Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

स्वाभिमानी ने ऊस दर न घोषित होने पर जयवंत शुगर कारखाने के रास्ता रोको किया

TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 08:09:33
Satara, Maharashtra
सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयवंत शुगर कारखान्याची ऊस वाहतूक ऊस दर जाहीर न केल्यामुळे इंदोली येथे रोखली आहे. जयवंत शुगर कारखान्याने गळीप हंगाम एक महिन्यांपूर्वीच सुरू केला असून देखील अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे या संघटनेने रास्ता रोको करत कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे. या ठिकाणी कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरू असून या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 12, 2025 09:54:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:भाईचा बड्डे...\n\nपोलीस अधीक्षकांनी सांगितली.. कसे घडला डबल मर्डरचा थरार\n\nस्लग - थरकाप उडवणारया डबल मर्डरचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर..\n\nअँकर - संपूर्ण सांगली शहराला हादरवून टाकणाऱ्या दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेसह झालेल्या डबल मर्डरचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पॅटर्न स्टाईलने उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आलाय.खुनाच्या वेळी नेमका काय प्रकार घडला,कशा पद्धतीने हल्लेखोरांनी उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला चढवला,या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारीं ही घटना आहे.या घटनेमध्ये उत्तम मोहितेंवर हल्ला करणाऱ्या पैकी एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,या डबल मर्डरच्या घटनेने सांगली हादरुन गेली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 12, 2025 09:50:04
Shirdi, Maharashtra:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन बिबट्या दहशत बिबट्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण... अहिल्यानगर जिल्ह्यात 1100 पेक्षा जास्त बिबटे... त्यांची उत्पत्ती वेगाने वाढत आहे.. अनेकांवर हल्ल्याच्या घटना... जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर सुरू केले मात्र संख्या कमी.. फक्त रेस्क्यू सेंटर उभारून चालणार नाही.. नविन तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करणार... रेस्क्यू सेटरमध्ये तीनशे बिबटे ठेवण्याची व्यवस्था करणार... जिल्ह्यात 25 बिबटे जेरबंद केलेले आहेत... पिंजऱ्याची संख्या वाढवणार... तातडीने पावलं उचलले जाणार... कायद्याच्या उडचणीमुळे वनविभागाला बंधने.. हतबल झाले अशी अवस्था आहे... शेड्युल एक मधून काढण्याचा प्रस्ताव.. वाघांची संख्या मर्यादित होती म्हणून हे केलं गेलं.. मात्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय... एआयच्या माध्यमातून बिबट्यावर नजर ठेवून अलार्म वाजेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न... शेड्युलमधून काढलं पाहीजे हि मागणी वाढत चाललीय आम्हीही त्याचा पाठपूरावा करू.... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... ऑन केंद्रीय जलशक्ती मंत्रालय गौरव केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलसंपदा विभागाचा गौरव केलाय याचे अतिशय समाधान... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन समोर आणलं आणि पूर्ण केलेत... जलसंपदा खात्याने फार मोठी उभारी घेतलीय... महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो मोदींजिनी केलाय त्याला या पुरस्कारामुळे अतिशय चांगल बळ मिळतंय.. मी अतिशय समाधानी , मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो... ऑन अंजली दमानिया अजित पवार राजीनामा मागणी राजीनामा कोणी मागावा किंव्हा मागू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत.. मला असं वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे... अंजली दमानिया यांच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया.. ऑन संभाजीनगर मॅप व्हायरल ही बाब अतिशय गंभीर... काही हितसंबध असणारे अधिकारी स्थानिक लोकांना हाताशी धरून अगोदरच जमीन घेणे , भूसंपादन करताना भाव वाढवून मिळणे किंवा कमी भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणे अश्या तक्रारी त्यावेळी सुद्धा आल्या... मी विरोधीपक्षनेता असताना समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मराठवाडा येथे अशा तक्रारी माझ्याकडे देखील आल्या होत्या , याबाबत चौकशी सुरू आहे.. पुणे संभाजीनगर महामार्ग हा विदर्भाला जोडणारा रस्ता , ट्रॅफिकची सोय गतीने व्हावी.. हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे , आणि रस्ता जरी नॅशनल हायवे करीत असले तरी भूसंपादन मात्र राज्य सरकार करत... त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना करू असे जमिनीचे व्यवहार होत असतील तर आपण चौकशी करू... पुणे संभाजीनगर महामार्गाचा मॅप वायरल होत असल्याबाबत या प्रकरणाची चौकशी करू... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 09:46:19
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग जालन्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश खुद्द अंबेकरांनीच दिली माहिती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा पक्षाला मोठा धक्का एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार आज जाहीर पक्ष प्रवेश अँकर- जालन्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सायंकाळी शहरातील मामा चौकात एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार असून या मेळाव्यात अंबेकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे.. भास्कर अंबेकर मागच्या 14 वर्षांपासून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.. जालना नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भुषवलं.. मात्र आता पक्षात वेळो वेळी अवमान केला गेला.. मान सन्मान राहिला नाही.. सुख:दु:खालाही पक्ष नेतृत्व विचारत नाही. जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा दौरा असतानाही कळवलं जात नाही. त्यामुळं याची खंत अंबेकर यांनी व्यक्त केलीये. त्यामुळं आज हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत.. त्यामुळं महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी मोठा धक्का दिलाय..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 12, 2025 09:44:27
