाला संघटन प्रमुख म्हणून सोबत घेणार हे माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच कर्तव्य आहे
On स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती म्हणून सोबत जाणार की स्वबळावर लढणार
राज्यात समन्वय समितीची बैठक झाली त्या वेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला समोर जाऊ अशी चर्चा झाली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे जिल्ह्यातल्या मतदारसंघातील परिस्थिती सुद्धा वेगळी आहे तिन्ही पक्षातील नेत्यांनी असं ठरवलं की ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती त्या त्या नेत्यांकडून समजून घ्यावी त्यानंतर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते बसून जिल्हा निहाय निर्णय घेऊ
On
महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाणार आणि कार्यकर्त्यांना न्याय देणार हे कसं जमवणार
महायुतीच्या ऐक्याला बाधा न येता निवडणुकीला समोर जायचं
राज्यात जावे ला 95 ते 99 शिवसेना-भाजपचे सरकार होतं 99 ते 2015 ला लोकशाही आघाडी अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होतं 14 ते 19 भाजप सेनेचे सरकार होतं त्यावेळेस सुद्धा सत्तेमध्ये राज्यात जरी एकत्र होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या होत्या याचा अर्थ आम्ही वेगळं लढणार आहोत अशातला भाग नाही पण कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल
On सावली बार प्रकरणी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची परब यांच्याकडून मागणी
विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचा आश्वासन दिला आहे. त्या संदर्भातील चौकशी करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील
On
अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली
माझ्यासहित पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा आहे. परंतु आम्ही राजकीय वास्तववादी आहोत जमिनीवरती आहोत आम्हाला वास्तव कळतं. भाजपचे 131 आमदार आहेत शिवसेनेचे 60 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता त्यावेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल आता मला ते माहित नाही. ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष आहे. त्यावेळेला आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरू ( अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा तरी असं म्हणत आहेत. )
महाराष्ट्र ग्राम मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रवेशासाठी ओघ लागलेला आहे
On
लाडक्या बहिणीच्या मदतीमध्ये एक वीस रुपयाची वाढ कधी होईल
संयुक्त जाहीरनामा महायुतीने तयार केला आहे तीन गोष्टी आम्ही प्रामुख्याने आश्वासित केले आहेत
लाडक्या बहिणीने २१ रुपये पर्यंत वाढ देणे
हे सरकार योग्य या बाबतचा निर्णय घेनार आहे.
On
विधान भवन आमदारांचा राडा
वाईट वाटण्यापेक्षा चुडिया तुम्ही वारंवार सांगत असतो विधिमंडळातील कोणत्याही राजकीय पक्षाचा विधानसभा सदस्य असेल किंवा लोकसभा सदस्य असो त्यांचं वर्तन त्यांची भूमिका ही नेहमीच लोकांचा अपेक्षांची पूर्तता करणारे असले पाहिजे या निंदनीय घटनांचा मी निषेध वारंवार केलाय राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी मागणी केली आहे की अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या वरती कार्यवाही केली पाहिजे
On शेतकरी आत्महत्या
दुर्दैवाने तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आल्या काही वेळेला प्रमाण सुद्धा वाढला केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना सुद्धा झाल्या तरी सुद्धा हे सत्र थांबत नाही हे आम्हा सर्वांसाठी क्लेश कारक आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यापूर्वीसुद्धा घेतलेत अधिक निर्णय कशा पद्धतीने करता येतील याबाबतीत विचार राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचे अमूल बजावणी करणे गोदावरी जोड प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पिक विमा योजना योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या बारापर्यंत करणे तेच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत आहोत
