Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

शेतकरी सागर पाटील: कारल्याने बदलला आयुष्याचा गोडवा!

PPPRASHANT PARDESHI
Jul 20, 2025 13:35:14
Dhule, Maharashtra
Anchor कडू कारल्यामुळे सागर पाटील या तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला आहे.पारंपारिक शेतीपेक्षा कारल्याची शेती फलदाजी असल्याचे शेतकरी सागरी पाटील यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षांपासून सागर पाटील लाखो रुपये कारले उत्पादनातून घेत आहे.यंदा देखील सहा एकरात ८ ते १० लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे. कापूस ,मका या पिकांना लागणारा खर्च आणि त्यापेक्षाही पारंपरिक शेतीतून सहा महिन्यांच्या कालावधीत मिळणारे उत्पन्नामुळे आर्थिक उत्पन्न गणितं कोलमडत. पारंपरिक पिकांमध्ये लागवडी पासून तर त्याला लागणारे खत, फवारणी यासह अनेक खर्चीक बाबींनतर सहा महिन्यांच्या कालावधी नंतर उत्पादनात येणारी घट व मिळणारे उत्पनाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात येत असल्यामुळे शेतकरी सागर पाटील यांनी नगदी पिक म्हणून तिन वर्षांपूर्वी शेतात कारल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले. आणि पहिल्या वर्षापासून कारल्यांनी लाखोंचा नफा कमवून दिला असून विशेष म्हणजे दर दोन ते तीन दिवसाआड पैसा खेळता राहत असल्याने आर्थिक विवंचनेतून दूर होत असल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले. कारलेची सगळ्यात जास्त मागणी वसई किंवा गुजरात मधील सुरत येथील बाजारात आहे.सुरत वाहतूकीला जवळ पडत असल्याने २० ते २५ किलो पिशवीत कारल्या गडे करून शेतातूनच कारले वाहनात टाकून गुजरातच्या सुरत येथे विक्रीसाठी पाठविले जातात. कारल्याला सध्या स्थितीत,५० ते ६० रुपये किलोचा भाव असल्याने पहिल्या दोन तेड्यातच यांना ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले.अशाच पध्दतीने भाव मिळाला तर यंदा १० लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे. Byte सागर पाटील,शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
6
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top