Back
धाराशिव में प्रताप सरनाईक पर बढ़ा दबाव, क्या होगा अगला कदम?
DPdnyaneshwar patange
FollowJul 20, 2025 07:00:27
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव
DHARA_MAHAYUTI
एकनाथ शिंदे च्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढल्या
धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना बदला,
तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
धाराशिव मध्ये पालकमंत्री वरून शिवसेना आणि भाजपा मध्ये तणाव.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सावरासावर.
प्रताप सरनाईक आणि उबाठा चे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जवळकीमुळे वाढला तणाव.
अँकर
धाराशिव_रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री यांचा वाद कायम असतानाच आता धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री यावरून वाद सुरू झाला आहे . यामुळे एकनाथ शिंदे यांचे आणखी एक मंत्री म्हणजे प्रताप सरनाईक अडचणीत आले आहेत.शिवसेनेचे धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना बदला अशी मागणी भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी पत्र देऊन मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तुळजापूर डीपीडीसी विकास निधी , यु बी टी चे खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रताप सरनाईक यांच्या जवळीकीमुळे हा तणाव वाढला आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रताप सरनाईक यांची तक्रार करत त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. यावर प्रताप सरनाईक व आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना विचारलं असता जिल्ह्याच्या विकासासाठी सोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आपापसातील तणाव जाणवत होता. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी दोन पावलं मागे घेतलं.
Byte प्रताप सरनाईक
Byte आमदार राणा जगजीत सिंह पाटील
3
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 12:06:17Beed, Maharashtra:
बीड: कापूस पेरणीत गफलत, पीक तुटक उगवल्याने शेतकऱ्यांवर नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ..!
Anc- मे महिन्यात बीड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. यात प्रामुख्याने तूर आणि कापसाची लागवड आहे. परंतु वडवणी तालुक्यातील देवगाव इथल्या राहुल सुरवसे या शेतकऱ्यावर चक्क उभ्या पिकांत नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पहिल्याच पावसात शेतकऱ्याने घाईगडबडीने कापसाची पेरणी केली मात्र पीक तुटक आल्याने शेतकऱ्याच्या पदरी अखेर निराशा आली. मग काय हतबल झालेल्या शेतकऱ्याने तुटक पिकांवर नांगर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना योग्य कास धरण्याची गरज आहे, हेच यावरून स्पष्ट होतेय. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय.
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 20, 2025 11:47:05Vasai-Virar, Maharashtra:
Date-20july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI GAS
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसईत गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कारवाई
दोन आरोपी अटक , सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
अँकर - वसईत पुरवठा विभागाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये होणारा काळाबाजार उघडकीस आणला आहे...राजोडी परिसरात एका जागेत टेम्पो मध्ये गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचून धाड टाकली असता बंद टेम्पो मध्ये ग्रॅस रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले...या प्रकारात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक टेम्पो , ५२ सिलेंडर व एक मोटर असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. अर्नाळा पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 20, 2025 11:46:59Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शाळेतून घरी जाणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुरडाच्या अंगावरून गेला डंपर,अपघातात चिमुरडा जागीचं ठार.
