Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापुर नगर परिषद चुनाव: मतदान पूरा, परिणाम से पहले फटाकों की गूंज

JMJAVED MULANI
Dec 02, 2025 13:16:05
Baramati, Maharashtra
इंदापूरात निकालापूर्वीच फुटले फटाके.... इंदापूर नगर परिषदेसाठी पार पडलं मतदान..... इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अतितटीची लढत...... इंदापूरच्या निकालाकडे राज्याचं लक्ष..... ANCHAR इंदापूर नगर परिषदेची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालीये.इंदापूर नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. इंदापूर नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल लागण्यापूर्वीच इंदापूर मध्ये फटाके फुटलेले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय साडेपाच वाजता ची वेळ संपल्यानंतर इंदापूर शहरात नगर परिषदेच्या समोर वसई कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच दोन्ही बाजूकडून फटाक्यांची आशिषबाजी केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या विरोधात तब्बल 18 ते 19 वर्ष पक्षासोबत राहिलेले प्रदीप गारटकर यांनी स्थानिक आघाडी करत अजित पवारांना आव्हान दिलय. त्यामुळे इंदापूर नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता अनेकांना आहे ...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Dec 02, 2025 13:32:45
Buldhana, Maharashtra:आमदार पुत्राच्या परक्रमानंतर माजी आमदाराची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस मतदान सुरू असल्याचा आणि काही बोगस मतदार पकडले गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पकडलेल्या बोगस मतदारांना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या हस्तकांनी हस्तक्षेप करून मतदाराला पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 13:18:38
66
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 02, 2025 12:35:58
135
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 12:16:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पलूस मध्ये बोगस मतदानावरून काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादावादी. पुण्यातून आलेल्या एका मतदारावर अजित पवारांचे राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतला. परंतु त्या मतदाराच्या बाजूने काँग्रेसने भूमिका घेतल्याने दोन्ही गट आमने-सामने आले. पुण्यातील एक मतदार पलूस नगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता.यावेळी त्याचे आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही,त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.तसेच सकाळपासून पलूस येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये सात ते आठ बोगस मतदार आढळण्याचे देखील त्यांनी आरोप केला. यावेळी काँग्रेस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु यावेळी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून पिटाळून लावले.
110
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 12:16:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीच्या तासगाव नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला.तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला.तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला.यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील ही संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले.त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला.यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावले,पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे,कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
116
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 11:07:34
108
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 10:37:35
Shirdi, Maharashtra:निवडणुकीची गोंधळाची अवस्था झालेली आहे.... निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष आहे..... अगोदरच Evm वर शंका आता आणखी काळजी घ्यावी लागे.... २० दिवस हे सगळं सांभाळायचं राखण बसायचं का लोकांनी?..... या सगळ्या निर्णयामुळे लोकांचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही.... अशा प्रकारच्या निर्णयामुळे, जनतेचे, उमेदवारांचे हाल होत आहे.... शासकीय हस्तक्षेपातून निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले जातात ते असे असतात... नको वाटणाऱ्या गोष्टी निवडणुकीत घडताय.... निवडणूक आयोगाला सगळे अधिकार असतात न्यायालयाचे तोंडून ऐकून घेतलं तर स्वतःवरच अपवाद जातो.... सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम चालू...* निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे ते समजून घेत नाही.... अधिकारी जेवण करून झोपतील येथे उमेदवारांना जनतेला झोप नाही.... लोकशाहीची प्रक्रिया निकोप असली पाहिजे मात्र दुर्दैवने तसं नाही.... निवडणूक आयोगाचे वागणं निरपेक्ष आणि स्वायत्त पाहिजे तसे दिसत नाही.... तीन तारखेलाच मतमोजणी झाली पाहिजे होती... निवडणूक कार्यक्रमाची आखणीच सदोष होती... *मंत्रालयातील एखाद्या पीएने निवडणूक कार्यक्रम काढावा आणि जनतेला द्यावा असा कार्यक्रम....* *आम्ही ईव्हीएमची काळजी घेऊ विजय आमचाच...* *राहात्याला ईव्हीएम कशाकरता बदलले असे म्हणत विखे पाटलांवर निशाणा....* अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस पेटून उठतोय हे सकारात्मक...
110
comment0
Report
Advertisement
Back to top