Solapur, Maharashtra:सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक - सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक - छत्रपती संभाजी महाराज चौक के रास्ता रोको आंदोलन करते अजित पवार यांच्या विरोधात निदर्शन - मुंढवा येथील पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरण संदर्भात भिम शक्ती सामाजिक संघटने आक्रमक भूमिका - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी.. - भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. - छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा झाला होता खोळंबा..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 09:43:37
Washim, Maharashtra:एक महिला शेतकऱ्याने खरीप हंगामात नव्या पिकाचा यशस्वी प्रयोग करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चियाची लागवड साधारणतः रब्बी हंगामात केली जाते, मात्र उकळी पेन येथील सरला देवराव अंभोरे यांनी खरीप हंगामात चिया पिकाची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला आहे. आत्मा प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ मध्ये अर्ध्या एकरावर प्रायोगिक लागवड करण्यात आली होती. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने सरला अंभोरे यांनी यावर्षी तीन एकरांवर चिया पिकाची व्यावसायिक लागवड केली आहे. सध्या पीक चांगल्या वाढीच्या अवस्थेत असून, एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. चिया हे प्रथिने, ओमेगा-३ फॅट ऍसिड आणि फायबरयुक्त आरोग्यदायी तेलबिय पीक आहे. साधारणपणे रब्बी हंगामात घेतले जाणारे हे पीक अंभोरे यांनी खरीप हंगामात नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर घेतले असून, कमी खर्चात अधिक उत्पादनाचा अनुभव त्यांनी मिळवला आहे. अंभोरे यांचा हा यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कृषी विभागानेही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भविष्यात वाशीम जिल्ह्यात चिया लागवडीचा व्याप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाईट: सरला देवराव अंभोरे, महिला शेतकरी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 09:42:54
Akola, Maharashtra:राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार घोषित केले असून नगराध्यक्ष पदासाठी चार ठिकाणांहून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे .. १) बार्शीटाकळी नगरपंचायत - अख्तर खातून अलिमोद्दीन २) मूर्तिजापूर नगरपरिषद - शेख इम्रान शेख खलील ३)अकोट नगरपरिषद - स्वाती मंगेश चिखले ४) तेल्हारा नगरपरिषद - विद्या सिद्धार्थ शामस्कार या घोषणेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाने स्थानिक पातळीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रचाराला गती देण्याची तयारी सुरू केली आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 12, 2025 09:17:27
Nashik, Maharashtra:नंदिनी नदीच्या परिसरात एसटीपी प्लांट च्या कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध मागणी मान्य व्हावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आगामी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येणार आहे...तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते उपस्थित असणार आहे... मात्र नाशिकच्या टाकळी परिसरात असलेल्या नंदिनी नदी परिसरात नव्याने चौदाशे कोटी रुपयाचा एसटीपी प्लांट तयार करण्यात येणार आहे.. याला स्थानिक नागरिकांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय... या संदर्भात नंदनी नदीच्या किनारी आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे... एसटीपी प्लांटला विरोध नाही मात्र एसटीपी प्लांट तयार करत असताना नंदिनी नदीच्या प्रवाहाचा वापर न करता थेट पाईपलाईन द्वारे एसटीपी प्लांट ला पाणी द्यावं अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येते. उद्या मुख्यमंत्री नाशिकला येणार असून यावेळी घेराव घालून त्यांना निवेदन देण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी केलाय.... यासंदर्भात आंदोलन करते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 12, 2025 08:58:13
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 12, 2025 08:57:54
Ratnagiri, Maharashtra:महाराश्‍ट्रातील पहिला महायुतीच्या नगराध्यक्षाचा उमेदवारी अर्ज खेडमध्ये दाखल सौ. माधवी राजेश बुटाला शिवसेना पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शिवसेना उपनेते संजयराव कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे ल, तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे यांच्यासह चिपळूणचे माजी आ. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल खेड शहरातील युतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले यानंतर शहरातून भव्य अशी मिरवणूक देखील वाजत गाजत काढण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीची संख्या लक्षात घेता महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील अशी विश्वास उपस्थितींनी व्यक्त केला
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 12, 2025 08:33:53
Pune, Maharashtra:तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे. तळेगाव नगरपरिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. या युतीबाबतच शिक्कामोर्तब मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर यावर्षी प्रथमच तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 17 जागांवर तर भाजप 11 जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे.
73
comment0
Report
Advertisement
Back to top