अँकर - सांगलीच्या भिलवडी येथे एका 6 वर्षीय शाळकरी मुलाला डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.शाळेतून घरी परतत असताना अंगावरून डंपर गेल्याने हा भीषण अपघात झाला आहे.ज्यामध्ये राज वैभव पवार,वय ६,राहणार भिलवडी,हा चिमूरडा जागीच ठार झाला आहे.राज हा भिलवडीतल्या एका शाळेमध्ये इयत्ता पहिलीत शिकत होता,शाळा सुटल्यानंतर तो आपल्या आईसोबत घरी निघाला होता, याचवेळी माळवाडीहून भिलवडीकडे जाणारया भरधाव डंपरचा ताबा सुटला, ज्यामुळे डंपर थेट राजच्या अंगावरून गेली,ज्यामध्ये चिमुरडा राज जागीच ठार झाला आहे.अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.राज याच्या मृत्युच्या घटनेने भिलवडी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 20, 2025 11:05:15Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2007ZT_CHP_SUDHIR_ON_RUMY
( single file sent on 2C)
टायटल:-- मी व्हिडीओ पाहिलेला नाही, मात्र सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी एथिकल कमिटी आहे, काही तथ्य असेल तर सूचना- समज दिले जातील, विधिमंडळातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--विधिमंडळातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी व्हिडीओ पाहिलेला नाही, मात्र सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी एथिकल कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. व्हिडीओत काही तथ्य असेल तर सूचना- समज दिले जातील असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 11:04:48Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबईचे चोरलेले पाणी नाही दिलं तर निवडणुकीच्या प्रचारात पाणीचोर ही उपाधी घ्यावी लागेल, नाईकांची शिंदेंवर सडकून टिका.
पानी के उपर से वनमंत्री गणेश नाईक ने दिया इशारा
ftp slug - nm ganesh naik on water
byet- ganesh naik
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वन मंत्री गणेश नाईक यांनी पाणी चोरीच्या मुद्द्यावरून नगरविकास खात्यावर ताशेरे ओढतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागलेय. नवी मुंबईचे चोरलेले 40 एमएलडी पाणी नाही दिलं तर मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर नाईकांनी सडकून टीका केलेय. 5 वर्ष 8 महिने झाले बारवी धरणातून नवी मुंबईला मिळणारे 40 एमएलडी पाणी दिलेले नाही. तुमच्याच नालायकपणामुळे नवी मुंबईची जनता तहानलेली राहिली आणि तुम्हीच सांगता इथे पाणी नाही. पाच वर्ष प्रशासन आहे ते नगरविकास खात्यांतर्गत येत हे कोणाच अपयश आहे असा सवाल देखील गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय.
बाईट -: गणेश नाईक वन मंत्री
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 11:04:02Navi Mumbai, Maharashtra:
story slug - खारघर येथील बंगल्यातून 42 लाख रुपये किंमीचे दागिने चोरुन फरार झालेला आरोपी अखेर अटकेत
42 लाख के गहने चुराने वाले नोकर को पकडा
FTP slug - nm khargher crime
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor : खारघर येथील एका बंगल्यामधुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे तसेच डायंमडचे दागिने व रोख रक्कम चोरुन पळून गेलेल्या नोकरास खारघर पोलिसांनी राजस्थान जालौर येथुन शिताफिने अटक केली आहे. दौलत शैतान सिंग (25) असे या चोरटÎाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी दौलत सिंग हा आरोपी खारघर येथील बंगल्यात नोकर म्हणुन काम करत होता. या चोरटÎाने गत 9 जुलै रोजी संधी साधुन बंगल्यातील रोख रक्कमेसह सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने चोरुन पलायन केले होते. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक सुरज जाधव व पोलीस हवालदार कासार, पोलीस नाईक खेडकर, पोलीस शिपाई मोरे यांचे पथक आरोपीच्या राहत्या पत्तावर पाठविण्यात आले होते.
सदर पोलिसांचे पथक आरोपी दौलत सिंग याच्या सिरोही राजस्थान येथील घरावर पाळत ठेवली असताना, आरोपी हा त्याचे लोकेशन बदलत वावरत असल्याचे तसेच त्याचे लोकेशन हे हिमाचल येथे असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आरोपीचे लोकेशन जालौर, राजस्थान येथे आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दौलत सिंग याला राजस्थान येथून शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दौलत सिंग याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमालासह हस्तगत करुन त्याला अटक केली.
बाईट - भाऊसाहेब ढोले - सहाय्य क पोलीस आयुक्त
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 10:36:56Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मनसे ची बॅनरबाजी मधून मराठी शिकण्याचा सल्ला
मनसे की पोस्टर ,मराठी सीखणे का संदेश
FTP slug- nm mns marathi banner
shots- banner
reporter - swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईत मनसेची बॅनरबाजी.
मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच.
मनसेच्या बॅनर वरून परप्रांती्यांना देण्यात आला इशारा.
मराठी शिकण्याचा सल्ला
नवी मुंबईतील नेरुळ विभागात लागलेत बॅनर.
राज ठाकरेंच्या सभे नंतर मनसेची बॅनरबाजी.
व्यंगचित्रं काढत देण्यात आला इशारा.
gf-
12
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 10:36:39Beed, Maharashtra:
बीड : प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू.. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणले
Anc : गेवराईच्या गंगावाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणावर पाच जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केली. ही घटना गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवम वर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र उर्वरित सर्वच आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. नातेवाईकांनी तलवाडा पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवून ठिय्या घातला आहे. जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या तलवाडा पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..
8
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 20, 2025 10:31:52Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार
फीड 2C
रोहित पवार ऑन आदित्य ठाकरे
Anc- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे हे तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते फडणवीस यांच्या भेटीचा आदित्य ठाकरे यांनी इन्कार जरी केला असला तरी, जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत ते निघून गेले... बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल असं म्हणत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लागावला... याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता आदित्य ठाकरे नेमके कोणाबद्दल बोलले हे सर्वांना माहीत आहे... पण मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली असावी... आमच्या माहितीप्रमाणे आदित्य ठाकरे हे आपल्या मित्रांसोबत तिथे जेवायला गेले होते , त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे देखील एका कार्यक्रमानिमित्त तिथे आले होते... मात्र जर एक व्यक्ती गावी निघून गेली तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असं म्हणावं लागेल असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन अंबादास दानवे
Anc- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता मला वाटत नाही की दोन्ही शिवसेना एकत्र येतील कारण त्यांच्यात इतकं फाटलंय की , शिवता शिवता खूप मोठ कापड लागेल...त्यातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टिका या समाज माध्यमांवर ते आहेत असे म्हटले आहे.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन योगेश कदम
Anc- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावावर बार असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत केला, पोलिसांनी दहा टाकल्यानंतर तिथे 22 बारबाला ही ताब्यात घेतल्या होत्या असं परब यांनी म्हटलं होतं याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता सरकारने याबाबत चौकशी करायला हवे तो बार चा परवाना नेमकं कोणाच्या नावावर आहे त्याचे व्यवस्था कोण पाहत याबाबत सरकारने चौकशी करावी सरकार तुमच आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन विजय वडेट्टीवार
Anc- एकनाथ शिंदे यांचे सरकार हनी ट्रॅप सीडीमुळेच आलं असल्याचा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू असे देखील त्यांनी म्हटलं यावर बोलताना राष्ट्रवादी सरकार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले की आहे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे कुठलातरी बोलणार नाहीत याच्या काळात तो पुरावा नक्कीच समोर येईल असं त्यांनी म्हटले आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 20, 2025 10:31:43Jalna, Maharashtra:
FEED NAmE : 2007ZT_CHILLY_RATE_JALNA(9 FILES)
जालना : तिखट मिरची झाली गोड,मागणी वाढल्यानं भाव पोहचले 9 हजार रुपये क्विंटलवर,'कोकडा'व्हायरसच्या प्रादूर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन
अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद या दोन तालुक्यात मिरची लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यंदा मिरची पिकावर 'कोकडा'व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हजारो एकरावरील मिरची पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे मिरची पिकाची बाजारपेठेत आवक घटली आहे.याचा परीणाम बाजार भावावर झालाय.मिरचीला प्रतीक्विंटल 9 हजार रुपये भाव मिळतोय.त्यामुळे 'कोकडा' रोगाच्या प्रादुर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झालीय.मिरचीला 9 हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी खुष झालाय.
बाईट :हरी लोखंडे, मिरची उत्पादक शेतकरी,पारध
(पिवळा शर्ट ,गळ्यात रुमाल असलेला शेतकरी )
बाईट : शिवा पाटील लोखंडे,व्यापारी(पांढरा शर्ट)
1
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 20, 2025 10:30:14Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव ब्रेकिंग -*
DHARA_UBT
ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या गळाला, ठाकरे सेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घरी जाऊन घेतली भेट.