On
निशिकांत दुबेला मुंबईत आल्यावर मारू राज ठाकरेंचा वक्तव्य
निशिकांत दुबे च वक्तव्य महाराष्ट्र दृष्टिकोनातून किंवा देशाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतच त्यांचासुद्धा वक्तव्याचा निषेध मी जरी आज एनडीए मध्ये असलो तरी दुबे यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या बद्दलचे वक्तव्य योग्य नव्हतं ठाकरे घराणे किंवा राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात आवड निवड काही असो ते त्यांच्या ठाकरी शैलीमध्ये बोलत असतात
On
आमदार राजू नवघरे यांना मंत्री करण्याबाबतचा शब्द अजित परांनी पाळलेला नाही
मंत्रिमंडळाची रचना करत असताना संख्येवरच्या मर्यादा आल्या आणि त्यामुळे अनेक सहकार्यांना मंत्रिमंडळामध्ये घेता आले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आमदार नवघरे यांना मंत्री करण्याचा योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल
On
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे काही संकेत आहेत का
राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा स्थानिक पातळीवरती सुद्धा नाही हे मी वारंवार स्पष्ट केल आहे
येईल त्या वेळेला कोरकमिटी त्याबाबत निर्णय घेईल पण निर्णय करत असताना ज्या वेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालोत त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधील सहभाग आहे अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय घ्यायची शक्यता येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेतृत्वाशी बोलावं लागेल चर्चा करावी लागेल
On
पहिली ते पाचवी हिंदी सुरू करून तर दाखवा शाळाच नाही तर दुकानही बंद करून टाकू व राज ठाकरे
ती ठाकरे शैली आहे आपण जे बोलतो ते सरकार करणार हे त्यांना माहीत असतं सरकारने हिंदी बाबतचा निर्णय रद्द केला नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. राष्ट्रवादीने सुद्धा स्वच्छ पाण्याची भूमिका मांडली त्रिभाषिक सूत्र आपल्याला स्वीकारायचे असेल तर ते पाचवीच्या नंतरच करावी लागेल.काही नेते महाराष्ट्रात बोलत आलेले आहेत. त्यात वेगळं वाटायचं आम्हाला काही कारण नाही.
On
ठाकरे ब्रँड जनतेने स्वीकारला आहे -उद्धव ठाकरे
दोन्हीही गोष्टीचे उत्तर काळच देईल
On
ठाकरेंच्या शैलीला कोणत्या शैलीत उत्तर असेल
आमची शैली वसंतराव चव्हाण यांची आहे चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत शैलीमध्ये आम्ही वाटचाल करत आहोत आणि जनता आम्हाला ताकद देते निवडणुकीमध्ये यश देते ही आमची शैली आहे .
On
माझ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार आरएसएस आहे या - प्रवीण गायकवाड
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा निषेध केला आहे सरकारने चौकशी केलेली आहे आरोपी अटक केलेले आहेत. कठोर कार्यवाही व्हावी ही आमची मागणी आहे
On
सरकार माजले आहे स्वतःधारी देखील मजले आहेत - संजय राऊत
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच वाटलं होतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल सात ते आठ मुख्यमंत्री तयार झाले होते 40 ते 50 मंत्र्यांनी सुद्धा नवीन कोट शिवून शपथ घेण्याची तयारी सुरू केली होती दारू अपयश आलेल्या नैराशातून अजून कोणीही बाहेर आलेलं नाही त्यामुळे संजय राऊत यांना दररोज सकाळी असं बोलून दिवसभर हे चालवायचे असते. या पलीकडे त्यांच्या वक्तव्याचं दखल घेण्यासारखे काही नाही.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 19, 2025 11:32:35Akola, Maharashtra:
Anchor : अकोला पोलिसांनी गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन पद्धत लागू केली आहेय..शहरातील जुने शहरातील परिसरात दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींची पोलिसांनी परेड काढली..या परेडचा मुख्य उद्देश स्थानिक नागरिकांमध्ये गुन्हेगारांबाबतची भीती कमी करणे आणि त्यांना सुरक्षिततेचा अनुभव देणे हा आहेय..पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्याची अपेक्षा आहे, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल.
