Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

बिहार NDA की जीत पर चंद्रपुर भाजपा ने गांधी चौक में जोरदार जश्न

AAASHISH AMBADE
Nov 14, 2025 15:34:12
Chandrapur, Maharashtra
बिहार मधील एनडीएच्या विजयाचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, स्थानिक गांधी चौकात आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप करत केली फटाक्यांची आतिषबाजी, ढोल वाजवून विजयाचा आनंद व्यक्त केला. अँकर: बिहार विधानसभेतील एन.डी.ए.च्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात नाचत गात विजयाचा जल्लोष साजरा केला. बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा विश्वास आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
166
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 14, 2025 14:52:18
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केंद्र चातगावला पोलीस स्टेशन म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे. या अन्वये नवीन पोलीस स्टेशन चातगाव ची निर्मिती करण्यात आली असून या भागातील गुन्हेगारी आणि नक्सली कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रभावीपणे याचा वापर होणार आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या हस्ते आज पोलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन पार पडले. सन 2010 साली चातगाव येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. सद्यस्थितीत पोलीस स्टेशन चातगाव अंतर्गत 26 गावे जोडली जाणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांना तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसोबत पोलीसांचा संवाद वाढून नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. निलोत्पल यांनी पोलीस स्टेशन चातगाव अंतर्गत सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, SRPF अंमलदार बॅरेंक, इत्यादींना भेट देवुन पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली.
151
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 14, 2025 14:51:56
Vasai-Virar, Maharashtra:वसईत आज वनमंत्र्यांच्या पाहणी दौरा , आणि जनता संवाद पालिकेच्या सुसज्ज रुग्णालयाच्या जागेची पाहणी नाट्यगृहाची क्षमता कमी असल्या वरून नाईकांची नाराजी अँकर - वसईत आज वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान त्यांनी आचोळे येथे उभारण्यात येत असलेल्या पालिकेच्या सुसज्ज रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली. यानंतर मंत्र्यांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या नालासोपारा येथील पालिकेच्या नाट्यगृह प्रकल्पाची पाहणी केली. पाहणीदरम्यान सदर प्रकल्प प्रत्यक्षात नाट्यगृह नसून केवळ मिनी थिएटरच्या स्वरूपात असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. पालिका प्रशासनाने प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही नाईक यांनी दिले. बाईट- गणेश नाईक , पालकमंत्री.
174
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 14, 2025 14:05:07
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: शिवसेनेचे ९ उमेदवार जाहीर! महायुती उद्या शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आगामी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) नगरसेवक पदाकरिता आपल्या नऊ (९) उमेदवारांची नावे आज अधिकृतपणे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही नावे घोषित करण्यात आल्यााची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत नावांची घोषणा आज रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत, शिवसेना रत्नागिरी जिल्हा निवडणूक प्रभारी यशवंत जाधव, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, विलास चाळके, आणि बंड्या साळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार (प्रभागानुसार): | प्रभाग क्रमांक | उमेदवाराचे नाव | |---|---| | प्रभाग २ | निमेश नायर | | प्रभाग ३ | राजन शेट्ये | | प्रभाग ५ | सौरभ मलुष्टे | | प्रभाग ७ | गणेश भारती | | प्रभाग ७ | श्रद्धा हळदणकर | | प्रभाग ८ | बाळू साळवी | | प्रभाग ९ | विजय खेडेकर | | प्रभाग १३ | सुहेल साखरकर | | प्रभाग १३ | आफरीन होडेकर | उद्या महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन! शिवसेनेचे हे ९ आणि भाजपचे ६, असे महायुतीचे एकूण १५ उमेदवार उद्या, शनिवार दिनांक (तारीख) रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुती जोरदार शक्तिप्रदर्शन रॅली काढणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सावळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही असा विश्वास यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.
200
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 14, 2025 13:49:53
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, कोल्हापुरात भाजपचा जल्लोष साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देशभरात भारतीय जनता पार्टी और जनता दल यूनायटेड या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कोल्हापुरातही भाजपच्या वतीने छत्रपतीय शिवाजी चौकात एकत्र जमत कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला. यावेळी साखर- पेढे, लाडू, गुलाबजाम नागरिकांना वाटून आनंद साजरा करण्यात आला खासदार धनंजय महाडिकही या जल्लोषात सामील झाले त्यांनीही कार्यकर्त्यांसोबत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला.
111
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 12:24:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचा राज्यातील पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल, उरुण ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलां विरोधात महायुती एकवटली.. अँकर - महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज सांगलीच्या उरूण ईश्वरपूरसाठी दाखल करत प्रचारांचा नारळ फोडला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.उमेदवारी दाखल करण्याच्या आधी उरुण ईश्वरपूर मध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करत जोरदार रॅली देखील काढण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील त्यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या उरूण ईश्वरपुर मध्ये एकत्रित येत जयंत पाटलांच्या विरोधात दंड थोपटलाय,या ठिकाणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगेंना नगराध्यक्ष पदाच्या मैदानात भाजपाने उतरवले,त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरपरिषदची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचा स्पष्ट झालय.. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.
70
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 14, 2025 12:19:14
Kalyan, Maharashtra:टॅक्स भरतो, मग रस्ता कुठे?'...संतप्त महिलांचं श्राद्ध घालत आंदोलन केडीएमसी मुख्यालयाबाहेर 'आई एकविरा महिला मंडळा'चा महापालिका अधिकाऱ्यांविरोधात एल्गार! कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज 'आई एकविरा महिला मंडळा'ने आक्रमक पवित्रा घेतला. क.डॉ.म.पा. मुख्यालयाच्या बाहेर महिला मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले.आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेत नसल्याने आई एकविरा महिला मंडळा'ने गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला. यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी "आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स जातो कुठे?" असा संतप्त सवाल उपस्थित करत. "दंड वसूल करायला येता, पण पाणी, रस्ता आणि सुविधा मात्र देत नाही," अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. बाईट... नागरिक
153
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:48:00
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी AIMIM निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून जिल्ह्यातील चार नगरपालिकेत पूर्ण ताकतीने निवडणुक लढणार असल्याचे पक्ष निरीक्षक शारिक नकशबंदी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मतदारांनी सत्तेचा अनुभव घेतला असून विकासाच्या दुष्काळामुळे कुठलाच ठोस विकास झालेला नाही, त्यामुळे सर्व समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदूरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले जाणार आहेत. AIMIM निवडणुकीत उतरणार असल्याने अनेकांचे गणित बदलेल, गेल्या वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या नेत्यांनी पाण्याच्या समस्या, गटारी, रस्ते अशा विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांना न्याय मिळण्यासाठी AIMIM सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन उमेदवारी देणार आहे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
146
comment0
Report
Advertisement
Back to top