Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

पैसे के लिए महिला ने आरोपियों को फँसाया; कोर्ट ने हिरालाल केदार को न्यायिक हिरासत में भेजा

SKShubham Koli
Dec 09, 2025 01:03:54
Thane, Maharashtra
पैशांसाठी महिलेने अडकवले आरोपींना या प्रकरणी आज ठाणे पोलिसांनी अटक आरोपी हिरालाल केदार याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने हिरालाल केदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीये… तर फरार आरोपी याला लवकरात लवकर पकडून कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत मात्र आरोपी यांना पैशांसाठी या प्रकरणात अडकवले गेले असून स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली जो गोरख धंदा सुरु असतो तो हिरालाल केदार आणि रवी पवार उघडकीस आणायचे म्हणुन त्या दोघांना या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला असून घटनेच्या दिवशी हिरालाल केदार ही ठाण्यात …
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 09, 2025 03:34:49
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राऊत गटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोपल गटाची धोबीपछाड झाली. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्याला लागली होती. १८ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपले वर्चस्व राखल्याने वैरागमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. १८ जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील २ जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित १६ जागांसाठी काल चुरशीने मतदान झाले होते. आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती. बाजार समिती सभापतीपदवी वैराग की बार्शी असे कोणाची वर्णी लागणार? Barshiला सभापती पद दिले तर वैरागला उपसभापती पद मिळणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 03:33:58
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.3° C पर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेलेले आहे. प्रचंड कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीतही शाळकरी मुलांची शाळेची वेळ बदलली न गेल्यामुळे शिक्षण विभागाबद्दल पालकांनी रोष व्यक्त केलेला आहे. बोचरी थंडी पडत असताना शिक्षण विभागाने शाळांची वेळ बदलावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. या बोचऱ्या थंडीमुळे रस्त्यांवर शाळकरी मुलांव्यतिरिक्त रस्त्यानावर सामान्यांनाचा वावर दिसून येत नाहीये. येणारे काही दिवस थंडी अशीच वाढत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. काळजी घेण्याचा अहवाल करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 03:32:36
Akola, Maharashtra:अकोल्यातील आरोग्य विभागातील 2024 च्या सरळसेवा भरती घोटाळ्याला आता नवीन वळण मिळत असून याप्रकरणी आणखी गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी केले आहेत. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कोणताही अधिकार नसताना एनएचएमच्या पाच अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बदली केल्याचा गंभीर आरोप मिर्झा यांनी केला आहे. शासनाने बदलीवर बंदी लागू असताना देखील आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी या बदल्या केल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर तक्रारी असल्याचे कारण पुढे करत खोटा अहवाल तयार करण्यात आला आणि त्याअधारे बदल्या करण्यात आल्या, असा दावा मिरझा यांनी केला आहे. सादर केलेल्या अहवालात एकाच व्यक्तीने जवळपास 20 जणांच्या वतीने स्वाक्षऱ्या केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व स्वाक्षऱ्यांची फॉरेन्सिक चाचणी करून त्या संबंधित व्यक्तींनीच केल्या आहेत का, याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर येथे अधिवेशन सुरू असताना या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची विनंतीही मिर्झा यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 09, 2025 03:16:23
Ratnagiri, Maharashtra:शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक खेड तालुक्यातील जामगे गावात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मातोश्रींचे नाव लिलाबाई गंगाधर कदम असे होते. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम व पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. तसेच हॅथवे Internet चे सदानंद कदम आणि जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम सभापती अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून, स्थानिकांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.
100
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 03:16:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरण करताना त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला सादर करावा असा आदेश न्यायमूर्तीनी दिला आहे. इतकच नाही तर जनहित याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याना देखील त्याची माहिती द्यावी असं देखील कोर्टाने म्हटले आहे. कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये उदय नारकर यांच्यासह इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे, या संदर्भात डिव्हिजन बेंच समोर झालेल्या सुनावणी मध्ये कोर्टाने अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत कोल्हापुर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला आदेश दिला आहे.
129
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 09, 2025 03:02:13
87
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 09, 2025 02:49:52
Nashik, Maharashtra:जिल्हा परिषदेमधील ६१४ दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिव्यांगता पुन्हा एकदा तपासली जाणार. तपासणी मुंबईतील केईएम रुग्णालयात करण्यात येणार. शासनाच्या सवलती घेताना सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत तक्रारी वाढल्याने निर्णय. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रमाणपत्रांची जिल्हास्तरावरून पुन्हा चौकशी. जि.प. सीईओ ओमकार पवार यांचा निर्णय—गैरवापर रोखण्यासाठी कडक तपासणी आवश्यक. यूडीआयडी कार्ड वेळेत न सादर केल्याने ३ कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन. सर्व विभाग प्रमुखांना—७ दिवसांत युडीआयडी कार्डांची पडताळणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट निर्देश. सवलती व हक्कांचा गैरवापर केल्यास कठोरात कठोर कारवाई होणार.
152
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:46:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. दिलेल्या मुदतीत म्हणजेच २ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, अन्यथा अतिविलंब केल्यास प्रतिदिन ५० रुपये, विशेष विलंबास १०० रुपये आणि अतिविशेष विलंब केल्यास २०० रुपये प्रतिदिनाप्रमाणे अखेरच्या क्षणी म्हणजे १८ जानेवारीपर्यंत अर्ज केल्यास चक्क ४००० रुपये पर्यंत शुल्क भरावे लागेल. त्यामुळे मुदतीत अर्ज जमा करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे. माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस जानेवारीत सुरुवात होणार आहे, तर लेखी परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे.
114
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 02:45:32
Nagpur, Maharashtra:नागपूर फोनवरून धमकीप्रकरणी भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय... सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आले. मुंडेनच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी त्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस जाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले
191
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:45:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात सध्या चांगलीच हुडहुडी भरली आहे.. यंदाच्या हिवाळ्यातील तापमान घसरण्याचा रेकॉर्ड झाला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३०.४ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळी थंड वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरते आहे. यंदा ९ नोव्हेंबरपासून थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान थंडी गायब झाली होती. १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले. सकाळपासून थंडी जाणवत आहे. सकाळी बाहेर पडणारे, उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असून सायंकाळी गार वाऱ्यासह थंडीचा कडाका बसतो आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे...
189
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:32:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत सहा महत्त्वाच्या रस्त्यांवर ८ हजार अतिक्रमणे हटवून महापालिकेने जागा स्वच्छ केली, मात्र आता रस्तेांचे वास्तविक काम पुढे न्यावे यासाठी २७०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या रस्त्यांची मालकी सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने प्रत्यक्ष रस्ते तयार करणे हे आता त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, प्रथम मुख्य रस्त्याचे काम त्या विभागाकडून झाले पाहिजे, त्यानंतर मनपा सर्व्हिस रोड आणि इतर जोड कामे करेल. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरणावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ३००० कोटींची मागणी केली होती. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कमी पडणार नाही, असा शब्द दिला होता; परंतु रस्ते प्रत्यक्ष कधी सुरु होतील याबद्दल शहरात अजूनही हलचाल दिसत नाही. बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, व्हीआयपी रोड, जळगाव रोड या सहा मार्गांवर साडेपाच हजार बांधकामे हटविली गेली. नागरिकांनी जागा सोडली, दुकानदारांनी अतिक्रमण हलवले; पण पुढचे काम कोण करणार याबाबत स्पष्टता नाही.
188
comment0
Report
Advertisement
Back to top