Byte : नितिन लव्हेकर , जुना शहर, पोलीस निरीक्षक
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 19, 2025 11:30:59Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1907ZT_WSM_POLICE_ACTIONAGAINST_VEHICLES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि प्रलंबित दंड वसूल करण्यात यावा यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा व आरसीपी यांच्या संयुक्त कारवाईत वाहनांची तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध नियमभंगांवर 61,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच कागदपत्रांची तपासणीदरम्यान 10 ऑटो रिक्षा आणि 3 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 11:07:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_CASH_CHORI
सातारा - भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बेंगळूर महामार्गावर एका कार चालकावर हल्ला करून 20 लाख रुपये लुटण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि भुईंज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केरळ राज्यातील दरोडेखोर टोळीला अटक केली असून, 24 तासांच्या आत 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे.तपासात इनोव्हा, स्कॉर्पिओ, स्विफ्ट कार, मोबाईल्स आणि 20 लाखांची रोख रक्कम असा 35.27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी केरळ, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडूमधील असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 19, 2025 11:04:05Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 1907_GON_ACCIDENT
FILE - 7 VIDEO 1 IMAGE
विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या काफील्याने तरुणाचा मृत्यू....परिणय फुके न थांबता निघून गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप......
Anchor: आज गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक असून त्या निमित्ताने विधान परिषद सदस्य परिणय फुके हे गोंदिया करता निघाले असता गोरेगाव दरम्यान रस्ता ओलांडत असलेल्या युवकाला ताफ्यातील वाहनाची धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र परिणय फुके हे न थांबता तिथून निघेल गेले असल्याने मृतकाच्या परिवाराने जोपर्यंत परिणय फुके येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा शव विच्छेदन करणार नाही अशी भूमिका परिवाराने घेतली आहे.
BYTE - 2
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 11:02:31Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा युवासेना शक्ती मेळावा संपन्न.
nm yuvasena melava
FTP slug - nm yuvasena melava
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: नवी मुंबईत जुईनगर नेरुळ विभागाचा युवासेना शक्ती मेळावा संपन्न झालाय. आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने युवासेना तयारीला लागलेली पहायला मिळत असून विभाग निहाय मेळावे घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतेय. युवासेनेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात कॉलेज युनिटची स्थापना करण्यात येत असून 1 ऑगस्ट रोजी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्याहस्ते या सर्व कॉलेज युनिटचे उदघाटन करण्यात येणार आहे.
gf-
===============================
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 19, 2025 11:01:02Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपुर केल्याच्या निर्णयाबद्दल महायुतीच्या वतीने पेढे आणि साखर वाटप करत फटाक्याची आताषबाजी.. इस्लामपूर मध्ये सदाभाऊ यांचे मिरवणूक काढून केले जंगी स्वागत.
अँकर :- सांगलीच्या उरुण-इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे. या निर्णयाचे आज इस्लामपूर मध्ये आतषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सदाभाऊ खोत हे इस्लामपूर मध्ये दाखल होताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
इस्लामपूरच्या पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील,तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्याची आताषबाजी करण्यात आली.यावेळी आमदार सदाभाऊ खोत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.तर यावेळी बोलताना
सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारचे आभार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचे स्वप्न आम्ही स्वप्न पूर्ण केले,अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली आहे.
बाईट-: सदाभाऊ खोत - आमदार .
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 19, 2025 10:36:12Navi Mumbai, Maharashtra:
story slug -दारूच्या दुकानातून 17 लाखांची दारू चोरणारया दोघांना अटक cctv च्या मद्यमातून अटक
17 लाख की शराब चोरी cctv जारी
FTP slug - nm vashi liquer cctv
shots-cctv
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वाशी सेक्टर 31 मधील व्ही फाईव्ह लिविंग लिक्विड्स या मद्य विक्री दुकानाचे शेटर आणि लॉक तोडून विविध कंपन्याच्या दारूच्या बॉटल चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी तब्बल 17 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या दारूच्या बॉटल टेम्पोमध्ये टाकत चोरी केल्या होत्या. पोलीसांनी सिसीटीव्ही फूटेज आणि गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दहिसर येथून दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी गुन्हा कबूल केलाय. वाशी पोलीसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बॉटल, गुन्ह्यात वापरलेला टेम्पो तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा एकूण 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
gf-
========≠===========
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 10:33:05Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलं गुंडगिरीच्या मार्गावर!