धाराशिव मध्ये पुन्हा ऑपरेशन टायगर ची चर्चा
प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात मनोमिलन ?
विधानसभेतील पराभवानंतर शिवसेना उपनेते आणि माजी आमदार असलेले ज्ञानराज चौगुले पहिल्यांदाच प्रवीण स्वामींच्या घरी
धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाढती जवळीक, ही राजकीय सुसंस्कृतपणा की धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय ?
भेटीचा कारण गुलदस्त्यात, मात्र भेटीने चर्चांना उधाण
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांच्यात समेट ?
निवडणुकीच्या नंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र आणि तांत्रिक कारण पुढे करत घेतली होती न्यायालयात धाव
दोघांचा न्यायालयीन लढा सुरू असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोघांना आणलं एकत्र
पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते आमदार प्रवीण स्वामी यांच्या घरी एकत्र
आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फटाक्यांच्या आतषबाजीत उमरगा येथील निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि उमरगा मतदारसंघातही शिवसेनेचे पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले हेही भेटी वेळी उपस्थित
Byte प्रताप सरनाईक
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 20, 2025 10:05:51Pandharpur, Maharashtra:
20072025
Slug - PPR_MAHAJAN_BYTE
file 08
-----
Anchor - ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच हा ब्रँड संपला, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले उत्तर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या मतदारसंघातील वारकऱ्यांसोबत आज पंढरपूर मध्ये आले आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा गोष्ट वेगळी होती मात्र जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले बाळासाहेबांच्या विचारात तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे. प्रश्न यांचेच उत्तर यांचीच आणि हे असली कसली मुलाखत घेतात कोण बघणार या मुलाखती, लोक हसू लागले आहेत. दोघांनी मुलाखत घ्यायचे हा काय विषय होऊ शकतो का
रायगडच्याच पालकमंत्री पदाबाबत काय विचारता, नाशिक बद्दल ही विचारा असे म्हणत महाजन यांनी पांडुरंगाला साकडे घालूया, हा विषय संपतोय का, पण सध्या कुंभमेळ्याची जबाबदारी शासनाने माझ्यावर दिलेली आहे. त्या दृष्टीने मी त्यासाठी काम करतोय. असे म्हणत पालकमंत्री पदावरून अधिक बोलणे टाळले.
येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भुई सपाट झालेली दिसेल. असे म्हणत महा युतीला चांगलं यश मिळण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातले चार मंत्री काढणार आहेत याबाबत संजय राऊत म्हणत असतील तर ही आतल्या गोठातली माहिती आहे. त्यांना माहिती असेल त्यांचे जर वर काय आमच्या पक्ष्यांची वरिष्ठांशी बोलणं झालं असेल तर ते त्यांनाच माहित ते त्यांनाच विचारा असं म्हणत संजय राऊत यांची खिल्ली उडवली
हनी ट्रॅप बद्दल वडेट्टीवार आरोप करता येत नाना पटोले पेन ड्राईव्ह दाखवत आहेत त्यांनी एखादा टक्का तरी पुरवा दाखवला पाहिजे. कुठलीही स्पष्टता याबाबत नाही. पुरावे आहेत तर त्याने दाखवलं पाहिजे मात्र मला वाटतं हे सगळे हवेतले गोळीबार आहेत
कृषी मंत्री रमी खेळताना दिसत आहेत असे जर असेल तर हे योग्य नाही अयोग्य आहे विधानसभेमध्ये बसून असं कोणी करत असेल तर याचे समर्थन करू शकत नाही.
