Back
विद्यादीप बालगृहाला टाळा: ३० जूनच्या पळून जाणाऱ्या मुलींचा धक्का!
VKVISHAL KAROLE
FollowJul 19, 2025 02:32:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn vidyadeep av
Feed attached
विद्यादीप बालगृहातून ३० जून रोजी ९ मुली पळून गेल्यानंतर १८ दिवस हे प्रकरण गाजले. धक्कादायक आरोपांनंतर अखेर १८ जुलै रोजी या बालगृहाला टाळे लागले. १०० वर्षांपासून निराधार मुलींचा आधार असलेल्या या संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली. संस्थेतील ६४ मुलींना राज्यातील ३ संस्थांमध्ये स्थलांतरित केले, तर उर्वरित मुलींना पालकांकडे सोपवले. इथं मुलींचा छळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता त्यानंतर याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला आणि या प्रकरणाची चौकशी सुद्धा झाली त्यानंतर बालगृह परवाना रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती..
'
12
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 19, 2025 09:06:20Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Lonikand Bhima River Man Death
File:01
Rep: Hemant Chapude(Pune)
Anc :पुण्याच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीमा नदीत एका अन्द्यात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस येताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून लोणीकंद पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया लोणीकंद पुणे...
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 19, 2025 09:06:12Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rebbis update
feed attched
छत्रपती संभाजीनगरच्या म्हारोळा गावात एक आगळावेगळा प्रकार घडला आहे. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला. काल सकाळी हा वासरू मृत्युमुखी पडला. विशेष म्हणजे वासरू गायीचं दूध पित असल्याने गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली. बरं या गाईचं दूध गावातील अनेक घरांना पुरवठा केला जात होता. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्ख गावं शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचेले आहे. परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात इंजेक्शन पुरत नाही. लोक रुग्णालयात रांगा लावून इंजेक्शन घेत आहे
byte 2 गावकरी आहे
byte डॉ. प्रणिती म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 19, 2025 09:03:31Chandwad, Maharashtra:
अँकर:- चांदवड शहराच्या आठवडे बाजार मध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत ओरबडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेग बिर सिंगसंधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी सापळा रसून पोत चोरणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलां विरुद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करत आहे
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 19, 2025 09:02:24Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळा येथे मोर्चा
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदार संघात प्रकल्पाची घोषणा
प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी मोर्चा
मोर्चा झाल्यानंतर असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 19, 2025 09:00:26Ambernath, Maharashtra:
बदलापुरात ज्वेलर्समध्ये चोरी!
दत्तवाडी परिसरातील मराठा ज्वेलर्स फोडलं!
बदलापूर पूर्व पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Bdl theft
Anchor : बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात चोरट्यांनी ज्वेलर्स फोडल्याची घटना घडलीये. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडलं असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Vo : बदलापूरच्या दत्तवाडी परिसरातील मराठा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडलंय. या दुकानाच्या बाहेरची ग्रील तोडून शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि चोरी केली. यात नेमका किती मुद्देमाल चोरीला गेलाय, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, दत्तवाडी परिसरात चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 19, 2025 08:38:11Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत..PKG
Note : शौच करिता जाणाऱ्या महिलांचे चेहरे ब्लर करावे..
Anchor : ' बेटी बचाव , बेटी पढाओ ' सरकारचा हा ब्रिद वाक्य अकोल्यातील मौजे सागद या गावात फोल ठरत असल्याचं दिसून येत आहेय..शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी या गावातील विद्यार्थी आणि गावकरी सरसावले आहेत..
Vo 1 : 40 किलोमीटरच्या अंतरावरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले हे विद्यार्थी आपल्या गावातील रस्ता आणि गाव हागणदारीमुक्त करण्याच्या विनंतीसाठी आले आहेत...अकोला जिल्ह्यातील मौजे सागद ते निंबा या रस्त्यावर महिला व पुरुष शौच करण्यासाठी बसतात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने आणि काटेरी झुळूप वाढल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी अडथळे निर्माण होत आहेत आणि रस्त्यांची दुरवस्था सध्या गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहेय..गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्येशी सामना करावा लागत आहेय.. गावातील हा रस्ता दुरुस्त करून गाव हागणदारीमुक्त करण्यात याव अशीया शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी आहेय..