इन्स्टाग्रामवर रील अन स्टोरी टाकत गुन्हेगारीचं समर्थन
पोलिसांनी युवकांना 'योग्य दिशा' दाखवण्याची आवश्यकता
Amb reel
Anchor : अंबरनाथमध्ये १५ ते १८ वयोगटातली अल्पवयीन मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच एका मुलाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रील अन स्टोरीवर चाकूच्या फोटोमुळे या मुलांना पोलिसांनी योग्य दिशा दाखवून त्यांची गुन्हेगारीची नशा उतरवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय.
Vo : इन्स्टाग्रामवर बद्री यादव नावाने एक अकाउंट तयार करण्यात आलं असून त्यावर एक रील शेअर करण्यात आलीये. यात आम्हाला पोलीस स्टेशनची केस आवडत असल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे. याच अकाउंटवर स्टेटसला स्टोरी ठेवण्यात आली असून त्यात चाकूचा फोटो ठेवण्यात आलाय, आणि बॅकग्राऊंडला सरकार चित्रपटातील गाणं ठेवण्यात आलंय. हे पाहिल्यानंतर अंबरनाथ शहरातली तरुणाई कोणत्या दिशेनं चाललीये, असा प्रश्न उपस्थित झालाय. शहरात सोल्युशन, व्हाईटनर हुंगत फिरणारी अल्पवयीन मुलं सर्रास पाहायला मिळतात. हीच मुलं गुन्हेगारीकडेही वळू लागली असून पोलिसांनी या मुलांना समजेल, अशा भाषेत पोलिसांनी त्यांना समजवावं, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 10:32:55Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात तरुणाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू ,नशेत केला प्रकार
Bdl burn
Anchor उल्हासनगरच्या शास्त्री नगर एटीपी हायस्कूल जवळ एका तरुणावर पेट्रोल ओतून जाळण्या धक्कादायक प्रकार समोर आलय, दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचं बोललं जातय,
Vo यात ऋषि गुप्ता हा तरुण गंभीर जखमी झाला आहे ,ऋषि गुप्ता हा शुक्रवारी रात्री मद्यपान करण्यासाठी शास्त्री नगर येथील एटीपी हायस्कूल जवळ बसला होता यावेळी त्याचा परिचयाचा रोहन यादव याने नशेत ऋषीच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावून दिली ,यात ऋषि हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या सद्या उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत,आता ह्या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत पुढील कारवाई सुरू केलीय,
Byte ऋषी गुप्ता जखमी तरुण
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 19, 2025 10:08:07Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_SWAGAT
सातारा - नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.साताऱ्यातील सारोळा पूल,शिरवळ,वेळे,भुईंज , पाचवड आणि सातारा शहरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी मधून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.त्याच बरोबर भले मोठे हार क्रेन च्या सहाय्याने शशिकांत शिंदे यांना घालण्यात आले.
*प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बाईट पॉइंटर..*
शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला मान दिला आहे.. पक्षांमध्ये अनेक दिग्गज नेते ताकतीचे होते मात्र पवार साहेबांनी आणि पक्षांनी प्रदेश अध्यक्ष पदाची संधी मला दिली.. आमच्यातीलच मंडळी फोडून भाजपने आपला बालेकिल्ला तयार केला असला तरी नवीन सारथी घेऊन पुन्हा बालेकिल्ला उभा करणार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली..
राष्ट्रवादीच्या विलीनी करणाच्या चर्चा सुरू असल्या तरी मी पक्ष वाढी साठी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे तो दूर झाला पाहिजे.. शरद पवारांचे विचारायचा महाराष्ट्र पुन्हा कार्यकर्ते उभे करतील हा संदेश मला द्यायचा आहे..
