Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
पुणे-छत्रपति संभाजी नगर नए महामार्ग का नक्शा वायरल, किसानों की जमीन लेनदेन चर्चा
VKVISHAL KAROLE
Nov 12, 2025 03:30:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल झालाय. महामार्गा ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातेय याची कसलीच माहितीच नाही.. आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत आहेत. हा नकाशा व्हायरल झाला आहे..पण प्रश्न आहे की केवळ सरकार कडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला. सरकार याची चौकशी करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होताय... दरम्यान व्हायरल झालेला नकाशा खरा की खोटा माहिती नाही मात्र या नकाशाच्या आधारे कोट्यावधींचे व्यवहार मात्र ग्रामीण भागात रोज सुरू आहेत...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 12, 2025 05:35:33
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 05:16:55
Washim, Maharashtra:रात्री शेतकऱ्याच्या कोठ्यात लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. भगवान गंगाराम भारती या शेतकऱ्याच्या कोठ्यात लागलेल्या आगीत जनावरांचा चारा, शेतीसाठीचे साहित्य, मोटर पंप, केबल, टिनपत्रे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. या आगीत एका वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन बैल ६० टक्के भाजले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने आणि रिसोड नगरपालिका 的 अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 12, 2025 05:16:27
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रजनन काळ असलेल्या या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा वन्यजीवप्रेमींचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात शंभरहून अधिक वाघ आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रादेशिक व राखीव जंगलांमध्ये वाघांची संख्या 100 व त्याहून अधिक आहे. उत्तम वनव्यवस्थापन आणि अधिवासासाठी लागणारी अनूकूल वातावरण निर्मिती वाघ संख्येच्या वृद्धीचे मुख्य कारण आहे. मात्र वाढते वाघ प्रादेशिक व राखीव जंगलांच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये शिरकाव करत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षाने परिसिमा गाठली आहे. पीक पेरणी व कापणीच्या काळात मोठ्या संख्येत वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे मृत्यू होत आहेत. हे टाळण्यासाठी वनविभागाने सातत्याने हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना जेरबंद करण्याची मोहीम चालविली आहे. याचाच दुसरा उपाय म्हणजे काही वाघांना राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले जात आहे. मात्र हल्लेखोर व समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्यापेक्षा ज्या वाघिणीनी कुठलेही हल्ले केले नाहीत व समस्याग्रस्त नाहीत अशा वाघिणींना हलवले जात आहे त्यामुळेच हा विरोध केला जात आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 05:04:47
Beed, Maharashtra:बीड:वाळू माफीयांची दहशत; सीना नदी पात्रातील वाळू उपसा थांबविल्याने वाळू माफियांकडून शेतकऱ्यावर हल्ला आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांची दहशत पहायला मिळाली. नऊ जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्यावर तसेच घरावर आणि वाहनांवर हल्ला करण्यात आला. वाकी परिसरात असलेल्या सीना नदी पात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू होती. याच दरम्यान नदी शेजारील असलेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार रोखला. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने दोघा शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. हल्लेखोर यावरच थांबले नसून शेतकऱ्याच्या घरावर पाण्याच्या प्लांटवर आणि वाहनांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाळू माफियांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी हल्ला झालेल्या शेतकऱ्याने केली. बाईट: दीपक आस्वार फिर्यादी शेतकरी
110
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 04:34:57
Amravati, Maharashtra:दिल्ली ब्लास्ट प्रकरणानंतर अमरावतीत हाय अलर्ट जारी; शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी अँकर :– दिल्ली ब्लास्ट प्रकरणानंतर अमरावतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात अमरावती शहर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू आहे. दिल्लीमधील घटनेनंतर राज्यात मोठ्या शहरांमध्ये वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील वाहनांची तपासणी आणि वाहन चालकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान कोणी संशयित आढळल्यास त्यांची कसून चौकशी पोलीस करत असून रात्री उशिरापर्यंत ही नाकीबंदी सुरू होती.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 04:16:15
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे.या प्रचंड आवकेमुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याने आज (बुधवार) शेतमाल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीकडून घेण्यात आला आहे.या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने सर्व व्यापारी, हमाल-मजूर आणि शेतकरी यांना सूचना जारी केल्या आहेत.शेतकऱ्यांनी आज बाजारात शेतमाल न आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोयाबीनच्या विक्रमी आवकेमुळे बाजार परिसरात मोठी गर्दी झाली असून, परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर गुरुवारपासून पुन्हा खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे。
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 12, 2025 04:15:42
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त — सहकार क्षेत्रात खळबळ! वारंवार सूचना करूनही बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नाही... आणि अखेर राज्य मंत्रिमंडळाने धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक दीर्घकाळापासून आर्थिक संकटात सापडली होती. वारंवार सहकार विभागाकडून सूचना देऊनही बँकेची आर्थिक घडी बसली नाही. यामुळे राज्य मंत्रिमंडळानं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेत प्रशासकाची नेमणूक केली आहे. बँकेवर 29 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याचा आरोप असून, आर्थिक दिवाळखोरीतून संस्था बाहेर काढण्यात संचालक मंडळ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 2007 मध्ये तत्काळीन सहकार मंत्र्यांनी या बरखास्त प्रस्तावावर स्थगिती दिली होती, मात्र आता ती स्थगिती उठवून मंत्रिमंडळानं थेट कारवाई केली आहे. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महायुतीचं वर्चस्व होतं.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 12, 2025 03:46:29
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पාර्श्वभूमीवर निवडून प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून जिल्हाभरात कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. अकोला–हैदाबाद महामार्गावरील मालेगाव परिसरात स्थिर पथक (SST) तर्फे वाहनांची काटेकोर तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान संशयास्पद वाहनांची पाहणी करून रोख रक्कम, दारू किंवा इतर अनधिकृत साहित्याची वाहतूक होत नाही ना, याची खात्री करण्यात येत आहे. निवडणुकीचा काळ जवळ आल्याने प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केल्या असून, जिल्ह्यात शांत, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणूक पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे तयारीत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top