Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

दूषित पाण्यामुळे मृत्यू: कुटुंबांना मिळाले पाच लाख रुपये!

AAABHISHEK ADEPPA
Jul 20, 2025 04:02:51
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या दोन शाळकरी मुलींच्या कुटुंबीयांना मिळाला प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत Anchor - शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी भागात काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पीडित कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. धनादेश स्वीकारताना पीडित कुटुंबीयांना आपल्या अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला दुःखद प्रसंगात सरकारने मदतीचा हात दिला असून यामधून पीडित कुटुंबांना आधार मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top