Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

कर्जमाफी समितीवर बच्चू कडूंचा तीव्र हल्ला!

ADANIRUDHA DAWALE
Jul 19, 2025 08:31:09
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_KADU_ON_COMITE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही; येत्या 24 तारखेला चक्काजाम होणारच – बच्चू कडू अँकर :– शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते तेव्हा सरकारच्या आश्वासनानंतर कडू यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केले होते या आंदोलनानंतर काल एक समिती स्थापन केली आहे यावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. कर्जमुक्ती साठी सरकारने जी समिती काल नेमली त्यातून काही अर्थ बोध होत नाही. त्यामुळे येत्या 24 तारखेला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार घेतला आहे. नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही हे सर्व उत्तर थातुर मातुर आहे असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कर्ज माफी संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. दिव्यांगांचे मानधन वाढवले त्या संदर्भात सरकारचे आभारच आहे पण इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य असून देखील दिव्यांगांना कमी मानधन देत असेही कडू म्हणाले. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top