Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

केडीएमसी अस्पताल के ICU बंद: मनसे का ऑक्सीजन मास्क पहनकर प्रदर्शन

ABATISH BHOIR
Dec 02, 2025 10:36:30
Kalyan, Maharashtra
केडीएमसी रुग्णालयातील आयसीयुबंद मनसेचे ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन.. ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन केडीएमसी मुख्यालयात मांडला ठिय्या.. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालया मधील आय.सी.यू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बंद आहे. आयसीयु बंद असल्याने रुग्णांना ठाणे, मुंबई येथे घेऊन जावे लागत असल्याने, येथील रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडला. लवकर आयसीयू सुरु न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात गरजू नागरिक उपचारासाठी येतात परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचार घेण्यासाठी पाठवले जाते. गेल्या दोन वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालयातील सुसज्ज आयसीयू असून देखील सुरु करण्यात आले नाही. ते लवकरात लवकर चालू करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याण मधील नागरिकांचे काही पडले नाही. दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली मधील आयसीयू नसल्यामुळे सर्पदंश मुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून महापालिकाेने काहीही बोध घेतला नाही. काल देखील आयसीयु उपलब्ध नसल्यामुळे एक महिलेला दोन तासानंतर दुसऱ्या रुग्णालया मध्ये जाण्यास सांगितले. वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई येथील रुग्णालया मध्ये न पोहचल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याकरिता लवकरात लवकर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामधील सुसज्ज आयसीयु चालू करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क लावून ठिय्या आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर आयसीयू सुरु न केल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Byte.. कपिल पवार विभाग अध्यक्ष मनसे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 10:37:35
Shirdi, Maharashtra:निवडणुकीची गोंधळाची अवस्था झालेली आहे.... निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष आहे..... अगोदरच Evm वर शंका आता आणखी काळजी घ्यावी लागे.... २० दिवस हे सगळं सांभाळायचं राखण बसायचं का लोकांनी?..... या सगळ्या निर्णयामुळे लोकांचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही.... अशा प्रकारच्या निर्णयामुळे, जनतेचे, उमेदवारांचे हाल होत आहे.... शासकीय हस्तक्षेपातून निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले जातात ते असे असतात... नको वाटणाऱ्या गोष्टी निवडणुकीत घडताय.... निवडणूक आयोगाला सगळे अधिकार असतात न्यायालयाचे तोंडून ऐकून घेतलं तर स्वतःवरच अपवाद जातो.... सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम चालू...* निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे ते समजून घेत नाही.... अधिकारी जेवण करून झोपतील येथे उमेदवारांना जनतेला झोप नाही.... लोकशाहीची प्रक्रिया निकोप असली पाहिजे मात्र दुर्दैवने तसं नाही.... निवडणूक आयोगाचे वागणं निरपेक्ष आणि स्वायत्त पाहिजे तसे दिसत नाही.... तीन तारखेलाच मतमोजणी झाली पाहिजे होती... निवडणूक कार्यक्रमाची आखणीच सदोष होती... *मंत्रालयातील एखाद्या पीएने निवडणूक कार्यक्रम काढावा आणि जनतेला द्यावा असा कार्यक्रम....* *आम्ही ईव्हीएमची काळजी घेऊ विजय आमचाच...* *राहात्याला ईव्हीएम कशाकरता बदलले असे म्हणत विखे पाटलांवर निशाणा....* अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस पेटून उठतोय हे सकारात्मक...
56
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 10:35:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - थेट ऑस्ट्रेलिया मधून येऊन शिरळा येथे बजावला मतदानाचा हक्क... अँकर - मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत एक तरुण सांगलीच्या शिरळामध्ये दाखल झाला. मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान केलं आहे. अन्सार कासिम मुल्ला असे या तरुणाचं नाव असून तो ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला असून दोन डिसेंबर रोजी शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिरळामध्ये दाखल झाला. मतदानासाठी आपला मित्र आल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी फटाक्यांचं आतिशबाजी करत स्वागत केले, त्यानंतर अन्सारने मतदानाचा पवित्र हक्क बजावला, यानिमित्ताने शिरळा तहसीलदार शामला खोत यांनी त्यांचा सत्कार यावेळी केला. मतदानाला येण्यासाठी मेलबॉर्न ऑस्ट्रेलियाातून शिरळा येण्यासाठी दीड लाख रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आला, असल्याचे यावेळी सांगितलेतो आज संध्याकाळी मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी रवाना होणार आहे.
