Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला नगरपालिका चुनाव के लिए एनसीपी की तीन योजनाएं: बहुमुखी उम्मीदवार, गठबंधन विकल्प

JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 06:55:10
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकांना येणार्‍या जानेवारी महिन्यात पार पडणार असल्याची माहिती आली आहे. डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने तयारी सुरू केली असून महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. पक्षाकडे निवडणुकेसाठी तीन प्लॅन तयार असल्याचे मिटकरी यांनी नमूद केले. प्लॅन ए: महायुतीसोबत निवडणूक लढवणे. प्लॅन बी: शिंदे गटासोबत युती करून निवडणूक रिंगणात उतरणे. प्लॅन सी: स्वबळावर निवडणूक लढवणे. अकोल्यात राष्ट्रवादीला मजबूत भूमिका मिळू शकते आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 12, 2025 08:33:53
Pune, Maharashtra:तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे. तळेगाव नगरपरिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. या युतीबाबतच शिक्कामोर्तब मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर यावर्षी प्रथमच तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 17 जागांवर तर भाजप 11 जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 12, 2025 08:25:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने रक्कम जमा केली, मात्र बँकांनी थकबाकीदारांचे पैसे रोखून ठेवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावमध्ये समोर आलाय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य शासनाने नुकतीच मदतीची रक्कम जमा केली असली तरी ती मिळण्याआधीच बँकांनी थकबाकीच्या कारणावरून होल्ड लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिले असताना गल्लेबोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खात्यातून पैसे काढता येत नाहीत. तसेच बँकांमध्ये कर्ज थकबाकी, पतसंस्थेतून घेतलेले कर्ज किंवा तांत्रिक कारणे दाखवून रक्कम रोखून धरली जात आहे, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत. याबाबत काही ठिकाणी शेतकरी शाखा व्यवस्थापकांकडे धाव घेत आहेत.. दरम्यान असे काही झाले असेल तर शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापकाकडे यावे असे आवाहन आता बँक मॅनेजर करताय
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 12, 2025 08:14:47
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्हा काँग्रेस प्रभारी वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये कोणताच वाद नसल्याचे सांगितले मात्र आजच्या बैठकीला काँग्रेस नेते सुनिल केदार मात्र अनुपस्थित होते.. आज काही नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे सांगितले. सुनील केदार यांच्या गैरहजेरी बद्दल विचारले असता केदार मुंबईला असल्याने बैठकीत गैरहजर असल्याचे वीरेंद्र जगताप म्हणाले. 7 नोव्हेंबरला सुनील केदार यांच्या गटाने जिल्हा निवड मंडळाच्या गैरहजेरीत नगर परिषद व नगर पंचायतच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या ...मात्र प्रदेश काँग्रेसने सुनील केदार यांच्या मनमानीला चाप लावत आज नव्याने इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात 15 नगरपरिषद व 12 नगरपंचाय साठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. 16 नोव्हेंबर पर्यंत उमेवारांचे नावे निश्चित केली जाईल असे वीरेंद जगताप यांनी सांगितले. बाईट - वीरेंद्र जगताप, जिल्हा प्रभारी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 12, 2025 08:10:04
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व प्रशासनाकडून चालवण्यास नकार देण्यात आला आहे. कारखान्यातील कामगारांनी वेतन वाढीसह इतर मुद्द्यावर आंदोलन सुरू केल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं अथर्वचे मानसिंगराव खोराटे यांनी जाहीर केले आहे. यामुळे चंदगड परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साखर कारखाना सुरू होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणी केली आहे. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 08:09:33
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 12, 2025 08:08:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली में मुलशी पॅटर्न का थरार, डबल मर्डर ने हादरली सांगली. अपराध की इस घटना में दलित महासंघ के अध्यक्ष उत्तम मोहिते का घर में घुसकर निर्घृण हत्या किया गया. इस घटना के दौरान एक हल्लेखोर की भी मौत हुई है. हूबेहूब मुलशी पॅटर्न फिल्म के दृश्य जैसे इस घटनाक्रम को बताया गया, वर्चस्व के विवाद से हत्या की आशंका व्यक्त की जा रही है. उत्तम मोहिते के बारे में बताया गया कि वे सांगली के सामाजिक कार्यकर्ता और दलित महासंघ मोहिते समूह के संस्थापक अध्यक्ष थे. मंगलवार रात उन्हें जन्मदिन के अवसर पर शुभकामनाओं के कार्यक्रम के बीच हमला किया गया, और बाद में हत्या की गई. हमलों के समय घर के पास मौजूद एक अन्य व्यक्ति, शाहरुख शेख, गंभीर रूप से घायल हुआ जिसे अस्पताल में भर्ती कराया गया, पर इलाज के दौरान उसकी मृत्यु हो गई. घटना के आरोपियों में आठ से दस लोग बताए जाते हैं, कुछ हिरासत में हैं; पुराने वाद-विवाद के कारण हत्या की आशंका है.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 12, 2025 08:07:45