विरोधी पक्षातले अनेक खासदार हे संपर्कात आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे अधिक लोक आहेत आता त्यांना तिकडे राहायचं नाही. कायदेशीर अडचणी असल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही मात्र ते सांगतात की आम्ही तुमच्या सोबतच आहे
कोणत्या सीडीमुळे सरकार आलं हे असं म्हणत आहेत तर ती सीडी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिली उगीच हवेत गोळीबार करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं महाजन म्हणाले
----
byte - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
9
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 10:03:51Kalyan, Maharashtra:
*योगेश कदम गृहराज्यमंत्री पॉइंटर*
शिवसेना शिंदे गटाचा टिटवाळा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे गुणगौरव सोहळ्यासाठी आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना
*ऑन कोकाटे रमी व्हिडिओ*
तो व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही पाहिल्यावर मी त्यावर काहीतरी बोलेल
*ऑन आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे टीका*
आज एक वेगळा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करायचा
*शिवसेना-भाजप मध्ये फूट पडले आहे असे एक वातावरण तयार करायचं*
स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात
या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं
मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे सिंहाचा वाटत हा कोणीही नाकारू शकत नाही
*महाराष्ट्र ला महायुती मधून यश मिळालेला आहे शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा होता*
आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे मंत्री काम करत आहोत
आमच्या मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलं वातावरण आहे
*ऑन उद्धव ठाकरे*
*उद्धव जी जेव्हा सोनिया गांधींना भेटायला जातात दिल्लीत गेले होते त्याचं काय*
*महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेसचे तळवे चाटले त्याचं काय*
हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला काँग्रेसचे साथ तुम्ही स्वीकारली
*सोनिया गांधींना भेटायला तुम्ही दिल्लीत जातात*
वंदनीय बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का
हे त्यांनी स्वतःला विचारव
*सगळे बोट तुम्ही दाखवतात त्यावर तीन बोट आपल्याकडे असतात याचं भान ठेवलं पाहिजे*
*ऑन फडवणीस सल्ला*
आज गृहराज्यमंत्री म्हणून फडवणीस साहेबांसोबत जे मला काम करायला मिळते
आज महसूल राज्यमंत्री आणि अन्य जे काही माझ्याकडे खाते आहेत त्यामधून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहोत
आमच्या नेतृत्वाची प्रतिमाची कुठेही बदल होणार नाही ते जबाबदारी आमची ती व्यवस्थितपणे मी पार पडतोय
*जे काही आरोप आहेत वेळेत उत्तर काही दिवसातच देणार*
*ऑन उद्धव ठाकरे मुलाखत*
*उद्धवजींची मुलाखत कुणी बघत नाही*
एके शिवसैनिक त्यांची मुलाखत बघत नाही
*स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत घेणं स्वतःच उत्तर द्यायची हे जगामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतोय*
*त्यामुळे अशा मुलाखतला आम्ही महत्त्व देत नाही*
byte.. योगेश कदम
गृहराज्य मंत्री
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 20, 2025 10:01:06Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
9 FILES
SLUG NAME -SAT_DESAI
*सातारा: शंभूराज देसाई बाईट पॉइंटर*
कृषिमंत्री कोकाटे हे नेमकं मोबाईल मध्ये काय पाहतायत हे पहावं लागेल. मोबाईल मध्ये जर गेम खेळत असतील तर हे योग्य नाही सर्वांनीच विधिमंडळातील नियम पाळले पाहिजेत. कोकाटे हे स्वतः याचा खुलासा करतील
दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली असेल यावर शंभूराज देसाई यांनी असं कोणीही आशा व्यक्त करू शकतो.. आता उबाठा आणि मनसे एकत्र येणार अशी आशा धरून काहीजण बसले आहेत.... मात्र मनसे म्हणत आहे आम्ही मराठीचा मुद्द्यावरून एकत्र आलो आहे.. आमच्या पक्षात राष्ट्रीय राज्य कार्यकारणी झाली यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी कोणतीही चर्चा नाही.
आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या बातम्या पाहून कोणीतरी गावी जाईल अशी टीका शिंदेंवर केली याला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिल आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दाखला देत संताजी आणि धनाजी त्यांचे शूर सरदार होते. मुघलांची घोडी तळ्यामध्ये पाणी प्यायला गेले तरी त्यांना हे दोन शूर सरदार दिसायचे. अशी अवस्था उबाठा नेत्यांची झाली आहे. सगळीकडे आमचे साहेब त्यांना दिसतात.. जास्त बोलू नका आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत. नितेश आणि नीलेश राणे नेहमी म्हणत असतात अनेक गोष्टींची चौकशी करा. यामध्ये कोणाचे कुठे संबंध आहेत हे उघड होईल. असे जर सातत्याने उबाठा चे नेते बोलू लागले तर सर्व प्रकरणाच्या खोलात जावे लागेल
हनी ट्रॅप प्रकरणात फडणवीसांनी सांगितलेला आहे असला कुठला हानी नाही आणि ट्रॅप ही नाही कपो कल्पित या गोष्टी आहेत. ज्या आधारे वडेटीवार बोलतायत... हा पुरावा पहिल्यांदा अध्यक्षांकडे द्यावा लागतो तो दिलेला नाही. याचा अर्थ हवेत तीर मारायचं काम काँग्रेसचे नेते करत आहेत. असं कोणताही प्रकरण घडलेलं नाही
सरनाईक हे कोणत्या अर्थाने शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे बोलले हे मला माहीत नाही. मला त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय समजणार नाही यावर मी नंतर बोलेल
उबाठाच्या नेत्यांचं असे म्हणणं आहे जादूटोणा करून महायुतीने 200 जागा मिळवल्या तर लोकसभेला महाविकास आघाडीने केला असा कोणता जादूटोणा केला की तुमचे उमेदवार निवडून आले तुम्ही दहा डायनासोर कापले होते का?..
जादूटोणा करून जर जागा निवडून येत असत्या तर आपण खोल्या भरून पैसे ठेवले असते.. जादूटोण्यावरून उबाठा गटाच्या नेत्यांनी बोलणे म्हणजे आता यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली याचा अंदाज येतो.
शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियाला शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिलय. महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चालू आहे. अनावधानाने कळत नकळत महायुती मधील काही नेत्यांकडून काही चुका घडत असतील तर त्यांना सावरण्याची समजावण्याची संधी आमचे तिन्ही वरिष्ठ नेते देतात. दुसऱ्या कोणी आम्हाला सांगायची गरज नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली आहे ते आमचे चांगले मित्र आहेत उत्तम नेते आहेत मात्र त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कोणताही परिणाम पश्चिम महाराष्ट्र किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार नाही. महायुती जिल्ह्यामध्ये भक्कम आहे असे मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले
राज आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत.. राजकीय मुद्द्यावरून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.. तुम्ही दोघांचीही मुलाखती पहा. त्यांनी कार्यक्रमात कोणताही पक्षाचा झेंडा वापरलेला नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या भूमिका स्पष्ट होऊ द्या मग आम्ही यावर बोलू
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 20, 2025 10:00:46Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2007ZT_JALNA_ROTA(6 FILES)
जालना : कोथिंबीरीचे भाव कोसळले,व्यापारी 2 रुपये किलोनं कोथिंबीर मागत असल्यानं शेतकऱ्यानं फिरवला दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टर
अँकर : कोथिंबीरीचे भाव कोसळले आहेत.व्यापारी शेतकऱ्यांना 2 रुपये किलोनं कोथिंबीर विकत मागत असल्यानं शेतकऱ्यानं दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोटाव्हेटर फिरवला आहे.दिड एकर कोथिंबीरीवर 70 हजारांचा खर्च करूनही निव्वळ उत्पन्न तर दूर पण साधा खर्चही निघत नसल्यानं भागवत पंडित या जानेफळ गावच्या शेतकऱ्यानं त्यांच्या दिड एकरावरील कोथिंबीरीवर रोटाव्हेटर फिरवला.
बाईट : भागवत पंडित,शेतकरी
0
Share
Report