महाराष्ट्राला विधानसभेची निवडणूक कशी झाली माहिती आहे, महाविकास आघाडीला लोकसभेला चांगले यश आल्यानंतर भाजप सावध झाल आणि त्यांनी निवडून येण्यासाठी काही योजना आणल्या रणनीती आखली त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती मात्र तो केलेला नाही. लाडक्या बहिणी योजनेला देखील कात्री लावण्याचे काम केले जात आहे. मागासवर्गीय समाजाचा निधीदेखील वळवण्याचा प्रयत्न केला जातो.. समाजामध्ये जागृती केली तर या सरकारची नाराजगी दिसून येईल..
अजित पवार मुख्यमंत्री हवेत या प्रश्नावर येणारा दिवस काय होईल ते माहित नाही मात्र माझी पार्टी मी कशी मजबूत होईल यासाठी मी प्रयत्न करणार.. 2029 ला शरद पवार त्यांच्या पक्षाची सत्ता कशी याचा प्रयत्न करणार..
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही असं सांगावं लागतं यामध्येच शंका आहे. मुख्यमंत्र्यांना सातत्याने असं विधान का करावं लागतं हे मला समजत नाही. हिंदी भाषेवरून सक्ती करण्याचे काम सुरू आहे.दिल्ली मधून आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असेल याचा अर्थ मुंबई वेगळी करण्याचा निर्णय होतोय का अशी शंका लोकांच्या मनात आहे..
माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जरी जबाबदारी दिली असली तरी लगेच मी यश आणू शकत नाही. प्रयत्न करणं आपलं काम आहे. महाराष्ट्रातील जनता खासदारकीला आणि आमदार केला इतिहास घडवू शकते. तर ही जनता कोणत्याही प्रकारचा अरेरावी पाना, हुकूमशाही खपवून घेणार नाही. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे.. मंग उद्याचा परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल..
ही लढाई विकास निधीची राहिलेली नाही, आत्ता सत्ता टिकवण्यासाठी हुकूमशाही दडपशाहीची रणनीती आखली जात आहे.
कर्जमाफीची आश्वासन सरकारने दिले होते. अधिवेशना मध्ये देखील आम्ही प्रश्न उपस्थित केला मात्र त्याला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. कर्जमाफीचे आश्वासन देऊन मत घेतली आहेत जनता यांना माफ करणार नाही.. या सरकारवर काय परिणाम होतील ते शेतकरी वर्ग दाखवून देणार..
हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सर्व विरोधक जर एकत्र आले तर या सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही..
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 19, 2025 10:04:15Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Jarange Press
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
*मनोज जरांगेपाटील बाईट *
- मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच आहे जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय
- आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार धनगरांच्या पाठिंब्यावर जरांगेची प्रतिक्रिया
- कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही
*आव्हाड पडळकर वाद...!*
- गोट्या खेळायचा खेळ आहे यांचे काहीच खरे नसते
- हि खरी भांडणं करतात मुद्दाम भांडण करतात अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली
*मुबंई मोर्चा ..*
पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी असेल
अंतर वाली मार्गे आहिल्यानगर शिवनेरी,माळशेज घाट कल्याण मार्गे मुंबई धडकणार
*ठाकरे बंधु एकत्र*
- दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही
- जुनी म्हण आहे कि *"मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे"*
- कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं.पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही
- दोन भावांनी एकत्र यावं
- वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडु द्या
- पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं..
- लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या
*राष्ट्रवादी एकत्र..*
- दोन राष्ट्रवादी वेगळ्या नव्हत्याच आता कुठुन एकत्र यायचं दोन राष्ट्रवादी वेगळ्या हे लोकांना दाखवायला आहे राजकारणी छक्केपंज्जे दाखवतात
*राज ठाकरे*
- राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहे मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला जरांगेंनी राज ठाकरे ना मोंदीच्या प्रचाराची आठवण करुन दिली
-
*देवेंद्र फडणवीस इशारा...*
- संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय
- मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा
- प्रमाणपत्र रोखुन धरु नका वेळ वाईट येईल जरांगेंचा फडणवीसांना इशारा
*१९ ऑगस्ट आझाद मैदान मोर्चा...*
- मागच्या वेळी जरांगेच्या मोर्चा लोणावळा मार्गे मुंबई होता मात्र यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज मार्गे कल्याण ठाणे चेंबुर करुन आझाद मैदानावर धडकणार असुन माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा हा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन निघणार आहे याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला...