30
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 02, 2025 10:35:33
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- ईव्हीएम यंत्रात बिघाड आणि संथ मतदान गती यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती अँकर:--ईव्हीएम यंत्रात बिघाड आणि संथ मतदान गती यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या जिल्हा परिषद शाळा, आदर्श हिंदी शाळा आदी तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतदान थांबल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. कित्येक मतदार मतदानाच्या संथ गतीने कंटाळून परत गेल्याचे चित्र बघायला मिळाले. असे असले तरी बिघाड दुरुस्त झाल्यावर मात्र महिला वर्गाचा मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एक नकाराध्यक्ष पद आणि वीस नगरसेवक पदांकरिता गडचंदुर शहरातील 25000 मतदार सकाळपासून मतदान केंद्रांवर उत्साहाने दाखल झाले आहेत दुपारनंतर मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
63
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 02, 2025 10:19:36
118
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 10:02:22
Dhule, Maharashtra:निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे, त्यामुळे लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाल्याच सांगत, निवडणूक आयोगाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका बद्दल, राज्याचे पणन वरात शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रियांमध्ये प्रचार आणि आता मतदान प्रक्रिया सुरू असताना पुन्हा आता निकालाबद्दल नवीन निर्णय आल्याने लोकांमध्ये नैराश्य आहे. लोकशाही बद्दल लोकांमध्ये उत्साह कमी झाल्याचे बघायाला मिळत आहे., अस वक्तव्य रावल यांनी केले आहे. पहिले ५० टक्के आरक्षणची चिंता होती,नंतर नगरपरिषद निवडणुकाची चिंता होती आणि आता निकाल पुढे ढकलून तिसरा शॉक दिला आहे, निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे. निवडणूक पारदर्शक होणे गरजेचे आहे, असं अपेक्षा रावल यांनी व्यक्त केली आहे.
98
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 09:32:12
64
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 02, 2025 09:31:54
Dharashiv, Maharashtra:निवडणूक आयोग आहे की अडवणूक आयोग. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बट्ट्या भोळ लावला. निवडणुका मतमोजणी पुढे ढकलणे लोकशाहीसाठी दुर्दैवी. निवडणूक आयोगावर धाराशिव चे उबाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सडकून टीका. Anchor धाराशिव- नागपूर खंडपीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर सध्या निवडणूक आयोगावर सर्व स्तरातून टिका होते आहे. धाराशिव चे उबाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केलीय. निवडणूक आयोग आहे की अडवणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बट्ट्याभोळ लावलाय. निवडणुका पुढे ढकलणे ही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. निवडणूक आयोगाच्या धरसोड धोरणामुळे आणि चुकीचे नियोजन आहे त्यामुळे निवडणूक आयोगात सक्षम माणसं बसवावी अशी मागणी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलीय. एखादी ग्रामीण भागातील महिला निवडणूक आयोगापेक्षा स्वयंपाकाचं नियोजन चांगली करते असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर निवडणूक आयोगाला लगावलाय. Byte खासदार ओमराजे निंबाळकर
116
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 02, 2025 09:21:51
Jalna, Maharashtra:जालना : पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी तरुण पुण्यातून अंबडमध्ये आला मात्र मतदान न करताच तो माघारी परतला,दुसऱ्यानेच आपल्या नावावर मतदान केल्याची तरुणाची तक्रार,अंबड मधील बूथ क्रमांक 3 वरील घटना अँकर :जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक तरुण पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून अंबडमध्ये आला.मात्र मतदान न करताच तो माघारी परतलाय. हा तरुण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याआधी दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्या नावावर मतदान केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे.आनंद शिंदे असं या तरुणाचं नाव असून प्रभाग क्रमांक 1 वरील बूथ क्रमांक 3 वर या तरुणाचं मतदान झालेलं होतं.त्यामुळे दूरवरून येऊनही मतदान न झाल्यानं हा तरुण निराश झालाय.निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने हा तरुण आल्या पावली माघारी फिरला
73
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 02, 2025 09:21:28
125
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 08:50:29
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - उद्योग मंत्री उदय सामंत ऑन महाड राडा महायुतीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना मैत्रीपूर्ण लढत करा अशा तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं महाडमध्ये झालेली हाणामारी भरत गुळगे यांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे भरत गोगावले यांचे मंत्रीपद अडचणीत आणण्याचं षडयंत्र योग्य तपास करावा, विकास गोगावले आणि भरत गोगावले यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न विकास गोगावले यांना त्यांचे वडील मंत्री आहेत यांचं भान गोगावले यांना त्रास द्यायचा आहे म्हणून या गोष्टी होत आहेत महाडमध्ये असं चालू ठेवणार आहात का हे महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे
106
comment0
Report
Advertisement
Back to top