Byte : खुशी राऊत , विद्यार्थिनी
Vo 2 : रस्त्यावरून मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने घाण असल्याने विद्यार्थ्यांना खाली सुद्धा उतरता येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही.. यासोबतच शेजारील गावातील नागरिक या रस्त्यावर शौच करण्यासाठी येत असल्याने या गावातील जागृत महिलांना रोज या लोकांसोबत ' पंगा ' घ्यावा लागत आहेय.. अनेक महिलांना या ठिकाणी शौचासाठी रोखल्यास हाणामारी पर्यंतच्या गोष्टी या महिला करतात..
रस्त्यामुळे सुद्धा अनेक दुर्घटना घडतात..
ग्रामस्थांनी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्त्यांची दुरुस्ती आणि हागणदारी मुक्तीच्या मागणीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहेय...
Byte : रत्नाबाई गवारगुरु , ग्रामस्थ..
Final Vo : हागणदारी मुक्त गाव करण्याची जबाबदारी गावकऱ्यांसोबत प्रशासनाची सुद्धा आहे त्यामुळे गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत प्रशासनाने सुद्धा त्यांची साथ दिली पाहिजे..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 19, 2025 08:38:03Pandharpur, Maharashtra:
19072025
Slug - PPR_MOHITE_SPEECH
feed on 2c
file 01
-----
Anchor - राष्ट्रवादीचे दोन गट एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2009 ते 2024 काळात एकत्र राष्ट्रवादीची वाट का लावली, आम्हाला भाजपत जाण्यासाठी का परिस्थिती तयार केली असे म्हणत आपली खदखद बोलून दाखवली आहे.
2009 मध्ये माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात अनेक जण कात्री घेऊन बसले होते. यातूनच जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली असे म्हणत अप्रत्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केली.
पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली मनातील खदखद बोलून दाखवली. त्यामुळे खासदाराची एकत्रित होण्याची सध्या तरी मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे.
------
Sound Byte - खासदार धैर्यशील मोहिते पाटील
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 19, 2025 08:37:19Shirdi, Maharashtra:
Anc_ शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या योगीराज गंगागीरी महाराजांच्या 178 व्या हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा आज वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे पार पडला.. अहिल्यानगर आणी संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शनीदेवगाव येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी खासदार संदिपान भुमरे आमदार रमेश बोरणारे हे देखील उपस्थित होते येत्या 30 जुलै पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात सप्ताह पार पडणार आहे..
2
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 19, 2025 08:31:09Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_COMITE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही; येत्या 24 तारखेला चक्काजाम होणारच – बच्चू कडू
अँकर :– शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते तेव्हा सरकारच्या आश्वासनानंतर कडू यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केले होते या आंदोलनानंतर काल एक समिती स्थापन केली आहे यावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. कर्जमुक्ती साठी सरकारने जी समिती काल नेमली त्यातून काही अर्थ बोध होत नाही. त्यामुळे येत्या 24 तारखेला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार घेतला आहे. नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही हे सर्व उत्तर थातुर मातुर आहे असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कर्ज माफी संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. दिव्यांगांचे मानधन वाढवले त्या संदर्भात सरकारचे आभारच आहे पण इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य असून देखील दिव्यांगांना कमी मानधन देत असेही कडू म्हणाले.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 19, 2025 08:06:56Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1907ZT_JALNA_CHAKKA_JAM(9 FILES)
जालना :व्यापाऱ्यानं शेतमाल खरेदी केला पण शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ,पैसे मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन
अँकर : व्यापाऱ्यानं कोट्यावधी रुपयांचा शेतमाल खरेदी केला पण शेतीमालाचे पैसे देण्यास टाळाटाळ केलीय.त्यामुळे शेतमाल विक्रीचे व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबासह चक्का जाम आंदोलन केलं. जालन्यातील जालना-भोकरदन रोडवरील जवखेडा ठोंबरे फाट्यावर हे आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात शेतकरी जनावरं,बैलगाड्या घेऊन दाखल झाले होते.दरम्यान व्यापाऱ्याकडे अडकलेले आम्हाला आमचे पैसे मिळवून द्या व्यापारी अडकलेले पैसे देत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय
बाईट: आंदोलक शेतकरी
1
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 19, 2025 08:06:07Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मतकुणकी येथे सलग तिसऱ्या दिवशी शक्तीपीठची मोजणी पाडली बंद, शेतकऱ्यांनी भजनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा केला निषेध.
अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठीचा विरोध कायम आहे, तासगाव तालुक्यातल्या मतकुणकी येथे भजन करत शेतकऱ्यांनी मोजणीचा निषेध नोंदवला आहे,तिसऱ्या दिवशीही मोजणी होऊ दिली नाही. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांचा याला विरोध कायम आहे.मतकुणकी या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मोजणी करण्याचा घाट घालण्यात येतोय,मात्र शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.सरकारच्या आणि मोजणीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात,शक्तिपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण,या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण,अश्या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवत,
तिसऱ्या दिवशीही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी पासून रोखून धरले आहे.