- मागच्या वेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे नी मध्यस्थी केली होती यावर बोलताना आम्ही कुणाच्या सांगण्यावरुन थांबत नाही असा टोला जरांगेंनी लावला
- हा मोर्चा शिंदे ना टार्गेट असे छक्केपंज्जे खेळत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा माझे शरीर मला साथ देत नाही जाताना शिवनेरीची माती कपाळाला लावुन जाणार आहे परत माघारी येईल याची खात्री नाही
Byte: मनोज जरांगे पाटील
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 19, 2025 09:38:42Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1907ZT_WSM_KHATNAPUR_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम च्या कारंजा तालुक्यातील खतनापूर–इमामपूर–बांबर्डा–कामरगांव हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून, कारंजा बाजार समितीशी थेट जोडणारा हा मार्ग आजही ग्राम रस्ता क्रमांकाच्या प्रतीक्षेत आहे. हजारो हेक्टर शेतीला जीवनदायिनी असलेला हा रस्ता क्रमांकाअभावी विकासापासून वंचित राहिला आहे.तसेच शेती कामासाठी पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना चिखलातुन जावं लागतं शेतकऱ्यांना अडचणीला समोर जावं लागत त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने रस्ता क्रमांक मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जातं आहे.
5
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 19, 2025 09:32:58Kalyan, Maharashtra:
उल्हासनगरमध्ये तिकट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाच्या भरारी पथकाने पोलखोल करत केली कारवाई
एकाला अटक , 1लाख किमतीचे विदेशी मद्य जप्त
Anc...तिकीट बुकिंग च्या नावाखाली बेकायदेशीरपणे महागड्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या एका इसमाला राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या पथकाने उल्हासनगर येथे एका दुकानात छापा टाकत केली आहे .परदेशातून विनापरवाना आयात केलेल्या 1 लाख 7 हजार रुपये किमतीच्या 21 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.राजेश विषणदास छाबरिया असे आरोपीचे नाव आहे . राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या भरारी पथक निरीक्षक दीपक परब यांच्या पथकाने हि कारवाई केली.
0
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 19, 2025 09:32:48Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadik Gokul PKG
Feed :- Live U & 2C
Anc :- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे. पण गोकुळचे संचालक पद 21 वरून 25 करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्यानंतर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे गोकुळचा राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे..
VO 1:- गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी महायुतीचे नावेद मुश्रीफ यांची नुकतीच निवड करण्यात आली. असं असलं तरी गोकुळचे सत्ताधारी नेते हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हेच गोकुळचा कारभार चालवत आहेत. नुकताच गोकुळच्या संचालकांची बैठक पार पडली या बैठकीत गोकुळचे संचालक संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालक संख्या वाढीला विरोध करत आक्षेप नोंदविला आहे.
Byte :- शौमिका महाडिक, विरोधी संचालिका
VO 2:- गोकुळच्या विरोधी संचालिका शोमीका महाडिक यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध केला होता. त्यानंतर आता माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुतणे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा कंबर कसली आहे. पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांची देखील बैठक पार पडली. या बैठकीत दूध उत्पादक आणि गोकुळचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक वाढीचा निर्णय होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे अशी भूमिका घेतली आहे.. सध्या गोकुळची सत्ता मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हातात आहे.. महाडिक यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या सतेज पाटील यांना सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी महाडिक यांनी यापूर्वीच राजकीय खेळी करायला सुरुवात केलीय.. पण सहकारात राजकारण नको म्हणणारे मंत्री हसन मुश्रीफ या विरोधाला किती किंमत देतात यावरच गोकुळ मधील आगामी राजकारण आवलंबून आहे. पण सद्यातरी महाडिक यांनी संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर नेत्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर संचालक संख्या वाढीचा घेतलेला निर्णय आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीवर परिणाम करणार हे नक्की.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Share
Report