Dharashiv, Maharashtra:धाराशिव तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी संतोष कदम आणि चंद्रकांत कने भाजपमध्ये दाखल! आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश धाराशिव – तुळजापूर येथील चर्चित ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी आणि जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम तसेच चंद्रकांत कने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला ड्रग्स तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या दोघांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने निकाल लागेपर्यंत दोघांना धाराशिव तहसील हद्दीत येण्यास बंदी घातली आहे. हा जामीन 10 ऑक्टोबर रोजी मंजूर करण्यात आला. नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर ड्रग्स प्रकरणातील या आरोपींचा भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 08:07:29
Amravati, Maharashtra:लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला; बडनेरा येथील धक्कादायक घटना अँकर : अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ zee 24 तासच्या हाती आले आले. नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू हीच त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली, नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपी कडून करण्यात आला. आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार जखमी सुजल समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या आरोपीचा शोध आता बडनेरा पोलीस घेतो असून यापूर्वी देखील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी धाब्यावर महिलेस मारहाण केली होती त्यामुळे बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होतो.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 12, 2025 08:06:34
Pune, Maharashtra:स्लग:- जैन शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांच्या भेटीला फीड 2C Anc:- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित कार्यालयाच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे सातत्याने आरोप करत आहेत...या अनुषंगाने या जागेसंदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी सकल जैन समाजाचे शिष्टमंडळ तसेच श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे...काळे यांनी आ.जगताप यांच्यावर आरोप करताना जगताप यांनी स्वतःच्या कार्यालयासाठी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकवल्याचा आरोप केलाय, तर संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे मंदिर नव्हते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किरण काळे यांनी राजकीय सूड उगवण्यासाठी आणि ट्रस्टला बदनाम करण्यासाठी खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे या घटनेतील वास्तविकता आणि पोलीस अधीक्षकांना सांगितले असून खोटी तक्रार दाखल करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी म्हटलं आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 08:06:02
Shirur, Maharashtra:पिंपरखेड/शिरूर/पुणे - वनमंत्री गणेश नाईक ग्रामस्थ सोबत चर्चा - इस गावातील तीन जणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला येथील वातावरण दुखःद आहे - पुणे और नगर जिल्ह्यात हायटेक करण्यासाठी मी निर्देश दिले आहे - पहिले बिबट्याची संख्या मानवी वस्तीत नव्हती मात्र उसाची लागवड जास्त झाली त्यावेळी त्यांना उसाची शेती म्हणजे आमचा अधिभास आहे असा त्यांचा समज झालाय - वनविभाग सतर्क आहे - अन्य राज्यात बिबटे पाहिजे असतील तिथे पाठविण्यात येथील - वस्तू खरेदी करता येईल मात्र जीव नाही - नसबंदी हा पर्याय केंद्र - आमच्या कोकणात उतरले आहे - बिबट्याची संख्या कमी केली पाहिजे नाहीतर कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील - मी बदनाम झालो - बदनाम व्हायला मंत्री झालो आहे की काय - लोकांचा माझ्यावर दोष असला तरी लोकांचा जीव जाता कामा नये - आपल्या सर्वांचे सहकार्य लागेल आता यापुढे अशी घटन नको - जी चंद्र पूर मध्ये यंत्रणा वापरली ती आता पुणे जिल्ह्यात वापरणार आहे - मी मंत्री म्हणून आलो नाही एक माणूस म्हणून मी या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलोय - गुन्हे दाखल झाले त्याबाबत निर्णय घेऊ - बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 07:38:21
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 07:16:00
Shirur, Maharashtra:मी मंत्री म्हणुन नाही तर माणुस म्हणुन इथं आलो आंदोलनातील गुन्ह्यांवर कारवाई करु नका या घटनेची खंत व्यक्त करत ऊस तुम्ही लावला त्या ऊसात ससे लांडगे कोल्हे असल्याने बिबट्याला शिकार आयती मिळतेय हा दोष कुनाचा हतबल वनमंत्र्यांचा माध्यमांना सवाल दोष कुनाचा हि परिस्थिती सर्व ठिकाणी उद्धभवली पण यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असुन हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्यावा शुट करा अशी आक्रमक भुमिका वनमंत्री गणेश नाईकांनी घेतली वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी गणेश नाईक माध्यमांशी बोलत होते
0
comment0
Report
Advertisement
Back to top