..
1
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 19, 2025 08:03:11Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn dog cow avb
feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या मारोळा गावात एक आगळावेगळा प्रकार घडला आहे. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासरूला पिसाळलेला कुत्रा चावला. काल सकाळी हा वासरू मृत्युमुखी पडला. विशेष म्हणजे वासरू गायीचं दूध पित असल्याने गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली. बरं या गाईचं दूध गावातील अनेक घरांना पुरवठा केला जात होता. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्ख गावं शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचेले आहे. परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात इंजेक्शन पुरत नाही. लोक रुग्णालयात रांगा लावून इंजेक्शन घेत आहे
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 19, 2025 08:02:25Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_ChildCase
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - शासकीय नोकरी मिळण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलीला विकल्याच्या प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करताहेत.
Vo - अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या शासकीय नोकरीसाठी अडचण येऊ नये म्हणून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल झालाय. सुरेखा ह्या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे यांच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. दरम्यान वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. नोकरीसाठी तिसऱ्या आपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. या विषयावरून दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले पतिकडेच होती. सुरेखा यांनी लोकांच्या घरी धुनी भांडी करून गुजरान केली. आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यापूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्या नंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एन जी ओ बद्दल माहिती मिळाली. एन जी ओ च्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते.
Byte - नवीन जाणकर - जनसंजीवनी एन जी ओ संचालक
Vo - एन जी ओ कडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवन्यात यावे आणि पती विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये.
Byte - सुरेख - मुलीची आई.
Vo - मुलीच्या जन्मावेळी तिच्या वडिलांचे नाव आणि शाळेत टाकल्यानंतर आताचे नाव या तफावत असल्याने आणि सांभाळ करणाऱ्या जोशी दांपत्याकडे मुलगी दत्तक घेतल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस या संपूर्ण प्रकरनाचा तपास करताहेत.
--------------------
टीप - मुलीचे फोटो, आरोपीचा फोटो ब्लर करावा
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 19, 2025 08:00:17Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 1907_WARDHA_S_WKT
- वर्ध्याच्या देवळीत 5 कोटीचे इंटेरियल स्लॅब कोसळला
- देवळीचे खासदार रामदास तडस इनडोर स्टेडियम मधील घटना
अँकर- वर्ध्याच्या देवळी शहरात 14 कोटी खर्च करून खासदार रामदासजी तडस इनडोर स्टेडियम बांधण्यात आले आहेय..आणि अतिरिक्त 5 कोटीचे इंटेरियल करण्यात आले आणि त्याचे उदघाटन पाच महिन्यांपूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन देखील करण्यात आले आहेय..मात्र दोन दिवसांपूर्वी स्टेडियमचा स्लॅब कोसळला त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्न विचारला जात आहेय..इंडोर स्टेडियम मधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- wkt, मिलिंद आंडे
विवो- देवळीचे खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम बांधण्यात आले मात्र या स्टेडियम बांधकामाच्या गुणवतेवर प्रश्न विचारला जात आहेय..दोन दिवसांपूर्वी स्लॅब कोसळला मात्र कोणतेही जीवितहानी झाली नाही..निकृष्ठ बांधकाम केल्याचा आरोप होत असताना..नगरपरिषदचे मुख्यधिकारी, अभियंता आणि गुणवत्ता तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी किरण ठाकरे यांनी केली आहेय..
बाईट- किरण ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 19, 2025 07:37:01Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- पेरणी झाली… पावसाने पाठ फिरवली… आणि शेतकऱ्यांनी शेतात फिरवला रोटर...
AC ::- लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कष्टांवर पुन्हा एकदा पावसाने पाणी फेरलं आहे… पेरणी केली… पण पाऊस नाही… आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांना आपल्याच शेतावर रोटर फिरवायची वेळ आली आहे. लातूर तालुक्यातील शिराळा येथे एका शेतकऱ्याने आपल्या सोयाबीनच्या शेतात रोटर फिरवलं आहे… मृग नक्षत्रात पेरणी केली पण पेरणी झाल्यापासून पाऊसच आला नाही त्यामुळे पेरणी केलेलं पिक वापलं नाही. काही ठिकाणी पिक वापल तरी त्या पिकांची वाढ झाली नाही. म्हणून शेतकर्यांनी आपल्या पिकांवर रोटर फिरवलं आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे… पावसाची प्रतिक्षा करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय…
0
Share
Report